शहरं
Join us  
Trending Stories
1
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
2
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
3
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
4
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
5
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
6
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
7
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
8
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
9
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
10
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
11
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
12
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
13
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
14
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
15
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
16
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
17
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
18
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
19
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
20
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा

लातूर जिल्ह्यात तिघांचा पाणीबळी; विहिरीतील गाळ काढताना वडील, मुलगा अन पुतण्याचा गुदमरूम मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2019 15:00 IST

विहीर अत्यंत अरुंद असल्याने ऑक्सिजनची कमी आहे.

आलमला (जि. लातूर) : पाणी कमी येत असल्यामुळे आडात उतरलेल्या तिघांचा गुदमरून मृत्यू झाला. तर दोघांवर खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. मृतांमध्ये एकाच कुटुंबातील वडील, मुलगा आणि पुतण्या असून, ही घटना औसा तालुक्यातील आलमला येथे सोमवारी सकाळी १०.३० वाजता घडली.

आलमला गावात तीव्र पाणीटंचाई असून, गावभागात खाजगी मालकीची जुनी विहीर बुजवून त्यात सिमेंट टाक्या बसवून आड तयार करण्यात आला होता. वॉर्ड क्रमांक एक मधील नागरिकांना येथून पाणी पुरवठा आहे. सदरील आडात असलेल्या मोटारीला पाणी का येत नाही म्हणून सोमवारी सकाळी काही तरुण आडात उतरले. सर्वात आधी सद्दाम फारुख मुलानी (२२) हा आडात उतरला होता. तो वर का येत नाही म्हणून त्याचे वडील फारुख खुदबुदीन मुलानी (४६) हेही आडात उतरले. तेही परत न आल्याने पुतण्या सईद दाऊद मुलानी (२६) हा आडात उतरला. आडात उतरलेल्या कोणाचाच प्रतिसाद येत नसल्याने उपस्थित नागरिकांनी आरडाओरड सुरू केली. घटनास्थळी कुटुंबियांनी प्रचंड आक्रोश सुरू केला. यावेळी दोन तरुणांच्या कमरेला दोरखंडाने बांधून त्यांना आडात सोडण्यात आले. मात्र त्यांनाही गुदमरल्यासारखे झाल्याने तात्काळ वर काढण्यात आले. तद्नंतर त्यांना लातूरच्या खाजगी रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले. 

दरम्यान, अग्निशमन दलाने घटनास्थळी तात्काळ धाव घेत आडात आॅक्सिजन सोडले. परंतु, प्रतिसाद येत नसल्याने अग्निशमनचे कर्मचारी आडात उतरले. शेवटी मोठ्या कसरतीनंतर त्यांनी तिघांनाही बाहेर काढले. मात्र ते बेशुद्धावस्थेत होते. रुग्णवाहिका येण्यास विलंब लागला. तोपर्यंत फारुख खुदबुदीन मुलानी, मुलगा सद्दाम फारुख मुलानी, पुतण्या सईद दाऊद मुलानी या तिघांचाही मृत्यू झाला होता. मृतदेहांची उत्तरीय तपासणी औसा येथील रुग्णालयात झाली. या प्रकरणी आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान, अपर जिल्हाधिकारी अविनाश पाठक, तहसीलदार, आरोग्याधिकारी यांच्यासह पोलीस घटनास्थळी पोहोचले. 

मुलानी कुटुंबियावर शोककळा... काबाड कष्ट करून उपजीविका भागविणाऱ्या मुलानी कुटुंबियांतील तिघांचा आडात गुदमरून मृत्यू झाल्याने कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. घटनास्थळी कुटुंबातील सदस्यांनी आक्रोश केला. मुलानी कुटुंबियासह संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे. 

१५ दिवसांपूर्वी झाला होता सद्दामचा विवाह... पाणी का येत नाही म्हणून सर्वात पहिल्यांदा आडात उतरलेल्या सद्दाम मुलानी याचा १५ दिवसांपूर्वीच विवाह झाला होता. गावात प्रत्येकाच्या अडचणीच्या वेळेला धावून जाणारा सद्दाम सोमवारीही सर्वात आधी आडात उतरला होता. सद्दाम उत्साहाने प्रत्येकाला मदत करीत असे. दरम्यान, अवघ्या पंधरा दिवसांपूर्वी विवाह सोहळ्यात आनंदात असलेल्या मुलानी कुटुंबियावर दु:खाचा डोंगर कोसळला.

टॅग्स :Deathमृत्यूlaturलातूरAccidentअपघात