शहरं
Join us  
Trending Stories
1
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
2
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
3
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
4
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
5
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
6
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
7
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
8
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
9
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
10
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
11
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
12
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
13
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
14
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
15
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
16
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
17
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
18
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
19
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
20
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील

'एक रोटेशन द्या,ऊस वाळायचा थांबेल'; 'मांजरा'वरील सिंचन बंद झाल्याने शेतकऱ्यांची विनवणी

By हणमंत गायकवाड | Updated: June 19, 2023 18:48 IST

पिण्याच्या पाण्याची अडचण होऊ नये म्हणून सिंचनासाठी पाणी बंद करण्यात आले आहे.

लातूर : उन्हाळी हंगाम अद्याप संपला नसला तरी पाटबंधारे विभागाने मांजरा प्रकल्पावरील सिंचनासाठी पाण्याचे रोटेशन थांबविले आहे. उन्हाळी तीन पाळ्या उजव्या आणि डाव्या कालव्यात पाणी सोडल्यानंतर हंगाम तूर्तास बंद करण्यात आला आहे. केवळ आणि केवळ पाऊस लांबल्यामुळे पाटबंधारे विभागाने हा निर्णय घेतला आहे. दरम्यान, मांजरा प्रकल्पावरील २० ते २२ हजार लाभार्थी शेतकऱ्यांनी एका रोटेशनसाठी पाटबंधारे विभागाकडे पाणी सोडण्याची विनवणी केली आहे. मात्र, पिण्याच्या पाण्याची अडचण होऊ नये म्हणून सिंचनासाठी पाणी बंद करण्यात आले आहे.

मांजरा प्रकल्पाअंतर्गत डावा आणि उजवा कालवा आहे. या दोन्ही कालव्याअंतर्गत २३ हजार ९२३ हेक्टर्स क्षेत्र सिंचनाखाली आहे. उजव्या कालव्याचे क्षेत्र लातूर तालुक्यातील हरंगुळपर्यंत आहे. तर डाव्या कालव्याचे क्षेत्र रेणापूर तालुक्यातील निवाडा पाटीपर्यंत आहे. या दोन कालव्याअंतर्गत २३ हजार हेक्टर क्षेत्र ओलिताखाली आहे. प्रस्तुत उन्हाळ्यामध्ये २० ते २२ हजार शेतकऱ्यांनी तीन रोटेशनचा फायदा पीकक्षेत्र भिजविण्यासाठी घेतला आहे. मात्र आता पावसाळा लांबल्याने पुन्हा रोटेशन नाही, अशी भूमिका पाटबंधारे विभागाने घेतली आहे.

ऊस वाळतोय, पाणी द्या...तिसऱ्या रोटेशनचा कालावधी संपून दहा ते बारा दिवस उलटले आहेत. त्यातच उन्हाची तीव्रता वाढतच आहे. कॅनॉलच्या पाण्यावर असलेला ऊस दुपार धरत आहे. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी पाटबंधारे विभागाकडे एका रोटेशनची मागणी केली आहे. परंतु, पिण्याच्या पाण्याची अडचण नको म्हणून सध्या तरी प्रशासनाने फक्त पिण्याच्या पाण्याचाच विचार केला आहे.

मांजरा प्रकल्पात २१.२४ टक्के जिवंत साठा...मांजरा प्रकल्पामध्ये प्राप्त स्थितीमध्ये २१.२४ टक्के पाणीसाठा आहे. म्हणजे ३७.५९१ दलघमी जिवंत पाणीसाठा असून, एवढे पाणी पिण्यासाठीच वापरायचे असे ठरविले तर एक वर्ष सर्व पाणीपुरवठा योजनांना पुरू शकते. आणखी पावसाळा सुरू झालेला नाही. पाऊस पडणार आहेच, त्यामुळे एक रोटेशन द्यावे, अशी विनंती शेतकऱ्यांची आहे. परंतु, पावसाने ताण दिल्यामुळे सध्या तरी प्रशासनाची सिंचनासाठी नो, अशी भूमिका आहे.

दोन सेंटिमीटरने दररोज घट...मांजरा प्रकल्पात सध्या एकूण ८४.७२१ दलघमी पाणीसाठा आहे. त्यातील मृतसाठा ४७.१३० दलघमी असून, ३७.५९१ जिवंत पाणीसाठा आहे. २१.२४ जिवंत पाणीसाठ्याची टक्केवारी आहे. बाष्पीभवन, पाणी वापर योजना हे सगळे मिळून दररोज धरणातील पाणी दोन सेंटिमीटरने कमी होत आहे, अशी माहिती शाखा अभियंता सूरज निकम यांनी दिली.

टॅग्स :Manjara Damमांजरा धरणFarmerशेतकरीSugar factoryसाखर कारखानेlaturलातूरRainपाऊस