शहरं
Join us  
Trending Stories
1
मुघलांच्या घोड्यांना संताजी, धनाजी दिसायचे तसे मोदींना ठाकरे, पवार दिसतात; राऊतांची टीका
2
२५०० महिलांचे लैंगिक शोषण करणारा खासदार रेवन्ना परदेशात कसा पळाला? कर्नाटकात खळबळ
3
Amit Shah : "केजरीवालांची जेलमध्ये हत्या होऊ शकते"; AAP च्या आरोपांवर काय म्हणाले अमित शाह?
4
“वर्षानुवर्षे उत्तर मुंबईची सेवा करत राहीन”; पियूष गोयल यांनी व्यक्त केला विश्वास, उमेदवारी अर्ज भरला
5
"भारत महासत्ता बनतोय, आम्ही भीक मागतोय", पाकिस्तानच्या संसदेत भारताचे गोडवे
6
'देवरा' सिनेमात मराठमोळ्या अभिनेत्रीची वर्णी, ज्युनिअर एनटीआरच्या पत्नीची भूमिका साकारणार
7
नाशिक: राऊड घाटात एसटीचा भीषण अपघात; ६ प्रवाशांचा मृत्यू, टायर फुटून ट्रकला धडकली
8
Amit Shah : "हे लोक कन्फ्यूज, यूपी सोडून पळून गेले"; अमित शाह यांचा राहुल-प्रियंका गांधींवर जोरदार हल्लाबोल
9
खासदार बनण्याचे स्वप्न; हरलो तर आमदार आहेच; उदयनराजे लोकसभेत बसणार की राज्यसभेतच राहणार?
10
Ravindra Waikar तिढा सुटला, उमेदवार ठरला! मुंबई उत्तर-पश्चिममध्ये रविंद्र वायकरच महायुतीचे उमेदवार
11
“भाजपा नेत्यांना मराठ्यांचा द्वेष, म्हणूनच PM मोदींना इतक्या सभा घ्याव्या लागतात”: मनोज जरांगे
12
‘कॉलर उडवताना सकाळ आहे की संध्याकाळ हे पाहावं लागतं’, शरद पवारांची उदयनराजेंवर बोचरी टीका 
13
Video - बापमाणूस! घटस्फोटानंतर वडिलांनी वाजत-गाजत लेकीला आणलं आपल्या घरी
14
प्रियांका गांधी लोकसभा निवडणूक लढवणार नाहीत, सूत्रांची माहिती 
15
नवीन गुजरातचा आत्मा महाराष्ट्रात भटकतोय; संजय राऊतांचा भाजपावर पलटवार
16
१३९ दिवस शनी वक्री: ५ राशींना लॉटरी, वरदान काळ; गुंतवणुकीतून लाभ, पदोन्नती, पगारवाढ शक्य!
17
SRK ने लेकाला जोरात पकडलं अन्...! IPL दरम्यान शाहरुख-अबरामचं क्युट भांडण कॅमेऱ्यात कैद
18
इकडे आड, तिकडे विहीर! युद्ध रोखले तर नेतन्याहूंचे सरकार पडणार, नाही रोखले तर...
19
 ‘अमित शाह माझं पार्थिव उचलण्यास आले, तर खूप बरं होईल…’ दिग्विजय सिंह यांचं विधान चर्चेत  
20
पतंजलीला मोठा झटका, दृष्टी आय ड्रॉपसह 14 प्रोडक्ट्सवर बंदी, जाणून घ्या कारण

९,१० आणि ११ फेब्रुवारीला लातूरमध्ये पार पडणार धनगर साहित्य संमेलन

By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2018 12:25 PM

समाजाचे एकीकरण, संघटन व संवर्धन होणे गरजेचे असून, समाजाची जनजागृती आणि सर्वांगीण विकास साधन्याच्या उद्देशाने लातूर मध्ये दुसरे आदिवासी धनगर साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात येत आहे

ठाणे - महाराष्ट्रात मोठ्या संख्येने धगनर समाज असून, समाजाला इतिहास, कला, नृत्य, ओव्या, साहित्य, संस्कृती अशी संपन्न आणि समृद्ध परंपरा आहे. मात्र, राज्यभरात विखुरलेल्या या समाजाचे स्वातंत्र्योत्तर काळात एकही साहित्य संमेलन झालेले नाही. त्यामुळे समाजाचे एकीकरण, संघटन व संवर्धन होणे गरजेचे असून, समाजाची जनजागृती आणि सर्वांगीण विकास साधन्याच्या उद्देशाने लातूर मध्ये दुसरे आदिवासी धनगर साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात येत असल्याची माहिती ठाण्यात आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत धनगर साहित्य परिषदेचे अध्यक्ष जयसिंग तात्या शेंडगे यांनी दिली

लातूर येथे होत असलेल्या धनगर साहित्य संमेलनाची माहिती ठाण्यातील धनगर समाजातील नागरिकांना व्हावी यासाठी ठाण्यात  बैठक आयोजित करण्यात आली होती यावेळी  धनगर साहित्य परिषदेचे अध्यक्ष जयसिंग तात्या शेंडगे,धनगर समाजचे नेते बाबासाहेब दगडे,वकील नानासाहेब मोटे,समाजाचे जेष्ठ नेते अभिमन्यू  शेंडगे,डॉ अरुण गावडे,धनगर प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य अध्यक्ष दीपक कुरकुंडे,माणगंगा प्रतिष्ठान अध्यक्ष बाबासहेब माने,वकील प्रकाश पुजारी, धनगर प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष महेश गुंड, श्री पाटील साहेब आदी प्रमुख पदाधिकाऱ्यांसह समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते  

धनगर साहित्य परिषद आयोजित दुसरे आदिवासी धनगर साहित्य संमेलन लातूर येथे होत आहे. ९,१० व ११ फेब्रुवारी २०१८ असे तीन दिवस वेगवेगळ्या विषयावर परिसंवाद, पहिल्या दिवशी धनगर समाजाच्या संस्कृतीचे दर्शन घडविणारी दिंडी, ओव्या, ढोल-ताशे याचे प्रदर्शन होणार आहे. १० फेब्रुवारी रोजी या संमेलनाचे पद्मश्री ना. धो. महानोर यांच्या हस्ते उद्घाटन होणार असून ११ रोजी आंतरराष्ट्रीय ख्यातीचे साहित्यीक कांचा इलाही यांच्या हस्ते समारोप होणार आहे. या तीन दिवसात वेगवेगळ्या प्रश्‍नांवर परिसंवाद, चर्चा आयोजित करण्यात आली आहे. तरी या संमेलनाला सर्व समाज बांधवानी  उपस्थित राहावे अशी विनंती नगर साहित्य परिषदेचे अध्यक्ष जयसिंग तात्या शेंडगे यांनी केली आहे

संमेलनाच्या अध्यक्षपदी संगीता धायगुडेसंमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ लेखिका संगीता उत्तम धायगुडे यांची निवड करण्यात आली आहे. संगीता धायगुडे या सध्या मालेगाव महानगरपालिकेच्या आयुक्त म्हणून कार्यरत आहेत. त्यांचे शिक्षण इयत्ता १ ली ते ७ वी पर्यंत आंधळी, ता. माण, जि. सातारा येथे झाले आहे. समाजशास्त्र विषयात एसएनडीटी महाविद्यालयातून पदवी व एम.ए. मराठी या विषयात पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे. त्यांचे ‘हुमाना’ हे आत्मकथन सध्या जगभरात गाजत आहे. त्यांना महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे या संस्थेकडून लक्ष्मीबाई टिळक पुरस्कार, डॉ. द. ता. भोसले पुरस्कार मिळाला आहे. ‘प्रिय आयुष्यास सप्रेम नमस्कार’ हा कवितासंग्रह प्रचंड गाजला आहे. असे अनेक उल्लेखनीय कार्य संगीता धायगुडे यांचे आहे.