शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
2
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
3
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
4
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
5
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
6
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
7
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
8
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
9
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
10
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
11
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
12
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
13
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
14
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
15
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
16
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
17
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
18
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
19
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
20
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...

बांध फोडल्यावरुन दोन गटात वाद पेटला; शेतकऱ्याचा दगडाने ठेचून केला खून

By राजकुमार जोंधळे | Updated: May 17, 2024 19:24 IST

या प्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली आहे

औसा (जि. लातूर) : शेतातील बांध फाेडून माती घेवून जाण्याच्या कारणावरुन कत्ती, राॅड आणि दगडाने ठेचून एका शेतकऱ्याचा खून करण्यात आल्याची घटना शिंदाळा (ता. औसा) येथे गुरुवारी रात्री घडली. यात सहा जखमी झाले असून, दाेघांची प्रकृती गंभीर आहे. याबाबत भादा पाेलिस ठाण्यात शुक्रवारी सकाळी सहा जणांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला असून, तिघांना अटक केली आहे. 

पाेलिसांनी सांगितले, सिंदाळा, सिंदाळावाडी शिवारात दहा एकर विलास माेरे यांच्या वडिलांच्या नावे असून, याच जमीनीलगत चंद्रसेन मुळे याचीही शेती आहे. ते दोन दिवसांपासून शेतातील माती जेसीबीच्या साह्याने काढून ट्रॅक्टरने घेवून जात होते. दरम्यान, गुरुवारी रात्री यातून माेरे आणि मुळे यांच्यात वाद झाला. सामाईक बांध फोडून माती नेण्यावरुन विलास व्यंकट मोरे यांच्यासह कुटुंबातील काहींनी त्यांना जाब विचारला. यावेळी चंद्रसेन मुळे, आण्णाराव मुळे, शेषेराव मुळे, कमलाकर मुळे, परमेश्वर मुळे, संतोष मुळे, अंगद भोसले यांनी कत्ती, लोखंडी रॉड, काठी, दगडाने जबर मारहाण केली. 

या मारहाणीत विलास व्यंकट मोरे यांच्या डोक्यात कत्ती, रॉडचा मार लागला. त्यानंतर दगडाने ठेचल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. त्यांना शुक्रवारी पहाटे २ वाजण्याच्या सुमारास औसा रुग्णालयात दाखल केले असता, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून त्यांना मृत घोषित केले. तर बालाजी व्यंकट मोरे, गोपाळ व्यंकट मोरे, अनंत गोपाळ मोरे यांच्यासह आण्णाराव मुळे हे जखमी आहेत. त्यांनाही पुढील उपचारासाठी औसा येथून लातूरला हलविण्यात आले आहे. याबाबत भादा पाेलिस ठाण्यात राेहित विलास माेरे यांच्या तक्रारीवरुन शुक्रवारी सकाळी सहा जणांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पाेलिसांनी तिघांना अटक केल्याचे सपोनि. राहुलकुमार भोळ यांनी सांगितले.

टॅग्स :laturलातूरCrime Newsगुन्हेगारी