शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
2
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
3
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
4
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
5
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
6
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
7
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
8
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
9
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
10
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
11
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
12
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
13
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
14
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
15
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
16
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
17
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
18
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
19
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
20
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!

अमित देशमुख यांच्या विरोधात भाजपकडून उमेदवाराचा शोध सुरूच

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 11, 2019 06:34 IST

अगदी प्रारंभापासून भाजपा अथवा शिवसेनेला प्रतिनिधित्व करण्याची संधी या मतदारसंघात आजपर्यंत मिळालेली नाही. मात्र गेल्या पाच वर्षांत महापालिका, जिल्हा परिषदेतील सत्ता आणि लोकसभेचा निकाल पाहता भाजपाचा जोर वाढला आहे

हणमंत गायकवाडलातूर : काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या लातूर जिल्ह्यात जिल्हा बँक आणि बाजार समिती वगळता बहुतांश सत्तास्थानावर भाजपाचा झेंडा फडकला आहे. तरीही माजी राज्यमंत्री आमदार अमित देशमुख यांच्या विरोधात तगड्या उमेदवाराचा शोध भाजपाला घ्यावा लागत आहे.१९५७ पासून लातूर विधानसभा मतदारसंघावर काँग्रेसचे वर्चस्व राहिले आहे. केशवराव सोनवणे आणि शिवराज पाटील चाकूरकर यांनी प्रत्येकी दोन वेळा तर दिवंगत नेते विलासराव देशमुख यांनी पाच वेळा या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले आहे. १९६७ मध्ये बापूसाहेब काळदाते तर १९९५ शिवाजीराव पाटील कव्हेकर यांचा अपवाद वगळता निर्विवाद काँग्रेस राहिली आहे. लातूर विधानसभा मतदारसंघाचे लातूर शहर आणि ग्रामीण असे दोन मतदारसंघ करण्यात आल्यानंतर २००९ पासून विद्यमान आमदार अमित देशमुख या मतदारसंघाचे नेतृत्व करीत आहेत. आता ते हॅट्ट्रिक करणार का, याकडे लक्ष आहे.

अगदी प्रारंभापासून भाजपा अथवा शिवसेनेला प्रतिनिधित्व करण्याची संधी या मतदारसंघात आजपर्यंत मिळालेली नाही. मात्र गेल्या पाच वर्षांत महापालिका, जिल्हा परिषदेतील सत्ता आणि लोकसभेचा निकाल पाहता भाजपाचा जोर वाढला आहे. सध्या भाजपाकडून शहर विधानसभा मतदारसंघात २४ इच्छुकांनी मुलाखती दिल्या असल्या तरी अमित देशमुख यांच्या विरोधात सक्षम उमेदवाराचा शोध भाजपाला अजूनही करावा लागणार आहे.

२०१४ मधील भाजपाचे उमेदवार शैलेश लाहोटी यंदाही इच्छुक आहेत. त्यांच्याबरोबर अन्य इच्छुकांनीही मुलाखती दिल्या आहेत. त्यामुळे गेल्या पाच वर्षांत मिळविलेली सत्ता, लोकसभेतील उत्तुंग यश यावर भाजपा काँग्रेसचा गड भेदणार की पुन्हा काँग्रेसच आपले वर्चस्व कायम राखणार, याची उत्सुकता मतदारसंघात आहे.

पाच वर्षांत काय घडले?

  • काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या जिल्ह्यात प्रथमच लातूर मनपा, जि़प़वर भाजपा सत्तेवर आली़ परिणामी, काँग्रेस या दोन्ही संस्थांत विरोधी बाकावर राहिली़
  • अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव तसेच गोवा राज्याचे प्रभारी म्हणून ठसा उमटविण्यात अमित देशमुख यांना यश़ सत्ता नसतानाही मतदार संघातील विकासकामांवर लक्ष़
  • सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, विमानतळाचे विस्तारीकरण, चौपदरी रस्ता, जिल्हा रुग्णालयाच्या जागेसाठी प्रयत्न केले.
  • लातूर शहर मतदार संघात सौहार्द व शांतता राखण्यासाठी प्रत्येक समाजघटकाशी संवाद असून, निवडणुकीचा रागरंग पाहून व्यक्तिगत गाठीभेटींवर भर आहे.

 

गेली पाच वर्षे केंद्र व राज्यात भाजपाची सत्ता आहे़ त्यांनी आपल्या सत्ताकाळात कोणती ठळक कामे केली, हा प्रश्न आहे़ बेरोजगारी, पाणी अशा मूलभूत समस्यांवर सरकार अपयशी ठरले आहे़ आर्थिक मंदीचे सावट आहे़ बेरोजगारीत वाढ झाली आहे़ याला सरकारच जबाबदार आहे़ - आ़अमित देशमुख, लातूर शहर विधानसभा

टॅग्स :latur-city-acलातूर शहरAmit Deshmukhअमित देशमुखBJPभाजपा