शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; कोण मारणार बाजी?
2
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
3
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
4
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
5
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
6
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
7
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
8
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
9
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
10
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
11
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
12
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
13
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
14
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
15
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
16
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
17
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
18
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
19
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
20
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
Daily Top 2Weekly Top 5

शेतकरी संकटात! शेतीपंपाची वीज खंडित; उभा ऊस वाळून जातोय, तरी कारखाने ऊस नेईनात

By संदीप शिंदे | Updated: January 13, 2024 12:14 IST

कारखाना प्रशासनाने या ग्रीन बेल्टकडे पाठ फिरवली असल्यामुळे शेतकरी संकटात सापडला आहे.

- व्ही. एस. कुलकर्णी

उदगीर (जि. लातूर) : पिण्याच्या पाण्यासाठी देवर्जन मध्यम प्रकल्पाच्या ग्रीन बेल्टमध्ये सुरू असलेल्या शेतीपंपांची वीज खंडित करण्यात आल्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतातील उभा ऊस वाळून जात आहे. अशातच साखर कारखान्याकडून या उसाची तोड करून गाळपासाठी नेला जात नसल्यामुळे शेतकरी संकटात सापडला आहे. ग्रीन बेल्ट परिसरातील सरपंच व शेतकऱ्यांनी या उसाची तत्काळ विल्हेवाट लावण्यासाठी साखर कारखाना प्रशासनाकडे निवेदन देऊनही कारखाना प्रशासनाने ग्रीन बेल्टकडे पाठ फिरवली आहे.

देवर्जन मध्यम प्रकल्पाच्या चिघळी, भाकसखेडा, देवर्जन, हणमंतवाडी, धोतरवाडी,गंगापूर परिसराच्या ग्रीन बेल्टमध्ये मोठ्या प्रमाणात उसाची लागवड करण्यात आली आहे. यावर्षी पाऊस कमी झाल्यामुळे महसूल प्रशासनाने देवर्जन मध्यम प्रकल्पातील सद्य:स्थितीत असलेला पाण्याचा साठा पिण्याच्या पाण्यासाठी आरक्षित केला आहे. यासाठी शेतकऱ्यांच्या शेतीपंपांचे कनेक्शन तोडण्यात आले आहे. शेतकऱ्यांच्या शेतातील ऊसतोडीची तारीख जानेवारी, फेब्रुवारी, मार्च महिन्यातील आहे. या तारखेशिवाय ऊस तोडला जाणार नाही. अशी कारखाना प्रशासनाची भूमिका आहे. मात्र गेल्या दोन महिन्यांपूर्वी या ग्रीन बेल्टमधील शेतकऱ्यांच्या शेतीपंपांचे कनेक्शन तोडण्यात आल्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतातील उभा ऊस वाळून जात आहे. दरम्यान, आजघडीला साखर कारखान्याच्या गावात एक-दोन टोळ्या ऊसतोडणीसाठी कार्यरत आहेत. किमान तीन साखर कारखान्यांच्या दहा -पंधरा टोळ्या ऊसतोडणीसाठी ठेवण्याची मागणी या भागातील शेतकऱ्यांनी केली आहे.

मागणी करूनही ऊसतोड होत नाहीमहसूल प्रशासनाने दोन महिन्यांपूर्वी शेतीपंपांचे कनेक्शन तोडल्यानंतर देवर्जनचे सरपंच अभिजित साकोळकर व शेतकऱ्यांनी कारखान्यांकडे ग्रीन बेल्टमधील ऊस गाळपासाठी नेण्याची मागणी केली. शिवाय उदगीरच्या तहसीलदारांनी कारखाना प्रशासनास ग्रीन बेल्टमधील शेतीपंपांची वीज खंडित करण्यात आल्यामुळे उभ्या उसाची तोड तारीख लांबणीवर असली तरी या उसाची तत्काळ तोड करण्यात यावी, असे पत्र देऊनही कारखाना प्रशासनाने या ग्रीन बेल्टकडे पाठ फिरवली असल्यामुळे शेतकरी संकटात सापडला आहे.

शेतकऱ्यांचे क्रीडामंत्र्यांना साकडेशेतात वाळून जात असलेल्या उसाची साखर कारखान्याकडून तत्काळ तोड करण्यात यावी, अन्यथा वीजपंपांचे तोडण्यात आलेले कनेक्शन तत्काळ जोडून देण्यात यावे, अशी मागणी देवर्जन परिसरातील गंगापूरचे शेतकरी नागभूषण बिरादार व शांतकुमार बिरादार यांच्यासह अन्य शेतकऱ्यांनी क्रीडामंत्री संजय बनसोडे यांची प्रत्यक्ष भेट घेऊन केली आहे. त्यानुसार याबाबत काय निर्णय होतो याकडे लक्ष लागले आहे.

नवीन शेअर्स न घेता सभासदत्व द्यावेदेवर्जन परिसरातील शेतकरी तीन साखर कारखान्यांचे सभासद आहेत. तोंडारचा प्रियदर्शनी नाव असताना या ग्रीन बेल्टमधील शेतकरी मोठ्या प्रमाणात साखर कारखान्याचे सभासद होते. मात्र, हा साखर कारखाना विकास -२ खासगी झाल्यानंतर १५ ते २० टक्केच शेतकरी पुन्हा शेअर्स खरेदी करून सभासद झाले आहेत. प्रियदर्शनीचे सर्व सभासद शेतकऱ्यांना नवीन शेअर्स न घेता सरसकट शेतकऱ्यांना सभासद म्हणून मान्यता देऊन या सर्व शेतकऱ्यांचा ऊस गाळपासाठी प्राध्यान्याने नेण्याची मागणी ग्रीन बेल्टमधील शेतकऱ्यांनी केली आहे.

टॅग्स :sugarcaneऊसFarmerशेतकरीlaturलातूरSugar factoryसाखर कारखाने