शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे गोंधळ पसरवण्यासारखे ..."; एअर इंडियाच्या विमान अपघातावर तुर्कीचे विधान; मेंटनन्स कंपनीवर स्पष्टीकरण दिले
2
Donald Trump : "जर आमच्यावर हल्ला केला तर अमेरिकन सैन्य..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला कडक इशारा
3
केदारनाथहून परतताना कोसळलं हेलिकॉप्टर; महाराष्ट्रातल्या जयस्वाल दाम्पत्यासह २ वर्षाची चिमुरडी ठार
4
माळेगाव कारखान्याचा चेअरमन मीच होणार..! भर सभेत अजित पवार नेमकं काय म्हणाले ?
5
खुल्लम खुल्ला प्यार... 'चॅम्पियन' एडन मार्करमने भरमैदानात सर्वांसमोर पत्नीला केलं किस, Photo व्हायरल
6
पहिली गोळी मांडीवर अन् शाहरुख आडवा झाला; असा होता एन्काऊंटरचा थरार...
7
Kedarnath Helicopter Crash : चारधाम यात्रेची हेलिकॉप्टर सेवा स्थगित; गौरीकुंडमधील दुर्घटनेनंतर नवा आदेश
8
कोल्हार- घोटी राज्यमार्गावर भीषण अपघात; तीन ठार, दहा जखमी
9
पालकांच्या कष्टाची जाण! मराठी अभिनेत्याने आई-बाबांसाठी घेतलं नवीन घर, चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव
10
Maharashtra Rains: राज्यात पावसाचा जोर वाढला, वीज पडून ९ जणांचा मृत्यू; ७ जण भाजले!
11
हेलिकॉप्टर पायलट बनायचंय? किती खर्च, किती पगार? जाणून घ्या A to Z माहिती!
12
Ahmedabad Plane Crash : आईच्या शब्दाखातर 'तो' थांबला अन् विमान अपघातातून जीव वाचला; ऐनवेळी नेमकं काय घडलं?
13
Israel–Iran War : इस्त्रायल-इराण युद्धात जग दोन गटात विभागले! 'या' मुस्लीम देशांनी घेतली इराणची बाजू; भारत कोणासोबत?
14
BCCI ने जाहीर केलं 'टीम इंडिया'चं पुढल्या वर्षीचं वेळापत्रक, रोहित-विराट 'या' तगड्या संघाविरूद्ध मैदानात उतरणार
15
केदारनाथला जाण्यासाठी हेलिकॉप्टरचं तिकीट किती? अपघात झाल्यास कोण देतं भरपाई?
16
Bhiwandi Fire: भिवंडीत भीषण आगीत, १२ केमिकल गोदामे जळून खाक!
17
मोठी बातमी: पुणे पोलिसांनी केलेल्या गोळीबारात कुख्यात गुन्हेगार ठार; सोलापूर जिल्ह्यातील घटना
18
चंद्रपूर: 'फादर्स डे'च्या दिवशी पाच मुले झाली पोरकी! दोन रानटी हत्तीनी सोंडेने आपटून एकाला केले ठार
19
मोठा दिलासा! आधार मोफत अपडेट करण्याची शेवटची संधी? UIDAI ने तारीख बदलली!
20
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !

सरकारचा ‘विकास’ विजय मल्ल्यासारखा पळून गेला का ? अजित पवारांचा सरकारला सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2018 21:27 IST

विकासाच्या नावाने सत्तेत आलेल्या सरकारचा विकास हरवला असून तो विजय मल्ल्यासारखा पळून गेला का असा सवाल विधीमंडळ पक्षनेते अजित पवार यांनी सरकारला उदगीरच्या जाहीर  सभेत केला.

लातूर ( उदगीर ) : विकासाच्या नावाने सत्तेत आलेल्या सरकारचा विकास हरवला असून तो विजय मल्ल्यासारखा पळून गेला का असा सवाल विधीमंडळ पक्षनेते अजित पवार यांनी सरकारला उदगीरच्या जाहीर  सभेत केला.

लातूर जिल्हयातील दुसरी सभा उदगीरमध्ये मोठया उत्साहामध्ये पार पडली. सभेच्या अगोदर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यावतीने उपजिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात आला. हा मोर्चा डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळयाला अभिवादन करुन सुरु करण्यात आला. या मोर्चात विधीमंडळ पक्षनेते अजित पवार सहभागी झाले होते. पक्षाचे प्रदेश सरचिटणीस बसवराज नागराळकर यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा आणि भव्य जाहीर सभा पार पडली. 

या सभेला विधीमंडळ पक्षनेते अजित पवार,विधानपरिषदेचे विरोधी पक्षते धनंजय मुंडे,आमदार राणा जगजितसिंह पाटील,आमदार विक्रम काळे,आमदार सतिष चव्हाण,आमदार जयदेव गायकवाड,प्रदेश सरचिटणीस बसवराज नागराळकर, महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ,जिल्हाध्यक्ष बाबासाहेब पाटील, युवक प्रदेशाध्यक्ष संग्राम कोतेपाटील,उदगीर तालुकाध्यक्ष शिवाजी मुळे,शहराध्यक्ष समर शेख,युवक शहराध्यक्ष चंदन पाटील नागराळकर,विधानसभा अध्यक्ष प्रविण भोळे आदींसह पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.

व्यवहारी दृष्टीकोन न ठेवता सरकारने मुठभर लोकांसाठी नोटबंदी आणि कॅशलेससारखी योजना राबवली. या योजनेचा फायदा न होता माझ्या ग्रामीण भागातील लोकांना त्याचा फटका जास्त बसला.राज्यात नवीन गुंतवणूक नाही,नोकऱ्या नाहीत,फक्त साडेतीन वर्षात सरकार खड्डे बुजवत बसली आहे.सगळ्या योजना सरकारच्या अशापध्दतीच्या आहेत. नुसती बनवाबनवी,गाजर दाखवण्याचे,फेकूगिरी करण्याचे काम सरकार करत असल्याचा आरोप अजित पवार यांनी केला.मागच्यावेळी बटन दाबून केलेली चूक पुन्हा उदगीरकरांनो करु नका असे आवाहनही अजित पवार यांनी यावेळी केले.

सभेमध्ये विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी सरकारवर टिकास्त्र सोडले. त्यांनी या सरकारला पुन्हा एकदा संपावर पाठवण्याची वेळ आली असून त्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने हे हल्लाबोल आंदोलन केले आहे. जमीन विकून मिळवलेला पैसा आणि पावडर खावून बनवलेली बॉडी आणि मोदी लाटेत निवडून आलेले लोक कधीच पुन्हा येत नाहीत असा टोलाही धनंजय मुंडे यांनी लगावला. या सभेमध्ये आमदार जयदेव गायकवाड,महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ,संजय बनसोडे,बसवराज नागराळकर यांनीही सरकारवर हल्लाबोल केला.

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारlaturलातूर