शहरं
Join us  
Trending Stories
1
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
2
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
3
Asia Cup 2025 : बांगलादेशनं मॅच जिंकली; अफगाणिस्तानला अजूनही स्वबळावर बाजी पलटण्याची संधी, पण...
4
'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ
5
West Indies Squad For India Test Series : दिग्गजाच्या पोराला संधी; माजी कर्णधाराचा पत्ता कट
6
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक
7
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
8
दोन मुंबईकरांसोबत नेट प्रॅक्टिस करताना दिसला हिटमॅन रोहित शर्मा; फोटो व्हायरल
9
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
10
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...
11
म्युच्युअल फंड असावा तर असा...! ₹10000 ची SIP गुंतवणूक ₹1.79 कोटींवर पोहोचली, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
12
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
13
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
14
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय
15
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
16
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
17
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
18
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
19
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
20
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग

पुरामुळे मांजरा- तेरणा संगमावरील नुकसान टाळण्यासाठी राज्य शासनाच्या समितीची पाहणी

By हरी मोकाशे | Updated: May 10, 2023 17:48 IST

राज्य शासनाचे वरिष्ठ अधिकारी औराद शहाजानीत दाखल

औराद शहाजानी : निलंगा तालुक्यातील औराद शहाजनी परिसरात दरवर्षीच्या पावसाळ्यात मांजरा- तेरणा नदी संगमाशेजारी पूरस्थिती निर्माण होऊन शेकडो हेक्टरवरील शेती पिकांचे व शेतीचे नुकसान होते. हे नुकसान टाळण्यासाठी आणि त्यावर कायमस्वरुपी उपाययोजना करण्यासाठी राज्य शासनाने वरिष्ठ अधिकाऱ्यांची समिती गठित केली आहे. या समितीने बुधवारी नदीपात्रात भेट देऊन तांत्रिक पाहणी केली.

लातूर जिल्ह्यातून मांजरा व तेरणा या दोन नद्या वाहतात. मांजरा धरण प्रकल्पाखाली धाराशिव जिल्ह्यात एक व लातूर जिल्ह्यात १४ अशी एकूण १५ बंधारे आहेत. हे बंधारे कर्नाटक सीमेपर्यंतच्या १४८ किमी अंतरावर बांधण्यात आलेले आहेत. याशिवाय तेरणा प्रकल्प खालील बाजूस तेरणा नदी पात्रावर धाराशिव जिल्ह्यात एक तर लातूर जिल्ह्यात ९ असे एकूण १० बंधारे आहेत. मांजरा व तेरणा नद्यावर एकूण २५ बंधारे सिंचनासाठी कार्यान्वित आहेत.अतिवृष्टीच्या काळात पुराच्या पाण्यामुळे या दोन्ही नदीशेजारील आजूबाजूच्या शेतकऱ्यांचे नेहमी नुकसान हाेते. त्यामुळे बॅरेजेसची उंची व संरक्षण भिंत बांधण्याची मागणी स्थानिक लोकप्रतिनिधींनी शासनाकडे केल्याने महाराष्ट्र शासनाने या कामासाठी तांत्रिक सदस्य टीम नियुक्ती केली आहे. त्यासाठी माजी मंत्री आ. संभाजी पाटील निलंगेकर व माजी मंत्री आ. अमित देशमुख यांनी पाठपुरावा केला हाेता.

या शासकीय टीमचे अध्यक्ष छत्रपती संभाजीनगर येथील मुख्य अभियंता विजय घोगरे हे असून समितीत अधिक्षक अभियंता बाळासाहेब शेटे, अधीक्षक अभियंता इ.म. चिस्ती, अधीक्षक अभियंता अभिजित म्हेत्रे, लातूरचे कार्यकारी अभियंता अमरसिंह पाटील, कार्यकारी अभियंता एस. व्ही. वाघमारे, कार्यकारी अभियंता आर.पी. मोरे हे आहेत. या टीमने बुधवारी औराद शहाजानी येथील मांजरा व तेरणा नदी संगमावर भेट देऊन पाहणी केली. याशिवाय, तगरखेडा उच्चस्तरीय बंधारा, औराद उच्चस्तरीय बंधारा, वांजरखेडा कोल्हापुरी बंधारा, कर्नाटक हद्दीतील काेंगळी उच्चस्तरीय बंधाऱ्याची प्रत्यक्ष पाहणी केली. हे पथक क्षेत्रीय परिस्थितीनुसार आवश्यक उपाययोजना तसेच प्रत्यक्ष पाहणीचा अहवाल लवकरच सादर करणार आहे. दरम्यान, यापूर्वीही वॉटर रिसर्च टीमने पाहणी केली होती.

बॅकवॉटरमुळे शेकडो हेक्टरचे नुकसान...दरवर्षी पावसाळ्यात मांजरा- तेरणा नदीस पूर येऊन संगमावर पूरस्थिती निर्माण होते. या नद्यांवरील उच्चस्तरीय बॅरेजचे अतिरिक्त पाणी सोडल्याने जलसाठा वाढून पूर वाढतो. दरम्यान, मांजरा नदीचे पात्र मोठे असल्याने आणि तेरणा नदीचे पाणी पुढे लवकर वाहत नाही. त्यामुळे तेरणा नदीचे पात्र बदलते आणि शेतकऱ्यांच्या शेतामधून हे पाणी वाहते. त्यामुळे काही किमीपर्यंत बॅक वॉटर तयार होतो व परिसरातील शेतकऱ्यांच्या शेकडाे हेक्टर शेतीतील पिकांमध्ये पाणी घुसून नुकसान होते.

टॅग्स :laturलातूरfloodपूरState Governmentराज्य सरकारriverनदी