हंडरगुळी येथे शेतकऱ्यांना बियाणांचे वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2021 04:14 IST2021-06-10T04:14:53+5:302021-06-10T04:14:53+5:30
राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान २०२१ खरीप सोयाबीन पीक प्रात्यक्षिक घेण्यासाठी शेतकरी गट लाभार्थी निवड बुधवारी करण्यात आली. ग्रामपंचायत कार्यालयात ...

हंडरगुळी येथे शेतकऱ्यांना बियाणांचे वाटप
राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान २०२१ खरीप सोयाबीन पीक प्रात्यक्षिक घेण्यासाठी शेतकरी गट लाभार्थी निवड बुधवारी करण्यात आली. ग्रामपंचायत कार्यालयात शेतकऱ्यांचा उपस्थितीत ड्राॅ पद्धतीने शेतकरी गटांची निवड करण्यात आली. यात जय जवान जय किसान गटांची निवड झाली. गटातील १९ शेतकरी लाभार्थ्यांना ३० किलो सोयाबीन बियाणे, विविध कीटकनाशके, फेरोमन ट्रॅप आदी साहित्य मिळणार आहे. आधुनिक तंत्रज्ञान वापरून सोयाबीन पिकाचे उत्पादन वाढवणे हा उद्देश या योजनेचा आहे.
यासोबतच पशुवैद्यकीय दवाखान्यात जिल्हा वार्षिक वैरण विकास योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना शेतात चारा उपलब्ध व्हावा यासाठी महाबीज कंपनीचे वैरणीचे एक किलो बियाणे लाभार्थी शेतकऱ्यांना मोफत वाटप करण्यात आले. यातून स्वत:च्या शेतात चारा उत्पादन करण्यासाठी शेतकऱ्यांना सोपे जाणार आहे. शिवाय हा चाऱा दुधाळ जनावरांना उपयोगी पडणार असून, दूधवाढीसाठी फायदा होणार आहे.
यावेळी सरपंच विजय अंबेकर, उपसरपंच बालाजी भोसले, ग्रामविकास अधिकारी एस.आर. कांबळे, कृषी सहायक संजयसिंह चौहान, पशुधन विकास अधिकारी डाॅ. रेश्मा पाटील, चेअरमन संग्राम भोसले, शिवशंकर धुप्पे, शंकर शेळके, अमोल भोसले, ग्रा.पं. सदस्य ज्ञानेश्वर पिट्टलवाड, सुनील कांबळे यांच्यासह शेतकरी गटांचे सभासद, ग्रामस्थ उपस्थित होते.