शहरं
Join us  
Trending Stories
1
नांदेडमध्ये काळजाचा थरकाप! आई-वडील घरात मृतावस्थेत, तर मुलांनी रेल्वेखाली संपवलं आयुष्य
2
ऑस्ट्रेलियात ख्रिसमसपूर्वी ज्यूंवर पुन्हा हल्ला, कारवर 'फायर बॉम्बिंग'; PM अल्बनीज म्हणाले, 'अँटी-सेमिटिझम' कृत्य!
3
सुधीर मुनगंटीवारांचं पक्षाने ऐकलं? आमदार किशोर जोरगेवारांना पदावरून हटवलं; भाजपचा निवडणुकीच्या तोंडावर मोठा निर्णय
4
५० नगरपालिकांमध्ये भाजपाचा नगराध्यक्ष पण नगरसेवकांची संख्या निम्मीही नाही; २ ठिकाणी 'भोपळा'
5
महापालिका निवडणूक २०२६: काँग्रेस-वंचितची आघाडी फिस्कटली! अकोल्यात पाच उमेदवार जाहीर, यादीत कोणाची नावे?
6
“अखेर ‘बाळासाहेबांचे वाघ’ एकत्र आले”; ठाकरे बंधूंच्या युतीनंतर बाळा नांदगावकरांची खास पोस्ट
7
नक्षलवादानंतर अमित शाहांचे नवे मिशन; 2029 पर्यंत देशातून ड्रग्स हद्दपार करण्याचा निर्धार
8
इन्फोसिसमध्ये फ्रेशर्सची चांदी! 'या' पदांसाठी मिळणार २१ लाखांचे पॅकेज; २०,००० नव्या भरतीचे संकेत
9
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून आज पहिले विमान झेपावणार! पहिल्या दिवशी किती फ्लाईट्स उडणार?
10
चंद्रपुरात भीषण अपघात! चालकाला लागलेली एक डुलकी ठरली जीवघेणी; ४ मृत्यू, ५ जण जखमी
11
UPI 'ऑटो-पे'च्या कटकटीतून सुटका! १ जानेवारीपासून लागू होणार ८ मोठे बदल; ग्राहकांचे पूर्ण नियंत्रण
12
संतापजनक! लग्नाला नकार दिल्याने भाडेकरूने तरुणीच्या आईला जिवंत जाळले; प्रकृती चिंताजनक
13
धुळे महापालिका निवडणुकीत महायुती अन् मविआत जागावाटपाचा तिढा; 'स्वबळा'ची तयारी जोरात
14
महापालिका निवडणूक २०२६ : 'एमआयएम'ची वाढती ताकद काँग्रेससाठी डोकेदुखी, संख्याबळासह मतांच्या टक्केवारीतही वाढ
15
भीषण अपघात! चित्रदुर्गात ट्रकशी धडक झाल्यानंतर स्लीपर बसला आग, १७ जणांचा मृत्यू
16
क्रॉस व्होटिंग नको, 'एक पॅनल, एकच चिन्ह'; महायुतीची नवी रणनीती, दगाफटका टाळण्यासाठी खबरदारी
17
'आता हिशोब सरळ आहे'; राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येताच भाजपने मांडलं मतांचे गणित, आकडेवारीत कोण वरचढ?
18
अमेरिकेत ३० भारतीयांना अटक, शिक्षाही होणार! पण नेमका गुन्हा तरी काय केला?
19
३ तासांत चेकद्वारे पैसे मिळणार का? आरबीआयने ऐनवेळी घेतला मोठा निर्णय, वाचा नवे परिपत्रक
20
तैवानमध्ये भूकंपाचे तीव्र धक्के, समोर आला इमारत हलतानाचा धडकी भरवणारा VIDEO
Daily Top 2Weekly Top 5

दाहकता वाढली, लातूर जिल्ह्यातील २८९ गावांमध्ये ठणठणाट; घागरभर पाण्यासाठी पायपीट!

By हरी मोकाशे | Updated: April 4, 2024 17:44 IST

वाढत्या उन्हाबरोबरच पाण्यासाठी चटके, गत पावसाळ्यात वार्षिक सरासरीएवढाही पाऊस झाला नसल्याने जिल्ह्यातील आठ मध्यम प्रकल्पांसह लघु प्रकल्पांमध्ये पुरेशा प्रमाणात जलसाठा झाला नाही.

लातूर : वाढत्या उन्हामुळे तापमानाचा पारा ४० अं.से. च्या वर गेेला आहे. परिणामी, पाण्याच्या बाष्पीभवनाचा वेग वाढला असल्याने पाणीटंचाई चटके वाढले आहेत. सध्या जिल्ह्यातील २४७ गावे आणि ४२ वाड्यांमध्ये पाण्याचा ठणठणाट निर्माण झाल्याने त्या तहानेने व्याकूळ झाल्या आहेत. त्यामुळे अधिग्रहणाद्वारे पाणीपुरवठ्यासाठी प्रस्ताव दाखल होत आहेत.

गत पावसाळ्यात वार्षिक सरासरीएवढाही पाऊस झाला नसल्याने जिल्ह्यातील आठ मध्यम प्रकल्पांसह लघु प्रकल्पांमध्ये पुरेशा प्रमाणात जलसाठा झाला नाही. त्याचबरोबर नद्याही वाहिल्या नाहीत. परिणामी, जिल्ह्यात डिसेंबरपासूनच पाणीटंचाईच्या झळा बसू लागल्या. वाढत्या उन्हामुळे बाष्पीभवनाचा वेग वाढला असून उपलब्ध जलसाठ्यात झपाट्याने घट होत आहे. त्यामुळे ग्रामीण भागात पाणीटंचाई वाढू लागली आहे. घागरभर पाण्यासाठी नागरिकांना पायपीट करावी लागत आहे. सध्या जिल्ह्यातील २८९ गावांत टंचाई जाणवत असल्याने अधिग्रहणासाठी ३९० प्रस्ताव दाखल करण्यात आले आहेत.

सर्वाधिक पाणीटंचाई अहमदपूर तालुक्यात...तालुका - टंचाईग्रस्त गावेलातूर - ३७औसा - ४६निलंगा - ५८रेणापूर - २७अहमदपूर - ७०चाकूर - १७शिरूर अनं. - ०५उदगीर - २०देवणी - १जळकोट - ८एकूण - २८९

११९ गावांना अधिग्रहणाद्वारे पाणी...जिल्ह्यातील २८९ गावांनी अधिग्रहणाद्वारे पाणीपुरवठ्यासाठी ३९० प्रस्ताव पंचायत समितीकडे दाखल केले आहेत. त्याची पाहणी केली असता त्यातील २७ गावांचे प्रस्ताव वगळण्यात आले आहेत. त्यापैकी २०१ गावांचे २४५ प्रस्ताव तहसील कार्यालयाकडे सादर करण्यात आले आहेत. त्यापैकी ११९ गावांना १३२ अधिग्रहणाद्वारे पाणीपुरवठा सुरू करण्यात आला असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या लघुपाटबंधारे विभागाकडून देण्यात आली.

दोन तालुक्यांत अधिग्रहण नाही...जिल्ह्यातील शिरूर अनंतपाळ आणि देवणी तालुक्यातील प्रत्येकी पाच व एका गावाने अधिग्रहणासाठी प्रस्ताव दाखल केले असले तरी अद्यापही मंजूर करण्यात आले नाहीत. त्यामुळे दोन तालुक्यात एकही अधिग्रहण करण्यात आले नाही.

सात गावांना ८ टँकरने पाणी...जिल्ह्यातील १७ गावे आणि एका वाडीस तीव्र पाणीटंचाई जाणवत आहे. त्यामुळे या गावांनी टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याची मागणी करीत प्रस्ताव दाखल केला आहे. त्यापैकी ७ गावांना आठ टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे. त्यात औसा तालुक्यातील लामजना, खरोसा, टाका, मोगरगा, तांबरवाडी/ राजेवाडी, कार्ला आणि अहमदपूर तालुक्यातील टेंभूर्णी या गावांचा समावेश आहे.

१० गावांना टँकरची प्रतीक्षा...अहमदपूर तालुक्यातील फुलसेवाडी, जळकोट तालुक्यातील येलदरा, शिवाजीनगर तांडा, मेवापूर, लातूर तालुक्यातील चिंचोली ब., महापूर, साखरा, बोरगाव बु., गुंफावाडी, निलंगा तालुक्यातील लिंबाळा या गावांना अद्यापही टँकरची प्रतीक्षा आहे.

टॅग्स :laturलातूरWaterपाणीdroughtदुष्काळ