शहरं
Join us  
Trending Stories
1
‘दोन शून्यां’ची बेरीज केली, त्यावर कितीही शून्य जोडले तरी…; भाजपाचा ठाकरे बंधूंना खोचक टोला
2
CM रेखा गुप्तांवर हल्ला करणाऱ्या व्यक्तीचा फोटो आला समोर, आरोपी गुजरातचा रहिवासी
3
India China Talks: व्यापारापासून ते थेट उड्डाणांपर्यंत; भारत-चीन यांच्यातील चर्चेत अनेक समस्यांवर निघाला तोडगा
4
BMC: पावसाळ्यात कुठे अडकलात तर काय कराल? मुंबई महानगरपालिकेची महत्त्वाची पोस्ट!
5
'हिला भुतांनी पछाडलेले आहे'; तांत्रिक गरम सळीने चटके देत राहिला, वेदनेने मुलीचा मृत्यू झाला
6
खळबळजनक! बीडमधील कोर्टात सरकारी वकिलाने स्वतःला संपवलं; कारण काय?
7
"चहलने तो टीशर्ट स्टंट खरंच केला? माझा विश्वासच बसत नव्हता..", धनश्री वर्माने व्यक्त केल्या भावना
8
पंतप्रधान अन् मुख्यमंत्र्यांनाही पदावरुन हटवण्याची तरतूद; केंद्र सरकारच्या नवीन विधेयकात नेमकं काय?
9
BEST Election Results: ना ठाकरे बंधू, ना भाजपा; शशांक राव यांच्या पॅनलला १४ जागा, आकडेवारी पाहाच
10
आधी बोलत होता, अचानक हात खेचला, धक्का दिला; रेखा गुप्ता यांच्यावर कसा हल्ला झाला? प्रत्यक्षदर्शी म्हणाले...
11
Toll: खराब रस्त्यांवर टोल नाही; सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय!
12
दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यावर हल्ला; जनसुनावणीदरम्यान कागद हातात दिला, केस ओढले अन्....
13
रात्रीच्या वेळी शेतामध्ये प्रियकरासोबत आक्षेपार्ह अवस्थेत होती मुलगी; मागून गेलेल्या वडिलांनी बघितलं, उचललं टोकाचं पाऊल अन्...
14
फक्त ३ वर्षात पैसे दुप्पट! FD पेक्षाही जास्त परतावा देणारे टॉप ५ म्युच्युअल फंड, १० वर्षांत कोट्यधीश
15
व्हाट्सॲप युजर्ससाठी महत्त्वाची बातमी: 'Meta AI' मुळे ग्रुप चॅट्सची प्रायव्हसी धोक्यात? पेटीएम संस्थापकांचा दावा
16
बेस्ट निवडणूक २०२५: शशांक राव-महायुती पॅनलची बाजी, ठाकरे बंधू चितपट; विजयी उमेदवारांची यादी
17
HDFC बँकेच्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी! २२-२३ ऑगस्टला 'या' ऑनलाईन सेवा राहणार बंद
18
BEST Election Results: 'ब्रँडचे बॉस एकही जागा जिंकले नाहीत'; बेस्ट निवडणुकीतील पराभवावरुन ठाकरे बंधूंना भाजपचा टोला
19
India-China Trade: भारत की चीन.. या मैत्रीचा सर्वाधिक फायदा कोणाला होणार? काय सांगते आकडेवारी
20
महाराष्ट्र जलमय... पिके खरडली, घरे बुडाली; मराठवाड्यात ११ जीव गेले, ४९८ जनावरे दगावली

साठा मर्यादेमध्ये वाढ केल्याने कडधान्याचे दर वधारले !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2021 04:13 IST

उदगीर : केंद्र सरकारने २ जुलै रोजी मूग वगळता इतर कडधान्यावर स्टॉक लिमिट करण्याबाबत अधिसूचना काढली होती. त्या अधिसूचनेविरुद्ध ...

उदगीर : केंद्र सरकारने २ जुलै रोजी मूग वगळता इतर कडधान्यावर स्टॉक लिमिट करण्याबाबत अधिसूचना काढली होती. त्या अधिसूचनेविरुद्ध सर्वच धान्य व्यापारी व दाळमिल मालकांनी विरोध करून बाजार समितीमध्ये धान्य खरेदी बंद केली होती. व्यापारी वर्गाची मागणी लक्षात घेऊन स्टॉक लिमिटमध्ये वाढ केल्याने गुरुवारी बाजारात तूर व हरभऱ्याच्या दरात प्रत्येकी २०० रुपये प्रतिक्विंटलने वाढ झाली. तर सोयाबीनची मात्र विक्रमी दरवाढ हाेत असल्याचे चित्र आहे.

सण-उत्सवाच्या काळात डाळी व तेलाच्या दरात दरवर्षी वाढ होत असते. त्यामुळे यंदा केंद्र सरकारने दर स्थिर राहावेत, म्हणून २ जुलै रोजी मूग वगळता तूर, हरभरा, उडीद, मसूर या कडधान्याच्या डाळींवर साठा मर्यादा ३१ ऑक्टाेबरपर्यंत लागू केली होती. शासनाच्या या आदेशाविरुद्ध राज्यातील सर्व धान्याचे व्यापारी व दाळमिल मालकांनी व बाजार समितीमध्ये व्यापाऱ्यांनी खरेदी बंद करण्याचे ठरवून हा अध्यादेश मागे घ्यावा अशी मागणी केली होती. परंतु, व्यापाऱ्यांच्या सोयीसाठी व ग्राहकांचे हित लक्षात घेता निर्णयात सुधारणा केली आहे. आता दाळमिल चालकांना त्यांच्या कारखान्याच्या वार्षिक क्षमतेच्या २५ वरून ५० टक्क्यांपर्यंत तर ठोक विक्रेत्यांना २०० वरून ५०० टन साठ्यामध्ये वाढ करता येणार आहे. शासनाने केलेल्या बदलाचे परिणाम गुरुवारी बाजारात दिसून आले. तूर व हरभऱ्याच्या दरात प्रतिक्विंटल २०० रुपयांनी वाढ झाली. तर सोयाबीनच्या दरात विक्रमी वाढ होत असून, गुरुवारी ८ हजार २०० प्रतीक्विंटल दराने विक्री झाली. जुन्या सोयाबीनचा साठा जवळपास संपत आला असल्याने येणाऱ्या काळात सोयाबीनचे दर आणखी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आगामी काळात सण-उत्सव असल्याने सोयाबीन तेलासह इतर सर्वच खाद्य तेलाचे दर वाढतील अशी शक्यता वर्तवली जात आहे.

केंद्राच्या निर्णयामुळे व्यापाऱ्यांना दिलासा...

केंद्र सरकारने साठा मर्यादेमध्ये वाढ केल्याने व्यापाऱ्यांना दिलासा मिळाला आहे. तूर व हरभऱ्याच्या दरात वाढ झाली आहे. पुढील काळात सणासुदीचे दिवस असल्याने दरात काही प्रमाणात वाढ होण्याची शक्यता आहे.

- बालाजी बच्चेवार, दाळ मिल चालक

आवक नसल्याने दरात होतेय वाढ...

मागणी व पुरवठ्यामध्ये मोठी तफावत आहे. शेतकऱ्यांकडील शेतमाल संपला आहे. मोठ्या व्यापाऱ्यांकडील सोयाबीनचा साठा संपला असून, बाजारात आवक होत नसल्याने सोयाबीनचे दर वाढत आहे. येणाऱ्या काळात सणांचा मौसम चालू होईल, तेव्हा तेलाचे दर वाढण्याची शक्यता आहे.

-सागर महाजन, सोयाबीन कारखानदार