शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
3
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
4
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
5
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
6
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
7
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
8
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
9
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
10
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
11
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
12
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
13
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
14
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
15
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
16
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
17
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास
18
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
19
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
20
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  

आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांस लातूर झेडपीची मायेची मदत; मोफत सोयाबीन बियाणे वाटप

By हरी मोकाशे | Updated: June 2, 2023 13:29 IST

आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना आधार देऊन त्यांनी पुन्हा उभारी घ्यावी म्हणून शासनाच्या वतीने विविध योजनांचा प्राधान्याने लाभ देण्यात येत आहे

लातूर : नापिकी, कर्जबाजारीपणा, कर्जाची परतफेड या तीन प्रमुख कारणांना वैतागून काही शेतकरी आपली जीवनयात्रा संपवितात. अशा आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांच्या सक्षमीकरणासाठी जिल्हा परिषदेने नवा उपक्रम हाती घेतला आहे. सेस फंडातून एकूण ५६५ आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबास खरीपासाठी मोफत सोयाबीन बियाणे देण्यात येणार आहेत. जिल्हा परिषदेचा हा निर्णय राज्यासाठी पथदर्शी ठरणारा आहे.

देशाच्या अर्थव्यवस्थेचा शेतकरी हा कणा आहे. मात्र, नापिकी, कर्जाच्या चिंतेने नैराश्यग्रस्त काही शेतकरी टाेकाचे पाऊल उचलत आत्महत्या करीत आहेत. आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना आधार देऊन त्यांनी पुन्हा उभारी घ्यावी म्हणून शासनाच्या वतीने विविध योजनांचा प्राधान्याने लाभ देण्यात येत आहे. दरम्यान, जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी., जि.प.चे सीईओ अभिनव गाेयल यांच्या सूचनेवरुन जिल्हा परिषदेने योजनांचा लाभ देण्याबरोबरच सामाजिक बांधलिकी जोपासत यंदाच्या खरीप हंगामासाठी मोफत सोयाबीन बियाणे देण्याचा उपक्रम हाती घेतला आहे.

५६५ कुटुंबांना अनुदानावर बियाणे...नापिकी व कर्जाला कंटाळून जिल्ह्यात सन २००४ ते २०२३ या कालावधीत एकूण ५६५ शेतकऱ्यांनी टोकाचे पाऊल उचलले. या आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबास जिल्हा परिषदेच्या सेस फंडातून शंभर टक्के अनुदानावर सोयाबीन बियाणे उपलब्ध करुन दिले जाणार आहे. पंचायत समितीस्तरावरुन कृषी केंद्रांना या शेतकरी कुटुंबांच्या याद्याही देण्यात आल्या आहेत.

१५ लाखांचे बियाणे वितरण...महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळाने उत्पादित केलेले सोयाबीनचे बियाणे ५६५ शेतकरी कुटुंबांना दिले जाणार आहे. सामाजिक बांधिलकी व सामाजिक उत्तरदायित्वाच्या भावनेतून जिल्हा परिषदेने जवळपास १५ लाख रुपयांचा निधी बियाणासाठी उपलब्ध करुन दिला आहे.

औश्यात सर्वाधिक आत्महत्या...जिल्ह्यात सर्वाधिक आत्महत्या ह्या औसा तालुक्यात झाल्या असून १३३ अशी संख्या आहे. लातूर तालुका- ७४, निलंगा- ८५, रेणापूर- ४८, शिरुर अनंतपाळ २३, उदगीर- ३४, अहमदपूर- ६७, चाकूर- ४३, देवणी- ४०, जळकोट तालुक्यातील १८ अशा एकूण ५६५ आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबास प्रत्येकी एक बॅगप्रमाणे सोयाबीन बियाणांचे वितरण होणार आहे.

आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांचे बळीकटीकरण...जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे सीईओ यांच्या सूचनेनुसार आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांच्या सक्षमीकरणासाठी विविध शासन योजनांचा प्राधान्याने लाभ देण्यात येत आहे. आता या कुटुंबांना सोयाबीन बियाणाची प्रत्येकी एक बॅग मोफत देण्यात येणार आहे.- सुभाष चोले, कृषी विकास अधिकारी.

टॅग्स :laturलातूरFarmerशेतकरीagricultureशेतीfarmer suicideशेतकरी आत्महत्या