शहरं
Join us  
Trending Stories
1
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
2
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
3
राज्यातील ओबीसी आरक्षण संपल्यात जमा; आरक्षणाला कसलाही धक्का लागू नये, हीच मागणी - लक्ष्मण हाके
4
१ मे रोजी गुरुवार पण बंद राहणार शेअर बाजार; कारण काय? जाणून घ्या
5
राधाकृष्ण विखे पाटलांना दणका; फसवणुकीप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
6
Nashik Crime: हर्षद पाटणकरच्या सांगण्यावरून करण चौरेची हत्या; तपासातून समोर आली खबळजनक माहिती
7
LoC Tensions Escalate: तणाव वाढताच पाकिस्तानी जवानांनी सीमेवरील चौक्या सोडल्या, झेंडेही हटवले
8
भारत-पाकिस्तान तणाव शिगेला पोहोचला असतानाच अमेरिकेतून आली 'गुड न्यूज'! ट्रम्प म्हणाले, भारतासोबत होऊ शकतो करार
9
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
10
मनीष सिसोदिया आणि सत्येंद्र जैन पुन्हा अडचणीत; आता ₹2000 कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप
11
भारत-पाकिस्तान युद्ध झालेच तर पाकिस्तानच्या बाजुने कोणते देश? भारताला कोण मदत करू शकतो...
12
"मी २७ वर्षांची असून बेकार, काहीच कमवत नाही", आमिरच्या लेकीची खंत; अभिनेता म्हणाला...
13
नाशिक: तो पळत गेला अन् उडी मारून स्कुटीवर बसला; पोलिसाच्या हाताला झटका देऊन आरोपी फरार
14
Gold Price on Akshay Tritiya : अक्षय्य तृतीयेला 'इतक्या' रुपयांनी स्वस्त झालं सोनं, काय आहे १४ ते २४ कॅरेट सोन्याचे नवे दर
15
चपाती बनवताना तुम्हीही करता का 'ही' चूक? वाढू शकतो कॅन्सरचा धोका, वेळीच व्हा सावध
16
पाकिस्तानचा खोटारडेपणा, हुतात्मा जवानाच्या आईला भारताने हाकलल्याची पसरवली बातमी, आता समोर आलं सत्य
17
'मुस्लीम रुग्णांवर उपचार करणार नाही' पहलगाम हल्ल्यानंतर इंदूरच्या डॉक्टरची पोस्ट व्हायरल
18
१ मेपासून देशातील १५ बँका होणार बंद; महाराष्ट्रातील बँकांचाही समावेश? खातेदारांच्या पैशाचं काय होणार?
19
"लहानपणापासून मी कित्येक पूजा केल्यात, काही लोकांना आज उत्तर मिळाले असेल"; शरद पवारांचा टोला
20
क्रिकेटसोबत कमाईतही नंबर वन आहे Rohit Sharma, वर्षाला कोट्यवधींची कमाई; कशी आहे लक्झरी लाईफस्टाईल?

'एक रोटेशन द्या,ऊस वाळायचा थांबेल'; 'मांजरा'वरील सिंचन बंद झाल्याने शेतकऱ्यांची विनवणी

By हणमंत गायकवाड | Updated: June 19, 2023 18:48 IST

पिण्याच्या पाण्याची अडचण होऊ नये म्हणून सिंचनासाठी पाणी बंद करण्यात आले आहे.

लातूर : उन्हाळी हंगाम अद्याप संपला नसला तरी पाटबंधारे विभागाने मांजरा प्रकल्पावरील सिंचनासाठी पाण्याचे रोटेशन थांबविले आहे. उन्हाळी तीन पाळ्या उजव्या आणि डाव्या कालव्यात पाणी सोडल्यानंतर हंगाम तूर्तास बंद करण्यात आला आहे. केवळ आणि केवळ पाऊस लांबल्यामुळे पाटबंधारे विभागाने हा निर्णय घेतला आहे. दरम्यान, मांजरा प्रकल्पावरील २० ते २२ हजार लाभार्थी शेतकऱ्यांनी एका रोटेशनसाठी पाटबंधारे विभागाकडे पाणी सोडण्याची विनवणी केली आहे. मात्र, पिण्याच्या पाण्याची अडचण होऊ नये म्हणून सिंचनासाठी पाणी बंद करण्यात आले आहे.

मांजरा प्रकल्पाअंतर्गत डावा आणि उजवा कालवा आहे. या दोन्ही कालव्याअंतर्गत २३ हजार ९२३ हेक्टर्स क्षेत्र सिंचनाखाली आहे. उजव्या कालव्याचे क्षेत्र लातूर तालुक्यातील हरंगुळपर्यंत आहे. तर डाव्या कालव्याचे क्षेत्र रेणापूर तालुक्यातील निवाडा पाटीपर्यंत आहे. या दोन कालव्याअंतर्गत २३ हजार हेक्टर क्षेत्र ओलिताखाली आहे. प्रस्तुत उन्हाळ्यामध्ये २० ते २२ हजार शेतकऱ्यांनी तीन रोटेशनचा फायदा पीकक्षेत्र भिजविण्यासाठी घेतला आहे. मात्र आता पावसाळा लांबल्याने पुन्हा रोटेशन नाही, अशी भूमिका पाटबंधारे विभागाने घेतली आहे.

ऊस वाळतोय, पाणी द्या...तिसऱ्या रोटेशनचा कालावधी संपून दहा ते बारा दिवस उलटले आहेत. त्यातच उन्हाची तीव्रता वाढतच आहे. कॅनॉलच्या पाण्यावर असलेला ऊस दुपार धरत आहे. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी पाटबंधारे विभागाकडे एका रोटेशनची मागणी केली आहे. परंतु, पिण्याच्या पाण्याची अडचण नको म्हणून सध्या तरी प्रशासनाने फक्त पिण्याच्या पाण्याचाच विचार केला आहे.

मांजरा प्रकल्पात २१.२४ टक्के जिवंत साठा...मांजरा प्रकल्पामध्ये प्राप्त स्थितीमध्ये २१.२४ टक्के पाणीसाठा आहे. म्हणजे ३७.५९१ दलघमी जिवंत पाणीसाठा असून, एवढे पाणी पिण्यासाठीच वापरायचे असे ठरविले तर एक वर्ष सर्व पाणीपुरवठा योजनांना पुरू शकते. आणखी पावसाळा सुरू झालेला नाही. पाऊस पडणार आहेच, त्यामुळे एक रोटेशन द्यावे, अशी विनंती शेतकऱ्यांची आहे. परंतु, पावसाने ताण दिल्यामुळे सध्या तरी प्रशासनाची सिंचनासाठी नो, अशी भूमिका आहे.

दोन सेंटिमीटरने दररोज घट...मांजरा प्रकल्पात सध्या एकूण ८४.७२१ दलघमी पाणीसाठा आहे. त्यातील मृतसाठा ४७.१३० दलघमी असून, ३७.५९१ जिवंत पाणीसाठा आहे. २१.२४ जिवंत पाणीसाठ्याची टक्केवारी आहे. बाष्पीभवन, पाणी वापर योजना हे सगळे मिळून दररोज धरणातील पाणी दोन सेंटिमीटरने कमी होत आहे, अशी माहिती शाखा अभियंता सूरज निकम यांनी दिली.

टॅग्स :Manjara Damमांजरा धरणFarmerशेतकरीSugar factoryसाखर कारखानेlaturलातूरRainपाऊस