शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
4
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
5
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
6
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
7
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
8
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
9
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
10
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
11
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
12
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
13
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
14
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
15
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
16
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
17
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
20
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी

पुरामुळे मांजरा- तेरणा संगमावरील नुकसान टाळण्यासाठी राज्य शासनाच्या समितीची पाहणी

By हरी मोकाशे | Updated: May 10, 2023 17:48 IST

राज्य शासनाचे वरिष्ठ अधिकारी औराद शहाजानीत दाखल

औराद शहाजानी : निलंगा तालुक्यातील औराद शहाजनी परिसरात दरवर्षीच्या पावसाळ्यात मांजरा- तेरणा नदी संगमाशेजारी पूरस्थिती निर्माण होऊन शेकडो हेक्टरवरील शेती पिकांचे व शेतीचे नुकसान होते. हे नुकसान टाळण्यासाठी आणि त्यावर कायमस्वरुपी उपाययोजना करण्यासाठी राज्य शासनाने वरिष्ठ अधिकाऱ्यांची समिती गठित केली आहे. या समितीने बुधवारी नदीपात्रात भेट देऊन तांत्रिक पाहणी केली.

लातूर जिल्ह्यातून मांजरा व तेरणा या दोन नद्या वाहतात. मांजरा धरण प्रकल्पाखाली धाराशिव जिल्ह्यात एक व लातूर जिल्ह्यात १४ अशी एकूण १५ बंधारे आहेत. हे बंधारे कर्नाटक सीमेपर्यंतच्या १४८ किमी अंतरावर बांधण्यात आलेले आहेत. याशिवाय तेरणा प्रकल्प खालील बाजूस तेरणा नदी पात्रावर धाराशिव जिल्ह्यात एक तर लातूर जिल्ह्यात ९ असे एकूण १० बंधारे आहेत. मांजरा व तेरणा नद्यावर एकूण २५ बंधारे सिंचनासाठी कार्यान्वित आहेत.अतिवृष्टीच्या काळात पुराच्या पाण्यामुळे या दोन्ही नदीशेजारील आजूबाजूच्या शेतकऱ्यांचे नेहमी नुकसान हाेते. त्यामुळे बॅरेजेसची उंची व संरक्षण भिंत बांधण्याची मागणी स्थानिक लोकप्रतिनिधींनी शासनाकडे केल्याने महाराष्ट्र शासनाने या कामासाठी तांत्रिक सदस्य टीम नियुक्ती केली आहे. त्यासाठी माजी मंत्री आ. संभाजी पाटील निलंगेकर व माजी मंत्री आ. अमित देशमुख यांनी पाठपुरावा केला हाेता.

या शासकीय टीमचे अध्यक्ष छत्रपती संभाजीनगर येथील मुख्य अभियंता विजय घोगरे हे असून समितीत अधिक्षक अभियंता बाळासाहेब शेटे, अधीक्षक अभियंता इ.म. चिस्ती, अधीक्षक अभियंता अभिजित म्हेत्रे, लातूरचे कार्यकारी अभियंता अमरसिंह पाटील, कार्यकारी अभियंता एस. व्ही. वाघमारे, कार्यकारी अभियंता आर.पी. मोरे हे आहेत. या टीमने बुधवारी औराद शहाजानी येथील मांजरा व तेरणा नदी संगमावर भेट देऊन पाहणी केली. याशिवाय, तगरखेडा उच्चस्तरीय बंधारा, औराद उच्चस्तरीय बंधारा, वांजरखेडा कोल्हापुरी बंधारा, कर्नाटक हद्दीतील काेंगळी उच्चस्तरीय बंधाऱ्याची प्रत्यक्ष पाहणी केली. हे पथक क्षेत्रीय परिस्थितीनुसार आवश्यक उपाययोजना तसेच प्रत्यक्ष पाहणीचा अहवाल लवकरच सादर करणार आहे. दरम्यान, यापूर्वीही वॉटर रिसर्च टीमने पाहणी केली होती.

बॅकवॉटरमुळे शेकडो हेक्टरचे नुकसान...दरवर्षी पावसाळ्यात मांजरा- तेरणा नदीस पूर येऊन संगमावर पूरस्थिती निर्माण होते. या नद्यांवरील उच्चस्तरीय बॅरेजचे अतिरिक्त पाणी सोडल्याने जलसाठा वाढून पूर वाढतो. दरम्यान, मांजरा नदीचे पात्र मोठे असल्याने आणि तेरणा नदीचे पाणी पुढे लवकर वाहत नाही. त्यामुळे तेरणा नदीचे पात्र बदलते आणि शेतकऱ्यांच्या शेतामधून हे पाणी वाहते. त्यामुळे काही किमीपर्यंत बॅक वॉटर तयार होतो व परिसरातील शेतकऱ्यांच्या शेकडाे हेक्टर शेतीतील पिकांमध्ये पाणी घुसून नुकसान होते.

टॅग्स :laturलातूरfloodपूरState Governmentराज्य सरकारriverनदी