शहरं
Join us  
Trending Stories
1
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
2
Glenn Maxwell Video: याला म्हणतात 'कमबॅक'... ग्लेन मॅक्सेवलने मारले तब्बल १३ षटकार, ४८ चेंडूत केलं शतक
3
Nashik: शिंदेंचा घाव, ठाकरेंच्या शिवसेनेला पडलं भगदाड! उरले फक्त नऊ माजी नगरसेवक
4
एक्स्प्रेस हायवे असुदे की नॅशनल... कोणताही टोल १५ रुपयांत पार करा; पण नियम आधी जाणून घ्या...
5
सोन्याचे दर घसरले, पण चांदीचा विक्रम; किंमत १ लाख १२ हजारांवर; खरेदीपूर्वी पाहा लेटेस्ट रेट
6
"आता वेळ आलीय..."; लोकप्रिय अभिनेत्रीसोबत मोठा स्कॅम, स्टायलिस्ट सांगून फसवलं
7
हनीमूनला जाताना किती सोनं आणि कॅश घेऊन गेली होती सोनम रघुवंशी? भावानं केला मोठा दावा
8
"इंग्रजीचा पुरस्कार अन् भारतीय भाषांचा तिरस्कार हे योग्य नाही, आपली भाषा..."; CM फडणवीसांचे राज यांना उत्तर
9
जिवंत रुग्णाला मृत घोषित केले; डॉक्टरांकडे महापालिकेने मागितला खुलासा
10
Israel Iran War : इराणच्या क्षेपणास्त्र हल्ल्यामुळे संरक्षण यंत्रणेवर तणाव; फक्त १० दिवसांचा साठा शिल्लक
11
हैदराबादच्या बेगमपेट विमानतळाला बॉम्बने उडवण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा अलर्टवर, शोधमोहिम सुरू
12
सोने सोडा चांदीमध्येही बंपर कमाईची संधी! पुढील ६ महिन्यांत किंमत दुप्पट होणार? कोणी केला दावा?
13
केदारनाथ यात्रेला निघालेले भाविक दरीत कोसळले; दोघांचा मृत्यू, तीन जखमी
14
...तर पाकिस्तानातील अण्वस्त्र ठिकाणे उद्ध्वस्त झाली असती; इस्त्रायलची ऑफर भारताने का नाकारली?
15
पुणे, चंद्रपूर, नंदूरबार, धाराशिव; शरद पवार गट, उद्धवसेनेला खिंडार, माजी नगरसेवक शिंदे गटात
16
सोनमने २५ दिवसांत केला ११२ वेळा फोन, तो संजय वर्मा कोण? राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण  
17
Mukesh Ambani : मुकेश अंबानींनी लावलं जबरदस्त डोकं, ५०० कोटींच्या गुंतवणूकीतून कमावले ९००० कोटी रुपये
18
पंतप्रधान नरेंद्र मोदी ३७ दिवस शांत बसले अन् आता..; मोदी-ट्रम्प चर्चेवर काँग्रेसचा निशाणा
19
खासगी टेलिकॉम कंपन्यांचे धाबे दणाणले; लवकरच सुरू होणार BSNL ची 5G सेवा; नावही ठरले...
20
करून दाखवलं! ११ व्या वर्षी लग्न... समाजासमोर 'तो' झुकला नाही, स्वप्नासाठी लढला; होणार डॉक्टर

खाद्यतेल आयातीचा व्यापारी, शेतकऱ्यांना फटका; सोयाबीनचे दर जैसे थे!

By संदीप शिंदे | Updated: August 25, 2023 18:20 IST

साठा केलेले व्यापारी, विक्री न केलेल्या शेतकऱ्यांना फटका; दोन वर्षांपूर्वी सोयाबीनला १० हजार प्रतिक्विंटलचा दर मिळाल्याने शेतकरी सोयाबीन विक्रीसाठी घाई न करता दर वाढतील या अपेक्षाने टप्प्याटप्प्याने विक्री करत होते.

उदगीर : केंद्र सरकारने खाद्यतेलावरील आयात शुल्क कमी केल्यामुळे बाहेर देशातून आयात होत असलेल्या खाद्यतेलाचा परिणाम स्थानिक बाजारात दिसत आहे. त्यामुळे मागील दोन महिन्यापासून सोयाबीनच्या दरात कुठलीही वाढ झालेली नाही. उलट बाजारात आवक कमी असतानासुद्धा मागील चार दिवसापासून सोयाबीनच्या दरात दिडशे रुपयाची घट झाल्याचे चित्र आहे. व्यापाऱ्यांनी दर वाढतील म्हणून मोठ्या प्रमाणात सोयाबीनचा साठा केलेला आहे, तसेच अनेक शेतकऱ्यांनीही दरवाढ होईल म्हणून सोयाबीन घरीच ठेवले आहे. परिणामी, आर्थिक नुकसान होत आहे.

दोन वर्षांपूर्वी सोयाबीनला १० हजार प्रतिक्विंटलचा दर मिळाल्याने शेतकरी सोयाबीन विक्रीसाठी घाई न करता दर वाढतील या अपेक्षाने टप्प्याटप्प्याने विक्री करत होते. त्यामुळे बाजारात मोठ्या प्रमाणात आवक झालीच नाही. यासोबतच अनेक व्यापाऱ्यांनी दोन वर्षांपूर्वीचा सोयाबीनला मिळालेला उच्चांकी दर पाहता मिळेल त्या दरात सोयाबीन खरेदी करून गोदामात साठवणूक केली आहे. मागील वर्षाच्या हंगामाच्या सुरुवातीला सोयाबीनचा दर ५ हजार २०० रुपये प्रतिक्विंटल होता. दरवाढीच्या फायदा घ्यावा म्हणून शेतकऱ्यांनी त्यांच्याकडील सोयाबीन बाजारात टप्प्याटप्प्याने विक्रीसाठी आणला. त्यामुळे बाजारात मोठ्या प्रमाणात आवक झालीच नाही.

हंगामाच्या मध्यात सोयाबीन ५ हजार ८५० प्रतिक्विंटलपर्यंत गेला. हा दर साधारणपणे दोन-तीन दिवस होता. त्यामुळे बहुतेक व्यापारी व शेतकऱ्यांनी इथून आता दर वाढेल असा अंदाज वर्तवित साठवणूक केली. याचा परिणाम बाजारातील आवक कमी होण्यावर झाला. परंतु प्रक्रियादार कारखानदाराकडून मागणी जेमतेम होत असल्यामुळे दर वाढ झाली नाही. मुळात सोयाबीन हे आंतरराष्ट्रीय पीक असल्यामुळे जागतिक घडामोडीचा यावर फार मोठा परिणाम होतो. खाद्य तेलाचे दर वाढू नयेत म्हणून केंद्र सरकारने आयात होणाऱ्या खाद्यतेलावरील आयात शुल्क कमी केले. त्याचा परिणाम बाहेर देशातून येणारे खाद्यतेल कमी दरामध्ये बाजारात उपलब्ध होत असल्याकारणाने प्रक्रियादार कारखानदारांनीसुद्धा सोयाबीन खरेदी करतेवेळी या बाबीचा विचार करून आवश्यक व मागणी पुरवठ्याचा हिशोब घालित सोयाबीन खरेदी केले. संपूर्ण हंगाम संपून गेला, यंदाच्या पेरण्या झाल्या तरी बाजारात आवक १ हजार ते १ हजार ५०० पोतपर्यंत खाली आली असल्याचे चित्र आहे.

उदगीरात ४ हजार ८५० रुपयांचा दर...शुक्रवारी उदगीरच्या बाजारात ४८५० रुपयांपर्यंत सोयाबीनचा दर होता. क्विंटलमागे एक हजार रुपयाची घसरण झाली आहे. व्यापाऱ्यांनी ५७०० ते ५८५० प्रतिक्विंटल दराने खरेदी करून गोदामात सोयाबीन ठेवले आहे. गोदाम भाडे, येणारी तूट व इतर खर्च वजा जाता १०० पोत्यांमागे जवळपास सव्वा लाखांचे नुकसान होत आहे. लाखो क्विंटल सोयाबीन अनेक गोदामात विक्रीविना पडून आहे. हीच अवस्था शेतकऱ्यांची असून, दोघांनाही नुकसान सहन करावे लागत आहे.

दर वाढण्याची शक्यता कमीच...मागील वर्षीचा साठा व आंतरराष्ट्रीय बाजारातून कमी दरात खाद्य तेल बाजारात उपलब्ध होत आहे. केंद्र सरकारने ग्राहकांना परवडेल अशा दराने बाजारात खाद्यतेल उपलब्ध व्हावे म्हणून खाद्य तेलावरील आयात शुल्क कमी केले आहे. त्यामुळे भविष्यात सोयाबीनच्या दरात कुठलीही वाढ होण्याची शक्यता दिसून येत नाही, असे सोयाबीन प्रक्रियादार सागर महाजन यांनी सांगितले.

टॅग्स :Farmerशेतकरीlaturलातूर