शहरं
Join us  
Trending Stories
1
"पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2047 पर्यंत देशाचे नेतृत्व करावे, आजवर असा नेता पाहिला नाही..." - मुकेश अंबानी
2
प्रसिद्धीचा मुद्दा, अजितदादांचा फडणवीसांकडे रोख;  म्हणाले, “जाहिरात करावी तर देवाभाऊंसारखी”
3
आरोपीला पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर प्राणघातक हल्ला: अनेक पोलिस एम्समध्ये दाखल
4
कार अन् ट्रकचा भीषण अपघात; एकाच कुटुंबातील सात जणांचा जागीच मृत्यू
5
लोकांच्या हातात जादाचे २ लाख कोटी उरणार; जीएसटी कपातीवर अर्थमंत्र्यांचा अंदाज
6
VIRAL : 'थार' घेऊन डिलिव्हरी बॉय पार्सल द्यायला आला, बघणारा प्रत्येकजण अवाक् झाला! व्हिडीओ होतोय व्हायरल
7
"बाप्पा तुम्ही खूप भाग्यवान, नांगरलं कुणी, पेरलं कुणी अन्..."; पंकजा मुंडेंचा खासदार बजरंग सोनवणेंना टोला
8
आमिर खानला नाही आवडली दादासाहेब फाळकेंवरील सिनेमाची स्क्रिप्ट, नक्की कारण काय?
9
ऑनलाइन मागवलेल्या बिर्याणीत झुरळ, घटनेने उडाली खळबळ; कुठे घडला 'हा' किळसवाणा प्रकार?
10
टाटा-इन्फोसिससह 'या' शेअर्समध्ये वाढ! सलग दुसऱ्या दिवशी सेन्सेक्स-निफ्टी वधारले, कुठे झाली घसरण?
11
World Athletics Championships 2025 : नीरज चोप्राची फायनलमध्ये धडक; इथंही IND vs PAK महामुकाबला?
12
२५,००० रुपयांच्या पगारात आलिशान कार अन् फ्लॅट शक्य आहे! तज्ज्ञांनी सांगितलं गुंतवणुकीचं सूत्र
13
याला म्हणतात नशीब! आदिवासी महिलेला सापडले ३ मौल्यवान हिरे; रातोरात झाली लखपती
14
GST कपाती नंतर मध्यमवर्गींना आणखी एक भेट मिळणार? ऑक्टोबरमध्ये RBI घेणार मोठा निर्णय
15
'या' कंपनीनं अचानक बंद केला आपला व्यवसाय, आता शेअर विकण्यासाठी रांगा; ₹१३१ वर आला भाव
16
एटापल्लीच्या जंगलात पोलीस आणि नक्षलवाद्यांत जोरदार चकमक, दोन महिला माओवाद्यांना मारण्यात यश
17
पितृपक्ष २०२५ गुरुपुष्यामृत योग: लक्ष्मी-स्वामींची कायम कृपा, ५ गोष्टी करा, लाभ-पुण्य मिळवा!
18
टेस्लाने जे मॉडेल भारतात लाँच केले, त्याच्या काचा फोडून बाहेर पडतायत अमेरिकेतील लोक...
19
देशभरात तपासणी अन् औषधे मोफत; पीएम मोदींच्या हस्ते ‘स्वस्थ नारी योजने’चा शुभारंभ
20
पितृपक्ष २०२५: पितृपक्षात मृत्यू येणे चांगले, पण अंत्यविधिला गेल्यावर स्मशानात काढू नका 'हे' शब्द

दाहकता वाढली, लातूर जिल्ह्यातील २८९ गावांमध्ये ठणठणाट; घागरभर पाण्यासाठी पायपीट!

By हरी मोकाशे | Updated: April 4, 2024 17:44 IST

वाढत्या उन्हाबरोबरच पाण्यासाठी चटके, गत पावसाळ्यात वार्षिक सरासरीएवढाही पाऊस झाला नसल्याने जिल्ह्यातील आठ मध्यम प्रकल्पांसह लघु प्रकल्पांमध्ये पुरेशा प्रमाणात जलसाठा झाला नाही.

लातूर : वाढत्या उन्हामुळे तापमानाचा पारा ४० अं.से. च्या वर गेेला आहे. परिणामी, पाण्याच्या बाष्पीभवनाचा वेग वाढला असल्याने पाणीटंचाई चटके वाढले आहेत. सध्या जिल्ह्यातील २४७ गावे आणि ४२ वाड्यांमध्ये पाण्याचा ठणठणाट निर्माण झाल्याने त्या तहानेने व्याकूळ झाल्या आहेत. त्यामुळे अधिग्रहणाद्वारे पाणीपुरवठ्यासाठी प्रस्ताव दाखल होत आहेत.

गत पावसाळ्यात वार्षिक सरासरीएवढाही पाऊस झाला नसल्याने जिल्ह्यातील आठ मध्यम प्रकल्पांसह लघु प्रकल्पांमध्ये पुरेशा प्रमाणात जलसाठा झाला नाही. त्याचबरोबर नद्याही वाहिल्या नाहीत. परिणामी, जिल्ह्यात डिसेंबरपासूनच पाणीटंचाईच्या झळा बसू लागल्या. वाढत्या उन्हामुळे बाष्पीभवनाचा वेग वाढला असून उपलब्ध जलसाठ्यात झपाट्याने घट होत आहे. त्यामुळे ग्रामीण भागात पाणीटंचाई वाढू लागली आहे. घागरभर पाण्यासाठी नागरिकांना पायपीट करावी लागत आहे. सध्या जिल्ह्यातील २८९ गावांत टंचाई जाणवत असल्याने अधिग्रहणासाठी ३९० प्रस्ताव दाखल करण्यात आले आहेत.

सर्वाधिक पाणीटंचाई अहमदपूर तालुक्यात...तालुका - टंचाईग्रस्त गावेलातूर - ३७औसा - ४६निलंगा - ५८रेणापूर - २७अहमदपूर - ७०चाकूर - १७शिरूर अनं. - ०५उदगीर - २०देवणी - १जळकोट - ८एकूण - २८९

११९ गावांना अधिग्रहणाद्वारे पाणी...जिल्ह्यातील २८९ गावांनी अधिग्रहणाद्वारे पाणीपुरवठ्यासाठी ३९० प्रस्ताव पंचायत समितीकडे दाखल केले आहेत. त्याची पाहणी केली असता त्यातील २७ गावांचे प्रस्ताव वगळण्यात आले आहेत. त्यापैकी २०१ गावांचे २४५ प्रस्ताव तहसील कार्यालयाकडे सादर करण्यात आले आहेत. त्यापैकी ११९ गावांना १३२ अधिग्रहणाद्वारे पाणीपुरवठा सुरू करण्यात आला असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या लघुपाटबंधारे विभागाकडून देण्यात आली.

दोन तालुक्यांत अधिग्रहण नाही...जिल्ह्यातील शिरूर अनंतपाळ आणि देवणी तालुक्यातील प्रत्येकी पाच व एका गावाने अधिग्रहणासाठी प्रस्ताव दाखल केले असले तरी अद्यापही मंजूर करण्यात आले नाहीत. त्यामुळे दोन तालुक्यात एकही अधिग्रहण करण्यात आले नाही.

सात गावांना ८ टँकरने पाणी...जिल्ह्यातील १७ गावे आणि एका वाडीस तीव्र पाणीटंचाई जाणवत आहे. त्यामुळे या गावांनी टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याची मागणी करीत प्रस्ताव दाखल केला आहे. त्यापैकी ७ गावांना आठ टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे. त्यात औसा तालुक्यातील लामजना, खरोसा, टाका, मोगरगा, तांबरवाडी/ राजेवाडी, कार्ला आणि अहमदपूर तालुक्यातील टेंभूर्णी या गावांचा समावेश आहे.

१० गावांना टँकरची प्रतीक्षा...अहमदपूर तालुक्यातील फुलसेवाडी, जळकोट तालुक्यातील येलदरा, शिवाजीनगर तांडा, मेवापूर, लातूर तालुक्यातील चिंचोली ब., महापूर, साखरा, बोरगाव बु., गुंफावाडी, निलंगा तालुक्यातील लिंबाळा या गावांना अद्यापही टँकरची प्रतीक्षा आहे.

टॅग्स :laturलातूरWaterपाणीdroughtदुष्काळ