ताप न आल्यास विश्वास बसेना; लस खरी की खोटी !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2021 04:25 IST2021-09-07T04:25:05+5:302021-09-07T04:25:05+5:30
जिल्ह्यात १६ जानेवारीपासून लसीकरण मोहीम राबविण्यात येत असून कोविशिल्ड आणि कोव्हॅक्सिन या दोन लसीचा वापर सुरू आहे. ग्रामीण भागात ...

ताप न आल्यास विश्वास बसेना; लस खरी की खोटी !
जिल्ह्यात १६ जानेवारीपासून लसीकरण मोहीम राबविण्यात येत असून कोविशिल्ड आणि कोव्हॅक्सिन या दोन लसीचा वापर सुरू आहे. ग्रामीण भागात जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागामार्फत तर शहरात महानगरपालिकेच्या आरोग्य विभागामार्फत मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेअंतर्गत पहिला डोस ७ लाख ५० हजार ९४६ जणांनी घेतला आहे तर दोन्ही डोस २ लाख ७१ हजार ८४० लोकांनी घेतला आहे. ५ लाख ४९ हजार ५४४ पुरुषांनी तर ४ लाख ७३ हजार ९१ महिलांनी पहिला किंवा दुसरा डोस घेतला आहे. त्यातील अनेकांना ताप किंवा अंग, डोकेदुखीचा त्रास झालेला नाही तर काहींना अंग, ताप, डोकेदुखीचा त्रास झालेला आहे. त्रास झाल्यानंतरच परिणाकारकता असते असा अनेकांचा समज आहे परंतु आरोग्य विभागाने याला दुजोरा दिलेला नाही. व्यक्ती तितक्या प्रकृती असतात त्यामुळे कोणाला लसीचा त्रास होऊ शकतो तर कोणाला होऊ शकत नाही. ताप आला तरच लसीची परिणामकारकता अधिक आहे, असे म्हणणे गैरसमजच असून अज्ञानातून ही चर्चा होत असल्याचे आरोग्य विभागाने स्पष्ट केले असून जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात लस उपलब्ध आहे. त्यामुळे अठरा वर्षांपुढील सर्व नागरिकांनी लस घ्यावी, असे आवाहनही करण्यात आले आहे.
जिल्हा शल्यचिकित्सक म्हणाले हा तर गैरसमज....
जागतिक आरोग्य संघटनेच्या मान्यतेनंतरच लस वितरीत केले जाते. लसीची परिणामकारकता तपासूनच वितरित करण्याचे मापदंड आहेत. व्यक्ती तितक्या प्रकृती असतात. त्यामुळे ताप, अंग व डोकेदुखीचा कोणाला त्रास होतो तर कोणाला होत नाही. त्यामुळे लसीची परिणामकारकता नाही असे म्हणणे हा गैरसमज आहे आणि तो चुकीचा आहे. जिल्ह्यात वापरण्यात येत असलेल्या दोन्ही लसी परिणामकारक आहेत. त्यामुळे कोणी असे गैरसमज करून घेऊ नयेत.
डॉ एल.एस. देशमुख जिल्हा शल्यचिकित्सक
पहिला डोस :७५०९४६
दुसरा डोस : २७१८४०
एकूण डोस : १०२२७८६
कोविशिल्डचा वापर : ८२०५१८
कोव्हॅक्सिनचा वापर : २०२२६८
पुरुष लसीकरण : ५४९५४४
महिला लसीकरण : ४७३०९१