शहरं
Join us  
Trending Stories
1
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
2
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
3
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
4
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
5
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
6
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
7
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
8
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
9
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
10
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?
11
Air India Plane Crash: ज्या आगीत जिवंत माणसांची झाली राख, त्यात एकच मानवी अवयव वाचला
12
दिवसभर खुर्चीवर बसून वाढतंय वजन? ३०-३०-३० नियमाची जादू, लठ्ठपणाला कराल बाय-बाय
13
अ‍ॅमेझॉनवर १६ जूनला अवघ्या १६ रुपयांना स्मार्टवॉच वाटली जाणार; कुपन कोड अन् वेळ लक्षात ठेवा...
14
"जर इस्त्रायलची साथ दिली तर..."; संतापलेल्या इराणचा पाश्चात्य देशांना मोठा इशारा
15
ऐन पेरणीत शेतकरी कुटुंबांवर संकट! वीज कोसळून दोन सख्ख्या भावांसह चार शेतकऱ्यांचा मृत्यू
16
अहमदाबाद प्लेन क्रॅशसंदर्भात बाबा रामदेव यांना वेगळाच संशय, स्पष्टच बोलले! केली मोठी मागणी
17
Maharashtra Rain Alert: कोकणाला रेड अलर्ट! मुंबई-ठाण्यासह 'या' जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा
18
Tarot Card: कष्ट करावे लागतील, तडकाफडकी कोणतेही निर्णय घेऊ नका; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य!
19
Ahmedabad Plane Crash : कॅन्सरने आईला हिरावून नेलं, अपघातामुळे वडिलांचं छत्र हरपलं; १८ दिवसांत २ चिमुकल्या अनाथ
20
काव्या मारन विवाहबंधनात अडकणार? हा प्रसिद्ध संगीतकार करतोय डेट, रजनीकांत बोलणी करायला... 

पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2021 04:19 IST

शिरूर अनंतपाळ : वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसाने शिरूर अनंतपाळ तालुक्यातील ४५० हेक्टर्सवरील ऊस भुईसपाट झाला असून, अनेक ...

शिरूर अनंतपाळ : वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसाने शिरूर अनंतपाळ तालुक्यातील ४५० हेक्टर्सवरील ऊस भुईसपाट झाला असून, अनेक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे ऊस उत्पादक शेतकरी अडचणीत आले आहेत. त्यामुळे पंचनामे करून नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी शेतकऱ्यांतून केली जात आहे.

शिरूर अनंतपाळ तालुक्यात घरणी, साकोळ, पांढरवाडी, प्रकल्प आणि डोंगरगाव, हालकीसारखे बंधारे यामुळे तालुक्यात त्रिकोणी ग्रीनबेल्ट निर्माण झाला आहे. मागील वर्षी हे सर्व प्रकल्प शंभर टक्के भरले होते. त्यामुळे अनेक गावातील शेतकऱ्यांनी २ हजार ५०० हेक्टर्समध्ये नवीन ऊसाची लागवड केली आहे. तर ७०० हेक्टर्स खोडवा असा एकंदर ३ हजार २०० हेक्टर्समध्ये ऊसाचे क्षेत्र आहे. नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये अनेक शेतकऱ्यांच्या ऊस तोडणीच्या तारखा आहेत. परंतु नुकत्याच वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसाने अनेक गावांतील शेतकऱ्यांच्या ऊसाचे मोठे नुकसान झाले आहे. अनेक गावातील शेतकऱ्यांचा ऊस भुईसपाट झाला असल्याने शेतकऱ्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. भुईसपाट झालेल्या ऊसाची मशागत कशी करायची असा प्रश्न पडला आहे.

सर्वाधिक नुकसान या गावात...

तालुक्यातील सर्वच गावात कमी अधिक प्रमाणात ऊस असला तरी दैठणा, शेंद, तिपराळ, कानेगाव, साकोळ, तळेगाव, सांगवी घुग्गी, अंकुलगाराणी, उजेड, डोंगरगाव, हालकी, पांढरवाडी, धामणगाव, बोळेगाव, येरोळ, सुमठाणा, डिगोळ, चामरगा , नागेवाडी, कारेवाडी, लक्कडजवळगा, जोगाळा, शिवपूर, थेरगाव, हिप्पळगाव, कांबळगा, शिरूर अनंतपाळ या गावातील शेतकऱ्यांचे सर्वाधिक नुकसान झाले आहे. ऊस उत्पादनाच्या टनेजमध्ये घट होणार आहे. त्याचबरोबर ऊसतोड कामगार ऊसाची तोडणी करताना शेतकऱ्यांची अडवणूक करणार त्यामुळे शेतकऱ्याचे दुहेरी नुकसान झाले आहे.

हेक्टरी २५ हजारांची मागणी ...

अनेक शेतकऱ्यांनी इतर कोणतीही पिके न घेता केवळ ऊसाची लागवड केली आहे. परंतु नुकत्याच वादळी वाऱ्यासह झालेल्या जोरदार पावसाने तालुक्यातील ४५० हेक्टर्स ऊस भुईसपाट झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे दुहेरी नुकसान झाले आहे. म्हणून हेक्टरी २५ हजारांची मदत देण्यात यावी अशी मागणी व्यंकटराव पाटील, धोंडीराम कारभारी, विठ्ठलराव पाटील, संजीव गुणाले, कल्याणराव बिरादार, भाऊराव पाटील यांनी केली आहे.