शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: काळजाचा ठोका चुकला! अंबरनाथ स्थानकात लोकल येत होती अन् अंध व्यक्ती थेट ट्रॅकवर कोसळला
2
लातूरमध्ये नागरिकाची सतर्कता; ११२ ला काॅल, अन् मुलगा सापडला !
3
निगेटिव्ह रिपोर्टिंग केल्याच्या रागातून डॉक्टरांचे बनवले अश्लील व्हिडिओ? कराडात 'एआय' चा घातक वापर
4
अखिलेश यादवांच्या आले मनी...! एक जिल्हा सोडला अन् युपीतील इतर जिल्ह्यांच्या कार्यकारिणी केल्या बरखास्त
5
ट्रम्पनी संधी साधली, अमेरिका आणि चीनमध्ये खतरनाक डील झाली; ट्रम्पच्या घोषणेने अनेकांची झोप उडाली
6
हे तेच मजेशीर केदार यादव...! लालूंचा वाढदिवस होडीवर साजरा करायला गेले आणि चिखलात पडले...
7
महापालिका निवडणूकीच्या पाश्वभूमीवर ओमी कलानींचा पुन्हा शिंदेगटाकडे दोस्तीचा हात?
8
महाराष्ट्रातही सोनम-राजा प्रकरण! २३ मे रोजीच झालेले लग्न, वटपौर्णिमेलाच कुऱ्हाडीने पतीला संपविले
9
Sonam Raghuvanshi : सोनम रघुवंशी प्रेग्नंट? लग्नाला महिना झाला! मेघालय पोलिसांकडे वैद्यकीय अहवाल आला
10
पहाटे ५.३० ला हॉटेलवरून निघाले, २.३० वाजता राजाचा मृतदेह दरीत फेकला; 'असा' होता ९ तासांचा घटनाक्रम
11
छत्तीसगडमधील सुकमा येथे दोन नक्षलवादी ठार; एकावर ५ लाखांचे बक्षीस होते
12
"एक दो तीन"... कॅच घेताना मोर्कोची 'कसरत'! लॉर्ड्सवर विक्रम रचल्यावर असा फसला स्मिथ (VIDEO)
13
छत्रपती संभाजीनगरास वादळाचा तडाखा; सिद्धार्थ गार्डनमधील भिंत कोसळून दोन महिलांचा मृत्यू
14
छत्रपती संभाजीनगरच्या विद्यार्थिनीची नवी मुंबईत आत्महत्या, प्राचार्यावर गंभीर आरोप, गुन्हा दाखल
15
BSF जवानांना ड्युटीवर जाण्यासाठी खराब ट्रेन मिळाली होती; रेल्वेने ४ अधिकाऱ्यांवर कारवाई केली
16
२० वर्षीय पाकिस्तानी युवकाच्या 'प्लॅनिंग'नं अमेरिका हादरली; FBI नं अटक करताच मोठा खुलासा
17
राज-सोनम यांनी केला होता कोर्ट मॅरेजचा प्रयत्न? राजासोबत लग्नाची घाई का केली? गोविंदनं दिलं उत्तर
18
टीम इंडियातील 'प्रिन्स'चा रुबाब! शुबमन गिलच्या स्टायलिश फोटोशूटवर उमटली फिरकी घेणारी कमेंट
19
आता फक्त ठाकरे ब्रँडच चालणार! शिवसेना भवनाबाहेर पहिल्यांदाच काका-पुतणे एकाच बॅनरवर झळकले
20
हायवेवर डान्स करत होती पत्नी अन् पतीला करावं लागलं शूटिंग! व्हिडीओ पाहून लोक म्हणाले 'सुखाने जगायचं तर..'

खरिपाच्या पीक विम्यासाठी कंपनीकडून शेतकऱ्यांची चेष्टा

By आशपाक पठाण | Updated: June 15, 2024 18:14 IST

हजारोंना प्रतिक्षा; गावोगावी चार दोन शेतकऱ्यांना आली रक्कम

लातूर : जिल्ह्यात गतर्षी खरीप हंगामात अनेक ठिकाणी पावसाने ओढ दिल्याने उत्पन्नात मोठी घट झाली. सोयाबीनचे पीक फुलोऱ्यात असताना पावसाने उघडील दिली. त्यामुळे अनेक ठिकाणी फुलांची गळती झाली. याचा फटका जिल्ह्यातील लाखो शेतकऱ्यांना बसला. पीक विमा कंपनीकडून काही शेतकऱ्यांना २५ टक्के अग्रीम देण्यात आला. आता उर्वरित रक्कम गावोगावी मोजक्या शेतकऱ्यांच्या खात्यावर आली असून इतर शेतकरी मात्र आपल्या माेबाईलवर कधी मेसेज पडणार याकडे लक्ष लावून बसले आहेत.

खरीप हंगाम २०२३ मध्ये जिल्ह्यात लाखो शेतकऱ्यांनी सोयाबीनचा पिक विमा भरला होता. त्यावेळी सोयाबीनचे पीक ऐन फुलोऱ्यामध्ये असतानाच पावसाने ओढ दिल्यामुळे पिकाचे अतोनात नुकसान झाले. राशी केल्यानंतर अनेकांच्या पदरात उत्पादन खर्चही पडला नाही. त्यामुळे मोठ्या प्रमाणात आर्थिक फटका बसला. पावसाने ओढ दिल्याने पिकांचे नुकसान झाल्याची पाहणी वेळोवेळी विमा कंपनीकडून करण्यात आली होती. शेवटी पीक कापणी प्रयोग सुद्धा केले. जिल्हाधिकारी स्वतः हजर राहून पीक कापणी प्रत्यक्ष करून घेतले. तो अहवाल कृषी खाते महसूल खाते व संबंधित पीक विमा कंपनी व गावकरी यांच्या समक्ष आणेवारीसाठी सोयाबीनचे प्रात्यक्षिक केले. त्यात ५० पैसे पेक्षा कमी आणेवारी आली आहे. त्यामुळे पावसाने ओढ दिल्यामुळे झालेल्या नुकसानीच्या संदर्भामध्ये पिक विमा कंपनीने शेतकऱ्यांना २५ टक्के अग्रीम विमा सर्व शेतकऱ्यांना दिलेला आहे. आता मे महिन्याच्या २७ तारखेला काही गावांमध्ये चार-पाच जास्तीत जास्त दहा किंवा एखाद्या गावामध्ये दोन-तीन अशा शेतकऱ्यांना फक्त विमा रक्कम त्यांच्या खात्यावर जमा केलेली आहे उर्वरित शेतकरी एकमेकांना विचारणा करीत आहेत.

विमा कंपनीचे भरपाईचे नेमके निकष काय...

पिक विमा वाटपासाठी विमा कंपनीचे कोणते निकष आहेत. दोन सख्खे भाऊ असून बंधाऱ्याच्या बाजूच्या शेतकऱ्याला विमा आला. एका भावाला विमा आला अन् एक भाऊ पंधरा दिवसांपासून नुसतीच वाट पाहतोय. मोबाईलवर मेसेज आला की पिकविम्याचाच असावा असा समज करून पाहत आहे. असे प्रकार गावोगावी घडत आहेत. यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष घालून लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना त्यांचा हक्क मिळवून द्यावा. सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावर पिक विमा रक्कम जमा करण्यासाठी आपण प्रयत्न करावेत, असे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या स्वाभिमानी पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष सत्तार पटेल यांनी सांगितले. शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम न आल्यास आंदोलनाचा इशाराही त्यांनी दिला आहे.

स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक...

शेतकऱ्यांना तत्काळ पिक विमा वाटप करावा, यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आक्रमक पवित्रा घेतला आहे. यासंदर्भात प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर यांच्याकडे निवेदन देण्यात आले आहे. कंपनीने शेतकऱ्यांच्या खात्यावर त्वरित रक्कम जमा करावी, अशी मागणी जिल्हाध्यक्ष अरूणदादा कुलकर्णी, माजी अध्यक्ष राजेंद्र माेरे, अशोक दहिफळे, हिराचंद जैन, नवनाथ शिंदे, गोरोबा मोदी, नारायण भिसे, अण्णासाहेब भिसे, जयराम भिसे, बाळासाहेब वायाळ, महेश वायाळ, व्यंकट निलंगे, राजीव कसबे, रंगनाथ पुजारी आदींनी केली आहे.

टॅग्स :laturलातूरFarmerशेतकरी