लातुरात आवक वाढली; साेयाबीनचे दर गडगडले !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2021 04:23 IST2021-09-22T04:23:38+5:302021-09-22T04:23:38+5:30

लातूर : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत साेयाबीनची आवक हाेताच प्रति क्विंटलचे दर गडगडले आहेत. एका आठवड्यात तब्बल तीन ...

Inflows increased in Latur; Soybean prices plummet! | लातुरात आवक वाढली; साेयाबीनचे दर गडगडले !

लातुरात आवक वाढली; साेयाबीनचे दर गडगडले !

लातूर : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत साेयाबीनची आवक हाेताच प्रति क्विंटलचे दर गडगडले आहेत. एका आठवड्यात तब्बल तीन हजारांनी भावामध्ये घसरण झाल्याने साेयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर चिंता आहे. त्यांना प्रति क्विंटल तीन हजारांचा झटका सहन करावा लागत आहे. १६ सप्टेंबर राेजी लातूरच्या बाजारात साेयाबीनला सर्वसाधारण भाव ८ हजार ९१० रुपयांचा मिळाला आहे, तर मंगळवारी तो प्रति क्विंटलला ६ हजार १५० रुपयांवर घसरला आहे.

लातूर येथील उच्चत्तम कृषी उत्पन्न बाजार समितीत साेयाबीनला गत महिनाभरात तब्बल दहा हजारांवर भाव मिळाला हाेता. आतापर्यंतचा सर्वात उच्चांकी भाव साेयाबीनला मिळाला आहे. मात्र, आवक अत्यल्प हाेती. अनेक शेतकऱ्यांनी चांगला भाव मिळावा यासाठी घरातच ठेवलेले साेयाबीन या काळात विक्रीसाठी बाजार समिती, आडत बाजारात आणले हाेते. ज्यांनी भाव पाहून साेयाबीन बाजारात विक्रीसाठी आणले, त्यांच्या साेयाबीनला दुप्पट भाव मिळाला आहे. मात्र, असे शेतकरी फार कमी आहेत. सध्याला यंदाच्या हंगामातील नवीन साेयाबीनची साेमवार, मंगळवारी माेठ्या प्रमाणावर आवक झाली अन् भाव चक्क गडगडत ६ हजारांवर आले. यातून प्रति क्विंटल तब्बल तीन हजारांची घसरण झाली आहे. १६ सप्टेंबर राेजी लातुराच्या बाजारात साेयाबीनची १ हजार २९७ क्विंटल आवक झाली. याला कमाल भाव ९ हजार १००, किमान भाव ८ हजार ७०० आणि सर्वसाधारण भाव ८ हजार ९१० रुपयांचा मिळाला आहे.

१८ सप्टेंबर राेजी लातूरच्या बाजारात १ हजार २८९ क्विंटल साेयाबीनची आवक झाली. याला कमाल भाव ८ हजार ९९१ रुपयांचा मिळाला. किमान भाव ६ हजार २०१ रुपये, तर सर्वसाधारण भाव ८ हजार ७८० रुपयांचा मिळाला आहे. त्यापाठाेपाठ साेमवार, २० सप्टेंबर राेजी लातूरच्या बाजारात २ हजार ८५७ क्विंटल साेयाबीनची आवक झाली. प्रति क्विंटलला कमाल भाव ६ हजार २९१ रुपये मिळाला, तर किमान भाव ५ हजार ५० रुपये आणि सर्वसाधारण भाव ६ हजार १५० रुपयांचा मिळाला आहे. मंगळवारी लातूरच्या बाजारात ५ हजार २२६ क्विंटलची आवक झाली असून, भाव मात्र गडगडले. साेयाबीनला कमाल भाव ६ हजार ३०० रुपयांचा मिळाला. किमान भाव ४ हजार ६०१ रुपये आणि सर्वसाधारण भाव हा ६ हजार १५० रुपयांचा मिळाला आहे. परिणामी, प्रति क्विंटल जवळपास ३ हजारांचा फरक पडला आहे. भाव घसरल्याने साेयाबीन उत्पादक शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.

जुलैमध्ये मिळाला रेकाॅर्डब्रेक भाव...

लातूर आणि उदगीर येथील बाजार समितीत जुलै महिन्यात साेयाबीनचे भाव १० हजारांपेक्षा अधिक हाेते. आजपर्यंतचा हा भाव रेकाॅर्डब्रेक हाेता. परिणामी, शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण हाेते. मात्र, सप्टेंबरअखेर शेतकऱ्यांच्या साेयाबीनची माेठ्या प्रमाणावर आवक सुरू झाली आणि भाव गडगडले. साेमवार, मंगळवारी तर चक्क ३ हजारांच्या घरात घसरण झाली. १८ सप्टेंबरला ६ हजार २०० रुपयांचा भाव असला तरी, पाेटलीतला भाव हा ५ हजार ५०० रुपयांच्या घरातच हाेता. ज्यावेळी ओलावा आणि माती असल्याचे कारण सांगितले जाते, त्यावेळी शेतकऱ्यांना आहे त्या भावापेक्षा कमी भावात शेतीमाल विकावा लागताे.

Web Title: Inflows increased in Latur; Soybean prices plummet!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.