शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

दाहकता वाढली, लातूर जिल्ह्यातील २८९ गावांमध्ये ठणठणाट; घागरभर पाण्यासाठी पायपीट!

By हरी मोकाशे | Updated: April 4, 2024 17:44 IST

वाढत्या उन्हाबरोबरच पाण्यासाठी चटके, गत पावसाळ्यात वार्षिक सरासरीएवढाही पाऊस झाला नसल्याने जिल्ह्यातील आठ मध्यम प्रकल्पांसह लघु प्रकल्पांमध्ये पुरेशा प्रमाणात जलसाठा झाला नाही.

लातूर : वाढत्या उन्हामुळे तापमानाचा पारा ४० अं.से. च्या वर गेेला आहे. परिणामी, पाण्याच्या बाष्पीभवनाचा वेग वाढला असल्याने पाणीटंचाई चटके वाढले आहेत. सध्या जिल्ह्यातील २४७ गावे आणि ४२ वाड्यांमध्ये पाण्याचा ठणठणाट निर्माण झाल्याने त्या तहानेने व्याकूळ झाल्या आहेत. त्यामुळे अधिग्रहणाद्वारे पाणीपुरवठ्यासाठी प्रस्ताव दाखल होत आहेत.

गत पावसाळ्यात वार्षिक सरासरीएवढाही पाऊस झाला नसल्याने जिल्ह्यातील आठ मध्यम प्रकल्पांसह लघु प्रकल्पांमध्ये पुरेशा प्रमाणात जलसाठा झाला नाही. त्याचबरोबर नद्याही वाहिल्या नाहीत. परिणामी, जिल्ह्यात डिसेंबरपासूनच पाणीटंचाईच्या झळा बसू लागल्या. वाढत्या उन्हामुळे बाष्पीभवनाचा वेग वाढला असून उपलब्ध जलसाठ्यात झपाट्याने घट होत आहे. त्यामुळे ग्रामीण भागात पाणीटंचाई वाढू लागली आहे. घागरभर पाण्यासाठी नागरिकांना पायपीट करावी लागत आहे. सध्या जिल्ह्यातील २८९ गावांत टंचाई जाणवत असल्याने अधिग्रहणासाठी ३९० प्रस्ताव दाखल करण्यात आले आहेत.

सर्वाधिक पाणीटंचाई अहमदपूर तालुक्यात...तालुका - टंचाईग्रस्त गावेलातूर - ३७औसा - ४६निलंगा - ५८रेणापूर - २७अहमदपूर - ७०चाकूर - १७शिरूर अनं. - ०५उदगीर - २०देवणी - १जळकोट - ८एकूण - २८९

११९ गावांना अधिग्रहणाद्वारे पाणी...जिल्ह्यातील २८९ गावांनी अधिग्रहणाद्वारे पाणीपुरवठ्यासाठी ३९० प्रस्ताव पंचायत समितीकडे दाखल केले आहेत. त्याची पाहणी केली असता त्यातील २७ गावांचे प्रस्ताव वगळण्यात आले आहेत. त्यापैकी २०१ गावांचे २४५ प्रस्ताव तहसील कार्यालयाकडे सादर करण्यात आले आहेत. त्यापैकी ११९ गावांना १३२ अधिग्रहणाद्वारे पाणीपुरवठा सुरू करण्यात आला असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या लघुपाटबंधारे विभागाकडून देण्यात आली.

दोन तालुक्यांत अधिग्रहण नाही...जिल्ह्यातील शिरूर अनंतपाळ आणि देवणी तालुक्यातील प्रत्येकी पाच व एका गावाने अधिग्रहणासाठी प्रस्ताव दाखल केले असले तरी अद्यापही मंजूर करण्यात आले नाहीत. त्यामुळे दोन तालुक्यात एकही अधिग्रहण करण्यात आले नाही.

सात गावांना ८ टँकरने पाणी...जिल्ह्यातील १७ गावे आणि एका वाडीस तीव्र पाणीटंचाई जाणवत आहे. त्यामुळे या गावांनी टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याची मागणी करीत प्रस्ताव दाखल केला आहे. त्यापैकी ७ गावांना आठ टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे. त्यात औसा तालुक्यातील लामजना, खरोसा, टाका, मोगरगा, तांबरवाडी/ राजेवाडी, कार्ला आणि अहमदपूर तालुक्यातील टेंभूर्णी या गावांचा समावेश आहे.

१० गावांना टँकरची प्रतीक्षा...अहमदपूर तालुक्यातील फुलसेवाडी, जळकोट तालुक्यातील येलदरा, शिवाजीनगर तांडा, मेवापूर, लातूर तालुक्यातील चिंचोली ब., महापूर, साखरा, बोरगाव बु., गुंफावाडी, निलंगा तालुक्यातील लिंबाळा या गावांना अद्यापही टँकरची प्रतीक्षा आहे.

टॅग्स :laturलातूरWaterपाणीdroughtदुष्काळ