शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदे गटाचे नेते तानाजी सावंत यांची प्रकृती बिघडली; रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचार सुरू
2
मुंबईत दीड कोटी अमराठी, त्यांच्याशी‌ बोलताना हिंदी हवी की नको; चंद्रकांत पाटील यांचं विधान
3
“उद्या दुपारी १२ वाजता या, अंतरवाली सराटीतील शेवटची बैठक”; जरांगेंचे मराठा समाजाला आवाहन
4
ENG W vs IND W : स्मृतीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाचा मोठा विजय; इंग्लंडवर ओढावली नामुष्की
5
"पृथ्वीवर कोणत्याही सीमा दिसत नाहीत, आपण सर्व एक आहोत"; पंतप्रधान मोदींनी साधला शुभांशू शुक्लांशी संवाद
6
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपाची तयारी सुरू; वॉर्डनिहाय आढावा घेणार, संचलन समितीची घोषणा
7
स्मृती मानधनानं पहिल्या टी-20I सेंच्युरीसह रचला इतिहास, असा पराक्रम करणारी ती पहिलीच
8
एअर इंडियाच्या विमानात बसला, दारू प्यायला अन् महिला कर्मचाऱ्यासोबत... ; लँडिंग होताच प्रवासी पोलिसांच्या ताब्यात!
9
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
10
भारताचा बांगलादेशला मोठा झटका, 'या' गोष्टीवर घातली बंदी! का घेतला मोठा निर्णय?
11
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
12
आता आणखी कोण? काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसायची चिन्हे
13
पैसे तयार ठेवा! लवकरच येणार Meesho चा IPO, काय आहे कंपनीचा प्लान? पाहा डिटेल्स 
14
मुंबईचे डबेवाले एक दिवसाच्या सुट्टीवर जाणार! काय आहे कारण? जाणून घ्या...
15
“तुमचा वाईट पद्धतीने पराभव केला, तुम्ही आता नरकात...”; ट्रम्प यांचा खामेनी यांच्यावर प्रहार
16
“काँग्रेसचा विचार संपवू शकत नाही, वहिनींना पक्षात घेऊन...”; विशाल पाटलांची भाजपावर टीका
17
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!
18
महायुती सरकारमध्ये मतभेद! पाचवीपर्यंत हिंदी नको, अजित पवार गटाने मांडली पक्षाची भूमिका
19
पाणी अंगावर उडाले म्हणून कोयता घेऊन धावला; छत्रपती संभाजीनगरात नशेखोराचा धुमाकूळ
20
Shefali Jariwala Funeral: शेफालीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, पती पराग त्यागीची रडून वाईट अवस्था, भावुक करणारा व्हिडिओ

'एक रोटेशन द्या,ऊस वाळायचा थांबेल'; 'मांजरा'वरील सिंचन बंद झाल्याने शेतकऱ्यांची विनवणी

By हणमंत गायकवाड | Updated: June 19, 2023 18:48 IST

पिण्याच्या पाण्याची अडचण होऊ नये म्हणून सिंचनासाठी पाणी बंद करण्यात आले आहे.

लातूर : उन्हाळी हंगाम अद्याप संपला नसला तरी पाटबंधारे विभागाने मांजरा प्रकल्पावरील सिंचनासाठी पाण्याचे रोटेशन थांबविले आहे. उन्हाळी तीन पाळ्या उजव्या आणि डाव्या कालव्यात पाणी सोडल्यानंतर हंगाम तूर्तास बंद करण्यात आला आहे. केवळ आणि केवळ पाऊस लांबल्यामुळे पाटबंधारे विभागाने हा निर्णय घेतला आहे. दरम्यान, मांजरा प्रकल्पावरील २० ते २२ हजार लाभार्थी शेतकऱ्यांनी एका रोटेशनसाठी पाटबंधारे विभागाकडे पाणी सोडण्याची विनवणी केली आहे. मात्र, पिण्याच्या पाण्याची अडचण होऊ नये म्हणून सिंचनासाठी पाणी बंद करण्यात आले आहे.

मांजरा प्रकल्पाअंतर्गत डावा आणि उजवा कालवा आहे. या दोन्ही कालव्याअंतर्गत २३ हजार ९२३ हेक्टर्स क्षेत्र सिंचनाखाली आहे. उजव्या कालव्याचे क्षेत्र लातूर तालुक्यातील हरंगुळपर्यंत आहे. तर डाव्या कालव्याचे क्षेत्र रेणापूर तालुक्यातील निवाडा पाटीपर्यंत आहे. या दोन कालव्याअंतर्गत २३ हजार हेक्टर क्षेत्र ओलिताखाली आहे. प्रस्तुत उन्हाळ्यामध्ये २० ते २२ हजार शेतकऱ्यांनी तीन रोटेशनचा फायदा पीकक्षेत्र भिजविण्यासाठी घेतला आहे. मात्र आता पावसाळा लांबल्याने पुन्हा रोटेशन नाही, अशी भूमिका पाटबंधारे विभागाने घेतली आहे.

ऊस वाळतोय, पाणी द्या...तिसऱ्या रोटेशनचा कालावधी संपून दहा ते बारा दिवस उलटले आहेत. त्यातच उन्हाची तीव्रता वाढतच आहे. कॅनॉलच्या पाण्यावर असलेला ऊस दुपार धरत आहे. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी पाटबंधारे विभागाकडे एका रोटेशनची मागणी केली आहे. परंतु, पिण्याच्या पाण्याची अडचण नको म्हणून सध्या तरी प्रशासनाने फक्त पिण्याच्या पाण्याचाच विचार केला आहे.

मांजरा प्रकल्पात २१.२४ टक्के जिवंत साठा...मांजरा प्रकल्पामध्ये प्राप्त स्थितीमध्ये २१.२४ टक्के पाणीसाठा आहे. म्हणजे ३७.५९१ दलघमी जिवंत पाणीसाठा असून, एवढे पाणी पिण्यासाठीच वापरायचे असे ठरविले तर एक वर्ष सर्व पाणीपुरवठा योजनांना पुरू शकते. आणखी पावसाळा सुरू झालेला नाही. पाऊस पडणार आहेच, त्यामुळे एक रोटेशन द्यावे, अशी विनंती शेतकऱ्यांची आहे. परंतु, पावसाने ताण दिल्यामुळे सध्या तरी प्रशासनाची सिंचनासाठी नो, अशी भूमिका आहे.

दोन सेंटिमीटरने दररोज घट...मांजरा प्रकल्पात सध्या एकूण ८४.७२१ दलघमी पाणीसाठा आहे. त्यातील मृतसाठा ४७.१३० दलघमी असून, ३७.५९१ जिवंत पाणीसाठा आहे. २१.२४ जिवंत पाणीसाठ्याची टक्केवारी आहे. बाष्पीभवन, पाणी वापर योजना हे सगळे मिळून दररोज धरणातील पाणी दोन सेंटिमीटरने कमी होत आहे, अशी माहिती शाखा अभियंता सूरज निकम यांनी दिली.

टॅग्स :Manjara Damमांजरा धरणFarmerशेतकरीSugar factoryसाखर कारखानेlaturलातूरRainपाऊस