शहरं
Join us  
Trending Stories
1
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
2
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
3
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
4
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
5
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
6
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
7
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
8
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
9
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
10
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
11
आयपीएल २०२५ दरम्यान 'या' स्टार फलंदाजावर ४ सामन्यांची बंदी
12
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
13
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
14
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
15
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
16
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
17
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
18
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
19
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
20
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज

लातुरात शेतीच्या पाण्यासाठी शेतकऱ्यांनी केले रास्ता रोको आंदोलन 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2018 17:37 IST

मांजरा प्रकल्पातून शेतीसाठी पाणीपुरवठा होत नसल्याने उभे ऊसाचे पीक वाळत आहे़ शेतीला पाणी उपलब्ध करून द्यावे, या मागणीसाठी भोईसमुद्रगा (ता़लातूर) येथील शेतकऱ्यांनी शनिवारी सकाळी लातूर-कळंब रस्त्यावर रास्ता रोको आंदोलन केले़

लातूर : मांजरा प्रकल्पातून शेतीसाठी पाणीपुरवठा होत नसल्याने उभे ऊसाचे पीक वाळत आहे़ शेतीला पाणी उपलब्ध करून द्यावे, या मागणीसाठी भोईसमुद्रगा (ता़लातूर) येथील शेतकऱ्यांनी शनिवारी सकाळी लातूर-कळंब रस्त्यावर रास्ता रोको आंदोलन केले़ त्यामुळे या मार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती़ 

मांजरा प्रकल्पातून शेतीला पाणी मिळावे, यासाठी भोईसमुद्रगा व परिसरातील शेतकऱ्यांनी संबंधित पाणी वापर संस्थेकडे पैसे भरले आहेत़ परंतु, प्रकल्पाचे पाणी आल्यानंतर या भागातील शेतकऱ्यांना ते मिळत नाही़ परिणामी, या भागातील ऊस वाळत आहे़ त्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत़ दरम्यान, भोईसमुद्रगा येथील शेतकऱ्यांनी शुक्रवारी लघू पाटबंधारे कार्यालयास घेराव घालत हलगीनाद आंदोलनही केले होते़ परंतु, पाण्याची सुविधा करण्यात आली नसल्याने संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी शनिवारी सकाळी रास्ता रोको आंदोलन केले़. 

या आंदोलनात हणमंत गायकवाड, दत्ता चोथवे, रानबा कांबळे, व्यंकट कारंडे, पिंटू पवार, दिनेश पवार, बापू सरवदे, नारायण गायकवाड, श्रीहरी पवार, महेश साबळे, मनोहर रोंगे, बन्सी पवार, श्रीमंत रोंगे, विकास पवार, गोविंद चोथवे, अण्णा चोथवे, संजय कटारे, विशाल चोथवे, शिवाजी चोथवे, विकास सरवदे, बाबू सरवदे, बबन पवार, रफिक पठाण, अण्णा पवार, श्रावण माने आदी सहभागी झाले होते़.

रस्त्यावर टाकले दगड़यावेळी आंदोलनकर्त्यांनी रस्त्यावर दगड व लाकडे टाकून रास्ता रोको आंदोलन केले़ दरम्यान, आंदोलनस्थळी पोलिसांनी धाव घेवून आंदोलनकर्त्यांना आपले आंदोलन मागे घेण्यासंदर्भात आवाहन केले़ मात्र आंदोलनकर्ते आपल्या भूमिकेवर ठाम होते़ त्यामुळे या मार्गावरील वाहतूक काही वेळ ठप्प होती़ 

टॅग्स :FarmerशेतकरीLatur collector officeजिल्हाधिकारी कार्यालय लातूरManjara Damमांजरा धरणagricultureशेती