शहरं
Join us  
Trending Stories
1
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
2
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
3
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
4
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
5
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
6
"उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
7
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
8
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
9
वरुथिनी एकादशी २०२६: १० हजार वर्षांच्या तपश्चर्येचे फळ केवळ एका व्रतात! जाणून घ्या 'वरुथिनी एकादशी'चे पूजा विधी
10
Tripti Kalhans : डिप्रेशनवर मात अन् पाचव्या प्रयत्नात बाजी! सलग ४ वेळा नापास झालेली तृप्ती बनली IAS अधिकारी
11
वयाच्या ४२ व्या प्रेग्नंट, तरी जिममध्ये हेवी वर्कआउट करतेय अभिनेत्री; नेटकऱ्यांनी दिला सल्ला
12
गोल्ड ETF मधील गुंतवणूक ५७% नं घसरली, चांदीत सलग दुसऱ्या महिन्यात 'एक्झिट'; आता गुंतवणूकदारांनी काय करावं?
13
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
14
IPL 2026: वैभव सूर्यवंशीच्या बॅटिंगवर किंग कोहली फिदा; सामन्यानंतर दिलं खास गिफ्ट!
15
Tarot Card: तुमचा हा आठवडा भाग्याचा की संघर्षाचा? टॅरो कार्ड्सनुसार वाचा १२ ते १८ एप्रिलचे साप्ताहिक भविष्य!
16
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
17
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
18
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
19
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
20
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
Daily Top 2Weekly Top 5

लातूर जिल्ह्यात तिघांचा पाणीबळी; विहिरीतील गाळ काढताना वडील, मुलगा अन पुतण्याचा गुदमरूम मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2019 15:00 IST

विहीर अत्यंत अरुंद असल्याने ऑक्सिजनची कमी आहे.

आलमला (जि. लातूर) : पाणी कमी येत असल्यामुळे आडात उतरलेल्या तिघांचा गुदमरून मृत्यू झाला. तर दोघांवर खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. मृतांमध्ये एकाच कुटुंबातील वडील, मुलगा आणि पुतण्या असून, ही घटना औसा तालुक्यातील आलमला येथे सोमवारी सकाळी १०.३० वाजता घडली.

आलमला गावात तीव्र पाणीटंचाई असून, गावभागात खाजगी मालकीची जुनी विहीर बुजवून त्यात सिमेंट टाक्या बसवून आड तयार करण्यात आला होता. वॉर्ड क्रमांक एक मधील नागरिकांना येथून पाणी पुरवठा आहे. सदरील आडात असलेल्या मोटारीला पाणी का येत नाही म्हणून सोमवारी सकाळी काही तरुण आडात उतरले. सर्वात आधी सद्दाम फारुख मुलानी (२२) हा आडात उतरला होता. तो वर का येत नाही म्हणून त्याचे वडील फारुख खुदबुदीन मुलानी (४६) हेही आडात उतरले. तेही परत न आल्याने पुतण्या सईद दाऊद मुलानी (२६) हा आडात उतरला. आडात उतरलेल्या कोणाचाच प्रतिसाद येत नसल्याने उपस्थित नागरिकांनी आरडाओरड सुरू केली. घटनास्थळी कुटुंबियांनी प्रचंड आक्रोश सुरू केला. यावेळी दोन तरुणांच्या कमरेला दोरखंडाने बांधून त्यांना आडात सोडण्यात आले. मात्र त्यांनाही गुदमरल्यासारखे झाल्याने तात्काळ वर काढण्यात आले. तद्नंतर त्यांना लातूरच्या खाजगी रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले. 

दरम्यान, अग्निशमन दलाने घटनास्थळी तात्काळ धाव घेत आडात आॅक्सिजन सोडले. परंतु, प्रतिसाद येत नसल्याने अग्निशमनचे कर्मचारी आडात उतरले. शेवटी मोठ्या कसरतीनंतर त्यांनी तिघांनाही बाहेर काढले. मात्र ते बेशुद्धावस्थेत होते. रुग्णवाहिका येण्यास विलंब लागला. तोपर्यंत फारुख खुदबुदीन मुलानी, मुलगा सद्दाम फारुख मुलानी, पुतण्या सईद दाऊद मुलानी या तिघांचाही मृत्यू झाला होता. मृतदेहांची उत्तरीय तपासणी औसा येथील रुग्णालयात झाली. या प्रकरणी आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान, अपर जिल्हाधिकारी अविनाश पाठक, तहसीलदार, आरोग्याधिकारी यांच्यासह पोलीस घटनास्थळी पोहोचले. 

मुलानी कुटुंबियावर शोककळा... काबाड कष्ट करून उपजीविका भागविणाऱ्या मुलानी कुटुंबियांतील तिघांचा आडात गुदमरून मृत्यू झाल्याने कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. घटनास्थळी कुटुंबातील सदस्यांनी आक्रोश केला. मुलानी कुटुंबियासह संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे. 

१५ दिवसांपूर्वी झाला होता सद्दामचा विवाह... पाणी का येत नाही म्हणून सर्वात पहिल्यांदा आडात उतरलेल्या सद्दाम मुलानी याचा १५ दिवसांपूर्वीच विवाह झाला होता. गावात प्रत्येकाच्या अडचणीच्या वेळेला धावून जाणारा सद्दाम सोमवारीही सर्वात आधी आडात उतरला होता. सद्दाम उत्साहाने प्रत्येकाला मदत करीत असे. दरम्यान, अवघ्या पंधरा दिवसांपूर्वी विवाह सोहळ्यात आनंदात असलेल्या मुलानी कुटुंबियावर दु:खाचा डोंगर कोसळला.

टॅग्स :Deathमृत्यूlaturलातूरAccidentअपघात