शहरं
Join us  
Trending Stories
1
"मदतीच्या बदल्यात मदत"; फडणवीसांची भेट, BJPचा प्रचार अन् अभिजीत पाटलांच्या कारखान्याचं सील निघालं!
2
मुंबईतील चुरशीच्या लढतीत आणखी एक ट्विस्ट; शेवटच्या दिवशी नवा उमेदवार मैदानात!
3
“३५ वर्षे राजकारणात, लढायचे अन् जिंकायचे एवढेच उद्दिष्ट”; रवींद्र वायकर स्पष्ट केली भूमिका
4
“राजकारणात माझा जन्म ४ दिवसांचा, पण...”; उज्ज्वल निकम मैदानात, विरोधकांना थेट आव्हान
5
राहुल गांधींनी रायबरेलीतून भरला उमेदवारी अर्ज, रस्त्यावर काँग्रेस कार्यकर्त्यांची गर्दी
6
Share Market: सेन्सेक्स-निफ्टी कोसळले, गुंतवणूकदारांनी 4 लाख कोटी गमावले...
7
ठरलं! पुढच्या महिन्यात लॉन्च होणार Bajaj ची जगातील पहिली CNG बाईक, किंमत किती..?
8
तनिष्क प्रस्तुत करत आहे 'ग्लॅमडेज' - रोज वापरण्याजोग्या दागिन्यांची श्रेणी 
9
Varuthini Ekadashi 2024: एकादशीच्या व्रताला फराळी पदार्थांचे सेवन करणे योग्य की अयोग्य? वाचा शास्त्र!
10
'बोस यांनी मला स्पर्श केला अन्...'; महिलेच्या आरोपांवर राज्यपाल म्हणाले,'गोळी चालवा पण...'
11
Smriti Irani : "काँग्रेसने आपला पराभव स्वीकारला..."; स्मृती इराणींचा राहुल गांधींवर जोरदार निशाणा
12
बारामतीत 'इमोशनल इम्पॅक्ट' ओसरतोय?; सुनेत्रा पवारांच्या प्रचारातील 'या' फॅक्टर्समुळे वारं फिरण्याची शक्यता
13
कोविशील्ड लसीचे नेमके किती दुष्परिणाम?; कोरोना काळातील 'सुपरमॅन'ने सांगितलं 'सत्य'
14
"टीएमसी बंगालचे नाव खराब करत आहे", नरेंद्र मोदींचा ममता सरकारवर हल्लाबोल
15
Jairam Ramesh : "राहुल गांधी हे राजकारणातील अनुभवी खेळाडू, बुद्धिबळाच्या काही चाली बाकी आहेत"
16
अमिताभ बच्चन यांची एक पोस्ट अन् भाजप-ठाकरे गटात रंगलं ट्विटर वॉर, नेमकं काय घडलं ?
17
Share Market : शेअर बाजारात हाहाकार; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; रिलायन्स आपटला
18
MRF Share Price: एमआरएफ देणार आतापर्यंतचा सर्वाधिक डिविडंड, मोठ्या विक्रीमुळे शेअर्स ४ टक्क्यांपर्यंत घसरले
19
अ‍ॅडव्हान्स फीचर्ससह पल्सरचे नवीन मॉडेल लाँच, टॉप स्पीड पाहून बसेल धक्का!
20
पराभव, भीती की रणनीती...! राहुल गांधींनी अमेठीऐवजी रायबरेली मतदारसंघ का निवडला?

सततच्या पावसाने टोमॅटोचे नुकसान, शेतकरी हतबल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2020 11:14 AM

एका एकरात बाराशे ते दीड हजार कॅरेटपर्यंत टोमॅटोचे उत्पादन मिळत असे़. परंतु सततच्या पावसामुळे आता एकरी केवळ ३०० ते ४०० कॅरेट टोमॅटो निघत आहेत. त्यामुळे लागवडीसाठीचा खर्चही निघत नाही. पाऊस आणि ढगाळ वातावरणामुळे वारंवार फवारणी करावी लागत आहे, असे टोमॅटो उत्पादक यांनी सांगितले़

किनगाव : सततच्या पावसामुळे रोगाचा प्रादुर्भाव होऊन रोपांना लगडलेले टोमॅटो गळू लागल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे़. एका शेतकऱ्याने टोमॅटो लागवड करुन आतापर्यंत ६० हजारांचा खर्च केला़. मात्र, पदरी केवळ २० हजारांचेच उत्पादन पडले आहे़. परिणामी, भाजीपाला उत्पादक संकटात सापडले आहेत़.

अहमदपूर तालुक्यातील किनगाव व परिसरातील शेतकरी खरीप हंगामातील पिकांपेक्षा भाजीपाला उत्पादनावर अधिक भर देतात़. किनगाव मंडळात जवळपास ७० ते ८० हेक्टरवर टोमॅटोची लागवड केली जाते़. मात्र, वातावरणात बदल होऊन सततच्या पावसामुळे टोमॅटोवर करपा व अन्य रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे़. त्यामुळे टोमॅटो रोपांची मुळे नासत असून रोपे उन्मळून पडत आहे. त्याचबरोबर रोपांना लागलेले टोमॅटोही गळून पडत आहेत़

एका एकरात बाराशे ते दीड हजार कॅरेटपर्यंत टोमॅटोचे उत्पादन मिळत असे़. परंतु सततच्या पावसामुळे आता एकरी केवळ ३०० ते ४०० कॅरेट टोमॅटो निघत आहेत. त्यामुळे लागवडीसाठीचा खर्चही निघत नाही. पाऊस आणि ढगाळ वातावरणामुळे वारंवार फवारणी करावी लागत आहे, असे टोमॅटो उत्पादक बालाजी पवार यांनी सांगितले़

सततचा पाऊस, सूर्यप्रकाशाचा अभाव व वातावरणातील आर्द्रतेत वाढ झाल्याने बुरशीचा प्रादुर्भाव वाढला आहे़. शेतकऱ्यांनी शेतातील पाण्याचा निचरा होईल, अशी सोय करावी़, बुरशीनाशक व कीटकनाशकाची फवारणी करावी, असा सल्ला कृषी पर्यवेक्षक एस. बी. तांदळे यांनी दिला़

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेतीlaturलातूर