शहरं
Join us  
Trending Stories
1
"एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्याने वाईट वाटलं आणि घरी निघून गेलो,पण पुन्हा..."; रवींद्र चव्हाणांचा गौप्यस्फोट
2
शेवटच्या 3 सेकंदांत 'RUN' वरून 'CUTOFF' झालं 'फ्यूल कंट्रोल स्विच' अ्न...; एअर इंडिया प्लेन क्रॅशवेळी शेवटच्या क्षणाला नेमकं काय घडलं?
3
"माझा नातेवाईक का असेना, टायरमध्ये घालून झोडायला सांगणार"; बारामतीत अजित पवारांचा कडक इशारा
4
KL राहुलची विक्रमी सेंच्युरी; लॉर्ड्सच्या मैदानात अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा भारतीय
5
भारतातील रस्त्यावरही टेस्लाच्या कार धावणार; या दिवशी पहिलं शोरूम सुरू होणार, लवकरच डिलिव्हरी सुरू होईल
6
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
7
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
8
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
9
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य
10
गुरु-चंद्र-राहुचा वसुमान ग्रहण योग: ७ राशींना भरभराट, भाग्योदय; पैसा-प्रतिष्ठा, कल्याण होईल!
11
सात वर्षांपूर्वीच दिला होता ७३७ जेटमधील स्विचच्या समस्येबद्दल इशारा; एअर इंडिया विमान अपघाताला ठरले कारण?
12
"जयंत पाटलांच्या राजीनाम्याची बातमी खोडसाळपणा...", प्रदेशाध्यक्षपदावरुन जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्टच सांगितलं
13
पंतची कडक फटकेबाजी! चौकारासह जोफ्राचं स्वागत अन् स्टोक्सला उत्तुंग षटकार मारत साजरी केली फिफ्टी
14
Radhika Yadav : "मी मुलीचा वध केला, मला फाशी द्या"; राधिकाला संपवल्यावर भावासमोर काय म्हणाले वडील?
15
'तो मला बायको म्हणायचा', मुंबईतील शिक्षिकेचा विद्यार्थ्यासोबतच्या संबंधाबद्दल चक्रावून टाकणारा खुलासा
16
Sankashti Chaturthi 2025: चातुर्मासातली पहिली संकष्टी, बाराही राशींसाठी ठरणार खास; पूर्ण होणार प्रत्येक आस!
17
१८० प्रवाशांऐवजी केवळ १५५ जणांनाच घेऊन उडाले एअर इंडियाचे विमान! विमानतळावर गोंधळ,नेमके झाले काय?
18
पतीचा भर रस्त्यात तमाशा; पत्नीवर केले सपासप वार, जांघेत अडकली तलवार! कशावरून झाला वाद?
19
“२० देशांनी भारताच्या बाजूने मतदान केले, १२ किल्ले जागतिक वारसा स्थळ घोषित झाले”: CM फडणवीस
20
CHYD च्या नवीन पर्वात निलेश साबळेंना मिस करशील का? गौरव मोरे म्हणाला, "मी त्यांच्यासोबत..."

'मृग' बरसल्याने लातूर जिल्ह्यातील जलसाठ्यात वाढ; मध्यम प्रकल्पांत आले ७ टक्के पाणी

By हरी मोकाशे | Updated: June 12, 2024 18:11 IST

कोरड्या घरणी प्रकल्पात आले अडीच टक्के पाणी

लातूर : मृगाच्या प्रारंभापासून सतत पाऊस होत असल्याने जिल्ह्यातील जलसाठ्यात वाढ होऊ लागली आहे. अवघ्या पाच दिवसांमध्ये मध्यम प्रकल्पांमध्ये ७.५९ टक्के पाणीसाठा झाला आहे. विशेषत: जोत्याखाली गेलेल्या घरणी मध्यम प्रकल्पात पाण्याचा येवा सुरु झाल्याने २.५७ टक्के साठा झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसह नागरिकांना दिलासा मिळाला आहे.

गत पावसाळ्यात वार्षिक सरासरीच्या तुलनेत ७३ टक्के पाऊस झाला होता. त्यामुळे जिल्ह्यातील काही गावांना हिवाळ्यापासून टंचाईच्या झळा जाणवू लागल्या होत्या. त्यातच यंदाचा उन्हाळा अधिक उष्ण राहिला. तापमानाचा पारा ४१ अंशसेल्सियसपर्यंत पोहोचल्याने जीवाची काहिली होत होती. परिणामी, जलस्त्रोत कोरडे पडत होते तर जलसाठे आटू लागले होते. त्यामुळे गेल्या पाच वर्षांच्या तुलनेत यंदा मे महिन्याच्या अखेरीस भूजल पातळी २.६७ मीटरने खालावली होती. पावसाळा कधी सुरु होतो, याकडे लक्ष लागून होते.

प्रकल्प - उपयुक्त पाणीसाठा (टक्के)तावरजा - ००रेणापूर - २१.१७व्हटी - ००तिरु - ००देवर्जन - २.८९साकोळ - ३.११घरणी - २.५७मसलगा - ४५.५०एकूण - ९.६३

मसलगा प्रकल्पात सर्वाधिक जलसाठा...मृगास शुक्रवारपासून सुरुवात झाली आहे. तेव्हापासून सतत कमी- जास्त प्रमाणात पाऊस होत आहे. या पावसामुळे तहानलेल्या प्रकल्पांना लाभ होत आहे. पाच दिवसांमध्ये रेणापूर मध्यम प्रकल्पात १९.५१ टक्के, घरणी प्रकल्पात २.५७ टक्के तर मसलगा प्रकल्पात ३४.४४ टक्के जलसाठा वाढला आहे. सर्वाधिक पाणीसाठा निलंगा तालुक्यातील मसलगा मध्यम प्रकल्पात झाला आहे.

१० दलघमीने वाढले पाणी...जिल्ह्यात एकूण ८ मध्यम प्रकल्प आहेत. शुक्रवारी एकूण १५.४९० दलघमी पाणीसाठा होता. आता २५.३१६ दलघमी एकूण पाणीसाठा झाला आहे. पाच दिवसांच्या कालावधीत ९.८२६ दलघमी पाणीसाठा वाढला आहे. त्यामुळे शेतकरी, नागरिकांना दिलासा मिळाला असून आशा पल्लवित झाल्या आहेत.

पाण्याचा प्रश्न कमी होणार...तीव्र उन्हामुळे यंदा ३० गावे आणि १६ वाड्यांना टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरु आहे. याशिवाय, ३८९ गावांना अधिग्रहणाद्वारे पाणीपुरवठा सुरु होता. पाऊस होत असल्याने मध्यम प्रकल्पात पाणी वाढत आहे. त्यामुळे पाणीप्रश्न कमी होणार असल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले.

टॅग्स :laturलातूरWaterपाणीRainपाऊस