शहरं
Join us  
Trending Stories
1
आयटी पार्क पुण्यातून बाहेर चालले..! अजित पवारांनी हिंजवडीच्या सरपंचांनाही सुनावले खडेबोल
2
२६ जुलै हा दिवस मुंबईकर कधीच विसरू शकत नाही! २० वर्षापूर्वी काय घडलं होतं त्या दिवशी?
3
Thailand- Cambodia Conflict :'सीमेवर प्रवास टाळा', थायलंड- कंबोडिया संघर्षादरम्यान भारताच्या पर्यटकांसाठी दूतावासाने सूचना दिल्या
4
विवाहित वर्गमैत्रिणीला भेटला; पत्नीला घटस्फोट देत तिच्यासोबत लिव्ह इनमध्ये राहिला, मग जे घडलं...
5
कॉलेजला जाण्यापूर्वी हवी होती लीन बॉडी; ऑनलाईन ट्रेंड, लिक्विड डाएट बेतलं जीवावर, मुलाचा मृत्यू
6
आता सैनिकांसाठी अरबी भाषा आणि इस्लाम शिकणे अनिवार्य, इस्रायलचा मोठा निर्णय! कारण काय?
7
अरेरे! 'सैयारा' पाहून तुफान राडा; गर्लफ्रेंडसाठी थिएटरबाहेर भिडले २ तरुण, लाथा-बुक्क्यांनी मारहाण
8
Rain Update : ठाणे, रायगड, मुंबईत मुसळधार, ऑरेंज अलर्ट, पालघरसाठी रेड अलर्ट, भरती-ओहोटीबाबतही इशारा
9
५ वर्षांत १० पट वाढला TATA Sons चा नफा; समूहाच्या 'या' कंपनीनं केली सर्वाधिक कमाई, तुमच्याकडे स्टॉक आहे का?
10
'मला बुटाने मारा', सिद्धरामय्या अन् शिवकुमार यांच्या विशेष अधिकाऱ्यांमध्ये दिल्लीत हाणामारी; कारण काय?
11
शाहरुख फिटनेससाठी कोणते पदार्थ खात नाही? किती वाजता झोपतो? काय जेवतो? जाणून घ्या एका क्लिकवर
12
पहिल्यांदा नोकरी करणाऱ्यांना सरकार देणार १५ हजार रुपये; फक्त पूर्ण कराव्या लागतील 'या' २ अटी
13
"तुम्हाला आनंद देणाऱ्या गोष्टींवरदेखील खर्च करा..," राधिका गुप्ता यांनी दिला हृदयस्पर्शी सल्ला
14
आमदार रोहित पवारांच्या अडचणीत वाढ; मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीकडून मोठी कारवाई
15
महायुतीत २ मंत्र्यांमध्ये रंगलं मानापमान नाट्य; शिंदेसेनेचे मंत्री नाराज, भाजपा मंत्र्यांचा पलटवार
16
सुनील शेट्टीने 'हेरा फेरी ३'मधील परेश रावलच्या एंट्रीवर दिली प्रतिक्रिया, म्हणाली- "नजर लागते..."
17
२ मुलांना विष पाजलं, पत्नीचा गळा दाबला अन् मग पतीने...; एकाच कुटुंबातील चौघांची जीवनयात्रा संपली
18
धक्कादायक घटना! एक वर्षाच्या मुलाने नागाचा चावा घेतला, कोब्राचा मृत्यू झाला; पण मुलगाही...
19
पाकिस्तानने अमेरिकेसमोर TRF'वर सूर बदलला! म्हणाले, आम्हाला काही हरकत नाही', हुशारीही दाखवली
20
₹३० वरुन ₹३००० पार गेला हा शेअर; आता कंपनीनं मोठ्या गुंतवणुकीची केली घोषणा, तुमच्याकडे आहे का?

शेतकऱ्यांनी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2021 04:17 IST

लातूर: रेशीम शेती करण्यासाठी जिल्ह्यात महारेशीम अभियान राबविण्यात येणार आहे. जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी आपले नावनोंदणी करून ...

लातूर: रेशीम शेती करण्यासाठी जिल्ह्यात महारेशीम अभियान राबविण्यात येणार आहे. जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी आपले नावनोंदणी करून रेशीम शेती करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी बी.पी.पृथ्वीराज यांनी केले.

चाकूर तालुक्यातील नळेगाव येथील अल्पभूधारक शेतकरी गोविंद रामा अलूरे या शेतकऱ्याच्या एक एकर तुती लागवड केलेल्या रेशीम शेती पाहणीप्रसंगी ते बोलत होते. यावेळी उपसंचालक (आत्मा) पाटील, रेशीम विकास अधिकारी एन. बी. बावगे यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी जिल्हाधिकारी पृथ्वीराज म्हणाले, जिल्ह्यात रेशीम शेती करण्यास वाव असून रेशीम कोषाला सोन्याचा भाव आहे. मागील वर्षी राबविण्यात आलेल्या महारेशीम अभियानात आपला जिल्हा राज्यात तीन नंबरवर आहे. यावर्षी आपला जिल्हा राज्यात प्रथम यावा, यासाठी प्रयत्न करणे गरजेच आहे.

एका गावात असावेत १० शेतकरी...

रेशीम अधिकारी बावगे म्हणाले, मनरेगाअंतर्गत एक एकर तुती लागवडीचे अंदाजपत्रक ३ लाख २३ हजार ७९० तीन वर्षांत दिले जाते. यासाठी लाभार्थी हा अल्पभूधारक असावा व शासननिर्णयानुसार एका गावात कमीत कमी १० शेतकऱ्यांनी रेशीम शेती करणे गरजेचे आहे.

नानाजी देशमुख कृषि संजीवनी योजना (पेाखरा) या योजनेतंर्गत शेतकऱ्यांना एक एकर तुती लागवड, किटक संगोपन, गृह बांधकाम व कीटक संगोपन साहित्य याकरिता साधारण लाभार्थ्यांना २ लाख २० हजार २२९ रुपये व अनुसूचित जाती जमातीच्या लाभार्थीकरीता २ लाख ६४ हजार २७५ रुपये दिले जाते.