शहरं
Join us  
Trending Stories
1
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
2
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
3
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
4
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
5
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
6
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
7
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
8
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
9
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
10
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
11
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
12
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
13
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
14
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
15
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
16
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
17
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
18
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
19
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
20
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
Daily Top 2Weekly Top 5

'मृग' बरसल्याने लातूर जिल्ह्यातील जलसाठ्यात वाढ; मध्यम प्रकल्पांत आले ७ टक्के पाणी

By हरी मोकाशे | Updated: June 12, 2024 18:11 IST

कोरड्या घरणी प्रकल्पात आले अडीच टक्के पाणी

लातूर : मृगाच्या प्रारंभापासून सतत पाऊस होत असल्याने जिल्ह्यातील जलसाठ्यात वाढ होऊ लागली आहे. अवघ्या पाच दिवसांमध्ये मध्यम प्रकल्पांमध्ये ७.५९ टक्के पाणीसाठा झाला आहे. विशेषत: जोत्याखाली गेलेल्या घरणी मध्यम प्रकल्पात पाण्याचा येवा सुरु झाल्याने २.५७ टक्के साठा झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसह नागरिकांना दिलासा मिळाला आहे.

गत पावसाळ्यात वार्षिक सरासरीच्या तुलनेत ७३ टक्के पाऊस झाला होता. त्यामुळे जिल्ह्यातील काही गावांना हिवाळ्यापासून टंचाईच्या झळा जाणवू लागल्या होत्या. त्यातच यंदाचा उन्हाळा अधिक उष्ण राहिला. तापमानाचा पारा ४१ अंशसेल्सियसपर्यंत पोहोचल्याने जीवाची काहिली होत होती. परिणामी, जलस्त्रोत कोरडे पडत होते तर जलसाठे आटू लागले होते. त्यामुळे गेल्या पाच वर्षांच्या तुलनेत यंदा मे महिन्याच्या अखेरीस भूजल पातळी २.६७ मीटरने खालावली होती. पावसाळा कधी सुरु होतो, याकडे लक्ष लागून होते.

प्रकल्प - उपयुक्त पाणीसाठा (टक्के)तावरजा - ००रेणापूर - २१.१७व्हटी - ००तिरु - ००देवर्जन - २.८९साकोळ - ३.११घरणी - २.५७मसलगा - ४५.५०एकूण - ९.६३

मसलगा प्रकल्पात सर्वाधिक जलसाठा...मृगास शुक्रवारपासून सुरुवात झाली आहे. तेव्हापासून सतत कमी- जास्त प्रमाणात पाऊस होत आहे. या पावसामुळे तहानलेल्या प्रकल्पांना लाभ होत आहे. पाच दिवसांमध्ये रेणापूर मध्यम प्रकल्पात १९.५१ टक्के, घरणी प्रकल्पात २.५७ टक्के तर मसलगा प्रकल्पात ३४.४४ टक्के जलसाठा वाढला आहे. सर्वाधिक पाणीसाठा निलंगा तालुक्यातील मसलगा मध्यम प्रकल्पात झाला आहे.

१० दलघमीने वाढले पाणी...जिल्ह्यात एकूण ८ मध्यम प्रकल्प आहेत. शुक्रवारी एकूण १५.४९० दलघमी पाणीसाठा होता. आता २५.३१६ दलघमी एकूण पाणीसाठा झाला आहे. पाच दिवसांच्या कालावधीत ९.८२६ दलघमी पाणीसाठा वाढला आहे. त्यामुळे शेतकरी, नागरिकांना दिलासा मिळाला असून आशा पल्लवित झाल्या आहेत.

पाण्याचा प्रश्न कमी होणार...तीव्र उन्हामुळे यंदा ३० गावे आणि १६ वाड्यांना टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरु आहे. याशिवाय, ३८९ गावांना अधिग्रहणाद्वारे पाणीपुरवठा सुरु होता. पाऊस होत असल्याने मध्यम प्रकल्पात पाणी वाढत आहे. त्यामुळे पाणीप्रश्न कमी होणार असल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले.

टॅग्स :laturलातूरWaterपाणीRainपाऊस