शहरं
Join us  
Trending Stories
1
विनाशाची ढगफुटी! पृथ्वी कोपली तर केलेल्या चुकांची माफी मागण्याची संधीदेखील देणार नाही
2
भारताला ५० टक्क्याचा शॉक; ट्रम्प यांनी दुप्पट केले टॅरिफ; काय होणार परिणाम?
3
रशियाशी व्यापार केल्याबद्दल फक्त भारतालाच का लक्ष्य केले? ट्रम्प म्हणाले, 'आता फक्त ८ तास...'
4
आजचे राशीभविष्य, ०७ ऑगस्ट २०२५: चिंतामुक्त व्हाल, हाती पैसा राहील; यशाचा शुभ दिवस
5
पक्के घर देण्याचा वादा तीन वर्षांनंतरही पूर्ण हाेईना; महाराष्ट्रात ‘पीएम आवास’ ची २७ लाख घरे अद्याप अपूर्ण
6
डोनाल्ड ट्रम्पच्या प्रयत्नांनाही पुतिन बधले नाहीत! चीनसोबत युद्धाची तयारी सुरू; पुढे काय करणार?
7
पाकिस्तान-अमेरिकेत नक्की काय सुरू? आधी तेलाचा करार, मग टॅरिफही कमी केला; आता असिम मुनीर USच्या वाटेवर!
8
मतदार यादीतील ६५ लाख नावे का वगळली हे सांगा, बिहारवरून सुप्रीम कोर्टाचे  आयोगाला आदेश
9
घरे, झाडे सर्व काही गाडले, हाती काही लागेना; मानवाच्या हव्यासाने आले संकट
10
डोनाल्ड ट्रम्प भारतात राहायला येणार? रहिवासी प्रमाणपत्रासाठी केला अर्ज! प्रशासनाची कोंडी
11
उत्तराखंडमधील ढगफुटीचे थैमान; महाराष्ट्रातील ५१ पर्यटक सुरक्षित
12
सावरकर सदन: वारसास्थळ दर्जाचा लवकरच निर्णय; महापालिकेची हायकोर्टात माहिती; अभिनव भारत काँग्रेसची याचिका
13
रेपो दर जैसे थे; कर्ज हप्ता राहणार स्थिर; ‘ट्रम्प टॅरिफ’च्या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँकेचा निर्णय
14
दिव्याखाली अंधार! हा घ्या, अमेरिकेने रशियाकडून केलेल्या आयातीचा हिशेब
15
महिंद्रा अँड महिंद्रा समूहाचे कर्मचारी होणार मालामाल, मिळणार ५०० कोटींचे शेअर्स
16
शिंदे, ठाकरे दिल्लीत, चर्चा महाराष्ट्रात! एकनाथ शिंदेंची अमित शाह यांच्याशी बंदद्वार चर्चा; पंतप्रधानांना सहकुटुंब भेटले
17
यूपीआय फ्री की फी? शुल्काचे संकेत; काय म्हणाले RBI गवर्नर संजय मल्होत्रा?
18
...तर निवृत्तीनंतरचे आयुष्य येईल धोक्यात, हे करा उपाय
19
"हा अमेरिकेचा दुटप्पीपणाच, भारताने आता..."; शशी थरुर यांनी मोदी सरकारला काय दिला सल्ला?
20
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर

खाद्यतेल आयातीचा व्यापारी, शेतकऱ्यांना फटका; सोयाबीनचे दर जैसे थे!

By संदीप शिंदे | Updated: August 25, 2023 18:20 IST

साठा केलेले व्यापारी, विक्री न केलेल्या शेतकऱ्यांना फटका; दोन वर्षांपूर्वी सोयाबीनला १० हजार प्रतिक्विंटलचा दर मिळाल्याने शेतकरी सोयाबीन विक्रीसाठी घाई न करता दर वाढतील या अपेक्षाने टप्प्याटप्प्याने विक्री करत होते.

उदगीर : केंद्र सरकारने खाद्यतेलावरील आयात शुल्क कमी केल्यामुळे बाहेर देशातून आयात होत असलेल्या खाद्यतेलाचा परिणाम स्थानिक बाजारात दिसत आहे. त्यामुळे मागील दोन महिन्यापासून सोयाबीनच्या दरात कुठलीही वाढ झालेली नाही. उलट बाजारात आवक कमी असतानासुद्धा मागील चार दिवसापासून सोयाबीनच्या दरात दिडशे रुपयाची घट झाल्याचे चित्र आहे. व्यापाऱ्यांनी दर वाढतील म्हणून मोठ्या प्रमाणात सोयाबीनचा साठा केलेला आहे, तसेच अनेक शेतकऱ्यांनीही दरवाढ होईल म्हणून सोयाबीन घरीच ठेवले आहे. परिणामी, आर्थिक नुकसान होत आहे.

दोन वर्षांपूर्वी सोयाबीनला १० हजार प्रतिक्विंटलचा दर मिळाल्याने शेतकरी सोयाबीन विक्रीसाठी घाई न करता दर वाढतील या अपेक्षाने टप्प्याटप्प्याने विक्री करत होते. त्यामुळे बाजारात मोठ्या प्रमाणात आवक झालीच नाही. यासोबतच अनेक व्यापाऱ्यांनी दोन वर्षांपूर्वीचा सोयाबीनला मिळालेला उच्चांकी दर पाहता मिळेल त्या दरात सोयाबीन खरेदी करून गोदामात साठवणूक केली आहे. मागील वर्षाच्या हंगामाच्या सुरुवातीला सोयाबीनचा दर ५ हजार २०० रुपये प्रतिक्विंटल होता. दरवाढीच्या फायदा घ्यावा म्हणून शेतकऱ्यांनी त्यांच्याकडील सोयाबीन बाजारात टप्प्याटप्प्याने विक्रीसाठी आणला. त्यामुळे बाजारात मोठ्या प्रमाणात आवक झालीच नाही.

हंगामाच्या मध्यात सोयाबीन ५ हजार ८५० प्रतिक्विंटलपर्यंत गेला. हा दर साधारणपणे दोन-तीन दिवस होता. त्यामुळे बहुतेक व्यापारी व शेतकऱ्यांनी इथून आता दर वाढेल असा अंदाज वर्तवित साठवणूक केली. याचा परिणाम बाजारातील आवक कमी होण्यावर झाला. परंतु प्रक्रियादार कारखानदाराकडून मागणी जेमतेम होत असल्यामुळे दर वाढ झाली नाही. मुळात सोयाबीन हे आंतरराष्ट्रीय पीक असल्यामुळे जागतिक घडामोडीचा यावर फार मोठा परिणाम होतो. खाद्य तेलाचे दर वाढू नयेत म्हणून केंद्र सरकारने आयात होणाऱ्या खाद्यतेलावरील आयात शुल्क कमी केले. त्याचा परिणाम बाहेर देशातून येणारे खाद्यतेल कमी दरामध्ये बाजारात उपलब्ध होत असल्याकारणाने प्रक्रियादार कारखानदारांनीसुद्धा सोयाबीन खरेदी करतेवेळी या बाबीचा विचार करून आवश्यक व मागणी पुरवठ्याचा हिशोब घालित सोयाबीन खरेदी केले. संपूर्ण हंगाम संपून गेला, यंदाच्या पेरण्या झाल्या तरी बाजारात आवक १ हजार ते १ हजार ५०० पोतपर्यंत खाली आली असल्याचे चित्र आहे.

उदगीरात ४ हजार ८५० रुपयांचा दर...शुक्रवारी उदगीरच्या बाजारात ४८५० रुपयांपर्यंत सोयाबीनचा दर होता. क्विंटलमागे एक हजार रुपयाची घसरण झाली आहे. व्यापाऱ्यांनी ५७०० ते ५८५० प्रतिक्विंटल दराने खरेदी करून गोदामात सोयाबीन ठेवले आहे. गोदाम भाडे, येणारी तूट व इतर खर्च वजा जाता १०० पोत्यांमागे जवळपास सव्वा लाखांचे नुकसान होत आहे. लाखो क्विंटल सोयाबीन अनेक गोदामात विक्रीविना पडून आहे. हीच अवस्था शेतकऱ्यांची असून, दोघांनाही नुकसान सहन करावे लागत आहे.

दर वाढण्याची शक्यता कमीच...मागील वर्षीचा साठा व आंतरराष्ट्रीय बाजारातून कमी दरात खाद्य तेल बाजारात उपलब्ध होत आहे. केंद्र सरकारने ग्राहकांना परवडेल अशा दराने बाजारात खाद्यतेल उपलब्ध व्हावे म्हणून खाद्य तेलावरील आयात शुल्क कमी केले आहे. त्यामुळे भविष्यात सोयाबीनच्या दरात कुठलीही वाढ होण्याची शक्यता दिसून येत नाही, असे सोयाबीन प्रक्रियादार सागर महाजन यांनी सांगितले.

टॅग्स :Farmerशेतकरीlaturलातूर