शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुतीत सारे काही आलबेल? मंत्र्यांच्या नाराजीनंतर शिंदेनी दरे नाही, दिल्ली गाठली; अमित शहांकडे तक्रार...
2
"राजा रघुवंशी प्रमाणे...!" ऑपरेशन सिंदूर'मध्ये पाकिस्तानला धडा शिकवणाऱ्या जवानाला वाटते भीती, 'सोनमसारखं' करण्याची धमकी देतेय पत्नी!
3
माळेगावात तणाव! शरद पवार राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष नितीन तावरे यांच्यावर जीवघेणा हल्ला 
4
₹१०००००००००००००० स्वाहा...! 6 आठवड्यांत क्रिप्टो मार्केट क्रॅश, बिटकॉइन 27% घसरला; गुंतवणूकदारांवर डोकं झोडून घ्यायची वेळ
5
'घातपाताच्या सूत्रधाराला वाचवणाऱ्या सरकारचे संरक्षण नको!' मनोज जरांगेंचा मोठा निर्णय
6
क्रिकेट चाहत्यांना धक्का! विश्वचषकात भारत-पाकिस्तान सामना होणार नाही, आयसीसीने ग्रुप स्टेजसाठी घेतला मोठा निर्णय...
7
KTM च्या बाईकना आग लागण्याचा धोका; Duke मॉडेल माघारी बोलविल्या...
8
एक 'ट्रिप'... एक 'ट्रिक'... अन् उभा राहिला १.५ कोटींचा उद्योग; कोल्हापूरच्या अद्वैतचा नादच खुळा
9
Travel : भारतापासून हजारो मैल दूर वसलाय 'मिनी इंडिया'; दिसायला सुंदर, फिरायला बेस्ट अन् इतिहासही आहे रंजक!
10
"मी अनेक वेळा रात्रीचे जेवण करत नाही, विचार करते...!"; करण जौहरसोबत अगदी मोकळेपणानं बोलली सानिया मिर्झा
11
नवी Honda City पाहिलीत का? कधी येणार; डिझाईन आणि प्लॅटफॉर्मची माहिती लीक झाली...
12
"तुमचा अहंकार ड्रेसिंग रुममध्ये ठेवा!" गावसकरांनी गंभीर-आगरकरांनाही सुनावलं
13
"जेव्हापासून बिहारचे निकाल लागलेत, माझी झोपच उडालीये", प्रशांत किशोरांना कोणत्या गोष्टीची सल?
14
अनमोल बिश्नोईला ११ दिवसांची कोठडी; ३५ हून अधिक हत्यांशी त्याचा थेट संबंध असल्याचा 'NIA'चा दावा
15
अल फलाह विद्यापीठाचे संस्थापक जवाद सिद्दीकींना ४१५ कोटींच्या फसवणुकी प्रकरणी ईडी कोठडी; १३ दिवसांची रिमांड
16
"जेव्हा मुस्लीम अल्लाहवर विश्वास ठेवतो, तेव्हा शत्रूवर फेकलेली मातीही मिसाइल बनते, पुन्हा युद्द झाले तर..."; मुनीर यांची 'कोल्हेकुई' 
17
'हो, आम्ही काश्मीरपासून लाल किल्ल्यापर्यंत हल्ले केले... ', सीमापार दहशतवादाबद्दल पाक नेत्याची धक्कादायक कबुली
18
Delhi Blast : "आता कुटुंबाचं पोट कसं भरणार?"; दिल्ली स्फोटातील जखमींची मन हेलावून टाकणारी गोष्ट
19
अफगाणिस्तानचे उद्योगमंत्री भारत दौऱ्यावर; 'या' महत्वाच्या विषयांवर होणार चर्चा...
20
जुन्या वाहन मालकांना जबर धक्का...! वाहनांचे आयुष्य १५ वरून १० वर्षे झाले, फिटनेसचे शुल्क १० पटींनी वाढविले...
Daily Top 2Weekly Top 5

पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2021 04:19 IST

शिरूर अनंतपाळ : वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसाने शिरूर अनंतपाळ तालुक्यातील ४५० हेक्टर्सवरील ऊस भुईसपाट झाला असून, अनेक ...

शिरूर अनंतपाळ : वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसाने शिरूर अनंतपाळ तालुक्यातील ४५० हेक्टर्सवरील ऊस भुईसपाट झाला असून, अनेक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे ऊस उत्पादक शेतकरी अडचणीत आले आहेत. त्यामुळे पंचनामे करून नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी शेतकऱ्यांतून केली जात आहे.

शिरूर अनंतपाळ तालुक्यात घरणी, साकोळ, पांढरवाडी, प्रकल्प आणि डोंगरगाव, हालकीसारखे बंधारे यामुळे तालुक्यात त्रिकोणी ग्रीनबेल्ट निर्माण झाला आहे. मागील वर्षी हे सर्व प्रकल्प शंभर टक्के भरले होते. त्यामुळे अनेक गावातील शेतकऱ्यांनी २ हजार ५०० हेक्टर्समध्ये नवीन ऊसाची लागवड केली आहे. तर ७०० हेक्टर्स खोडवा असा एकंदर ३ हजार २०० हेक्टर्समध्ये ऊसाचे क्षेत्र आहे. नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये अनेक शेतकऱ्यांच्या ऊस तोडणीच्या तारखा आहेत. परंतु नुकत्याच वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसाने अनेक गावांतील शेतकऱ्यांच्या ऊसाचे मोठे नुकसान झाले आहे. अनेक गावातील शेतकऱ्यांचा ऊस भुईसपाट झाला असल्याने शेतकऱ्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. भुईसपाट झालेल्या ऊसाची मशागत कशी करायची असा प्रश्न पडला आहे.

सर्वाधिक नुकसान या गावात...

तालुक्यातील सर्वच गावात कमी अधिक प्रमाणात ऊस असला तरी दैठणा, शेंद, तिपराळ, कानेगाव, साकोळ, तळेगाव, सांगवी घुग्गी, अंकुलगाराणी, उजेड, डोंगरगाव, हालकी, पांढरवाडी, धामणगाव, बोळेगाव, येरोळ, सुमठाणा, डिगोळ, चामरगा , नागेवाडी, कारेवाडी, लक्कडजवळगा, जोगाळा, शिवपूर, थेरगाव, हिप्पळगाव, कांबळगा, शिरूर अनंतपाळ या गावातील शेतकऱ्यांचे सर्वाधिक नुकसान झाले आहे. ऊस उत्पादनाच्या टनेजमध्ये घट होणार आहे. त्याचबरोबर ऊसतोड कामगार ऊसाची तोडणी करताना शेतकऱ्यांची अडवणूक करणार त्यामुळे शेतकऱ्याचे दुहेरी नुकसान झाले आहे.

हेक्टरी २५ हजारांची मागणी ...

अनेक शेतकऱ्यांनी इतर कोणतीही पिके न घेता केवळ ऊसाची लागवड केली आहे. परंतु नुकत्याच वादळी वाऱ्यासह झालेल्या जोरदार पावसाने तालुक्यातील ४५० हेक्टर्स ऊस भुईसपाट झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे दुहेरी नुकसान झाले आहे. म्हणून हेक्टरी २५ हजारांची मदत देण्यात यावी अशी मागणी व्यंकटराव पाटील, धोंडीराम कारभारी, विठ्ठलराव पाटील, संजीव गुणाले, कल्याणराव बिरादार, भाऊराव पाटील यांनी केली आहे.