शहरं
Join us  
Trending Stories
1
घाबरायची गरज नाही! ट्रम्प यांच्या H-1B व्हिसा बॉम्बनंतर उडालेल्या गोंधळात, अमेरिकन अधिकाऱ्यानंच दिली आनंदाची बातमी; म्हणाले, फक्त...
2
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
3
SL vs BAN : 'काठावर पास' झालेल्या बांगलादेशचा टॉपर श्रीलंकेला दणका; पराभवाचा हिशोबही केला चुकता
4
“२३८ नवीन रेक, नववर्षांत स्वयंचलित दरवाजे असलेली लोकल, ६० टक्के प्रवासी वाढ”: अश्विनी वैष्णव 
5
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
6
Asia Cup 2025 :मॅच संपल्यावर वडिलांच्या निधनाची बातमी! घरी जाऊन तो परत आला अन् देशासाठी मैदानात उतरला
7
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
8
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
9
उद्योगांना दिलेली अवाजवी एमआरपी सवलत तात्काळ मागे घ्यावी, मुंबई ग्राहक पंचायतीची केंद्रीय मंत्र्यांकडे मागणी
10
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
11
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
12
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
13
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
14
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
15
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
16
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
17
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
18
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
19
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
20
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...

सज्जनांच्या समूहाकडूनच कार्य संस्कृतीची निर्मिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2021 04:14 IST

लातूर : ध्येयवादी युवक-युवतीच आत्मनिर्भर समाज उभारतील. त्यासाठी प्रत्येक क्षेत्रात अस्तित्वात असलेल्या सज्जन व्यक्तींनी एकत्र येऊन सज्जनांचा समूह मजबूत ...

लातूर : ध्येयवादी युवक-युवतीच आत्मनिर्भर समाज उभारतील. त्यासाठी प्रत्येक क्षेत्रात अस्तित्वात असलेल्या सज्जन व्यक्तींनी एकत्र येऊन सज्जनांचा समूह मजबूत केला पाहिजे. ज्यामुळे त्यांच्याकडून कार्यसंस्कृती निर्माण होईल आणि समाजोन्नती साधली पाईल, असा विश्वास प्रसिद्ध प्लास्टिक सर्जन डॉ. विठ्ठल लहाने यांनी एम. डी. प्रतिष्ठान आयोजित व्याख्यानात व्यक्त केला. ‘डॉक्टर्स डे’निमित्त डॉक्टरांचा प्रातिनिधिक सत्कार आणि व्याख्यानाचे गुरुवारी आयोजन करण्यात आले होते. यावेळी मंचावर आमदार अभिमन्यू पवार, जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी., नंदूरबारचे जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भारुड, प्रा. शिवराज मोटेगावकर, प्रा. उदय देशपांडे उपस्थित होते.

यावेळी डॉ. लहाने म्हणाले, दूरदृष्टीचे ध्येय बाळगले पाहिजे. सज्जनांचा गट तयार केला पाहिजे. तरुणांनी उद्दिष्ट साध्य करताना प्लॅन ए व बी तयार ठेवून सकारात्मकपणे पुढे गेले पाहिजे. एकदा गोष्ट ठरवली की ती करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न केले पाहिजेत. मला अमेरिकेत झालेल्या आंतरराष्ट्रीय परिषदेतून प्रेरणा मिळाली. तेव्हापासून दरवर्षी ६०० ते ८०० दुभंगलेले ओठ व टाळूच्या मोफत शस्त्रक्रिया होऊ शकल्या. हे टीमचे फलित आहे. कोणतेही काम एका व्यक्तीच्या हातून होत नाही, त्यासाठी सामूहिक योगदानाची गरज असते. ध्येय, नियोजन आणि त्यादृष्टीने प्रयत्न ही त्रिसुत्री आहे. प्रारंभी आमदार अभिमन्यू पवार म्हणाले, शेतकरी समृद्ध झाला की कृषी क्षेत्र बळकट होईल आणि त्यामुळे देश आत्मनिर्भर होईल. त्यासाठी वीज, पाणी आणि शेतरस्ते याच कामावर लक्ष केंद्रीत केल्याचे सांगितले. जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. व नंदूरबारचे जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भारुड, प्रा. शिवराज मोटेगावकर यांनीही यावेळी मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक उदय देशपांडे यांनी केले तर सूत्रसंचालन पत्रकार संजय जेवरीकर यांनी केले.

डॉक्टरांचा सत्कार

यावेळी डॉ. विठ्ठल लहाने, डॉ. विश्रांत भारती, डॉ. राहुल सूळ, डॉ. व्यंकटेश मलगे, डॉ. अभिषेक सानप, डॉ. सचिन बालकुंदे, डॉ. नेहा हिरेमठ, डॉ. अरुणाचलेश्वर बालकुंदे यांचा डॉक्टर्स डेनिमित्त सत्कार करण्यात आला.

एकट्याने यश मिळत नाही...

अपयश ही एक संधी असते. त्यावर मात करून यशासाठी पुढे गेले पाहिजे. शेवटी समाज पुढे जाण्यासाठी केवळ एकाने काम करून चालणार नाही, तर काम करणाऱ्यांचा समूह बनला पाहिजे. ज्यामुळे कार्यसंस्कृती निर्माण होईल, असेही डॉ. लहाने म्हणाले.