शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK Asia Cup Final : पाकिस्तानने आशिया कप ट्रॉफीसह टीम इंडियाची पदके चोरली, बीसीसीआयचा मोठा आरोप
2
लेहमध्ये सलग पाचव्या दिवशी सर्वत्र संचारबंदी; सोनम वांगचुक यांची त्वरित सुटका करण्याची देशभरातून मागणी
3
"आता प्रायश्चित्त घेण्याची वेळ, दसरा मेळावा रद्द करून..."; भाजपाची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका
4
भारताचा आशिया चषकावर विजयी 'तिलक'; पाकिस्तानला सलग तिसऱ्यांदा नमवले! कुलदीप, तिलक यांचे मोलाचे योगदान
5
आजचे राशीभविष्य, २९ सप्टेंबर २०२५: महत्वाच्या कामासाठी खर्च झाला तरी सुद्धा आर्थिक लाभ होतील
6
पंधरा दिवसांत ६०% जास्त पाऊस! मराठवाडा, मध्य महाराष्ट्रातील चित्रच बदलले; आजही ६ जिल्ह्यांतऑरेंज अलर्ट
7
महिलांची सक्तीनं नसबंदी; ६० वर्षांनी माफी! ग्रीनलँडमध्ये ४५०० महिलांसोबत काय घडलेलं?
8
मोबाइलसारखीच लवकरच  बदलता येईल गॅसची कंपनी; काय बदल होणार? जाणून घ्या
9
आता पूर ओसरेल, मदत मिळेल... पण शेतकऱ्यांसमोर ३ वर्षे संकट! पुराने पळविले जमिनीचे पोषण, पुढील हंगामात धोका
10
विजयसाठी झुंबड ठरली जीवघेणी; तामिळनाडूच्या चेंगराचेंगरीतील मृतांची संख्या ४०वर
11
थंडगार वाळवंटात ही आग कुणी लावली? केंद्र सरकारशी बोलणी सुरू असतानाही हिंसाचार का?
12
IND vs PAK Asia Cup Final : दुबईत विजयाचा जल्लोष झाला; पण टीम इंडियानं बहिष्कारानं केला शेवट; नेमकं काय घडलं?
13
मुत्सद्देगिरी हेच औषध! ट्रम्प यांच्या 'टॅरिफ बॉम्ब'ने भारतीय फार्मा कंपन्यांचे काय होणार?
14
केवळ ३.९ टक्के महिलाच रोज करतात व्यायाम : सामाजिक मानसिकता बदलल्याशिवाय महिलांचा फिटनेस अशक्य
15
१७ विद्यार्थिनींचे लैंगिक शोषण, ‘बाबा’ अखेर अटकेत; आग्रा येथून घेतले ताब्यात 
16
‘साधी तक्रार पुरेशी नाही; ती पत्नीछळाचा गुन्हा ठरत नाही’; सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले?
17
क्रिकेटपटू, अभिनेते येणार आणखी अडचणीत;  ऑनलाइन बेटिंगप्रकरणी मालमत्तेवर येणार टाच
18
IND vs PAK: आधी 'सिंदूर', आता विजय 'तिलक'! भारताने आशिया कप जिंकला, पाकिस्तान पराभूत
19
IND v PAK: हिंदुस्थान झिंदाबाद! भारत जिंकल्यावर काश्मीरमध्ये लष्करी जवान, नागरिकांचा जल्लोष
20
IND vs PAK: "खेळाच्या मैदानात 'ऑपरेशन सिंदूर' आणि..."; पंतप्रधान मोदींनी पाकिस्तानला डिवचलं

लातूर मनपाकडून दैनंदिन १८ दशलक्ष लिटर पाण्याची बचत 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2019 18:41 IST

भविष्यातील पाणी टंचाई लक्षात घेता काटकसरीचा हा प्रयोग मनपाने गेल्या महिनाभरापासून सुरू ठेवला आहे.

ठळक मुद्देपाण्याची मागणी ६८ मनपा पुरवठा करते ५० द.ल.ली.३० टक्के अपव्यय रोखण्याचाही प्रयत्न

- हणमंत गायकवाड

लातूर  : व्यावसायिक व इतर मागणी तसेच योजनेतील तूट गृहित धरता १०० लिटर दरडोई प्रमाणे ६८ द.ल.ली. पाण्याची शहराला गरज आहे. त्यानुसार ६८ दलली.ची मागणी असली, तरी प्रत्यक्षात ५० दलली. पाणी मांजरा प्रकल्पातून लातूर शहराला उचलले जाते. साधारणपणे १८ द.ल.ली. पाणी कमी उचलून बचत केली जात आहे. भविष्यातील पाणी टंचाई लक्षात घेता काटकसरीचा हा प्रयोग मनपाने गेल्या महिनाभरापासून सुरू ठेवला आहे. या सूत्रानुसार जून अखेर पाणी पुरेल, असा विश्वास मनपा प्रशासनाला आहे.

नागरिकांकडून अंदाज ३० टक्के पाण्याचा अपव्यय होतो. ११.५० द.ल.ली. अपव्यय आहे. तो टाळण्यासाठी मनपा प्रशासनाकडून प्रयत्न सुरू आहेत. मांजरा प्रकल्पात सध्या ३१.७० दशलक्ष घनमीटर मृत पाणीसाठा आहे. या पाणी साठ्याचा वापर काटकसरीने मनपाने सुरू केला आहे. १८ दशलक्ष लिटर पाण्याची बचत दररोज केली जात आहे. मागणी ६८ दशलक्ष लिटरची असताना ५० दशलक्ष लिटर पाणी दररोज उचलले जात आहे. पाणी गळतीवरही मनपाचा कटाक्ष असून, ११.५० दशलक्ष लिटर दररोजचा होणारा पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी मनपाने पावले उचलली आहेत.

धनेगाव ते हरंगुळ दरम्यानच्या ५० कि.मी. लांबीच्या गुरुत्ववाहिनीवरील गळत्या, अनधिकृत नळ बंद करण्यात येत आहेत. जलशुद्धीकरण केंद्राच्या बॅकवॉशचे वाया जाणाऱ्या ८ ते १० लाख लिटर पाण्याची बचत केली जात आहे. वितरण व्यवस्थेच्या पाईपलाईनवरील गळत्या बंद करुन अमृत योजने अंतर्गत जलकुंभाची व्हॉल्वही बदलण्यात आली आहे. 

२० दशलक्ष लिटर पाणी बचतीचा प्रयत्न... शहराची लोकसंख्या ५ लाख आहे. या लोकसंख्येला दरडोई १०० लिटर पाण्याची गरज लक्षात घेता मागणी ६८ दशलक्ष लिटर आहे. परंतु, लातूर मनपाने मागणीमध्ये १८ दशलक्ष लिटरची बचत, अपव्यय टाळून ५ दशलक्ष लिटर वापरासाठी पाणी उपयोगात आणणे, कॅशबॅकमधून ८ ते १० लाख लिटर पाण्याची बचत केली जात आहे. तथापि, ५० पेक्षा कमी ४८ दशलक्ष लिटर पाण्यावर ५ लाख लोकसंख्येच्या शहराची तहान भागविण्याचा प्रयत्न सध्या प्रशासनाकडून केला जात आहे. या उपाययोजनेमुळे सात दिवसांआड शहराला पाणी पुरवठा करणे प्रशासनाला शक्य होत आहे. 

नळांना मीटर बसविण्याची निविदा अंतिम टप्प्यात... लातूर शहरातील सर्व नळांना वॉटर मीटर बसविण्यासाठी महानगरपालिकेने निविदा मागविल्या होत्या. त्यातील निविदा मान्यतेसाठी अंतिम टप्प्यात आहे. शिवाय, जलमापक खाजगी पुरवठादाराकडून बसवून घेण्याचाही पर्याय खुला ठेवण्यात आला आहे. मनपाच्या या उपाययोजनेला नागरिकांकडून प्रतिसाद मिळावा, अशी अपेक्षा प्रशासनाची आहे. 

 

टॅग्स :WaterपाणीMuncipal Corporationनगर पालिकाdroughtदुष्काळ