शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA : बुमराह-वरुण चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
4
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
5
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
6
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
7
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
8
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
9
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
10
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
11
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
12
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
13
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
14
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
15
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
16
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
17
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
18
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
19
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
20
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

पावसाने दिली हुलकावणी, वारे सुटल्याने वाढली शेतकऱ्यांची चिंता

By आशपाक पठाण | Updated: July 10, 2023 16:58 IST

लातूर जिल्ह्यात ५० टक्के क्षेत्रावर खरिपाची पेरणी; पावसाच्या प्रतीक्षेत आभाळाकडे लागले लक्ष

लातूर : चार दिवसांपासून पावसाने हुलकावणी दिली आहे. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. ज्या शेतकऱ्यांनी पेरणी केली त्या शेतकऱ्यांना बियाणे उगवण्याची तर न पेरणाऱ्या शेतकऱ्यांना पेरणीयोग्य पाऊस कधी पडेल याची चिंता लागली आहे. जिल्ह्यात सोमवारपर्यंत जवळपास ५० टक्के क्षेत्रावर पेरणी झाली आहे. त्यात सर्वाधिक पेरा सोयाबीनचा झाला आहे.

लातूर जिल्ह्यात खरिपाचे एकुण क्षेत्र ५ लाख ९९ हजार ४५५ हेक्टर्स आहे. त्यापैकी २ लाख ९९ हजार १११ हेक्टर्सवर खरिपाची पेरणी झाली आहे. चार ते पाच दिवसांपूर्वी झालेल्या पावसाने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला. दोन दिवस उघडीप मिळाल्याने घाईघाईत पेरणी करून घेतली. मात्र आता तीन दिवसांपासून नुसते वारेच सुटल्याने पेरलेलेही उगवते की नाही याची चिंता लागली आहे. तर ज्या शेतकऱ्यांनी पेरणी केली नाही, असे शेतकरी मोठ्या पावसाच्या प्रतिक्षेत बसले आहेत. पावसाने ओढ दिल्याने पेरणीचा हंगाम लांबला आहे. पहिल्या पावसात शेतकऱ्यांनी खते, बियाणे खरेदी करून ठेवले. मात्र, पावसाने ओढ दिल्याने शेतकऱ्यांचे डोळे आभाळाकडे लागले आहेत. आतापर्यंत झालेल्या पेरणीत ९५ टक्के पेरा सोयाबीनचा झाला आहे. उर्वरित क्षेत्रावर तर सोयाबीनशिवाय इतर पिक घेणे कठीण होणार आहे.

शिरूर अनंतपाळ तालुका आघाडीवर...जिल्ह्यात जवळपास ५० टक्के क्षेत्रावर पेरणी पूर्ण झाली आहे. काही ठिकाणी पिके उगवलीही आहेत. मात्र, चार दिवसांपासून पेरणी करणाऱ्या शेतकऱ्यांना पावसाने उघडीप दिल्याने झोप उडाली आहे.

निलंगा, अहमदपूर, चाकूर पिछाडीवर...जिल्ह्यातील निलंगा, अहमदपूर, चाकूर तालुक्यात अद्यापही सर्व भागात पेरणीयोग्य पाऊस झाला नसल्याने शेतकरी चिंताग्रस्त आहेत. तर इतर तालुक्यात पाऊस झाला असला तरी ज्या भागात सुपिक जमिनी आहेत,अशाच ठिकाणी पेरणी झाली आहे. मात्र तीन दिवसांपासून वारे सुटल्याने परिस्थिती गंभीर होत चालली आहे. महागडी बियाणे, खते, औषधी, पेरणीचा खर्च वाया जाऊ नये, यासाठी शेतकरी प्रार्थना करीत आहेत.

ओल असेल तर करा पेरणी...जमिनीत पेरणीयोग्य ओलावा असेल तर शेतकऱ्यांनी पेरणी करावी, पावसाने ओढ दिलेली आहे. अशा स्थितीत पेरणी करणे जोखमीचे ठरेल. त्यामुळे शेतकऱ्यांनी पावसाची प्रतिक्षा करावी, असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आले आहे.

कुठे किती झाली पेरणी...लातूर ५३.३५रेणापूर ४२.६९औसा ६०.८३निलंगा ३७.०३देवणी ६२.२५शिरूर अनंतपाळ ७९.८३अहमदपूर ३४.३७उदगीर ५७.७६चाकूर ४४.७८जळकोट ४७.९६......................एकूण पेरा : २, ९९,१११.५ हेक्टर्स

टॅग्स :RainपाऊसlaturलातूरFarmerशेतकरी