शहरं
Join us  
Trending Stories
1
"युद्ध थांबवलं नाही तर…’’, भारत-पाकिस्तानमधील संघर्षाचा उल्लेख करत डोनाल्ड ट्रम्प यांचा थायलंड कंबोडियाला इशारा
2
"...मग आम्हाला जगभर कशाला पाठवलं?"; IND vs PAK क्रिकेट शेड्युलवर संतापल्या प्रियंका चतुर्वेदी
3
मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात! कंटेनरचे ब्रेक फेल, अनेक वाहने एकमेकांवर धडकली...
4
IND vs ENG 4th Test Day 4 Stumps : साडे चार तासांत ३७३ चेंडूंचा सामना; KL राहुल-गिल जोडी जमली; पण लढाई अजून नाही संपली!
5
"जर 6 महिन्यांत मर्सिडीज अथवा बीएमडब्ल्यू हवी असेल तर..." सरन्यायाधीश गवई यांचा नव्या वकीलांना सल्ला
6
Asia Cup 2025: 'असं' झालं तर तब्बल तीन वेळा रंगणार IND vs PAK क्रिकेट सामना, जाणून घ्या
7
Shubman Gill Record : गिलनं साधला मोठा डाव! इंग्लंडच्या मैदानात पाक दिग्गजाला 'धोबीपछाड'
8
तेव्हा लोक म्हणाले होते जणू दुसरी ऐश्वर्याच, सलमान खानची ही हिरोईन आता दिसते अशी 
9
एलियन्सचं रहस्यमय अंतराळ यान नोव्हेंबरमध्ये करणार पृथ्वीवर हल्ला, शास्त्रज्ञांना धक्कादायक दावा
10
नवरा बायकोमध्ये तुफान भांडण, पतीच्या डोक्यात घातला हातोडा, हत्येनंतर दार लावलं अन्...
11
Video: बंगळुरूच्या महिला प्रोफेसरचा मराठमोळ्या 'वाजले की बारा' लावणीवर भन्नाट डान्स
12
"आम्ही खूप दुःखी..."; दिराने वहिनीला कुंकू लावलं अन् धबधब्यात घेतली उडी, प्रेमाचा भयंकर शेवट
13
IND vs ENG : जसप्रीत बुमराहचं 'शतक'; मँचेस्टर कसोटीतील न पटण्याजोगी गोष्ट
14
Asia Cup 2025 चे वेळापत्रक जाहीर! भारत पाकिस्तान पुन्हा एकाच गटात, 'या' दिवशी सामना
15
१४,२९८ पुरुषांना 'लाडकी बहीण'चा लाभ; अजित पवार म्हणाले, 'वसूल करणार, नाही दिले तर...'
16
"सरकार ही निरुपयोगी यंत्रणा, चालत्या गाडीला पंक्चर करण्याचं काम..."; नितीन गडकरींनी सुनावलं
17
बिहार निवडणुकीसाठी काँग्रेसची मोर्चेबांधणी, महाराष्ट्रातील या महिला खासदाराकडे सोपवली मोठी जबाबदारी
18
"बंदुकीच्या धाकाने बांगलादेशात ढकलले जातेय...!" बांगली भाषिक मुस्लिमांवरील कारवाईवरून ओवेसी भडकले
19
IND vs ENG : यशस्वीच्या पदरी लाजिरवाणा 'भोपळा'! साई आला अन् तोही फक्त 'दर्शन' देऊन गेला
20
"राहुल गांधींच्या नशिबात कायम माफी मागणे लिहीले आहे"; केंद्रीय कृषीमंत्र्यांनी काँग्रेसला घेरलं, "१० वर्षांनी पुन्हा..."

भाजपा, काँग्रेसचे नात्या-गोत्यांचे राजकारण गाडून टाका - प्रकाश आंबेडकर

By राजकुमार जोंधळे | Updated: May 3, 2024 01:33 IST

काँग्रेस आणि भाजपा या दोन्ही पक्षांनी वंचित, बहुजन, भटके व अल्पसंख्याकांना किती स्थान दिले, याचे उत्तर द्यावे. यावेळी उमेदवार नरसिंग उदगीरकर, संतोष सूर्यवंशी, डी.एन. नरसिंगे, अण्णा जाधव, प्रा. राजेंद्र ढवळे, श्याम कांबळे उपस्थित होते.

लातूर : भाजपा, काँग्रेसचे नात्या-गोत्यांचे राजकारण एकदाचे गाडून टाका, अशी टीका वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी लातुरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर पार्कवर गुरुवारी आयोजित सभेत केली. ॲड. आंबेडकर म्हणाले, राज्यात १६९ कुटुंबांकडे सत्ता आहे. ते हाणून पाडण्याची वेळ आली आहे. काँग्रेस आणि भाजपा या दोन्ही पक्षांनी वंचित, बहुजन, भटके व अल्पसंख्याकांना किती स्थान दिले, याचे उत्तर द्यावे. यावेळी उमेदवार नरसिंग उदगीरकर, संतोष सूर्यवंशी, डी.एन. नरसिंगे, अण्णा जाधव, प्रा. राजेंद्र ढवळे, श्याम कांबळे उपस्थित होते.

ॲड. आंबेडकर काय म्हणाले?मराठा समाजाच्या आरक्षणासाठी मनोज जरांगे-पाटील आंदोलन करीत आहेत. काँग्रेस, भाजपाने किती गरीब मराठ्यांना उमेदवारी दिली, हे आधी सांगावे. भाजपा २०२४ मध्ये पुन्हा सत्तेत आली तर गल्ली-गल्लीत गोध्रा, मणिपूर घडण्याची भीती आहे. मुस्लीम अल्पसंख्याक जेव्हा संकटात आले, तेव्हा तेव्हा वंचित आघाडीच पुढे आली.

भाजपा सरकार जुमलेबाजीचे आहे. खोटे बोलून फसविणाऱ्या सरकारला धडा शिकवा. ते पुन्हा सत्तेत आले तर देशाचे वाटोळे होईल. केंद्रातील सरकार हे ईडी, सीबीआय, इन्कमटॅक्स आणि तपास यंत्रणांचे आहे. लोकसभेच्या निकालानंतर अनेक काँग्रेस नेते भाजपाच्या घरी दिसतील. त्यात लातूर जिल्ह्यातील लोकही दिसतील, असे ॲड. आंबेडकर म्हणाले. लातूर लोकसभा मतदारसंघात काँग्रेसने सोयीचा उमेदवार दिला. त्यांच्या प्रमाणपत्राला न्यायालयात आव्हान दिले जात आहे. लातूरच्या पाण्याचा प्रश्न कायम आहे. उजनीच्या पाण्याबद्दल इथल्या राजकारण्यांनी सतत गाजर दाखविले. 

टॅग्स :Prakash Ambedkarप्रकाश आंबेडकरlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४