शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

लातूर तालुक्यात वाळलेल्या उसात गळफास घेऊन शेतकऱ्याची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2018 12:18 IST

या शेतकऱ्याने वाळलेल्या उसाच्या फडातच गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज सकाळी घडली़.

लातूर : वाळून गेलेला ऊस, तीन महिन्यावर आलेले मुलीचे लग्न, हाताला कामही नाही़. झालेले कर्ज कसे फेडायचे या विवंचनेतून लातूर तालुक्यातील सारसा येथील भूजंग पवार या शेतकऱ्याने वाळलेल्या उसाच्या फडातच गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज सकाळी घडली़.

गेल्या तीन महिन्यांपासून पाऊस नसल्याने सारसा व परिसरातील अनेक शेतकऱ्यांची हालक्या जमीनीवरील उस वाळून गेले आहे़. सारसा येथील भूजंग माणिकराव पवार (वय ४५) यांना तीन एकर शेती आहे़ त्यांनी यावर्षी ऊसाची लागवड केली होती़. पाणी नसल्याने उसाची पाचट झाली़ मुलीचे लग्न जमवून तारीखही काढली होती़. फेब्रुवारी महिन्यात मुलीचे लग्न करण्यासाठी पैशाची जुळवाजुळव कशी करावी, याची त्यांना चिंता लागली होती़ उसही वाळून गेल्याने खर्च कसा भागवायचा हा प्रश्न होता़ त्यातच हाताला कामही नसल्याने घरखर्च भागविणेही कठीण झाले होते़.

दुष्काळी परिस्थितीत झालेली नापिकी व कर्ज कसे फेडायचे यातून त्यांनी मंगळवारी सकाळी गळफास घेऊन आत्महत्या केल्याने नातेवाईकांनी सांगितले़. याबाबतची माहिती मुरूड पोलिसांना देण्यात आली असून सकाळी १०़३० वाजेपर्यंत प्रेत काढण्यात आले नव्हते़ प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी आल्याशिवाय प्रेत काढू नका, असा पवित्रा नातेवाईकांनी घेतला आहे़. 

हाताला कामही नाही़...पाऊस नसल्याने या भागात मजुरांना कामेही नाहीत़ भूजंग पवार हे मुलीच्या लग्नासाठी पैसे कोठून जमवायचे या चिंचेत होते़ उसाचीही पाचट झाल्याने त्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे़. घटनास्थळी महसूल विभागाचे मंडळ अधिकारी शेख यांच्यासह पोलीस दाखल झाले आहेत़.

टॅग्स :farmer suicideशेतकरी आत्महत्याFarmerशेतकरीagricultureशेती