शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

बस आगाराअभावी जळकोटातील प्रवाशांची गैरसोय !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2021 04:24 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळकोट : डोंगरी, दुर्गम तसेच लातूर जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावर असलेल्या जळकोट तालुक्यातील प्रवाशांना इच्छित ठिकाणी ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळकोट : डोंगरी, दुर्गम तसेच लातूर जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावर असलेल्या जळकोट तालुक्यातील प्रवाशांना इच्छित ठिकाणी ये-जा करण्यासाठी पायपीट करण्यावाचून पर्याय नाही. गेल्या २२ वर्षांपासून येथे राज्य परिवहन महामंडळाचे बस आगार मंजूर करावे, अशी मागणी सातत्याने करण्यात येत आहे. पण केवळ आश्वासने दिली जात आहेत. त्यामुळे तालुक्यातील प्रवाशांची फरपट कायम असून, प्रवाशांची गैरसोय रोखण्यासाठी बस आगाराची मागणी होत आहे.

जळकोट तालुक्याची १९९९मध्ये निर्मिती करण्यात आली आहे. मात्र केवळ तालुका करण्यापलिकडे पुढे कुठलीच कार्यवाही होत नसल्याचे चित्र आहे. कित्येक दिवसांचा बस आगार निर्मितीचा प्रश्नही अडगळीत पडला आहे.

येथे बस आगार नसल्याने तालुक्यातील अनेक गावांमधील जनतेला स्वातंत्र्यानंतर आतापर्यंतही राज्य परिवहन महामंडळाच्या बसगाडीचे दर्शन झालेले नाही. त्यात बसून प्रवास करणे तर लांबची गोष्ट. तालुक्यातील प्रवाशांची संख्या तसेच बससेवेचा अभाव लक्षात घेता या तालुक्यासाठी स्वतंत्र बस आगाराची आवश्यकता आहे. याबाबत जनतेकडून सातत्याने मागणी केली जात आहे.

विविध निवडणुकांमध्ये हा मुद्दा चर्चिला जाऊन बस आगार चार-दोन महिन्यांत मंजूर करु, अशी आश्वासने नेतेमंडळी व राज्यकर्ते देतात. मात्र, पुढे याचा चक्क त्यांना विसर पडतो. काही वर्षांपूवी येथे बस आगार स्थापन करण्यासाठी तत्कालीन आमदार सुधाकर भालेराव यांच्या पाठपुराव्यामुळे मंत्रालय येथे परिवहन मंत्री, विभागाचे सचिव तसेच सर्व संबंधित वरिष्ठ अधिकारी यांच्या उपस्थितीत आढावा बैठक घेण्यात आली होती.

त्यामुळे जनतेच्या आशा पल्लवित झाल्या होत्या. मात्र त्यानंतर काहीच हालचाली झालेल्या नाहीत. त्यामुळे तातडीने जळकोट येथे बस आगार मंजूर करावे अन्यथा तीव्र आंदोलन करु, असा इशारा तालुक्यातील त्रस्त प्रवाशांनी दिला आहे.

विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिकांची गैरसोय...

जळकोट तालुक्यात बस आगार नसल्याने कोणती बस कधी येणार, याची कल्पना नसते. त्यामुळे तालुक्याच्या ठिकाणावरुन जिल्ह्याच्या ठिकाणी महाविद्यालयात जाणाऱ्या विद्यार्थ्यांना तसेच ज्येष्ठ नागरिकांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. दरम्यान, यंदा तरी जळकोटला स्वतंत्र बस आगार मिळेल, अशी आशा तालुक्यातील प्रवाशांना आहे.