शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

सरकारचा ‘विकास’ विजय मल्ल्यासारखा पळून गेला का ? अजित पवारांचा सरकारला सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2018 21:27 IST

विकासाच्या नावाने सत्तेत आलेल्या सरकारचा विकास हरवला असून तो विजय मल्ल्यासारखा पळून गेला का असा सवाल विधीमंडळ पक्षनेते अजित पवार यांनी सरकारला उदगीरच्या जाहीर  सभेत केला.

लातूर ( उदगीर ) : विकासाच्या नावाने सत्तेत आलेल्या सरकारचा विकास हरवला असून तो विजय मल्ल्यासारखा पळून गेला का असा सवाल विधीमंडळ पक्षनेते अजित पवार यांनी सरकारला उदगीरच्या जाहीर  सभेत केला.

लातूर जिल्हयातील दुसरी सभा उदगीरमध्ये मोठया उत्साहामध्ये पार पडली. सभेच्या अगोदर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यावतीने उपजिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात आला. हा मोर्चा डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळयाला अभिवादन करुन सुरु करण्यात आला. या मोर्चात विधीमंडळ पक्षनेते अजित पवार सहभागी झाले होते. पक्षाचे प्रदेश सरचिटणीस बसवराज नागराळकर यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा आणि भव्य जाहीर सभा पार पडली. 

या सभेला विधीमंडळ पक्षनेते अजित पवार,विधानपरिषदेचे विरोधी पक्षते धनंजय मुंडे,आमदार राणा जगजितसिंह पाटील,आमदार विक्रम काळे,आमदार सतिष चव्हाण,आमदार जयदेव गायकवाड,प्रदेश सरचिटणीस बसवराज नागराळकर, महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ,जिल्हाध्यक्ष बाबासाहेब पाटील, युवक प्रदेशाध्यक्ष संग्राम कोतेपाटील,उदगीर तालुकाध्यक्ष शिवाजी मुळे,शहराध्यक्ष समर शेख,युवक शहराध्यक्ष चंदन पाटील नागराळकर,विधानसभा अध्यक्ष प्रविण भोळे आदींसह पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.

व्यवहारी दृष्टीकोन न ठेवता सरकारने मुठभर लोकांसाठी नोटबंदी आणि कॅशलेससारखी योजना राबवली. या योजनेचा फायदा न होता माझ्या ग्रामीण भागातील लोकांना त्याचा फटका जास्त बसला.राज्यात नवीन गुंतवणूक नाही,नोकऱ्या नाहीत,फक्त साडेतीन वर्षात सरकार खड्डे बुजवत बसली आहे.सगळ्या योजना सरकारच्या अशापध्दतीच्या आहेत. नुसती बनवाबनवी,गाजर दाखवण्याचे,फेकूगिरी करण्याचे काम सरकार करत असल्याचा आरोप अजित पवार यांनी केला.मागच्यावेळी बटन दाबून केलेली चूक पुन्हा उदगीरकरांनो करु नका असे आवाहनही अजित पवार यांनी यावेळी केले.

सभेमध्ये विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी सरकारवर टिकास्त्र सोडले. त्यांनी या सरकारला पुन्हा एकदा संपावर पाठवण्याची वेळ आली असून त्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने हे हल्लाबोल आंदोलन केले आहे. जमीन विकून मिळवलेला पैसा आणि पावडर खावून बनवलेली बॉडी आणि मोदी लाटेत निवडून आलेले लोक कधीच पुन्हा येत नाहीत असा टोलाही धनंजय मुंडे यांनी लगावला. या सभेमध्ये आमदार जयदेव गायकवाड,महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ,संजय बनसोडे,बसवराज नागराळकर यांनीही सरकारवर हल्लाबोल केला.

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारlaturलातूर