सध्या महाविकास आघाडीचे सरकार चांगल्या पद्धतीने काम करत आहे. प्रत्येक पक्षाला आपल्या पक्षाची भूमिका ठरविण्याचा अधिकार आहे. जो काही पक्ष आदेश असेल तो सर्वांसाठी कायम असतो. त्याची अंमलबजावणी आपण सर्वांनी केली पाहिजे. आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत महाविकास आघाडी सरकारच सत्तेवर येईल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
अतिवृष्टीत नुकसान झालेल्या शेतकऱ्यांचे पंचनामे करुन अहवाल सादर करण्यात आल्यानंतर शासनाच्या कॅबिनेट बैठकीमध्ये याबाबत चर्चा करण्यात येईल. प्रशासकीय अधिकाऱ्यांना पिकांचे, रस्त्यांच्या पुलांचे जे काही नुकसान झाले आहे, त्याचा अहवाल सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. पिकविमा माहीती भरण्यासंदर्भात ऑफलाइन पद्धतीने अर्ज घेण्यात येतील, असे सांगून शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकार असून, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचेही राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी सांगितले.
तालुक्याच्या सर्वागीण विकासासाठी कटीबद्ध...
जळकोट नगरपरिषद राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात द्या. जळकोट शहराचा कायापालट करून देऊ. जळकोट तालुक्याचा सर्वांगीण विकासासाठी कटीबद्ध असल्याचेही राज्यमंत्री संजय बनसोडे म्हणाले. यावेळी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अर्जुन पाटील आगलावे, ज्येष्ठ नेते मन्मथ आप्पा किडे, तालुका काँग्रेसचे अध्यक्ष मारुती पांडे, बाजार समितीचे संचालक गजानन पाटील दळवी, संग्राम पाटील हसुळे, महेश धूळशेटे, पाशा शेख, दिलीप कांबळे, दस्तगीर शेख, धनंजय धर्मांना, गोविंद ब्रह्मंना, शहराध्यक्ष अशोक डांगे, बालाजी आगलावे, मनोहर वाकळे, संग्राम नामवाड, नितीन धूळशेटे, माजी नगराध्यक्ष उस्मान मोमीन आदी उपस्थित होते.