शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
3
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
4
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
5
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
6
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
7
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
8
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
9
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
10
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
11
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
12
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
13
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
14
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
15
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

बोगस पदव्या देणाऱ्या संस्थांचा सर्च रिपोर्ट लवकर सादर करा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 27, 2018 17:58 IST

बोगस पदव्यांचा हा बाजार महाराष्ट्रापुरता सिमीत नाही. याची पाळेमुळे देशभर पसरली आहेत. अनेक संस्थांना मान्यता राहत नाही.

धर्मराज हल्लाळे

बोगस पदव्या देणाऱ्या संस्थांची शोध मोहीम महाराष्ट्रातील उच्च शिक्षण खात्याने आरंभिली आहे. यापूर्वीही बोगस पी.एचडी.पदव्यांची चर्चा झाली. काहीजणांना नोकऱ्या सोडाव्या लागल्या. तर अनेकांनी आपली पदवी योग्य असल्याचे सिध्द करण्याचा आटापिटा आजही सुरू ठेवला आहे. दरम्यान, उच्च शिक्षण विभागाने पुन्हा एकदा बोगस पदव्या देणाऱ्या संस्थांचे सर्चिंग करण्याचा आदेश दिला आहे. अशी बोगस पदवी मिळवून महाराष्ट्रातील काही महाविद्यालये तसेच विद्यापीठांमध्ये नोकरी बळकावणारे महाभाग असल्याच्या तक्रारी आहेत. जगाच्या कानाकोपऱ्यातील काही संस्थांची नावेही मोठ्या अभिमानाने सांगितली जातात.

 

बोगस पदव्यांचा हा बाजार महाराष्ट्रापुरता सिमीत नाही. याची पाळेमुळे देशभर पसरली आहेत. अनेक संस्थांना मान्यता राहत नाही. अधिकृत शिखर संस्थांशी त्या निगडित असत नाहीत. परंतू मोठ्या जाहिराती देऊन आपले विद्यापीठ किती नामांकित आहे, हे सांगितले जाते. त्या विद्यापीठाचे अभ्यासक्रम महाविद्यालयांना दिले जातात. जसे विद्यापीठ, तसे महाविद्यालय आणि मग पदव्याही तशा बोगसच. साधारणत: दिल्ली, मध्यप्रदेश आदी राज्यांमधून या संस्थांचा कारभार चालविला जात असल्याच्या तक्रारी शिक्षण विभागाकडे झाल्या. त्यामुळे राज्याच्या उच्च शिक्षण विभागाने शोध मोहीम सुरू केली. त्यात दोषी संस्था, व्यक्ती आढळल्यास कठोर कारवाईचे निर्देश देण्यात आले आहेत. शिक्षण विभागाने राज्यातील सर्व विद्यापीठे, कृषी विद्यापीठे  यांना पत्र पाठवून बोगस पदव्या देणाऱ्या संस्थांची, तसेच त्या पदव्या मिळवून नोकरी मिळवणाऱ्यांची तपासणी करून वस्तूनिष्ठ अहवाल देण्याचे निर्देश दिले आहेत. प्रश्न हा आहे की, वस्तूनिष्ठ अहवाल मिळाल्यानंतर शिक्षण विभाग किती तत्परतेने या संस्थांवर कारवाई करेल, त्याहूनही महत्वाचे म्हणजे ज्यांनी अशा पदव्या मिळवून नोकऱ्या मिळविल्या आहेत, त्यांचे काय होणार? एकीकडे दिवसरात्र परिश्रम घेऊन, अभ्यास करून विद्यार्थी पदवी मिळवितात. रोजगारासाठी धडपडतात. शिक्षण घेण्याइतकी ऐपत नसलेले अनेकजण शैक्षणिक कर्ज घेऊन शिकतात. अशा सर्व कष्टाळू व मेहनती विद्यार्थ्यांवर हे बोगस पदवी घेणारे घोर अन्याय करतात. त्यामुळे शोध मोहीम लवकरात लवकर संपवून जो काही अहवाल आहे, तो उघड केला पाहिजे. ज्या संस्था बोगस, ज्यांच्या पदव्या बोगस त्यांची  नावे तातडीने जाहीर केली पाहिजेत. अन्यथा वर्षानुवर्षे शोध आणि चौकशा सुरू राहिल्या तर पिढ्या बरबाद होतील. एका बाजुला प्रमाणिक विद्यार्थ्यांवर अन्याय तर दुसरीकडे बोगस शिक्षण व्यवस्था देश पोखरून टाकेल.

 

पारंपरिक शिक्षण तसेच तंत्र, वैद्यकीय, कृषी अशा विविध शाखांचे शिक्षण आणि त्यांना मान्यता देणाऱ्या शिखर संस्था, शासनमान्य विद्यापीठे आपल्या समोर आहेत. ज्यावेळी चौकशी पूर्ण होईल, तेव्हा बोगस असणारी विद्यापीठे गायब होतील. चार-दोन खोल्यांमध्ये चालणारी ही विद्यापीठे आणि त्यांनी दिलेल्या  पदव्या आपण का स्विकारतो हा खरा प्रश्न आहे. कसलेही संशोधन न करता थेट पीएच.डी. विकणारे  महाभाग असतीलही, ज्यांना बाजार भरवायचा आहे. परंतू, काहीही मेहनत न करता पदवी घेणारे मोठे गुन्हेगार आहेत. त्यामुळे ज्यांच्याकडे बोगस पदव्या आढळतील त्यांना शिक्षण व्यवस्थेतून हद्दपार केले पाहिजे. अनेक चतूर लोक आपण मिळविलेली पदवी अधिकृत विद्यापीठाची आहे, हे भासवतात. तक्रारी झाल्यानंतर न्यायालयात धाव घेतात. परंतू अन्य कुठल्याही भ्रष्ट व्यवहारापेक्षा शिक्षणातील भ्रष्ट कारभार  प्राधान्याने अधिक कठोरपणे निपटून काढण्याची गरज आहे. त्यामुळे उच्च शिक्षण विभागाने या आठवड्यात उचललेले पाऊल स्वागतार्ह असून त्यांनी शोध मोहीम लवकरात लवकर पूर्ण केली पाहिजे. जे चुकले त्यांना शिक्षा केली पाहिजे. तरच सर्चिंगच्या आदेशाला अर्थ उरेल.

टॅग्स :Fake Newsफेक न्यूजEducation Sectorशिक्षण क्षेत्र