शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
2
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
3
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
4
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
5
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
6
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
7
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
8
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
9
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!
10
AC बंद, ५ तास लहान मुलं, वृद्ध गरमीने हैराण; एअर इंडियाच्या विमानाचा धक्कादायक Video
11
१५ वर्ष भारतीय सेनेत देशसेवा केली, केदारनाथ हेलिकॉप्टर दुर्घटनेत आला मृत्यू; कोण होते पायलट राजवीर सिंह?
12
कुंडमळा पूल दुर्घटनेनंतर सुप्रिया सुळे घटनास्थळी; जखमींना दिला धीर, मदतीचे निर्देश
13
नागरिकांनी अपघाताची केली होती, शक्यता व्यक्त;सार्वजनिक बांधकाम विभाग प्रशासनाने केले दुर्लक्ष
14
कुंडमळा येथे क्षणात कोसळला पूल..! रांजणखळग्यांमुळे शोध मोहिमेत अडथळे
15
राजकोट किल्ल्यावरील शिवरायांच्या पुतळ्याला पुन्हा धोका?; चबुतऱ्याजवळील माती खचली
16
Pune Bridge Collapse: पूल दुर्घटनेत २ मृत्यू, ३२ जखमी, ६ जणांना वाचवले, मात्र आणखी काही...; CM देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
17
Pune Bridge Collapse: दोन महिन्यांपूर्वी इंद्रायणी नदीवरील पूल बंद झाला होता, बचाव मोहिम सुरू, व्हिडीओ आला समोर
18
नवरी जोमात, नवरा कोमात! लग्नानंतर १० दिवसांनी शॉपिंगच्या नावाने पत्नी फरार, पती पाहतोय वाट
19
एका दिवसात किती भाविक हेलिकॉप्टरने केदारनाथला जातात? किती वेळ लागतो? जाणून घ्या...
20
कुंडमळा दुर्घटनेत पहिला बळी..! बचाव कार्यादरम्यान महिलेचा मृतदेह सापडला

पुरामुळे मांजरा- तेरणा संगमावरील नुकसान टाळण्यासाठी राज्य शासनाच्या समितीची पाहणी

By हरी मोकाशे | Updated: May 10, 2023 17:48 IST

राज्य शासनाचे वरिष्ठ अधिकारी औराद शहाजानीत दाखल

औराद शहाजानी : निलंगा तालुक्यातील औराद शहाजनी परिसरात दरवर्षीच्या पावसाळ्यात मांजरा- तेरणा नदी संगमाशेजारी पूरस्थिती निर्माण होऊन शेकडो हेक्टरवरील शेती पिकांचे व शेतीचे नुकसान होते. हे नुकसान टाळण्यासाठी आणि त्यावर कायमस्वरुपी उपाययोजना करण्यासाठी राज्य शासनाने वरिष्ठ अधिकाऱ्यांची समिती गठित केली आहे. या समितीने बुधवारी नदीपात्रात भेट देऊन तांत्रिक पाहणी केली.

लातूर जिल्ह्यातून मांजरा व तेरणा या दोन नद्या वाहतात. मांजरा धरण प्रकल्पाखाली धाराशिव जिल्ह्यात एक व लातूर जिल्ह्यात १४ अशी एकूण १५ बंधारे आहेत. हे बंधारे कर्नाटक सीमेपर्यंतच्या १४८ किमी अंतरावर बांधण्यात आलेले आहेत. याशिवाय तेरणा प्रकल्प खालील बाजूस तेरणा नदी पात्रावर धाराशिव जिल्ह्यात एक तर लातूर जिल्ह्यात ९ असे एकूण १० बंधारे आहेत. मांजरा व तेरणा नद्यावर एकूण २५ बंधारे सिंचनासाठी कार्यान्वित आहेत.अतिवृष्टीच्या काळात पुराच्या पाण्यामुळे या दोन्ही नदीशेजारील आजूबाजूच्या शेतकऱ्यांचे नेहमी नुकसान हाेते. त्यामुळे बॅरेजेसची उंची व संरक्षण भिंत बांधण्याची मागणी स्थानिक लोकप्रतिनिधींनी शासनाकडे केल्याने महाराष्ट्र शासनाने या कामासाठी तांत्रिक सदस्य टीम नियुक्ती केली आहे. त्यासाठी माजी मंत्री आ. संभाजी पाटील निलंगेकर व माजी मंत्री आ. अमित देशमुख यांनी पाठपुरावा केला हाेता.

या शासकीय टीमचे अध्यक्ष छत्रपती संभाजीनगर येथील मुख्य अभियंता विजय घोगरे हे असून समितीत अधिक्षक अभियंता बाळासाहेब शेटे, अधीक्षक अभियंता इ.म. चिस्ती, अधीक्षक अभियंता अभिजित म्हेत्रे, लातूरचे कार्यकारी अभियंता अमरसिंह पाटील, कार्यकारी अभियंता एस. व्ही. वाघमारे, कार्यकारी अभियंता आर.पी. मोरे हे आहेत. या टीमने बुधवारी औराद शहाजानी येथील मांजरा व तेरणा नदी संगमावर भेट देऊन पाहणी केली. याशिवाय, तगरखेडा उच्चस्तरीय बंधारा, औराद उच्चस्तरीय बंधारा, वांजरखेडा कोल्हापुरी बंधारा, कर्नाटक हद्दीतील काेंगळी उच्चस्तरीय बंधाऱ्याची प्रत्यक्ष पाहणी केली. हे पथक क्षेत्रीय परिस्थितीनुसार आवश्यक उपाययोजना तसेच प्रत्यक्ष पाहणीचा अहवाल लवकरच सादर करणार आहे. दरम्यान, यापूर्वीही वॉटर रिसर्च टीमने पाहणी केली होती.

बॅकवॉटरमुळे शेकडो हेक्टरचे नुकसान...दरवर्षी पावसाळ्यात मांजरा- तेरणा नदीस पूर येऊन संगमावर पूरस्थिती निर्माण होते. या नद्यांवरील उच्चस्तरीय बॅरेजचे अतिरिक्त पाणी सोडल्याने जलसाठा वाढून पूर वाढतो. दरम्यान, मांजरा नदीचे पात्र मोठे असल्याने आणि तेरणा नदीचे पाणी पुढे लवकर वाहत नाही. त्यामुळे तेरणा नदीचे पात्र बदलते आणि शेतकऱ्यांच्या शेतामधून हे पाणी वाहते. त्यामुळे काही किमीपर्यंत बॅक वॉटर तयार होतो व परिसरातील शेतकऱ्यांच्या शेकडाे हेक्टर शेतीतील पिकांमध्ये पाणी घुसून नुकसान होते.

टॅग्स :laturलातूरfloodपूरState Governmentराज्य सरकारriverनदी