पाच गुन्ह्यांचा झाला उलगडा; ६ आराेपी अडकले जाळ्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2021 04:23 IST2021-09-22T04:23:31+5:302021-09-22T04:23:31+5:30
पाेलिसांनी सांगितले, पहिल्या घटनेत एका दुकानातील राेख ५२ हजार रुपये आणि दुसऱ्या घटनेत साेन्याचे दागिने चाेरुन नेल्यची घटना घडली ...

पाच गुन्ह्यांचा झाला उलगडा; ६ आराेपी अडकले जाळ्यात
पाेलिसांनी सांगितले, पहिल्या घटनेत एका दुकानातील राेख ५२ हजार रुपये आणि दुसऱ्या घटनेत साेन्याचे दागिने चाेरुन नेल्यची घटना घडली हाेती. दरम्यान, याप्रकरणी कृष्णा राजेंद्र कांबळे (२८), इश्वर गजेंद्र कांबळे (१९) आणि अजय संताेष चव्हाण (२० रा. जयनगर, रिंगराेड लातूर) यांना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून चाेरीतील ७ हजार २०० रुपयांची रक्कम जप्त करण्यात आली. दुसऱ्या घटनेतील मंगळसूत्र आणि २० हजार रुपये जप्त केले आहे. तिसऱ्या घटनेत साेन्याची बाेरमाळ आणि राेख रक्कम चाेरुन नेल्याची घटना घडली हाेती. याप्रकरणी पवन सहदेव जाधव (१८ रा. संजयनगर, औसा ह. मु. म्हाडा काॅलनी, लातूर) याला अटक करण्यात आली. त्याच्याकडून गुन्ह्यातील साेन्याची बाेरमाळ जप्त करण्यात आली आहे. चाैथ्या घटनेत अज्ञात चाेरट्यांनी साेन्याचे मणी-मंगळसूत्र, चांदीचे २५ ताेळ्याची चेन असा ४५ हजारांचा मुद्देमाल लंपास केला हाेता. याप्रकरणी अविनाश काशिनाथ काळे (२८ रा. विलासनगर, लातूर) याला अटक करण्यात आली. त्याच्याकडून चाेरीला गेलेल्या मुद्देमालापैकी चांदीची चैन जप्त करण्यात आली आहे. तर पाचव्या घटनेत राेख एक हजार आणि माेबाइल असा मुद्देमाल चाेरीला गेला हाेता. दरम्यान, याप्रकरणी गुरु सुभाष काळे (२७ रा. रिंगराेड, गरुड चाैक परिसर लातूर) याला अटक करण्यात आली. त्याच्याकडून राेख एक हजार आणि माेबाइल असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.