शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधू दादरच्या कबुतरखाना विरोधातील आंदोलनात दिसणार? ‘या’ समितीचे सहभागी होण्याचे आवाहन
2
“मतांची चोरी पकडली गेली, आता भाजपाची सत्ता जायची वेळ आली आहे”; उद्धव ठाकरेंचा मोठा दावा
3
६ शिफ्टमध्ये २८ मंत्र्यांची ड्युटी...यूपी विधानसभेत २४ तासांचं ऐतिहासिक कामकाज, कारण काय?
4
‘लाडकी बहीण’ योजनेकडे महिलांची पाठ? ५ महिन्यांत एकही नवा अर्ज नाही! क्रेझ ओसरल्याची चर्चा
5
ट्रम्पमुळे ज्यांचे रक्त खवळतेय त्या सामान्यांना काहीच नाही; तेल कंपन्यांना २५ टक्के नफा, सरकार घेतेय ४५ टक्के टॅक्स...
6
जगाच्या नकाशावरचा 'हा' देश बनलाय भूकंपाचं केंद्र; दर तासाला जाणवतात १८ भूकंपाचे झटके!
7
३ वर्षांपूर्वी बिसनेसला सुरुवात! आता थेट गुगलला क्रोम ब्राउझर खरेदी करण्याची ऑफर; कोण आहे अरविंद श्रीनिवास?
8
“स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत विजय खेचून आणा, काँग्रेसला १ नंबर पक्ष बनवा”: सपकाळ
9
'आदित्य ठाकरे' नावामुळे घोळ! लायसन्स पाहून अभिनेत्याला पोलिसांनी अडवलं, आधार कार्ड पाहिलं अन्...
10
India restricts Bangladeshi Jute Products: बांगलादेशला जोरदार झटका, नव्या निर्बधांनी भारतानं दिलं 'जशास तसं' उत्तर; कशावर होणार परिणाम?
11
स्फोट अन् भूकबळींनंतर गाजामध्ये आजारांचे थैमान, लोकांचे जाताहेत बळी; लान्सेट रिपोर्टमध्ये धक्कादायक खुलासा
12
जम्मू-काश्मीरच्या बारामुल्लामध्ये घुसखोरीचा प्रयत्न; भीषण चकमकीत एक जवान शहीद
13
भारताचा माजी क्रिकेटपटू सुरेश रैना याला 'ईडी'कडून समन्स; अडचणी वाढणार? प्रकरण काय...
14
पुतिन-ट्रम्प भेटीपूर्वी मोठा 'धमाका' करण्याच्या तयारीत रशिया; अमेरिकेलाही धडकी भरणार, संपूर्ण जग नुसतं बघतच बसणार!
15
WI vs PAK : कॅरेबियन बेटावर पाकचा करेक्ट कार्यक्रम! ५० वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच असं घडलं
16
'या' कारणाने लक्षात राहिली 'राऊडी राठोड'ची ऑडिशन; भार्गवी चिरमुले म्हणाली, 'त्यांनी मला..."
17
“विरोधकांकडे काही मुद्दे नसल्याने EVM, मतदारयाद्यांचा विषय उकरून काढला”; अजित पवारांची टीका
18
DRDOचा गेस्ट हाऊस मॅनेजर करत होता आयएसआयसाठी हेरगिरी; राजस्थानच्या सीआयडीने केली अटक
19
HDFC बँकेचा ग्राहकांना झटका! आता बचत खात्यात 'इतके' पैसे ठेवावे लागणार, नाहीतर बसणार दंड!
20
बालपणीच्या मित्राची भार्या आवडली, त्याने रंगेहाथ पकडले तरी...; दोघांनाही पुन्हा एक संधी दिली, पण... 

लातूर मनपाकडून दैनंदिन १८ दशलक्ष लिटर पाण्याची बचत 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2019 18:41 IST

भविष्यातील पाणी टंचाई लक्षात घेता काटकसरीचा हा प्रयोग मनपाने गेल्या महिनाभरापासून सुरू ठेवला आहे.

ठळक मुद्देपाण्याची मागणी ६८ मनपा पुरवठा करते ५० द.ल.ली.३० टक्के अपव्यय रोखण्याचाही प्रयत्न

- हणमंत गायकवाड

लातूर  : व्यावसायिक व इतर मागणी तसेच योजनेतील तूट गृहित धरता १०० लिटर दरडोई प्रमाणे ६८ द.ल.ली. पाण्याची शहराला गरज आहे. त्यानुसार ६८ दलली.ची मागणी असली, तरी प्रत्यक्षात ५० दलली. पाणी मांजरा प्रकल्पातून लातूर शहराला उचलले जाते. साधारणपणे १८ द.ल.ली. पाणी कमी उचलून बचत केली जात आहे. भविष्यातील पाणी टंचाई लक्षात घेता काटकसरीचा हा प्रयोग मनपाने गेल्या महिनाभरापासून सुरू ठेवला आहे. या सूत्रानुसार जून अखेर पाणी पुरेल, असा विश्वास मनपा प्रशासनाला आहे.

नागरिकांकडून अंदाज ३० टक्के पाण्याचा अपव्यय होतो. ११.५० द.ल.ली. अपव्यय आहे. तो टाळण्यासाठी मनपा प्रशासनाकडून प्रयत्न सुरू आहेत. मांजरा प्रकल्पात सध्या ३१.७० दशलक्ष घनमीटर मृत पाणीसाठा आहे. या पाणी साठ्याचा वापर काटकसरीने मनपाने सुरू केला आहे. १८ दशलक्ष लिटर पाण्याची बचत दररोज केली जात आहे. मागणी ६८ दशलक्ष लिटरची असताना ५० दशलक्ष लिटर पाणी दररोज उचलले जात आहे. पाणी गळतीवरही मनपाचा कटाक्ष असून, ११.५० दशलक्ष लिटर दररोजचा होणारा पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी मनपाने पावले उचलली आहेत.

धनेगाव ते हरंगुळ दरम्यानच्या ५० कि.मी. लांबीच्या गुरुत्ववाहिनीवरील गळत्या, अनधिकृत नळ बंद करण्यात येत आहेत. जलशुद्धीकरण केंद्राच्या बॅकवॉशचे वाया जाणाऱ्या ८ ते १० लाख लिटर पाण्याची बचत केली जात आहे. वितरण व्यवस्थेच्या पाईपलाईनवरील गळत्या बंद करुन अमृत योजने अंतर्गत जलकुंभाची व्हॉल्वही बदलण्यात आली आहे. 

२० दशलक्ष लिटर पाणी बचतीचा प्रयत्न... शहराची लोकसंख्या ५ लाख आहे. या लोकसंख्येला दरडोई १०० लिटर पाण्याची गरज लक्षात घेता मागणी ६८ दशलक्ष लिटर आहे. परंतु, लातूर मनपाने मागणीमध्ये १८ दशलक्ष लिटरची बचत, अपव्यय टाळून ५ दशलक्ष लिटर वापरासाठी पाणी उपयोगात आणणे, कॅशबॅकमधून ८ ते १० लाख लिटर पाण्याची बचत केली जात आहे. तथापि, ५० पेक्षा कमी ४८ दशलक्ष लिटर पाण्यावर ५ लाख लोकसंख्येच्या शहराची तहान भागविण्याचा प्रयत्न सध्या प्रशासनाकडून केला जात आहे. या उपाययोजनेमुळे सात दिवसांआड शहराला पाणी पुरवठा करणे प्रशासनाला शक्य होत आहे. 

नळांना मीटर बसविण्याची निविदा अंतिम टप्प्यात... लातूर शहरातील सर्व नळांना वॉटर मीटर बसविण्यासाठी महानगरपालिकेने निविदा मागविल्या होत्या. त्यातील निविदा मान्यतेसाठी अंतिम टप्प्यात आहे. शिवाय, जलमापक खाजगी पुरवठादाराकडून बसवून घेण्याचाही पर्याय खुला ठेवण्यात आला आहे. मनपाच्या या उपाययोजनेला नागरिकांकडून प्रतिसाद मिळावा, अशी अपेक्षा प्रशासनाची आहे. 

 

टॅग्स :WaterपाणीMuncipal Corporationनगर पालिकाdroughtदुष्काळ