शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची मध्यरात्रीची शरणागती! शस्त्रसंधीसाठी पडद्यामागे काय घडले? अमेरिकेने का केली मध्यस्थी?
2
रशिया अन् युक्रेनमध्ये युद्धबंदी होणार! १५ मे रोजी इस्तंबूलमध्ये मोठी बैठक; पुतिन यांनी झेलेन्स्कींना निमंत्रण पाठवले
3
बलुचिस्तानमध्ये बीएलएने पाकिस्तानी सैन्याला पळवले; सरकारी आस्थापन, पोलिसांवर हल्ले
4
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य:आज अचानक धनलाभ संभवतो; लाभदायक बातम्या प्राप्त होतील!
5
"चितेच्या राखेत जग सिंदूर मागत आहे"; पहलगाम हल्ल्यानंतर १९ दिवसांनी बिग बींनी सोडलं मौन, काय म्हणाले?
6
पाकिस्तानचे शेपूट वाकडे ते वाकडेच; सायंकाळी शस्त्रसंधी, रात्री उल्लंघन, ७ भारतीयांचा मृत्यू
7
आम्ही सज्ज, पुन्हा हल्ला झाला तर सडेतोड प्रत्युत्तर; पाकिस्तानला भारतीय लष्कराने दिली तंबी
8
३ डझन देशांसमोर पाकची विनवणी, मग भारताचा होकार; अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी घोषणा का केली?
9
चीन म्हणतो, “दोन्ही देशातील तणावाची आम्हाला चिंता वाटते आम्ही पाकिस्तानसोबत उभे राहू”
10
भारतावरील दहशतवादी हल्ला युद्धकृती मानून देणार चोख उत्तर; PM मोदींनी घेतल्या उच्चस्तरीय बैठका
11
ऑपरेशन सिंदूर: विमान अपहरणाचा कट रचणाऱ्यासह पाच टॉप वॉन्टेड दहशतवादी ठार
12
शस्त्रसंधी करणारे ते 'डीजीएमओ' कोण? भारत-पाकिस्तान संघर्षावर चर्चेतून शस्त्रसंधीचा तोडगा
13
पाकिस्तानकडून सायबर युद्धाला सुरुवात, 'या' लिंक्सवर क्लिक कराल तर पस्तवाल
14
राजस्थानच्या सीमाभागात लोक २ दिवस जागेच; २ जिल्ह्यांत ब्लॅकआउट, लोकांना घरात राहायच्या सूचना
15
ऑपरेशन सिंदूर: १९७१ नंतर प्रथमच तिन्ही सैन्यदलांनी पाकिस्तानला घडवली चांगलीच अद्दल
16
एकनाथ शिंदेंनी ढासळवला जितेंद्र आव्हाडांचा बुरुज; शरद पवार गटाचे ४ माजी नगरसेवक शिवसेनेत
17
“भारताला युद्ध नको, पण...”; अजित डोवाल यांनी चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांना स्पष्टच सांगितले
18
भारताने आमची शस्त्रास्त्रे, सैनिकी तळ उद्ध्वस्त केले, युद्धविरामानंतर शाहबाज शरीफ यांची कबुली
19
मोहम्मद युनूस यांचा मोठा निर्णय; शेख हसीन यांच्या ‘अवामी लीग’वर आणली बंदी
20
पाकिस्तानकडून युद्धविरामाचं घोर उल्लंघन, भारताची संतप्त प्रतिक्रिया, दिला सक्त इशारा

शेतकऱ्यांनी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2021 04:17 IST

लातूर: रेशीम शेती करण्यासाठी जिल्ह्यात महारेशीम अभियान राबविण्यात येणार आहे. जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी आपले नावनोंदणी करून ...

लातूर: रेशीम शेती करण्यासाठी जिल्ह्यात महारेशीम अभियान राबविण्यात येणार आहे. जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी आपले नावनोंदणी करून रेशीम शेती करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी बी.पी.पृथ्वीराज यांनी केले.

चाकूर तालुक्यातील नळेगाव येथील अल्पभूधारक शेतकरी गोविंद रामा अलूरे या शेतकऱ्याच्या एक एकर तुती लागवड केलेल्या रेशीम शेती पाहणीप्रसंगी ते बोलत होते. यावेळी उपसंचालक (आत्मा) पाटील, रेशीम विकास अधिकारी एन. बी. बावगे यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी जिल्हाधिकारी पृथ्वीराज म्हणाले, जिल्ह्यात रेशीम शेती करण्यास वाव असून रेशीम कोषाला सोन्याचा भाव आहे. मागील वर्षी राबविण्यात आलेल्या महारेशीम अभियानात आपला जिल्हा राज्यात तीन नंबरवर आहे. यावर्षी आपला जिल्हा राज्यात प्रथम यावा, यासाठी प्रयत्न करणे गरजेच आहे.

एका गावात असावेत १० शेतकरी...

रेशीम अधिकारी बावगे म्हणाले, मनरेगाअंतर्गत एक एकर तुती लागवडीचे अंदाजपत्रक ३ लाख २३ हजार ७९० तीन वर्षांत दिले जाते. यासाठी लाभार्थी हा अल्पभूधारक असावा व शासननिर्णयानुसार एका गावात कमीत कमी १० शेतकऱ्यांनी रेशीम शेती करणे गरजेचे आहे.

नानाजी देशमुख कृषि संजीवनी योजना (पेाखरा) या योजनेतंर्गत शेतकऱ्यांना एक एकर तुती लागवड, किटक संगोपन, गृह बांधकाम व कीटक संगोपन साहित्य याकरिता साधारण लाभार्थ्यांना २ लाख २० हजार २२९ रुपये व अनुसूचित जाती जमातीच्या लाभार्थीकरीता २ लाख ६४ हजार २७५ रुपये दिले जाते.