शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
4
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
5
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
6
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
7
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
8
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
9
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
10
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
11
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
12
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
13
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
14
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
15
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
16
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
17
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
18
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
19
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
20
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!

आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांस लातूर झेडपीची मायेची मदत; मोफत सोयाबीन बियाणे वाटप

By हरी मोकाशे | Updated: June 2, 2023 13:29 IST

आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना आधार देऊन त्यांनी पुन्हा उभारी घ्यावी म्हणून शासनाच्या वतीने विविध योजनांचा प्राधान्याने लाभ देण्यात येत आहे

लातूर : नापिकी, कर्जबाजारीपणा, कर्जाची परतफेड या तीन प्रमुख कारणांना वैतागून काही शेतकरी आपली जीवनयात्रा संपवितात. अशा आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांच्या सक्षमीकरणासाठी जिल्हा परिषदेने नवा उपक्रम हाती घेतला आहे. सेस फंडातून एकूण ५६५ आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबास खरीपासाठी मोफत सोयाबीन बियाणे देण्यात येणार आहेत. जिल्हा परिषदेचा हा निर्णय राज्यासाठी पथदर्शी ठरणारा आहे.

देशाच्या अर्थव्यवस्थेचा शेतकरी हा कणा आहे. मात्र, नापिकी, कर्जाच्या चिंतेने नैराश्यग्रस्त काही शेतकरी टाेकाचे पाऊल उचलत आत्महत्या करीत आहेत. आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना आधार देऊन त्यांनी पुन्हा उभारी घ्यावी म्हणून शासनाच्या वतीने विविध योजनांचा प्राधान्याने लाभ देण्यात येत आहे. दरम्यान, जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी., जि.प.चे सीईओ अभिनव गाेयल यांच्या सूचनेवरुन जिल्हा परिषदेने योजनांचा लाभ देण्याबरोबरच सामाजिक बांधलिकी जोपासत यंदाच्या खरीप हंगामासाठी मोफत सोयाबीन बियाणे देण्याचा उपक्रम हाती घेतला आहे.

५६५ कुटुंबांना अनुदानावर बियाणे...नापिकी व कर्जाला कंटाळून जिल्ह्यात सन २००४ ते २०२३ या कालावधीत एकूण ५६५ शेतकऱ्यांनी टोकाचे पाऊल उचलले. या आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबास जिल्हा परिषदेच्या सेस फंडातून शंभर टक्के अनुदानावर सोयाबीन बियाणे उपलब्ध करुन दिले जाणार आहे. पंचायत समितीस्तरावरुन कृषी केंद्रांना या शेतकरी कुटुंबांच्या याद्याही देण्यात आल्या आहेत.

१५ लाखांचे बियाणे वितरण...महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळाने उत्पादित केलेले सोयाबीनचे बियाणे ५६५ शेतकरी कुटुंबांना दिले जाणार आहे. सामाजिक बांधिलकी व सामाजिक उत्तरदायित्वाच्या भावनेतून जिल्हा परिषदेने जवळपास १५ लाख रुपयांचा निधी बियाणासाठी उपलब्ध करुन दिला आहे.

औश्यात सर्वाधिक आत्महत्या...जिल्ह्यात सर्वाधिक आत्महत्या ह्या औसा तालुक्यात झाल्या असून १३३ अशी संख्या आहे. लातूर तालुका- ७४, निलंगा- ८५, रेणापूर- ४८, शिरुर अनंतपाळ २३, उदगीर- ३४, अहमदपूर- ६७, चाकूर- ४३, देवणी- ४०, जळकोट तालुक्यातील १८ अशा एकूण ५६५ आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबास प्रत्येकी एक बॅगप्रमाणे सोयाबीन बियाणांचे वितरण होणार आहे.

आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांचे बळीकटीकरण...जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे सीईओ यांच्या सूचनेनुसार आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांच्या सक्षमीकरणासाठी विविध शासन योजनांचा प्राधान्याने लाभ देण्यात येत आहे. आता या कुटुंबांना सोयाबीन बियाणाची प्रत्येकी एक बॅग मोफत देण्यात येणार आहे.- सुभाष चोले, कृषी विकास अधिकारी.

टॅग्स :laturलातूरFarmerशेतकरीagricultureशेतीfarmer suicideशेतकरी आत्महत्या