शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
3
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
4
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
5
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?
6
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
7
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
8
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
9
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
10
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
11
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
12
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
13
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
14
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
15
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
16
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
17
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
18
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
19
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
20
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका

CoronaVirus: आता 'हा' जिल्हा झाला कोरोनामुक्त; आठही जणांचे अहवाल निगेटिव्ह आल्यानं मोठा दिलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2020 23:44 IST

सर्व यात्रेकरुंना आंध प्रदेशला पाठवणार; पालकमंत्र्यांची माहिती

लातूर : जिल्ह्यातील आठही कोरोनाबाधितांच्या दोन्ही चाचण्यांचा अहवाल निगेटिव्ह आल्यामुळे लातूर जिल्हा आता कोरोनामुक्त झाला आहे. दरम्यान, यात्रेकरुंचा अहवाल निगेटिव्ह आल्याने त्यांना आंध्र प्रदेशात घरी पाठविणार, असे पालकमंत्री अमित देशमुख यांनी सांगितले.

लातूर जिल्ह्यात आलेल्या १२ यात्रेकरुंपैकी ८ जणांना कोरोनाची लागण झाली होती. त्यांचे स्वॅब पाठविण्यात आले होते. त्यामध्ये आठही जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. त्यामुळे ते सर्व कोरोनामुक्त झाले आहेत. यापूर्वीच पालकमंत्री अमित देशमुख यांनी कोरोनाबाधितांचा अहवाल निगेटिव्ह आल्यानंतर त्यांच्या मूळ गावी पाठविण्यात येईल असे सांगितले होते. हे सर्व १२ यात्रेकरु हरयाणा येथून विविध राज्यांच्या सीमा ओलांडत निलंगा मार्गे आंध्रप्रदेशात जात होते. कर्नुल जिल्ह्यातील नंदियाला हे त्यांचे गाव आहे. दरम्यान, सर्व बाधितांचा क्वारंटाईन कालावधीही पूर्ण झाला आहे. आता  सर्वांचीच रवानगी आंध्र प्रदेशात होईल. एकंदर लातूर जिल्ह्यात स्थानिकांना बाधा नव्हती, आता परप्रांतियही कोरोना निगेटिव्ह झाले आहेत. त्यामुळे जिल्हा कोरोनामुक्त म्हणता येईल. आजपर्यत २१३ अहवाल प्राप्त असून, ते सर्व अहवाल निगेटिव्ह आले आहेत.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसCoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या