शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
4
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
5
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
6
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
7
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
8
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
9
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
10
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
11
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
12
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
13
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
14
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
15
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
16
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
17
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
18
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
19
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?
20
Dewald Brevis: बेबी एबीनं इतिहासच बदलून टाकला, ऑस्ट्रेलियाविरुद्ध 'अशी' कामगिरी करणारा एकटाच!

डेंग्यूच्या तापीमुळे शरीरातील पेशींची संख्या होते कमी; लहान मुलांची काळजी घ्या - डॉ. वर्धमान उदगीरकर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 18, 2018 14:45 IST

सध्या डेंग्यू आजार वाढला आहे़ त्यामुळे ताप भरल्यास तो अंगावर काढू नका. दुर्लक्ष केल्यास डेंग्यू आजाराची गुंतागुंत वाढू शकते़ अनेकदा शरीरातील पेशींची संख्या कमी होते, असे लातुरातील बालरोगतज्ज्ञ डॉ. वर्धमान उदगीरकर यांनी सांगितले. 

लातूर : सध्या डेंग्यू आजार वाढला आहे़ त्यामुळे ताप भरल्यास तो अंगावर काढू नका. दुर्लक्ष केल्यास डेंग्यू आजाराची गुंतागुंत वाढू शकते़ अनेकदा शरीरातील पेशींची संख्या कमी होते, असे लातुरातील बालरोगतज्ज्ञ डॉ. वर्धमान उदगीरकर यांनी सांगितले. लातूर जिल्ह्यात सध्या डेंग्यूचा ताप वाढला आहे. यासंदर्भात बोलताना डॉ. वर्धमान उदगीरकर म्हणाले, डेंग्यू हा विषाणूजन्य आजार असून तो एडिस जातीच्या डासांमुळे होतो. त्यास हड्डीतोड तापही म्हटले जाते. एडिस डासांची उत्पत्ती ही स्वच्छ पाण्यात होते. लहान मुले, गरोदर स्त्रिया, वृध्दांना डेंग्यूचा सर्वात अगोदर आजार होण्याची भीती असते.डेंग्यू आजाराचे दोन प्रकार असून पहिला प्रकारात ताप येणे तर दुसऱ्या प्रकार हा गुंतागुंतीचा आहे. गुंतागुंतीच्या प्रकारात यकृत, किडनी, मेंदू या अवयवांमध्ये गुंतागुंत होण्याची शक्यता असते. त्याचबरोबर शरीरावर सूज, पोटात आणि छातीत पाणी भरण्याची भीती असते. डेंग्यूची गुंतागुंत वाढल्यास प्लेटलेट कमी- कमी होतात. प्रत्येकात साधारणपणे दीड लाख ते साडेचार लाखापर्यंत प्लेटलेट असतात. परंतु, डेंग्युमुळे त्या ५ ते १० हजारापर्यंत खाली येऊ शकतात. डेंग्यूच्या निदानासाठी एनएस-१ अ‍ॅन्टीझीन तसेच आयजीएमआयजीजी या तपासण्या केल्या जातात.

डेंग्यूची सर्वसाधारण लक्षणे...अंगात तापी भरतो. तीव्र डोकेदुखी, अंगदुखी, स्रायूदुखी, सांधेदुखी, कंबरदुखी, डोळे दुखणे असे त्रास जाणवतात तर डेंग्यूमधील गुंतागुंतीमध्ये कातडीवर पुरळ येणे, चट्टे पडणे, हिरड्या-नाकातून रक्त येणे, डोळ्यांत रक्त उतरणे, लघुशंका आणि उलटीतून रक्त येते.

आजारात पपई फायदेशीर...डेंग्यू आजार झालेल्यास पपई, पपईच्या पानांचा ज्यूस, अर्क असलेली औषधे उपचारासाठी फायदेशीर असतात. त्यामुळे पपईवर भर द्यावा. तसेच रुग्णांनी विश्रांती घ्यावी. व्यवस्थित व पूरक पाणी प्यावे. अंगात ताप भरल्यास तात्काळ तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. डेंग्यूमुळे बहुतांश वेळा प्लेटलेटची आवश्यकता असते. त्यामुळे डॉक्टर प्लेटलेट चढवितात. 

असा करा प्रतिबंध...डेंग्यू आजार होऊन नये म्हणून नाल्या, गटारी साफ केल्या पाहिजे. घरातील कुंड्यांतील पाणी दररोज बदलले पाहिजे. डबक्यात पाणी साठू देऊ नये. घर परिसरात पडलेल्या टायरामध्ये पाणी साचू देऊ नये. पाण्याच्या टाक्या, पाणी साठविण्याची भांडी नेहमी झाकून ठेवावीत. रिकामी पिंपे व पाण्याची भांडी पालथी करुन ठेवावीत. कारण थोड्याशाही साचलेल्या पाण्यात एडीस डासांची वाढ होऊ शकते. आठवड्यातून एक दिवस कोरडा पाळावा.

ही घ्या काळजी...डेंग्यूचा आजार होऊ नये म्हणून कामाच्या ठिकाणी, प्रवासात लांब बाह्याचे कपडे वापरावेत. मुलांना अंगभर कपडे घालावेत. तसेच घरात मॅट, क्वाईल, लिक्विड अशी डास प्रतिबंधात्मक साधने वापरावीत. मच्छरदाणी वापर करावा. घरांना जाळ्या बसवाव्यात.

रक्तातील प्लेटलेटची नियमित तपासणी करावी...डेंग्यूमधील गुंतागुंत समजण्यासाठी रक्तातील प्लेटलेटची नियमित तपासणी करावी. कारण सामान्यपणे डेंग्यू ताप हा फ्लूसारखा वाटत असला तरी कधी- कधी तो गंभीर आजार बनू शकतो. डेंग्यूविरुध्द अजूनही कोणतीही लस उपलब्ध नाही. डेंग्यूचा आजार झाल्यानंतर बहुतांश नातेवाईक रुग्णाच्या शरीरातील पेशी वाढत नसल्याने ते संभ्रमित होऊन घाबरतात. परंतु, घाबरु नये. औषधोपचार आणि रुग्णाच्या रोगप्रतिकार शक्तीनुसार कमी झालेल्या पेशी हळूहळू वाढतात. त्यामुळे औषधोपचार सुरुच ठेवावे, असे डॉ. वर्धमान उदगीरकर यांनी सांगितले.

टॅग्स :laturलातूर