शहरं
Join us  
Trending Stories
1
एकटे PM मोदीच आठवड्याला १०० तास काम करतात; '७० तास'वरून ट्रोल झालेल्या नारायण मूर्तींचं प्रशस्तीपत्रक
2
गुहेत राहणाऱ्या रशियन महिलेने कसे कमावले पैसे, भारतात स्थायिक होण्याचे कारणही सांगितले
3
धक्कादायक...! डोनाल्ड ट्रम्प यांना भारतात पाठवायचंय 'मांसाहारी दूध', सरकारचा स्पष्ट नकार; जाणून घ्या काय आहे हा संपूर्ण प्रकार?
4
"दीपक काटे चांगले काम करेल म्हटलं होतं, पण..."; गायकवाडांवरील हल्ल्याचा मंत्री बावनकुळेंनी केला निषेध
5
ऑस्कर पुरस्कार विजेते सत्यजित रे यांचे बांग्लादेशातील घर पाडले; भारताने दिलेली दुरुस्तीची ऑफर
6
राहुल गांधी पंतप्रधान होणार हे तुम्हाला माहितीये का?; उच्च न्यायालयाने याचिकाकर्त्याला फटकारलं, प्रकरण काय?
7
रात्रीच्या अंधारातही हल्ला करू शकणारे अमेरिकेतून येणार अपाचे हेलिकॉप्टर; पाक सीमेवर होणार तैनात
8
टॉवेल-बनियान घालून विरोधक विधानभवनात; अनोख्या आंदोलनाने वेधले साऱ्यांचे लक्ष, सत्ताधारीही हसले
9
IND vs ENG 3rd Test: आयसीसीचा इंग्लंडला डबल दणका, लॉर्ड्स कसोटी जिंकूनही संघाचा मोठा तोटा! 
10
हॉट मॉडेल, राजघराण्याशी संबंध, रवी शास्त्रींसोबत दिसलेली ही महिला आहे तरी कोण?
11
निवडणुकीपूर्वी शिंदेसेनेला मिळाला नवा भिडू; एकनाथ शिंदेंनी भाजपाला शह देण्यासाठी आखली रणनीती?
12
८ वर्षांत पहिल्यांदाच GST मध्ये होणार बदल! PMO नं प्रस्तावाला दिली मंजुरी; तुमच्या खिशावर काय परिणाम होणार?
13
"खून झालेल्या व्यक्तीच्या कुटुंबियांना..."; महादेव मुंडे हत्या प्रकरण, सुप्रिया सुळेंची संतप्त पोस्ट
14
महात्मा गांधींच्या ९४ वर्षे जुन्या चित्राला लिलावात मिळाले १.७ कोटी, जाणून घ्या त्यात काय खास आहे?
15
विमानांच्या इंजिनांचे आयुष्य किती असते? एअर इंडियाच्या विमानाला होती अशी इंजिने, जी...
16
५ मुलांची आई अन् १३ वर्षांचा संसार; २४ वर्षांच्या मुलाच्या प्रेमात पडली आणि जीव गमावला! नेमकं काय झालं?
17
पाकिस्तानात हायव्हॉल्टेज ड्रामा! देशात राजकीय खळबळ; फिल्ड मार्शल मुनीर बनणार राष्ट्रपती?
18
'पंचायत' फेम जितेंद्र कुमारची 'मिर्झापूर' सिनेमात एन्ट्री, 'या' अभिनेत्याच्या जागी दिसणार
19
Khuldabad Rename: छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील खुलताबादचे नाव बदलून रत्नापूर करण्याची मागणी!
20
गरमा गरम समोसे, गोड गोड जिलेबी की यम्मी पिझ्झा... आरोग्यासाठी काय आहे सर्वात घातक?

कोरोनाच्या संसर्गाची भीती अन् पाण्यासाठी एकच होतेय गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2021 04:17 IST

औसा तालुक्यातील किल्लारी हे शहरवजा गाव आहे. गावची लोकसंख्या जवळपास ३० हजार आहे. गावात मोठी बाजारपेठ, आडत बाजार, बँका, ...

औसा तालुक्यातील किल्लारी हे शहरवजा गाव आहे. गावची लोकसंख्या जवळपास ३० हजार आहे. गावात मोठी बाजारपेठ, आडत बाजार, बँका, शाळा, महाविद्यालये, ग्रामीण रुग्णालय आहे. त्यामुळे किल्लारीशी दररोज ४० पेक्षा अधिक गावांतील नागरिकांचा संपर्क असतो. गावच्या पाणीपुरवठ्यासाठी शासनाने माकणी प्रकल्पावरून ३० खेडी पाणीपुरवठा योजना राबविली आहे. परंतु, जलवाहिनीस बरीच वर्षे झाल्याने आणि ती चांगल्या दर्जाची नसल्याने सतत फुटत असते. त्याचबरोबर सतत विद्युत मोटार जळण्याचे प्रमाणही आहे. त्यामुळे गावातील नागरिकांना सतत पाण्यासाठी भटकंती करावी लागते.

काही दिवसांपूर्वी किल्लारीस पाणीपुरवठा करणाऱ्या माळकोंडजी येथील जलकुंभाच्या जलवाहिनीला ४० टक्के गळती लागली होती. त्यामुळे बरेच दिवस दुरुस्तीसाठी लागले. त्यांन दोनच दिवस गावांत पाणी आले. गावातील काही गल्लीत पाणी पोहोचले तर काही गल्लीत पोहोचले नाही. दरम्यान, ‘महावितरण’ने थकीत वीजबिलापोटी २४ फेब्रुवारीला वीजपुरवठा तोडला. परिणामी, गावातील नागरिकांचे पाण्यासाठी हाल सुरू झाले.

सध्या कोरोनाचा संसर्ग वाढला आहे. त्यामुळे फिजिकल डिस्टन्स राखण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे; परंतु, किल्लारी येथे पाण्याची समस्या असल्याने पाणी असलेल्या ठिकाणी नागरिकांची गर्दी होत आहे. त्यामुळे मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.

पालकमंत्र्यांनी लक्ष देण्याची मागणी...

सध्या किल्लारीत पाण्याची समस्या निर्माण झाली आहे. ‘महावितरण’ने थकीत वीजबिलापोटी वीजपुरवठा तोडल्याने प्रकल्पात पाणी असूनही गावातील नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. त्यामुळे पालकमंत्री अमित देशमुख यांनी याकडे लक्ष देऊन ‘महावितरण’ला वीजपुरवठा सुरळीत करण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी नागरिकांतून करण्यात येत आहे.

१२५ रुपयांस ५०० लिटर पाणी...

गावात पाण्याची समस्या असल्याने नागरिकांना १२५ रुपयांना ५०० लिटर पाणी विकत घ्यावे लागत आहे. अनेकदा पाण्यासाठी आर्थिक व मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. पाण्यासाठी गोरगरिब नागरिकांचे मात्र हाल होत आहेत.

पाणीपट्टी वसुलीची अडचण...

गावातील नागरिक पाण्यासाठी फिरत आहेत. सध्या पाणीपट्टी वसुलीवर भर देण्यात येत आहे; परंतु, कोरोनाच्या संकटामुळे हाताला काम नसल्याने नागरिकांकडून प्रतिसाद मिळत नाही. लोकप्रतिनिधींनी याकडे लक्ष देऊन पाणीपुरवठा सुरळीत करणे गरजेचे आहे.

- शैलाताई लोव्हार, सरपंच

वीजपुरवठा सुरळीत होणे गरजेचे...

‘महावितरण’ने वीजपुरवठा जोडल्यास तात्काळ पाणीपुरवठा करण्यात येईल. या योजनेचे बिल जिल्हा परिषदेच्या माध्यमातून भरण्यात येते, असे माकणी प्रकल्पावरील अभियंता संगाप्पा कपाळे यांनी सांगितले.