शहरं
Join us  
Trending Stories
1
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
2
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
3
ऐसे लोग *** होते है! महबूब मुजावर यांचं नाव घेताच अरविंद सांवत संतापले!
4
IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'
5
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
6
Video: रागावलेल्या सिंहीणपुढे सिंहाचीच झाली 'शेळी'... जंगलच्या राजाची अवस्था पाहून तुम्हालाही येईल हसू
7
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
8
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
9
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
10
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
11
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
12
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
13
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
14
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
15
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
16
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
17
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर
18
IND vs ENG : आता कसं वाटतंय...! डकेटचा वचपा काढल्यावर आकाशदीपनं त्याच्या खांद्यावर हात टाकला अन्... (VIDEO)
19
"घासीराम कोतवाल'च्या प्रयोगासाठी देशभर...", संजय मिश्रांचं ३० वर्षांनंतर रंगभूमीवर पुनरागमन
20
तिवारी, शुक्ला, थरुर..; मोदी सरकारविरोधात राहुल गांधींना स्वकीयांनीच दिला घरचा आहेर

सरकारचा ‘विकास’ विजय मल्ल्यासारखा पळून गेला का ? अजित पवारांचा सरकारला सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2018 21:27 IST

विकासाच्या नावाने सत्तेत आलेल्या सरकारचा विकास हरवला असून तो विजय मल्ल्यासारखा पळून गेला का असा सवाल विधीमंडळ पक्षनेते अजित पवार यांनी सरकारला उदगीरच्या जाहीर  सभेत केला.

लातूर ( उदगीर ) : विकासाच्या नावाने सत्तेत आलेल्या सरकारचा विकास हरवला असून तो विजय मल्ल्यासारखा पळून गेला का असा सवाल विधीमंडळ पक्षनेते अजित पवार यांनी सरकारला उदगीरच्या जाहीर  सभेत केला.

लातूर जिल्हयातील दुसरी सभा उदगीरमध्ये मोठया उत्साहामध्ये पार पडली. सभेच्या अगोदर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यावतीने उपजिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात आला. हा मोर्चा डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळयाला अभिवादन करुन सुरु करण्यात आला. या मोर्चात विधीमंडळ पक्षनेते अजित पवार सहभागी झाले होते. पक्षाचे प्रदेश सरचिटणीस बसवराज नागराळकर यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा आणि भव्य जाहीर सभा पार पडली. 

या सभेला विधीमंडळ पक्षनेते अजित पवार,विधानपरिषदेचे विरोधी पक्षते धनंजय मुंडे,आमदार राणा जगजितसिंह पाटील,आमदार विक्रम काळे,आमदार सतिष चव्हाण,आमदार जयदेव गायकवाड,प्रदेश सरचिटणीस बसवराज नागराळकर, महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ,जिल्हाध्यक्ष बाबासाहेब पाटील, युवक प्रदेशाध्यक्ष संग्राम कोतेपाटील,उदगीर तालुकाध्यक्ष शिवाजी मुळे,शहराध्यक्ष समर शेख,युवक शहराध्यक्ष चंदन पाटील नागराळकर,विधानसभा अध्यक्ष प्रविण भोळे आदींसह पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.

व्यवहारी दृष्टीकोन न ठेवता सरकारने मुठभर लोकांसाठी नोटबंदी आणि कॅशलेससारखी योजना राबवली. या योजनेचा फायदा न होता माझ्या ग्रामीण भागातील लोकांना त्याचा फटका जास्त बसला.राज्यात नवीन गुंतवणूक नाही,नोकऱ्या नाहीत,फक्त साडेतीन वर्षात सरकार खड्डे बुजवत बसली आहे.सगळ्या योजना सरकारच्या अशापध्दतीच्या आहेत. नुसती बनवाबनवी,गाजर दाखवण्याचे,फेकूगिरी करण्याचे काम सरकार करत असल्याचा आरोप अजित पवार यांनी केला.मागच्यावेळी बटन दाबून केलेली चूक पुन्हा उदगीरकरांनो करु नका असे आवाहनही अजित पवार यांनी यावेळी केले.

सभेमध्ये विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी सरकारवर टिकास्त्र सोडले. त्यांनी या सरकारला पुन्हा एकदा संपावर पाठवण्याची वेळ आली असून त्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने हे हल्लाबोल आंदोलन केले आहे. जमीन विकून मिळवलेला पैसा आणि पावडर खावून बनवलेली बॉडी आणि मोदी लाटेत निवडून आलेले लोक कधीच पुन्हा येत नाहीत असा टोलाही धनंजय मुंडे यांनी लगावला. या सभेमध्ये आमदार जयदेव गायकवाड,महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ,संजय बनसोडे,बसवराज नागराळकर यांनीही सरकारवर हल्लाबोल केला.

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारlaturलातूर