शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

परतीच्या पावसाचीही हुलकावणी; वार्षिक सरासरीही न गाठल्याने यंदा रब्बी हंगामाचा पेरा घटणार!

By हरी मोकाशे | Updated: October 27, 2023 20:11 IST

रब्बीचे २ लाख ८० हजार हेक्टर क्षेत्र

लातूर : जिल्ह्यात यंदा पावसाने वार्षिक सरासरीएवढीही बरसात केली नाही. त्यामुळे नदी- नाले वाहिले नाहीत. परिणामी, खरीप हंगामास फटका बसण्याबरोबरच आता रब्बी हंगामाचेही क्षेत्र घटणार असल्याचे दिसून येत आहे. जिल्ह्यात सरासरी एकूण २ लाख ८० हजार ४३८ हेक्टर रब्बीचे क्षेत्र आहे. आतापर्यंत जवळपास २५ हजार हेक्टरवरही पेरा झाला नाही.

यंदाच्या पावसाळ्यात विलंबाने पाऊस होण्याबरोबरच सुरुवातीस पिकांपुरता पाऊस झाला. जुलैअखेरपासून ते ऑगस्टमध्ये तर पावसाने ओढ दिली. त्यामुळे खरिपातील सोयाबीनच्या उत्पादनात ६० टक्क्यांपेक्षा अधिक घट झाली. जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी ५४० मिमी पाऊस झाला आहे. पावसाने वार्षिक सरासरीही गाठली नाही. मांजरा, तेरणा या प्रमुख नद्यांसह रेणा, तिरू आणि लहान नद्याही वाहिल्या नाहीत. त्यामुळे जिल्ह्यातील मध्यम प्रकल्पांसह तलावात अपेक्षित प्रमाणात जलसाठा झाला नाही. त्यामुळे यंदा पाणीटंचाई संकट लवकरच येण्याची भीती व्यक्त होत आहे.

दरवर्षी परतीचा जोरदार पाऊस होतो आणि त्याचा रब्बी हंगामास लाभ होतो, असा शेतकऱ्यांचा अनुभव आहे. त्यामुळे यंदाही परतीचा पाऊस होईल, अशी आशा होती. परंतु, ती हवेतच विरली आहे. त्याचा परिणाम रब्बी हंगामावर होणार असून, पेरा घटणार असल्याचे पाहावयास मिळत आहे.

औसा तालुक्यात सर्वाधिक रब्बीचे क्षेत्र...तालुका - अपेक्षित पेरालातूर - ५१६२८औसा - ६२६८३अहमदपूर - २१६४८निलंगा - ४८१५५शिरुर अनं. - १३५३३उदगीर - ७९२५चाकूर - २४१०४रेणापूर - ३४१८३देवणी - १३९१४जळकोट - २६६९एकूण - २८०४३८

आतापर्यंत २५ हजार हेक्टरवर पेरा...जिल्ह्यात रब्बीचे सरासरी २ लाख ८० हजार ४३८ हेक्टर प्रस्तावित क्षेत्र आहे. दरम्यान, सध्या शेतकरी खरिपातील सोयाबीनच्या राशी आटोपत आहेत. सोयाबीनच्या राशी केलेले शेतकरी जमिनीतील ओल पाहून रब्बी हंगामातील पिकांची पेरणी करण्याची लगबग करीत आहेत. काही शेतकऱ्यांनी आठवडाभरापासून पेरणीस सुरुवात केली आहे. आतापर्यंत जिल्ह्यात जवळपास २५ हजार हेक्टरवर पेरणी झाल्याचे कृषी विभागाकडून सांगण्यात आले.

दोन लाख हेक्टरवर हरभऱ्याचा पेरा अपेक्षित...जिल्ह्यात रब्बी हंगामात हरभऱ्याचा २ लाख १९ हजार ४७५ हेक्टरवर पेरा होणे अपेक्षित आहे. तसेच रब्बी ज्वारीचा ३२ हजार ९४३, गव्हाचा १६ हजार १६, करडईचा ६ हजार ९७४ हेक्टरवर पेरा होणे अपेक्षित आहे, असा अंदाज जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाने वर्तविला आहे.

शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडणार...यंदा पावसाअभावी खरिपातील सोयाबीनचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यानंतर यल्लोमोझॅकचा प्रादुर्भाव झाला. त्यामुळे फटका बसला आहे. जलसाठा न झाल्याने आता रब्बी हंगामावरही परिणाम होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडणार असल्याचे दिसून येत आहे.

टॅग्स :laturलातूरFarmerशेतकरीRainपाऊस