शहरं
Join us  
Trending Stories
1
Raj-Uddhav Thackeray Vijayi Melava Live Update: ठाकरे बंधूंचा 'विजयी मेळावा'! तुफान गर्दी, प्रचंड उत्साह, वरळी डोममध्ये काय घडतंय?
2
मराठीचा विजयी मेळावा, ठाकरे बंधू येणार एकत्र, ऐतिहासिक सभेला सुप्रिया सुळेसुद्धा राहणार उपस्थित
3
Zerodha च्या संस्थापकांचा मोठा इशारा, एक्सचेज आणि ब्रोकर्ससाठी वाईट ठरू शकतं हे वृत्त; का म्हणाले नितीन कामथ असं?
4
"…हे तर पुतना मावशीचे प्रेम!’’ भाजपाचा उद्धव ठाकरेंना टोला, ती उदाहरणं देत साधला निशाणा
5
ठाकरे बंधूंचा आज 'विजयी मेळावा'; उद्धव अन् राज २० वर्षांनंतर एकत्र दिसणार! किती वाजता सुरू होणार मेळावा?
6
"मराठी भाषेचा विजय झालाय!"; ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्यात सिद्धार्थ-भरत जाधव, तेजस्विनी पंडित दाखल, व्यक्त केला आनंद
7
आषाढीला करा उपासाची थंडगार रसमलाई; घरचे खुश होतील, पुन्हा पुन्हा मागून खातील!
8
'एअर इंडिया'च्या अडचणी संपेनात! ऐन उड्डाणाच्या वेळीच पायलटला चक्कर आली अन्...; कुठे घडला 'हा' प्रसंग?
9
Ashadhi Ekadashi 2025: आषाढीला भक्तिरंगात न्हाऊन निघा; प्रियजनांना पाठवा 'हे' शुभेच्छा संदेश!
10
Uttar Pradesh: चालकाचे नियंत्रण सुटलं अन् कार उलटून थेट भिंतीवर आदळली, आठ जण ठार!
11
बायकोचं सुरू होतं अफेअर; नवऱ्यासह २ मुलांना दिलं विष, वाचल्यानंतर केला चाकूने हल्ला
12
अदानी बदलणार का ₹३ च्या शेअरच्या कंपनीचं नशीब? खरेदी करण्याच्या रेसमध्ये सर्वात पुढे
13
नवऱ्याने भरपूर त्रास दिला, पण बॉयफ्रेंड त्यापेक्षा भयंकर निघाला! ४ वर्षांच्या मुलानं सांगितलं आईसोबत काय घडलं...
14
ट्रेनमध्ये ८० रुपये आणि स्टेशनवर ७० रुपयांत मिळणार व्हेज जेवण; रेल्वे मंत्रालयानं शेअर केला संपूर्ण मेन्यू
15
भूखंड घोटाळा : एक अधिकारी निलंबित, ८ जणांची चौकशी; मालेगाव येथील प्रकार; दोघा स्टॅम्प व्हेंडरवरही फौजदारी कारवाई
16
Gold Price Today : आनंदाची बातमी! ...तर सोन्याच्या किंमती कमी होणार?, अर्थतज्ज्ञांनी कारण सांगितलं
17
"त्याच्यासोबतचं माझं नातं…’’,अल्पवयीन विद्यार्थ्यासोबत संबंध ठेवणाऱ्या शिक्षिकेचा धक्कादायक दावा
18
Maharashtra Weather: मुंबई, ठाण्यात मुसळधार पाऊस कोसळणार; रत्नागिरी, रायगडसह 'या' जिल्ह्यांना आज ऑरेंज अलर्ट
19
SIP: केवळ २.४० लाखांची गुंतवणूक आणि ₹४६.५६ लाखांचं व्याज; ही आहे कम्पाऊंडिंगची ताकद, कशी होईल ही कमाल?
20
Sena-MNS Rally: ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्यापूर्वी संदीप देशपांडेंनी घातलेल्या टी-शर्टनं वेधलं लक्ष!

साठा मर्यादेमध्ये वाढ केल्याने कडधान्याचे दर वधारले !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2021 04:13 IST

उदगीर : केंद्र सरकारने २ जुलै रोजी मूग वगळता इतर कडधान्यावर स्टॉक लिमिट करण्याबाबत अधिसूचना काढली होती. त्या अधिसूचनेविरुद्ध ...

उदगीर : केंद्र सरकारने २ जुलै रोजी मूग वगळता इतर कडधान्यावर स्टॉक लिमिट करण्याबाबत अधिसूचना काढली होती. त्या अधिसूचनेविरुद्ध सर्वच धान्य व्यापारी व दाळमिल मालकांनी विरोध करून बाजार समितीमध्ये धान्य खरेदी बंद केली होती. व्यापारी वर्गाची मागणी लक्षात घेऊन स्टॉक लिमिटमध्ये वाढ केल्याने गुरुवारी बाजारात तूर व हरभऱ्याच्या दरात प्रत्येकी २०० रुपये प्रतिक्विंटलने वाढ झाली. तर सोयाबीनची मात्र विक्रमी दरवाढ हाेत असल्याचे चित्र आहे.

सण-उत्सवाच्या काळात डाळी व तेलाच्या दरात दरवर्षी वाढ होत असते. त्यामुळे यंदा केंद्र सरकारने दर स्थिर राहावेत, म्हणून २ जुलै रोजी मूग वगळता तूर, हरभरा, उडीद, मसूर या कडधान्याच्या डाळींवर साठा मर्यादा ३१ ऑक्टाेबरपर्यंत लागू केली होती. शासनाच्या या आदेशाविरुद्ध राज्यातील सर्व धान्याचे व्यापारी व दाळमिल मालकांनी व बाजार समितीमध्ये व्यापाऱ्यांनी खरेदी बंद करण्याचे ठरवून हा अध्यादेश मागे घ्यावा अशी मागणी केली होती. परंतु, व्यापाऱ्यांच्या सोयीसाठी व ग्राहकांचे हित लक्षात घेता निर्णयात सुधारणा केली आहे. आता दाळमिल चालकांना त्यांच्या कारखान्याच्या वार्षिक क्षमतेच्या २५ वरून ५० टक्क्यांपर्यंत तर ठोक विक्रेत्यांना २०० वरून ५०० टन साठ्यामध्ये वाढ करता येणार आहे. शासनाने केलेल्या बदलाचे परिणाम गुरुवारी बाजारात दिसून आले. तूर व हरभऱ्याच्या दरात प्रतिक्विंटल २०० रुपयांनी वाढ झाली. तर सोयाबीनच्या दरात विक्रमी वाढ होत असून, गुरुवारी ८ हजार २०० प्रतीक्विंटल दराने विक्री झाली. जुन्या सोयाबीनचा साठा जवळपास संपत आला असल्याने येणाऱ्या काळात सोयाबीनचे दर आणखी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आगामी काळात सण-उत्सव असल्याने सोयाबीन तेलासह इतर सर्वच खाद्य तेलाचे दर वाढतील अशी शक्यता वर्तवली जात आहे.

केंद्राच्या निर्णयामुळे व्यापाऱ्यांना दिलासा...

केंद्र सरकारने साठा मर्यादेमध्ये वाढ केल्याने व्यापाऱ्यांना दिलासा मिळाला आहे. तूर व हरभऱ्याच्या दरात वाढ झाली आहे. पुढील काळात सणासुदीचे दिवस असल्याने दरात काही प्रमाणात वाढ होण्याची शक्यता आहे.

- बालाजी बच्चेवार, दाळ मिल चालक

आवक नसल्याने दरात होतेय वाढ...

मागणी व पुरवठ्यामध्ये मोठी तफावत आहे. शेतकऱ्यांकडील शेतमाल संपला आहे. मोठ्या व्यापाऱ्यांकडील सोयाबीनचा साठा संपला असून, बाजारात आवक होत नसल्याने सोयाबीनचे दर वाढत आहे. येणाऱ्या काळात सणांचा मौसम चालू होईल, तेव्हा तेलाचे दर वाढण्याची शक्यता आहे.

-सागर महाजन, सोयाबीन कारखानदार