शहरं
Join us  
Trending Stories
1
'सर्वात मोठा शत्रू म्हणजे परावलंबन'; टॅरिफ वाद आणि H-1B व्हिसासंदर्भातील बदलानंतर, काय म्हणाले पंतप्रधान मोदी?
2
MSRTC: एसटी महामंडळात १७ हजारांहून अधिक पदांची भरती; चालक आणि सहाय्यक नेमणार, 'इतका' पगार!
3
तुमचा पुण्यातील रोजचा प्रवास ३५ किमी आहे, तर तुम्ही कोणती स्कूटर, मोटरसायकल घ्यावी? 
4
ट्रम्प यांच्या एका निर्णयाने अमेरिकेतील भारतीयांची धाकधूक वाढली; मायक्रोसॉफ्टने कर्मचाऱ्यांना पाठवला तातडीचा ईमेल
5
परदेशी पाहुण्यांशी असलं वागणं शोभतं का? 'टपोरी' मुलाच्या Viral Video वर नेटकरी संतापले
6
निलेश साबळेनेच मला बाईचं कॅरेक्टर करायला सांगितलं होतं, भाऊ कदमचा खुलासा
7
भूपतीचा शस्त्रसंधीचा प्रस्ताव, जगन म्हणतो शस्त्र ठेवणार नाही ! माओवादी संघटनेतील वाद चव्हाट्यावर
8
१०० वर्षांनी शुभ योगात सर्वपित्री अमावास्या २०२५: ६ मूलांकांचे ग्रहण सुटेल; पैसा-लाभ-वरदान!
9
अमेरिकेत करिअरचे दार उघडणारा H-1B व्हिसा काय आहे? कोणाला मिळतो? जाणून घ्या संपूर्ण माहिती...
10
पुढच्या आठवड्यात येणार IPO चा पाऊस, २२ आयपीओंमध्ये मिळणार गुंतवणूकीची संधी; कोणत्या आहेत कंपन्या?
11
हृदयस्पर्शी! "आई-वडिलांना सोडून मुलगी गेली लंडनला"; ८० वर्षांचे आजोबा ट्रेनमध्ये विकतात पदार्थ
12
हाफिज सईदने दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदचे नाव बदलले; आता 'अल-मुराबितुन' नावाने पैसे गोळा करणार
13
GST Rate Cut: ५०% सूट, ८०% सूट... कपडे आणि बुटांच्या दुकांनावर आता अशा ऑफर्स दिसणार नाहीत! GST कपातीशी संबंध काय?
14
Hanuman Temple: 'या' मंदिरात हनुमान निद्रावस्थेत, तरीही केवळ दर्शनाने पूर्ण होते भक्तांची प्रत्येक इच्छा 
15
Vivo Y50i: झटक्यात चार्ज होणार आणि दिर्घकाळ चालणार; विवोचा बजेट स्मार्टफोन बाजारात!
16
शाहिद आफ्रिदीचं इरफान पठाणला आव्हान, म्हणाला, ‘’मर्द असशील तर…”, मिळालं असं प्रत्युत्तर
17
मोलकरणीने मालकिणीच्या 'थप्पड'चा असा घेतला बदला, वाचून तुमच्याही भुवया उंचावतील!
18
'टॅरिफ'नंतर ट्रम्प यांचा नवा फतवा! भारतीयांसाठी 'अमेरिकन ड्रीम' महागणार! Visa साठी भरावे लागणार ₹८८ लाख
19
'शिंदे, पवार अन् भाजपचे ९०% आमदार मते चोरुन निवडून आले', संजय राऊतांचे टीकास्त्र
20
VIDEO: हार्दिक पांड्याने सीमारेषेवर धावत-पळत, कसरत करत घेतला भन्नाट झेल, पाहणारेही थक्क

परतीच्या पावसाचीही हुलकावणी; वार्षिक सरासरीही न गाठल्याने यंदा रब्बी हंगामाचा पेरा घटणार!

By हरी मोकाशे | Updated: October 27, 2023 20:11 IST

रब्बीचे २ लाख ८० हजार हेक्टर क्षेत्र

लातूर : जिल्ह्यात यंदा पावसाने वार्षिक सरासरीएवढीही बरसात केली नाही. त्यामुळे नदी- नाले वाहिले नाहीत. परिणामी, खरीप हंगामास फटका बसण्याबरोबरच आता रब्बी हंगामाचेही क्षेत्र घटणार असल्याचे दिसून येत आहे. जिल्ह्यात सरासरी एकूण २ लाख ८० हजार ४३८ हेक्टर रब्बीचे क्षेत्र आहे. आतापर्यंत जवळपास २५ हजार हेक्टरवरही पेरा झाला नाही.

यंदाच्या पावसाळ्यात विलंबाने पाऊस होण्याबरोबरच सुरुवातीस पिकांपुरता पाऊस झाला. जुलैअखेरपासून ते ऑगस्टमध्ये तर पावसाने ओढ दिली. त्यामुळे खरिपातील सोयाबीनच्या उत्पादनात ६० टक्क्यांपेक्षा अधिक घट झाली. जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी ५४० मिमी पाऊस झाला आहे. पावसाने वार्षिक सरासरीही गाठली नाही. मांजरा, तेरणा या प्रमुख नद्यांसह रेणा, तिरू आणि लहान नद्याही वाहिल्या नाहीत. त्यामुळे जिल्ह्यातील मध्यम प्रकल्पांसह तलावात अपेक्षित प्रमाणात जलसाठा झाला नाही. त्यामुळे यंदा पाणीटंचाई संकट लवकरच येण्याची भीती व्यक्त होत आहे.

दरवर्षी परतीचा जोरदार पाऊस होतो आणि त्याचा रब्बी हंगामास लाभ होतो, असा शेतकऱ्यांचा अनुभव आहे. त्यामुळे यंदाही परतीचा पाऊस होईल, अशी आशा होती. परंतु, ती हवेतच विरली आहे. त्याचा परिणाम रब्बी हंगामावर होणार असून, पेरा घटणार असल्याचे पाहावयास मिळत आहे.

औसा तालुक्यात सर्वाधिक रब्बीचे क्षेत्र...तालुका - अपेक्षित पेरालातूर - ५१६२८औसा - ६२६८३अहमदपूर - २१६४८निलंगा - ४८१५५शिरुर अनं. - १३५३३उदगीर - ७९२५चाकूर - २४१०४रेणापूर - ३४१८३देवणी - १३९१४जळकोट - २६६९एकूण - २८०४३८

आतापर्यंत २५ हजार हेक्टरवर पेरा...जिल्ह्यात रब्बीचे सरासरी २ लाख ८० हजार ४३८ हेक्टर प्रस्तावित क्षेत्र आहे. दरम्यान, सध्या शेतकरी खरिपातील सोयाबीनच्या राशी आटोपत आहेत. सोयाबीनच्या राशी केलेले शेतकरी जमिनीतील ओल पाहून रब्बी हंगामातील पिकांची पेरणी करण्याची लगबग करीत आहेत. काही शेतकऱ्यांनी आठवडाभरापासून पेरणीस सुरुवात केली आहे. आतापर्यंत जिल्ह्यात जवळपास २५ हजार हेक्टरवर पेरणी झाल्याचे कृषी विभागाकडून सांगण्यात आले.

दोन लाख हेक्टरवर हरभऱ्याचा पेरा अपेक्षित...जिल्ह्यात रब्बी हंगामात हरभऱ्याचा २ लाख १९ हजार ४७५ हेक्टरवर पेरा होणे अपेक्षित आहे. तसेच रब्बी ज्वारीचा ३२ हजार ९४३, गव्हाचा १६ हजार १६, करडईचा ६ हजार ९७४ हेक्टरवर पेरा होणे अपेक्षित आहे, असा अंदाज जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाने वर्तविला आहे.

शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडणार...यंदा पावसाअभावी खरिपातील सोयाबीनचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यानंतर यल्लोमोझॅकचा प्रादुर्भाव झाला. त्यामुळे फटका बसला आहे. जलसाठा न झाल्याने आता रब्बी हंगामावरही परिणाम होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडणार असल्याचे दिसून येत आहे.

टॅग्स :laturलातूरFarmerशेतकरीRainपाऊस