शहरं
Join us  
Trending Stories
1
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
2
Pakistan Water : पाकिस्तानमध्ये पाण्याचं संकट वाढलं! भारतासोबतचा संघर्ष महागात पडला
3
शेअर बाजारात NSDL ची होणार CDSL शी टक्कर; ग्रे मार्केटमध्ये काय संकेत, किती गुंतवणूक करावी लागणार?
4
३ दिवसांच्या घसरणीला ब्रेक, टाटा-रिलायन्ससह 'या' शेअर्समुळे गुंतवणूकदारांना दिलासा! तुमच्या पोर्टफोलिओचं काय झालं?
5
आमिर खानने घेतला मोठा निर्णय, अभिनेत्याने सुरू केलं 'जनता का थिएटर'
6
"ऑपरेशन महादेव कालच का झालं?"; अखिलेश यादवांनी सरकारला घेरलं, पुलवामा हल्ल्यातील 'त्या' गाडीबद्दल काय बोलले?
7
शैलेश जेजुरीकर बनले 'या' अमेरिकन कंपनीचे CEO! मायक्रोसॉफ्ट, गुगलनंतर आता P&G लाही मिळणार 'भारतीय' नेतृत्व!
8
Tripti Dimri : "मी ३० वर्षांपासून गप्प...", तृप्ती डिमरीने खूप काही केलंय सहन, का नाही उठवला आवाज?
9
Russia Ukraine War: "हल्ले थांबवा अन्यथा..."; रशिया-युक्रेन युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्पकडून पुतिन यांना इशारा!
10
BCCI च्या ऑफिसमध्ये चोरी; सुरक्षा रक्षकाने लाखोंच्या IPL जर्सी चोरुन हरयाणात विकल्या
11
"कलंकित मंत्र्यांचा राजीनामा न घेणाऱ्या सरकारने गोमूत्र शिंपडून त्यांना पवित्र करून घ्यावे", विजय वडेट्टीवार यांची टीका
12
चीनमध्ये Apple ला मोठा झटका! एका रिटेल स्टोअरवर लावले टाळे, पण भारतासाठी आहे 'खुशखबर'!
13
हिंजवडीतील रस्ते अपुरे का पडू लागले? यावर काही उपाय आहेत का, की काहीच नाहीत... करणार कोण?
14
'माझ्या आईच्या डोळ्यात तेव्हा अश्रू आले जेव्हा...'; प्रियंका गांधींचा अमित शाहांवर निशाणा, म्हणाल्या....
15
Asia Cup 2025 : रिषभ पंतच्या जागी अकोल्याच्या पठ्ठ्याची होऊ शकते टीम इंडियात एन्ट्री
16
हर्षवर्धनचा नवा कारनामा; Reliance च्या नावाने उघडल्या ५ बनावट कंपन्या, तपास अधिकारी चक्रावले
17
Priyanka Gandhi : "लोक सरकारवर विश्वास ठेवून पहलगामला गेले, पण सरकारने लोकांना देवाच्या भरवश्यावर सोडलं"
18
'तुमचा वेळ वाया घालवू नका, काळजी घ्या'; आईवडिलांसाठी चिठ्ठी अन् पुण्यात इंजिनिअर तरुणाने स्वतःला संपवले
19
समुद्राचे पाणी पिण्यायोग्य होणार; मुंबई महानगरपालिकेने हाती घेतला महत्त्वाचा प्रकल्प!
20
"त्या रायफली विमानाने..."; दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर रात्रभर धावपळ कशासाठी? अमित शाहांनी संसदेत सगळं सांगितलं

खरिपाच्या पीक विम्यासाठी कंपनीकडून शेतकऱ्यांची चेष्टा

By आशपाक पठाण | Updated: June 15, 2024 18:14 IST

हजारोंना प्रतिक्षा; गावोगावी चार दोन शेतकऱ्यांना आली रक्कम

लातूर : जिल्ह्यात गतर्षी खरीप हंगामात अनेक ठिकाणी पावसाने ओढ दिल्याने उत्पन्नात मोठी घट झाली. सोयाबीनचे पीक फुलोऱ्यात असताना पावसाने उघडील दिली. त्यामुळे अनेक ठिकाणी फुलांची गळती झाली. याचा फटका जिल्ह्यातील लाखो शेतकऱ्यांना बसला. पीक विमा कंपनीकडून काही शेतकऱ्यांना २५ टक्के अग्रीम देण्यात आला. आता उर्वरित रक्कम गावोगावी मोजक्या शेतकऱ्यांच्या खात्यावर आली असून इतर शेतकरी मात्र आपल्या माेबाईलवर कधी मेसेज पडणार याकडे लक्ष लावून बसले आहेत.

खरीप हंगाम २०२३ मध्ये जिल्ह्यात लाखो शेतकऱ्यांनी सोयाबीनचा पिक विमा भरला होता. त्यावेळी सोयाबीनचे पीक ऐन फुलोऱ्यामध्ये असतानाच पावसाने ओढ दिल्यामुळे पिकाचे अतोनात नुकसान झाले. राशी केल्यानंतर अनेकांच्या पदरात उत्पादन खर्चही पडला नाही. त्यामुळे मोठ्या प्रमाणात आर्थिक फटका बसला. पावसाने ओढ दिल्याने पिकांचे नुकसान झाल्याची पाहणी वेळोवेळी विमा कंपनीकडून करण्यात आली होती. शेवटी पीक कापणी प्रयोग सुद्धा केले. जिल्हाधिकारी स्वतः हजर राहून पीक कापणी प्रत्यक्ष करून घेतले. तो अहवाल कृषी खाते महसूल खाते व संबंधित पीक विमा कंपनी व गावकरी यांच्या समक्ष आणेवारीसाठी सोयाबीनचे प्रात्यक्षिक केले. त्यात ५० पैसे पेक्षा कमी आणेवारी आली आहे. त्यामुळे पावसाने ओढ दिल्यामुळे झालेल्या नुकसानीच्या संदर्भामध्ये पिक विमा कंपनीने शेतकऱ्यांना २५ टक्के अग्रीम विमा सर्व शेतकऱ्यांना दिलेला आहे. आता मे महिन्याच्या २७ तारखेला काही गावांमध्ये चार-पाच जास्तीत जास्त दहा किंवा एखाद्या गावामध्ये दोन-तीन अशा शेतकऱ्यांना फक्त विमा रक्कम त्यांच्या खात्यावर जमा केलेली आहे उर्वरित शेतकरी एकमेकांना विचारणा करीत आहेत.

विमा कंपनीचे भरपाईचे नेमके निकष काय...

पिक विमा वाटपासाठी विमा कंपनीचे कोणते निकष आहेत. दोन सख्खे भाऊ असून बंधाऱ्याच्या बाजूच्या शेतकऱ्याला विमा आला. एका भावाला विमा आला अन् एक भाऊ पंधरा दिवसांपासून नुसतीच वाट पाहतोय. मोबाईलवर मेसेज आला की पिकविम्याचाच असावा असा समज करून पाहत आहे. असे प्रकार गावोगावी घडत आहेत. यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष घालून लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना त्यांचा हक्क मिळवून द्यावा. सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावर पिक विमा रक्कम जमा करण्यासाठी आपण प्रयत्न करावेत, असे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या स्वाभिमानी पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष सत्तार पटेल यांनी सांगितले. शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम न आल्यास आंदोलनाचा इशाराही त्यांनी दिला आहे.

स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक...

शेतकऱ्यांना तत्काळ पिक विमा वाटप करावा, यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आक्रमक पवित्रा घेतला आहे. यासंदर्भात प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर यांच्याकडे निवेदन देण्यात आले आहे. कंपनीने शेतकऱ्यांच्या खात्यावर त्वरित रक्कम जमा करावी, अशी मागणी जिल्हाध्यक्ष अरूणदादा कुलकर्णी, माजी अध्यक्ष राजेंद्र माेरे, अशोक दहिफळे, हिराचंद जैन, नवनाथ शिंदे, गोरोबा मोदी, नारायण भिसे, अण्णासाहेब भिसे, जयराम भिसे, बाळासाहेब वायाळ, महेश वायाळ, व्यंकट निलंगे, राजीव कसबे, रंगनाथ पुजारी आदींनी केली आहे.

टॅग्स :laturलातूरFarmerशेतकरी