शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
5
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
6
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
7
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
8
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
9
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
10
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
11
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
12
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
13
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
14
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
15
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
16
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
17
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
18
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
19
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
20
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!

साठा मर्यादेमध्ये वाढ केल्याने कडधान्याचे दर वधारले !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2021 04:13 IST

उदगीर : केंद्र सरकारने २ जुलै रोजी मूग वगळता इतर कडधान्यावर स्टॉक लिमिट करण्याबाबत अधिसूचना काढली होती. त्या अधिसूचनेविरुद्ध ...

उदगीर : केंद्र सरकारने २ जुलै रोजी मूग वगळता इतर कडधान्यावर स्टॉक लिमिट करण्याबाबत अधिसूचना काढली होती. त्या अधिसूचनेविरुद्ध सर्वच धान्य व्यापारी व दाळमिल मालकांनी विरोध करून बाजार समितीमध्ये धान्य खरेदी बंद केली होती. व्यापारी वर्गाची मागणी लक्षात घेऊन स्टॉक लिमिटमध्ये वाढ केल्याने गुरुवारी बाजारात तूर व हरभऱ्याच्या दरात प्रत्येकी २०० रुपये प्रतिक्विंटलने वाढ झाली. तर सोयाबीनची मात्र विक्रमी दरवाढ हाेत असल्याचे चित्र आहे.

सण-उत्सवाच्या काळात डाळी व तेलाच्या दरात दरवर्षी वाढ होत असते. त्यामुळे यंदा केंद्र सरकारने दर स्थिर राहावेत, म्हणून २ जुलै रोजी मूग वगळता तूर, हरभरा, उडीद, मसूर या कडधान्याच्या डाळींवर साठा मर्यादा ३१ ऑक्टाेबरपर्यंत लागू केली होती. शासनाच्या या आदेशाविरुद्ध राज्यातील सर्व धान्याचे व्यापारी व दाळमिल मालकांनी व बाजार समितीमध्ये व्यापाऱ्यांनी खरेदी बंद करण्याचे ठरवून हा अध्यादेश मागे घ्यावा अशी मागणी केली होती. परंतु, व्यापाऱ्यांच्या सोयीसाठी व ग्राहकांचे हित लक्षात घेता निर्णयात सुधारणा केली आहे. आता दाळमिल चालकांना त्यांच्या कारखान्याच्या वार्षिक क्षमतेच्या २५ वरून ५० टक्क्यांपर्यंत तर ठोक विक्रेत्यांना २०० वरून ५०० टन साठ्यामध्ये वाढ करता येणार आहे. शासनाने केलेल्या बदलाचे परिणाम गुरुवारी बाजारात दिसून आले. तूर व हरभऱ्याच्या दरात प्रतिक्विंटल २०० रुपयांनी वाढ झाली. तर सोयाबीनच्या दरात विक्रमी वाढ होत असून, गुरुवारी ८ हजार २०० प्रतीक्विंटल दराने विक्री झाली. जुन्या सोयाबीनचा साठा जवळपास संपत आला असल्याने येणाऱ्या काळात सोयाबीनचे दर आणखी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आगामी काळात सण-उत्सव असल्याने सोयाबीन तेलासह इतर सर्वच खाद्य तेलाचे दर वाढतील अशी शक्यता वर्तवली जात आहे.

केंद्राच्या निर्णयामुळे व्यापाऱ्यांना दिलासा...

केंद्र सरकारने साठा मर्यादेमध्ये वाढ केल्याने व्यापाऱ्यांना दिलासा मिळाला आहे. तूर व हरभऱ्याच्या दरात वाढ झाली आहे. पुढील काळात सणासुदीचे दिवस असल्याने दरात काही प्रमाणात वाढ होण्याची शक्यता आहे.

- बालाजी बच्चेवार, दाळ मिल चालक

आवक नसल्याने दरात होतेय वाढ...

मागणी व पुरवठ्यामध्ये मोठी तफावत आहे. शेतकऱ्यांकडील शेतमाल संपला आहे. मोठ्या व्यापाऱ्यांकडील सोयाबीनचा साठा संपला असून, बाजारात आवक होत नसल्याने सोयाबीनचे दर वाढत आहे. येणाऱ्या काळात सणांचा मौसम चालू होईल, तेव्हा तेलाचे दर वाढण्याची शक्यता आहे.

-सागर महाजन, सोयाबीन कारखानदार