शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
2
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
3
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
4
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
5
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
6
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
7
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
8
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
9
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
10
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
11
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
12
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
13
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
14
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
15
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
16
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
17
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
18
‘साहेब’ होऊ घातलेला बिरदेव म्हणतो, शेळ्या-मेंढ्यांना काय लाजायचं? तीच माझी ताकद
19
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
20
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे

वाद सासऱ्याचा अन् जीव गेला जावयाचा; शेतीच्या वादातून चाकूने भाेसकून खून

By राजकुमार जोंधळे | Updated: May 20, 2023 13:40 IST

या प्रकरणी तिघांना अटक करण्यात आली आहे

रेणापूर (जि. लातूर) : शेतीच्या वादातून एका ३२ वर्षीय तरुणाचा चाकूने भाेसकून खून करण्यात आल्याची घटना समसापूर शिवारात शुक्रवारी सकाळी घडली. याबाबत रेणापूर पाेलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून, पाेलिसांनी तिघांना रात्री उशिरा अटक केली आहे. सतीश श्रीमंत जमादार असे मयत तरुणाचे नाव आहे.

पाेलिसांनी सांगितले, सतीश श्रीमंत जमादार (वय ३२) हे गत सहा वर्षांपासून पत्नी, मुलांसह समसापूर येथे सासरे बळीराम खोडके यांच्याकडे वास्तव्याला हाेता. सासरे बळीराम खोडके यांची समसापूर शिवारात शेती आहे. त्यांच्या बांधालगत भारत निवृत्ती फुलसे यांचीही शेती आहे. खोडके आणि फुलसे यांचा समाईक बांधावरून रेणापूरच्या न्यायालयामध्ये वाद सुरू आहे. दरम्यान, सतीश जमादार आणि सासरे खोडके, मेहुणा महादेव बळीराम खोडके हे शुक्रवारी सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास शेतात टॅक्टरद्वारे माती सपाट करण्याचे काम करत होते. यावेळी भारत फुलसे, शाम ऊर्फ बाळू फुलसे यांनी सतीश जमादार यांना शिवीगाळ करत बांधाजवळ माती टाकायची नाही, असे सांगितले. यावेळी जमादार यांनी तुम्ही शिव्या देऊ नका, असे म्हणाले असता, शाम फुलसे यांनी सतीश जमादार यांचे तोंड दाबले, तर भरत फुलसे याने चाकूने पोटात भोसकले. यावेळी गयाबाई फुलसे यांनी धक्काबुकी केली, तर सतीशची पत्नी निर्मला, सासू सावित्राबाई यांनाही गयाबाई फुलसे हिने काठीने मारहाण केली. जखमी सतीश जमादार यांना मेहुणा महादेव खोडके यांच्यासह नातेवाइकांनी रेणापूर ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. डॉक्टरांनी लातूरला हलविण्यास सांगितले. लातुरात उपचार सुरू असताना सतीश जमादार यांचा दुपारी मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच सहायक पोलिस अधीक्षक निकेतन कदम यांनी घटनास्थळी भेट देत पंचनामा केला.

याबाबत रेणापूर पाेलिस ठाण्यात महादेव खोडके यांच्या फिर्यादीवरून भारत फुलसे, मुलगा शाम ऊर्फ बाळू भारत फुलसे, पत्नी गयाबाई भारत फुलसे (सर्व रा. समसापूर) यांच्याविरुद्ध रात्री उशिरा गुन्हा दाखल केला आहे.

अनेक वर्षांपासून धुमसणारा वाद उठला जावयाचा मुळावर !

सतीश जमादार हा समसापूर येथील बळीराम खोडके यांचा जावई होता. तो सासरवाडी समसापूर येथेच सध्याला वास्तव्याला हाेता. दरम्यान, शेतीचा वाद सासरे आणि शेजारी असलेले भरत फुलसे यांच्यामध्ये सुरू हाेता. गेल्या अनेक वर्षांपासून धुमसणाऱ्या वादानेच जावयाचा जीव घेतला. सासऱ्याच्या वादात शुक्रवारी जावयाचा जीव गेल्याने एकच खळबळ उडाली आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीlaturलातूर