शहरं
Join us  
Trending Stories
1
सोनम वांगचुक यांनीच लोकांना भडकावले; लेहमधील हिंसाचारासाठी गृहमंत्रालयाने धरले जबाबदार
2
'तुमचेही फोटो लावा'; प्रताप सरनाईकांच्या पूरग्रस्तांच्या मदतीच्या किटवरुन अजितदादांनी विरोधकांना सुनावलं
3
"अक्खी दुनिया एक तरफ, मेरा बुमराह एक तरफ"; अभिनेत्याची फरमाईश अन् संजानानं Live शोमध्ये लुटली मैफिल (VIDEO)
4
"मुस्लिमांनी अयोध्या सोडावी, या मंदिरनगरीत मशिदीच्या बांधकामाला परवानगी दिली जाणार नाही..."; भाजप नेते विनय कटियार यांचं विधान
5
Asia Cup 2025: सलग पाचव्या विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल! आता बांगलादेश-पाक यांच्यात रंगणार सेमीफायनल
6
MBBS आणि वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी १० हजार जागा वाढवण्यास मान्यता; प्रत्येक जागोसाठी १.५० कोटींचा खर्च
7
"रशिया कागदी वाघ नाही, तर...!"; डोनाल्ड ट्रम्प म्हणाले होते 'कागदी वाघ', रशियानं केला पलटवार; म्हणाला...
8
Pahalgam Terror Attack : मोठं यश...! पहलगाम हल्ल्यात दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या मोहम्मद कटारियाला अटक; असा पकडला
9
अभिषेकनं साधला मोठा डाव! आधी हिटमॅन रोहितला ओव्हरटेक केलं, मग गुरबाझचा विक्रमही मोडला
10
३ दिवस भारताचे मंत्री, अधिकारी अमेरिकेत तळ ठोकून; ट्रेड डील, ट्रम्प टॅरिफ, H1B व्हिसावर चर्चा
11
पूरग्रस्तांच्या मदतीसाठी भाजपा खासदार, आमदारांचा मोठा निर्णय, एक महिन्याचे वेतन देणार!
12
IND vs BAN : बांगलादेशच्या नव्या कॅप्टननं नशीब काढलं, पण तो गडबडला! सूर्या म्हणाला, आमच्या मनासारखं झालं
13
एकीकडे डोनाल्ड ट्रम्प यांची 'बोंबाबोंब', दुसरीकडे रशियाने मात्र थेट इराणसोबत केला अणू करार
14
राज ठाकरेंचे CM फडणवीसांना पत्र; सरकारला ५ महत्त्वाच्या सूचना, मदत-जाहिरातबाजीवरून टोचले कान
15
“शेतकऱ्यांना सर्व प्रकारची मदत, ड्रोनने केलेले पंचनामे मान्य करणार”; CM फडणवीसांची ग्वाही
16
त्याला अजून फाशी का दिली नाही? मुख्यमंत्र्यांची हत्या करणाऱ्या आरोपीच्या याचिकेवर कोर्टाने सरकारला फटकारलं
17
सरकार शेतकऱ्यांचे आहे, चिंता करू नका! एकनाथ शिंदे यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिला धीर
18
वायरल 'बाल्कनी' हिमनगाचे केवळ टोक? ९९८ कोटींचा इंडोरा–दिगोरी उड्डाणपूलामुळे प्रभावित मालमत्तांची यादी तयार करण्याचे आदेश
19
“पूरग्रस्त प्रत्येक कुटुंबाला १० किलो गहू-तांदूळ, केंद्राची मदत १०० टक्के येईल”: छगन भुजबळ
20
"प्रत्येकाला स्वाभिमान असतो, त्याने..."; शाहीन शाह आफ्रिदीकडून हॅरिस रौफच्या कृतीचे समर्थन

लातूर जिल्ह्यातील तीन महसूल मंडलांत अतिवृष्टी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2021 04:22 IST

लातूर : लातूर जिल्ह्यात शनिवारी रात्री सर्वदूर पाऊस पडला असून जिल्ह्यातील तीन महसूल मंडलात अतिवृष्टी झाली आहे. रेणापूर ...

लातूर : लातूर जिल्ह्यात शनिवारी रात्री सर्वदूर पाऊस पडला असून जिल्ह्यातील तीन महसूल मंडलात अतिवृष्टी झाली आहे. रेणापूर तालुक्यातील रेणा नदीवरील रेणा बॅरेजेस तुडुंब भरला आहे. जिल्ह्यात रविवारी सकाळी आठ वाजेपर्यंत २५.३ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. आतापर्यंत ५२० मि.मी. पाऊस पडला असून गतवर्षीच्या तुलनेत आणखीन २७.९ मि.मी पाऊस कमी आहे.

जिल्ह्यात शनिवारी रात्री सर्वदूर पाऊस पडला. तांदुळजा रेणापूर आणि कासारखेडा महसूल मंडलात अतिवृष्टी झाली आहे. कासारखेडा महसूल मंडलात ८३.५, तांदुळजा महसूल मंडलात ६८.५ आणि रेणापूर महसूल मंडलात ११३.५ पाऊस पडला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ५२० मि.मी.पाऊस झाला आहे. गतवर्षी आजच्या तारखेत ५४८.८ मि.मी.पाऊस झाला होता. जो की गतवर्षीच्या तुलनेत यंदा २७.९ मि.मी. कमी आहे.

रविवारी सकाळी आठ वाजेपर्यंत लातूर तालुक्यात ३४.२, औसा तालुक्यात २३.६, अहमदपूर तालुक्यात ९, निलंगा २२.३, उदगीर २८.६, चाकूर २४.२, रेणापूर ५०.४, देवणी १४.८ आणि जळकोट तालुक्यात ८.३ मि.मी. पाऊस पडला आहे.

यंदाच्या पावसाळ्यातला सर्वदूर होणारा पहिला पाऊस...

जिल्ह्यात एकूण ६० महसूल मंडले आहेत. या सर्व महसूल मंडलांत कमी-जास्त प्रमाणात शनिवारी रात्री पाऊस झाला. यामुळे खरिपाच्या पिकांना जीवदान मिळाले आहे. यापैकी कासारखेडा, तांदुळजा आणि रेणापूर या तीन महसूल मंडलांमध्ये अतिवृष्टी झाली असून परिसरातील नदी-नाल्यांना पाणी आले आहे. उर्वरित ५७ महसूल मंडलांमध्ये कमी-जास्त प्रमाणात पाऊस आहे. त्यामुळे बहुतांश साठवण तलाव अद्यापि जोत्याखालीच आहेत.

मोठ्या पावसाची प्रतीक्षा; मांजरा प्रकल्पात ८४.९४१ द.ल.घ.मी. पाणीसाठा

मध्यम प्रकल्प, मोठे प्रकल्प आणि लघु प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरण्यासाठी मोठ्या पावसाची प्रतीक्षा आहे. लातूर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या मांजरा प्रकल्पात सद्यस्थितीत एकूण पाणीसाठा ८४.९४१ द.ल.घ.मी. आहे. यातील जिवंत साठा ३७.१८१ द.ल.घ.मी. असून मृत पाणीसाठा ४७.१३० द.ल.घ.मी. आहे. मांजरा प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरण्यासाठी धरण क्षेत्रात पाऊस होण्याची गरज आहे. यंदाच्या पावसाळ्यात पंधरा ते अठरा द.ल.घ.मी. नवीन पाणीसाठा झाला असल्याची माहिती प्रकल्प अभियंत्यांनी दिली.