शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

लातूर मनपाकडून दैनंदिन १८ दशलक्ष लिटर पाण्याची बचत 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2019 18:41 IST

भविष्यातील पाणी टंचाई लक्षात घेता काटकसरीचा हा प्रयोग मनपाने गेल्या महिनाभरापासून सुरू ठेवला आहे.

ठळक मुद्देपाण्याची मागणी ६८ मनपा पुरवठा करते ५० द.ल.ली.३० टक्के अपव्यय रोखण्याचाही प्रयत्न

- हणमंत गायकवाड

लातूर  : व्यावसायिक व इतर मागणी तसेच योजनेतील तूट गृहित धरता १०० लिटर दरडोई प्रमाणे ६८ द.ल.ली. पाण्याची शहराला गरज आहे. त्यानुसार ६८ दलली.ची मागणी असली, तरी प्रत्यक्षात ५० दलली. पाणी मांजरा प्रकल्पातून लातूर शहराला उचलले जाते. साधारणपणे १८ द.ल.ली. पाणी कमी उचलून बचत केली जात आहे. भविष्यातील पाणी टंचाई लक्षात घेता काटकसरीचा हा प्रयोग मनपाने गेल्या महिनाभरापासून सुरू ठेवला आहे. या सूत्रानुसार जून अखेर पाणी पुरेल, असा विश्वास मनपा प्रशासनाला आहे.

नागरिकांकडून अंदाज ३० टक्के पाण्याचा अपव्यय होतो. ११.५० द.ल.ली. अपव्यय आहे. तो टाळण्यासाठी मनपा प्रशासनाकडून प्रयत्न सुरू आहेत. मांजरा प्रकल्पात सध्या ३१.७० दशलक्ष घनमीटर मृत पाणीसाठा आहे. या पाणी साठ्याचा वापर काटकसरीने मनपाने सुरू केला आहे. १८ दशलक्ष लिटर पाण्याची बचत दररोज केली जात आहे. मागणी ६८ दशलक्ष लिटरची असताना ५० दशलक्ष लिटर पाणी दररोज उचलले जात आहे. पाणी गळतीवरही मनपाचा कटाक्ष असून, ११.५० दशलक्ष लिटर दररोजचा होणारा पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी मनपाने पावले उचलली आहेत.

धनेगाव ते हरंगुळ दरम्यानच्या ५० कि.मी. लांबीच्या गुरुत्ववाहिनीवरील गळत्या, अनधिकृत नळ बंद करण्यात येत आहेत. जलशुद्धीकरण केंद्राच्या बॅकवॉशचे वाया जाणाऱ्या ८ ते १० लाख लिटर पाण्याची बचत केली जात आहे. वितरण व्यवस्थेच्या पाईपलाईनवरील गळत्या बंद करुन अमृत योजने अंतर्गत जलकुंभाची व्हॉल्वही बदलण्यात आली आहे. 

२० दशलक्ष लिटर पाणी बचतीचा प्रयत्न... शहराची लोकसंख्या ५ लाख आहे. या लोकसंख्येला दरडोई १०० लिटर पाण्याची गरज लक्षात घेता मागणी ६८ दशलक्ष लिटर आहे. परंतु, लातूर मनपाने मागणीमध्ये १८ दशलक्ष लिटरची बचत, अपव्यय टाळून ५ दशलक्ष लिटर वापरासाठी पाणी उपयोगात आणणे, कॅशबॅकमधून ८ ते १० लाख लिटर पाण्याची बचत केली जात आहे. तथापि, ५० पेक्षा कमी ४८ दशलक्ष लिटर पाण्यावर ५ लाख लोकसंख्येच्या शहराची तहान भागविण्याचा प्रयत्न सध्या प्रशासनाकडून केला जात आहे. या उपाययोजनेमुळे सात दिवसांआड शहराला पाणी पुरवठा करणे प्रशासनाला शक्य होत आहे. 

नळांना मीटर बसविण्याची निविदा अंतिम टप्प्यात... लातूर शहरातील सर्व नळांना वॉटर मीटर बसविण्यासाठी महानगरपालिकेने निविदा मागविल्या होत्या. त्यातील निविदा मान्यतेसाठी अंतिम टप्प्यात आहे. शिवाय, जलमापक खाजगी पुरवठादाराकडून बसवून घेण्याचाही पर्याय खुला ठेवण्यात आला आहे. मनपाच्या या उपाययोजनेला नागरिकांकडून प्रतिसाद मिळावा, अशी अपेक्षा प्रशासनाची आहे. 

 

टॅग्स :WaterपाणीMuncipal Corporationनगर पालिकाdroughtदुष्काळ