शहरं
Join us  
Trending Stories
1
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
2
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
3
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
4
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
5
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
6
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
7
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग
8
Video - "तीळ कुठे आहे हे Gemini ला कसं कळलं?"; तरुणीने सांगितला धक्कादायक अनुभव
9
Video: मोहम्मद युसूफने खालची पातळी गाठली! लाईव्ह टीव्हीवर सूर्यकुमारच्या नावाचा अभद्र उच्चार...
10
पडळकरांवर गुन्हा दाखल करा, अन्यथा जीवाचे बरे-वाईट करू; कुणी दिला इशारा, नेमके प्रकरण काय?
11
IND vs PAK हस्तांदोलन वादावर ऑस्ट्रेलियाचा रिकी पॉन्टींग स्पष्ट बोलला, पाकिस्तानला झापलं...
12
मेघालयमध्ये मोठी राजकीय उलथापालथ, ८ मंत्र्यांनी दिला राजीनामा, नेमकं कारण काय?
13
'तो जिच्यासोबत आहे तिला मी चांगलं ओळखतो', आरजे महावशबद्दल अरबाज अन् धनश्रीचं संभाषण
14
“चुकीच्या गोष्टी सुरू, खाडाखोड करून कुणबी नोंदी; रिपोर्ट मुख्यमंत्र्यांना देणार”: छगन भुजबळ
15
RSS च्या विचारानुसार नरेंद्र मोदी ७५ वर्षानंतर वानप्रस्थाश्रमात जाण्याचा राजधर्म पाळतील का?, काँग्रेसचा सवाल
16
राज ठाकरे यांच्याशी अधिकृत युती कधी जाहीर करणार?; उद्धव ठाकरे यांनी सरळ सांगितले, म्हणाले…
17
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
18
जगातील 'असे' ५ देश, ज्यांच्याकडे सैन्य दलच नाही! मग कोण करत देशाची सुरक्षा?
19
Navratri 2025: नवरात्रीत प्या झेंडूच्या फुलांचा चहा, मिळवा निरोगी डोळे, रक्तशुद्धी आणि नितळ त्वचा
20
“देवाभाऊंच्या जाहिरातीला कोट्यवधी उधळले, तेच पैसे शेतकऱ्यांना दिले असते तर...”: उद्धव ठाकरे

स्मशानभूमी नसल्याने ग्रामपंचायतीसमोरच अंत्यसंस्कार, निलंगा तालुक्यातील घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2022 17:54 IST

लातूर जिल्ह्यातील निलंगा तालुक्यातील हणमंतवाडीमध्ये ही घटना घडली असून, ग्रामस्थांकडून गेल्या २० वर्षांपासून स्मशानभूमीची मागणी केली जात आहे.

निलंगा (लातूर) - १५ ते २० वर्षांपासून स्मशानभूमीला शासनाकडून जागा मिळत नसल्याने संतप्त नागरिकांनी मयत महिलेवर गावातील ग्रामपंचायतीसमोर अंत्यसंस्कार केल्याची घटना गुरुवारी निलंगा तालुक्यातील हणमंतवाडी अं.बु. येथे घडली आहे. तालुक्यातील हणमंतवाडी अ.बु. हे चार हजार लोकसंख्येचे गाव आहे. गावात अद्यापही स्मशानभूमी नाही. त्यामुळे १५ ते २० वर्षांपासून गावातील नागरिक स्मशानभूमीसाठी जागा उपलब्ध करुन द्यावी, अशी मागणी प्रशासनाकडे करीत आहेत. मात्र, अद्यापि स्मशानभूमीचा प्रश्न संपुष्टात आला नाही. येथील जागेचा वाद न्यायप्रविष्ट असल्याने गावातील मयत व्यक्तीवर अंत्यसंस्कार करायचे कोठे, असा प्रश्न निर्माण होत आहे.

गावातील सोजरबाई रामचंद्र निकम (७०) यांचे गुरुवारी वृध्दापकाळाने निधन झाले. त्यामुळे नातेवाईक आणि नागरिकांनी गुरुवारी अंत्यविधीची तयारी सुरु केली. परंतु, अंत्यसंस्कार कोठे करावे, असा प्रश्न निर्माण झाला. तेव्हा संतप्त नागरिकांनी गावातील ग्रामपंचायतीसमोर अंत्यसंस्कार करण्याचा निर्णय घेऊन तिथेच केले. गेल्यावर्षीच्या पावसाळ्यात वादग्रस्त स्मशानभूमीच्या जागेत मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. तेव्हा मयत रावण सूर्यवंशी यांच्यावर अंत्यसंस्कार कोठे करायचे, असा सवाल करीत नागरिकांनी तहसीलदारांकडे धाव घेतली होती. तेव्हा तहसीलदारांनी निलंग्यातील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यासाठी पुढाकार घेतला होता. मात्र, शेजारीच असलेल्या अंबुलगा येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले होते. गावात एखाद्या व्यक्तीचे निधन झाल्यास पोलीस, महसूल प्रशासनास बोलावूनच अंत्यसंस्कार करावे लागत आहेत.स्मशानभूमीच्या जागेचा वाद न्यायालयात...

सार्वजनिक स्मशानभूमीसाठी चार गुंठे जागा गावाने खरेदी केली होती. परंतु, संबंधित शेत मालकाने ती जागा गावातील एकास विक्री केली. विक्री करणारा आणि खरेदी करणारा हे दोघेही जागा देण्यास तयार नाहीत. त्यामुळे ग्रामपंचायत व ग्रामस्थांनी न्यायालयात धाव घेतली आहे. प्रशासन यासंदर्भात कुठलाही पाठपुरावा करीत नसल्याचा आरोप ग्रामस्थ करीत आहेत.

जिल्हाधिका-यांनी दखल घ्यावी...

गावात स्मशानभूमी तयार करण्यासाठी ग्रामपंचायतीने वारंवार पाठपुरावा केला. मात्र, शासन अंत्यविधीसाठी जागा देत नाही. जिल्हाधिका-यांनी तात्काळ लक्ष देऊन जागा उपलब्ध करून द्यावी, अन्यथा आम्ही ग्रामस्थ मतदानावर बहिष्कार टाकणार आहोत, असे ग्रामस्थ धर्मराज लखने म्हणाले.

प्रशासनाच्या मध्यस्थीनंतर अंत्यसंस्कार...गावात एखाद्याचा मृत्यू झाला की, पोलीस, महसूल प्रशासनास बोलावून मध्यस्थी करून अंत्यसंस्कार करावे लागतात. मात्र आता संबंधित शेतकरी शेतात अंत्यसंस्कार करू देत नाही. त्यामुळे तात्काळ स्मशानभूमीचा प्रश्न सोडवावा, अशी मागणी सरपंच प्रभाकर मलिले यांनी केली.

अंबुलगा तलावानजीक जागा उपलब्ध...

गावाशेजारील २० गुंठे जमीन सार्वजनिक स्मशानभूमीसाठी १९८५ साली अधिग्रहित करण्यात आली होती. परंतु, त्या जमिनीची खरेदी- विक्री करण्यात आली आहे. दरम्यान, खरेदीदाराने न्यायालयातून मनाई हुकुम आणले आहे. ग्रामसेवक, तलाठ्यांनी गावाशेजारील अंबुलगा तलावाजवळ अंत्यविधी करण्यास जागा उपलब्ध करून दिली आहे. मात्र, काही नागरिकांनी ग्रामपंचायतीसमोर अंत्यविधी करून अतिरेक केला आहे, असे तहसीलदार गणेश जाधव म्हणाले.

टॅग्स :laturलातूरfundsनिधी