सणासुदीच्या काळात तरी ‘स्पेशल’ तिकीट कसे परवडणार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2021 04:25 IST2021-09-07T04:25:25+5:302021-09-07T04:25:25+5:30

सध्याला रेल्वे माेठ्या संख्येने सुरू झाल्या असल्या तरी अजूनही त्या स्पेशल नावानेच धावत आहेत. यातून अधिकचे भाडे आकारले जात ...

How can you afford a 'special' ticket even during the festive season! | सणासुदीच्या काळात तरी ‘स्पेशल’ तिकीट कसे परवडणार!

सणासुदीच्या काळात तरी ‘स्पेशल’ तिकीट कसे परवडणार!

सध्याला रेल्वे माेठ्या संख्येने सुरू झाल्या असल्या तरी अजूनही त्या स्पेशल नावानेच धावत आहेत. यातून अधिकचे भाडे आकारले जात आहे. त्याचवेळी जनरल डबे असूनही ‘लाॅक’ आहेत. यातून सर्वसामान्य प्रवाशांना अधिकचा भुर्दंड सहन करावा लागत आहे. लातूर रेल्वे स्थानकातून धावणाऱ्या मिरज ते परळी वैजनाथ आणि पंढरपूर ते निजामाबाद रेल्वे गत दीड वर्षापासून बंदच आहे. केवळ सात एक्स्प्रेस रेल्वे लातूर येथून सुसाट आहेत. या रेल्वेला प्रवाशांचा प्रतिसाद मिळत आहे. मात्र, ग्रामीण भागातील प्रवाशांना या रेल्वेतून प्रवास करणे अशक्य आहे. कारण या रेल्वेला ग्रामीण भागातील रेल्वे स्थानकावर थांबा नाही. लातूर राेड, लातूर, उदगीर येथील रेल्वेस्थानकावरच या एक्स्प्रेस रेल्वे थांबत आहेत.

दुप्पट प्रवासभाडे किती दिवस सहन करणार...

मार्च २०२० पासून पॅसेंजर रेल्वेसेवा बंद आहे. आता टप्प्या-टप्प्याने सुरू झालेल्या रेल्वेगाड्यात सर्वच रेल्वे या एक्स्प्रेस आणि स्पेशल रेल्वेचा समावेश आहे. अशा स्थितीत सामान्य प्रवाशांना प्रवास करणे अशक्य आहे. स्पेशल आणि एक्स्प्रेसचे दुप्पट प्रवासभाडे किती दिवस सहन करणार, असा प्रश्न प्रवाशांतून विचारला जात आहे.

ग्रामीण भागातील सामान्य प्रवाशांच्या साेयीसाठी रेल्वे विभागाने पॅसेंजर रेल्वेसेवा सुरू करण्याची गरज आहे. हा प्रवास खेड्या-पाड्यातील प्रवाशांसाठी साेयीचा आहे.

जनरल डबे कधी ‘अनलाॅक’ हाेणार...

रेल्वे विभागाच्या वतीने लातूर जिल्ह्यातून सुरू करण्यात आलेल्या सात एक्स्प्रेस रेल्वेचे जनरल डबे लाॅकच आहेत. हे डबे अनलाॅक कधी हाेणार, असा प्रश्न सामान्य प्रवाशांतून उपस्थित केला आहे. हे डबे गत दीड वर्षापासून लाॅक आहेत. आता पॅसेंजर रेल्वे सुरू झाल्या तरच खेड्या-पाड्यातील सामान्य प्रवाशांना दिलासा मिळणार आहे.

‘स्पेशल’ भाडे कसे परवडणार?

रेल्वे विभागाने सध्या सुरू केलेल्या रेल्वेगाड्यामध्ये सर्वच एक्स्प्रेस आहेत. परिणामी, एक्स्प्रेसचे प्रवास भाडे सामान्यांना परवडणारे नाही. यासाठी पॅसेंजर रेल्वेसेवा सुरू करण्याची गरज आहे. तरच ग्रामीण भागातील प्रवाशांची हेळसांड थांबवणार आहे.

- अंगद मुळे, उदगीर

सणासुदीच्या दिवसांत सुरू असलेल्या एक्स्प्रेस रेल्वेला माेठ्या प्रमाणावर प्रवाशांचा प्रतिसाद मिळत आहे. मात्र, या स्पेशल आणि एक्स्प्रेस रेल्वे सामान्यांना परवडणाऱ्या नाहीत. एकतर त्या छाेट्या-छाेट्या रेल्वे स्थानकांवर थांबत नाहीत. या रेल्वेने प्रवास करायचा म्हटल्यावर उदगीर, लातूर राेड आणि लातूर येथील रेल्वे स्थानकांचा वापर करावा लागताे.

- पुंडलिक सूर्यवंशी, लातूर

Web Title: How can you afford a 'special' ticket even during the festive season!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.