शहरं
Join us  
Trending Stories
1
"अजित पवार नाद करायचा नाही"; मुलाच्या इशाऱ्यानंतर राजन पाटील म्हणाले, "त्याला पार्थ सारखं..."
2
Pune Crime: रात्री दीड वाजेची वेळ, हातात कोयते; पुण्यातील रेस्टॉरंटमध्ये गुंडांचा हैदोस, घटना सीसीटीव्हीमध्ये कैद
3
सरकारच्या 'या' स्कीममध्ये मिळवा विना गॅरेंटी व्यवसाय सुरू करण्यासाठी लोन; केवळ एका डॉक्युमेंटची लागेल गरज
4
आरक्षण मर्यादेचं उल्लंघन, राज्यातील निवडणुकांचं काय होणार? आता २५ नोव्हेंबरला पुढील सुनावणी, सुप्रिम कोर्टात आज काय घडलं
5
दुसऱ्या मुलीशी लग्न करत होता बॉयफ्रेंड, अचानक भर लग्नात धडकली गर्लफ्रेंड; मंडपात तमाशा सुरू होताच...
6
निवडणूक आयोगाला बदनाम करण्याचा प्रयत्न; देशातील 272 प्रतिष्ठित व्यक्तींचा पत्रातून काँग्रेसवर निशाणा
7
SIP सुरू करण्यापूर्वी वाचा! इंडेक्स फंडात 'कमी खर्च' तर Active फंडात 'जास्त रिटर्न'ची संधी; कोणता निवडावा?
8
“काँग्रेस-वंचित पक्षाची आघाडी व्हावी ही स्थानिक कार्यकर्त्यांची भावना”; नेते म्हणाले...
9
'अजित पवार आणि सुनेत्राआत्या ज्याप्रमाणे माझे नातेवाईक...", राणा जगजितसिंह यांचं सुप्रिया सुळेंना पत्र; नेमकं प्रकरण काय?
10
"पंतप्रधान मोदींमुळे माझ्या आईचा जीव वाचला..."; शेख हसीना यांचा मुलगा सजीब यांचे विधान
11
Parasocial: केंब्रिज डिक्शनरीचा मोठा निर्णय! २०२५ चा 'वर्ड ऑफ द इयर' ठरला 'पॅरासोशल'
12
११ युवकांचं ब्रेनवॉश करण्यासाठी... ; दिल्ली स्फोटातील दहशतवादी डॉ. उमरबाबत आणखी धक्कादायक माहिती उघड
13
राज ठाकरेंमुळे काँग्रेस आणि ठाकरे गटात दुरावा?, वर्षा गायकवाड म्हणाल्या, ‘त्यांना सोबत घेण्यापूर्वी…’  
14
Delhi Blast: ‘बूट सुसाइड बॉम्बर’च्या तंत्रामुळे गुप्तचर-तपास यंत्रणा झाली सतर्क!
15
‘श्री स्वामी समर्थ अथर्वशीर्ष’ दररोज म्हणता का? कालातीत लाभ होतात, स्वामी कायम कृपा करतात!
16
Shubman Gill Medical Update : गिल टीम इंडियासोबत गुवाहटीला जाणार का? BCCI नं माहिती दिली, पण अर्धवट
17
"...मग हा ग्रुप आला कुठून, या अपयशाला जबाबदार कोण?" ; ओवेसींनी अमित शाहांना करून जुनी दाव्याची आठवण
18
५४ तास विपरीत महालक्ष्मी राजयोग: ५ राशींना ४ पट लाभ, पद-पैसा-प्रतिष्ठा वाढ; अकल्पनीय फायदा!
19
जमीन घोटाळ्यात पार्थ पवारांना वगळले! अंबादास दानवे म्हणाले, '९९% भागीदारी असताना चौकशी अहवालात नाव कसं नाही?'
20
वेदनादायी! ऑस्ट्रेलियात BMW ची भारतीय महिलेला धडक, जागीच मृत्यू; होती ८ महिन्यांची गर्भवती
Daily Top 2Weekly Top 5

तलाव कोरडे पडल्याने मत्स्य व्यावसायिकांची तडफड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2021 04:15 IST

अहमदपूर : गेल्या वर्षी अधिक पाऊस झाल्याने तालुक्यातील मत्स्य व्यावसायिकांना दिलासा मिळाला होता. मात्र, उन्हाळ्यात तलाव कोरडे पडल्याने त्यात ...

अहमदपूर : गेल्या वर्षी अधिक पाऊस झाल्याने तालुक्यातील मत्स्य व्यावसायिकांना दिलासा मिळाला होता. मात्र, उन्हाळ्यात तलाव कोरडे पडल्याने त्यात सोडलेले हजारो रुपयांच्या मत्स्य बीजांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे व्यवसायासाठी केलेला खर्चही पदरी पडला नसल्याने येथील १५२ कुटुंबांवर उपासमारीची वेळ आली आहे.

गेल्या वर्षीच्या पावसाळ्यात अधिक पाऊस झाला होता. त्यामुळे तालुक्यातील नागठाणा, गोताळा, धसवाडी, सोनखेड, मोघा, तेलगाव, कौडगाव, येस्तार, यलदरी, ढाळेगाव, तांबट सांगवी, हगदळ-गुगदळ, अहमदपूर, पाटोदा, खंडाळी, अंधोरी, काळेगाव, उगिलेवाडी, सावरगाव (थोट), हंगेवाडी, मावलगाव, मोळवण तसेच भुत्तेकरवाडी, गोताळा, नांदुरा (वाकी), अहमदपूर साठवण तलाव, थोडगा, फुलमाळा, लांजी येथील तलावात चांगला जलसाठा झाला होता. त्यामुळे भुत्तेकरवाडी, गोताळा, नांदुरा (वाकी), अहमदपूर साठवण तलाव, थोडगा, फुलमाळा, लांजी तलावाचा ठेका अहमदपूर मत्स्य व्यवसाय सहकारी संस्थेच्या माध्यमातून भरण्यात आला. या संस्थेचे १५२ क्रियाशील सदस्य आहे. यावर्षी दहा लाख खर्चून ठेका घेऊन १५ लाख मत्स्यबीज सोडले होते. त्यामुळे चांगले उत्पन्न पदरी पडेल, अशी आशा होती. परंतु, वाढत्या उन्हामुळे आणि शेतीसाठी मोठ्या प्रमाणात पाणी उपसा करण्यात आल्याने तलाव कोरडे पडले आहेत. परिणामी, मत्स्य बीजांची तडफड होऊन मृत्युमुखी पडले आहेत.

अहमदपूर तालुक्यात भोई समाजाचे ३०० मच्छीमार आहेत. मत्स्यविक्री हा त्यांचा प्रमुख व्यवसाय असून, त्यावरच कुटुंब अवलंबून आहे. दरम्यान, फेब्रुवारीपासून उन्हाची तीव्रता वाढल्याने पाणी पातळी घटण्यास सुरुवात होऊन त्याचा मत्स्य बीजांवर परिणाम झाला आहे. परिणामी, व्यवसायासाठीचा खर्च हा निष्फळ ठरला आहे. त्यामुळे या व्यावसायिकांपुढे कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. कुटुंबातील व्यक्तींचे पोट कसे भरावे आणि जर घरातील कोणी आजारी पडला तर उपचारासाठी पैसे कोठून आणावेत, अशी भ्रांत पडली आहे. त्यामुळे येथील काही कुटुंबांनी स्थलांतराचा मार्ग अवलंबिला आहे.

शासनाने आर्थिक मदत द्यावी...

तालुक्यात मत्स्य व्यवसाय मोठ्या प्रमाणात केला जातो. यंदा कोरोनाचे संकट आणि तलाव कोरडे पडल्याने हा व्यवसाय कोलमडला आहे. त्यामुळे शासनाने आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी मत्स्य व्यवसाय सहकारी संस्थेच्या सदस्यांनी केली आहे.

पुढील वर्षीचा ठेका मोफत द्यावा...

कोरोनामुळे सर्व उद्योग, व्यवसाय संकटात सापडले आहेत. त्यावर आधारित कामगारांची उपासमार होत आहे. त्यामुळे शासनाने अनुदानपर नुकसान भरपाई द्यावी. तसेच पाच वर्षांपासून मत्स्य व्यवसाय सतत तोट्यात आहे. तलाव कोरडे पडत असल्यामुळे लाखो रुपयांचा फटका बसत आहे. शासनाने आर्थिक मदत देऊन पुढील वर्षीचा ठेका मोफत द्यावा, अशी मागणी मत्स्य व्यवसाय सहकारी संस्थेचे अध्यक्ष गजानन अनंतवाळ यांनी केली.

पोटासाठी स्थलांतराची वेळ...

अहमदपूर तालुक्यातील तलाव कोरडे पडले आहेत. पाणी नसल्याने हा व्यवसाय संकटात सापडला आहे. त्यामुळे या व्यावसायिकांना पोट भरण्यासाठी स्थलांतर करावे लागत आहे, असे मत्स्य व्यवसाय सहकारी संस्थेचे उपाध्यक्ष धुराजी चिलकरवार, सचिव निलाजी डुक्करे यांनी सांगितले.