शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

लातूर तालुक्यात वाळलेल्या उसात गळफास घेऊन शेतकऱ्याची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2018 12:18 IST

या शेतकऱ्याने वाळलेल्या उसाच्या फडातच गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज सकाळी घडली़.

लातूर : वाळून गेलेला ऊस, तीन महिन्यावर आलेले मुलीचे लग्न, हाताला कामही नाही़. झालेले कर्ज कसे फेडायचे या विवंचनेतून लातूर तालुक्यातील सारसा येथील भूजंग पवार या शेतकऱ्याने वाळलेल्या उसाच्या फडातच गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज सकाळी घडली़.

गेल्या तीन महिन्यांपासून पाऊस नसल्याने सारसा व परिसरातील अनेक शेतकऱ्यांची हालक्या जमीनीवरील उस वाळून गेले आहे़. सारसा येथील भूजंग माणिकराव पवार (वय ४५) यांना तीन एकर शेती आहे़ त्यांनी यावर्षी ऊसाची लागवड केली होती़. पाणी नसल्याने उसाची पाचट झाली़ मुलीचे लग्न जमवून तारीखही काढली होती़. फेब्रुवारी महिन्यात मुलीचे लग्न करण्यासाठी पैशाची जुळवाजुळव कशी करावी, याची त्यांना चिंता लागली होती़ उसही वाळून गेल्याने खर्च कसा भागवायचा हा प्रश्न होता़ त्यातच हाताला कामही नसल्याने घरखर्च भागविणेही कठीण झाले होते़.

दुष्काळी परिस्थितीत झालेली नापिकी व कर्ज कसे फेडायचे यातून त्यांनी मंगळवारी सकाळी गळफास घेऊन आत्महत्या केल्याने नातेवाईकांनी सांगितले़. याबाबतची माहिती मुरूड पोलिसांना देण्यात आली असून सकाळी १०़३० वाजेपर्यंत प्रेत काढण्यात आले नव्हते़ प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी आल्याशिवाय प्रेत काढू नका, असा पवित्रा नातेवाईकांनी घेतला आहे़. 

हाताला कामही नाही़...पाऊस नसल्याने या भागात मजुरांना कामेही नाहीत़ भूजंग पवार हे मुलीच्या लग्नासाठी पैसे कोठून जमवायचे या चिंचेत होते़ उसाचीही पाचट झाल्याने त्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे़. घटनास्थळी महसूल विभागाचे मंडळ अधिकारी शेख यांच्यासह पोलीस दाखल झाले आहेत़.

टॅग्स :farmer suicideशेतकरी आत्महत्याFarmerशेतकरीagricultureशेती