शहरं
Join us  
Trending Stories
1
Beed: अजित पवारांच्या ताफ्यासमोरच दोन तरुणांनी पेटवून घेण्याचा केला प्रयत्न, पोलिसांची धावपळ
2
६० मुस्लीम देशांच्या बैठकीत पाकिस्ताननं दिला 'इस्लामिक नाटो'चा प्रस्ताव; भारतासाठी किती चिंताजनक?
3
सरकारनं अदानींना दिली १ रूपये प्रतिवर्ष दराने १ हजार एकर जमीन; विरोधकांचा हल्लाबोल, प्रकरण काय?
4
PM Modi Birthday: पंतप्रधान मोदींचा डुप्लिकेट कोण? राजकीय सभांपासून बॉलिवूड सिनेमांमध्ये केलंय काम
5
Urban Company IPO Listing: ५६ टक्क्यांचं लिस्टिंग गेन, ₹१०३ च्या शेअरची धमाकेदार एन्ट्री; गुंतवणूकदार मालामाल
6
Nupur Bora : पैसाच पैसा! ५ वर्षांच्या सेवेत ९२ लाख, १ कोटीचे दागिने...; कोट्यवधींच्या कमाईने मुख्यमंत्रीही हैराण
7
"तुमच्या सक्षम मार्गदर्शनाखाली..."; शरद पवार यांनी पंतप्रधान मोदींना दिल्या खास शुभेच्छा
8
PM Modi Birthday: जिथे गेले तिथे गाजवलं वर्चस्व! जगातील 'या' मोठ्या देशांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना दिला सर्वोच्च सन्मान 
9
Astro Tips: शुभ मुहूर्त पाहून मूल जन्माला घालणे शक्य आहे का? त्रेतायुगात सापडते उत्तर!
10
सगळे सलमानची बाजू घेत होते, ब्रेकअपनंतर ऐश्वर्याची इंडस्ट्रीनं सोडली साथ, दिग्दर्शकाचा खुलासा
11
सोने तारण कर्जाला सोन्याचे दिवस! जूनमध्ये झाली तब्बल १२२ टक्क्यांची वाढ
12
पैसे तयार ठेवा! कॅनरा रोबेको, हीरो मोटर्ससह या ६ कंपन्यांचे येणार IPO; सेबीकडून मिळाली मंजुरी, पाहा डिटेल्स
13
महाराष्ट्रात २ लाख रोजगार; ॲनिमेशन, गेमिंग धोरण जाहीर, ५० हजार कोटींची गुंतवणूक, ३,२६८ कोटींचा आराखडा
14
Electric Scooter: चार्जिंग सुरू असताना इलेक्ट्रिक स्कूटरला आग; नवरा- बायकोचा होरपळून मृत्यू!'
15
"नक्की कोण जिंकलं? आणि…’’, राज ठाकरेंचा व्यंगचित्रातून शाह पिता-पुत्रावर टीकेचा बाऊन्सर 
16
मोबिक्विकला ४८ तासांत ४० कोटींचा फटका! लाखो युजर्सच्या खात्यातून पैशांची चोरी
17
Dashavatar: पाचव्या दिवशीही कोटींमध्ये कमाई, दिलीप प्रभावळकरांच्या सिनेमाने आत्तापर्यंत किती कमावले?
18
Vaishno Devi Yatra: भयंकर घटनेनंतर वैष्णो देवी यात्रेला पुन्हा सुरूवात; ३४ भाविकांचा झाला होता मृत्यू
19
केवळ ₹१ विकली जाणार होती अपोलो टायर्स; आज आहे टीम इंडियाची ओळख, कोण आहेत मालक, किती आहे संपत्ती?
20
हेल्थ-लाईफ इन्शुरन्सवर सूट, ITC वर कठोर भूमिका; पाहा २२ सप्टेंबरपासून काय-काय बदलणार?

सायबर सुरक्षेबाबत प्रत्येकाने सावध राहण्याची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2021 04:26 IST

लातूर येथील दयानंद विज्ञान महाविद्यालयात ‘सायबर सिक्युरिटी जागरूकता’ या विषयावरील एक दिवसीय ऑनलाइन वेबिनारमध्ये ते बाेलत हाेते. या वेळी ...

लातूर येथील दयानंद विज्ञान महाविद्यालयात ‘सायबर सिक्युरिटी जागरूकता’ या विषयावरील एक दिवसीय ऑनलाइन वेबिनारमध्ये ते बाेलत हाेते. या वेळी त्या प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होत्या. कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. सिद्धेश्वर बेल्लाळे होते. या वेळी श्री कुमारस्वामी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एम.एम. बेटकर, प्राचार्य डाॅ. श्रीराम सोळंके, प्रा. शीतल पाटील, डॉ. राहुल मोरे यांची प्रमुख उपस्थिती होती. अध्यक्षीय समारोप करताना डॉ. सिद्धेश्वर बेल्लाळे म्हणाले, सध्याच्या युगात जवळपास सर्व दैनंदिन व्यवहार हे ऑनलाइन पद्धतीने होत आहेत. जगाचे जसजसे आधुनिकीकरण होत आहे, तसतशा पद्धतीने नवीन संकल्पना, डिजिटल व्यवहार होत आहेत. अशा या काळात सायबर सुरक्षा, सिक्युरिटीबाबत सजग असले पाहिजे. सायबर कायद्याबाबत समाजजीवनात जागृती झाली पाहिजे. समाजप्रबोधन झाले पाहिजे. यासाठी महाविद्यालयातील विद्यार्थी, प्राध्यापक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, असेही ते म्हणाले.

प्रास्ताविक प्रा. शीतल पाटील यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. पूजा सोनसाळे यांनी केले. आभार प्रा. शैलजा धुतेकर यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जयप्रकाश दरगड, प्रा. सुजाता काळे, डाॅ. कोमल गोमारे, प्रा. श्वेता लोखंडे, प्रा. शिवाजी आळणे, प्रा. किरण भिसे, प्रा. श्वेता मदने, डाॅ. रवींद्र सोळंके, डाॅ. रवींद्र शिंदे, डाॅ. रामशेट्टी शेटकार, डाॅ. गजानन बने, प्रा. कांचन कदम, प्रा. करुणा कोमटवार, प्रा. संगीता जाजू, प्रा. श्रेयस माहूरकर, डाॅ. महेश कराळे, प्रियंका हिप्परकर, प्रा. लहू काथवटे, प्रा. मंगेश आवाळे यांच्यासह प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते.

ऑनलाइन व्यवहार करताना काळजी घ्यावी...

आजचे युग माहिती तंत्रज्ञान, संगणकाचे आहे. संपूर्ण जग हे इंटरनेटच्या साह्याने एकमेकांशी जोडले गेले आहे. आज सोशल मीडिया म्हणजे फेसबुक, गुगल, व्हाॅट्सॲप, इन्स्टाग्राम, युट्युब यांच्या वापराचे प्रमाण आता वाढले आहे. या जागतिकीकरणाच्या, सोशल मीडियाच्या जगात सायबर गुन्ह्यांचे प्रमाणही अधिक वाढले आहे. यासाठी सायबर सुरक्षेबाबत प्रत्येक भारतीयांनी सावध असले पाहिजे. स्वतःची वैयक्तिक माहिती, गुगल पे, फोन पे, मनी ट्रांजेक्शन करताना कोणालाही देऊ नये, पासवर्ड, ओटीपी, क्रेडिट कार्डचा नंबर सांगू नये. इंटरनेट बँकिंग करताना काळजी घ्यावी.