शहरं
Join us  
Trending Stories
1
"तर मी फडणवीसांना या जन्मी माफ करणार नाही", अंजली दमानियांची पोस्ट, 'तो' फोटोही केला शेअर
2
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
3
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
4
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
5
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
6
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
7
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
8
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
9
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
10
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
11
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
12
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
13
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
14
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
15
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
16
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
17
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
18
आई-वडिलांचा केला खून, मृतदेहांचे तुकडे करून गोणीत भरले, अन् नदीत फेकले, मुलाचं धक्कादायक कृत्य 
19
‘महाराष्ट्रात येणाऱ्या सर्व विमानांमध्ये मराठी भाषेत उद्घोषणा करा’, नाना पटोले यांची मागणी 
20
हृदयद्रावक! 'तो' सेल्फी ठरला अखेरचा; लग्नाच्या वाढदिवशी पतीसमोर पत्नीचा पाय घसरला अन्...
Daily Top 2Weekly Top 5

अमित देशमुख यांच्या विरोधात भाजपकडून उमेदवाराचा शोध सुरूच

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 11, 2019 06:34 IST

अगदी प्रारंभापासून भाजपा अथवा शिवसेनेला प्रतिनिधित्व करण्याची संधी या मतदारसंघात आजपर्यंत मिळालेली नाही. मात्र गेल्या पाच वर्षांत महापालिका, जिल्हा परिषदेतील सत्ता आणि लोकसभेचा निकाल पाहता भाजपाचा जोर वाढला आहे

हणमंत गायकवाडलातूर : काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या लातूर जिल्ह्यात जिल्हा बँक आणि बाजार समिती वगळता बहुतांश सत्तास्थानावर भाजपाचा झेंडा फडकला आहे. तरीही माजी राज्यमंत्री आमदार अमित देशमुख यांच्या विरोधात तगड्या उमेदवाराचा शोध भाजपाला घ्यावा लागत आहे.१९५७ पासून लातूर विधानसभा मतदारसंघावर काँग्रेसचे वर्चस्व राहिले आहे. केशवराव सोनवणे आणि शिवराज पाटील चाकूरकर यांनी प्रत्येकी दोन वेळा तर दिवंगत नेते विलासराव देशमुख यांनी पाच वेळा या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले आहे. १९६७ मध्ये बापूसाहेब काळदाते तर १९९५ शिवाजीराव पाटील कव्हेकर यांचा अपवाद वगळता निर्विवाद काँग्रेस राहिली आहे. लातूर विधानसभा मतदारसंघाचे लातूर शहर आणि ग्रामीण असे दोन मतदारसंघ करण्यात आल्यानंतर २००९ पासून विद्यमान आमदार अमित देशमुख या मतदारसंघाचे नेतृत्व करीत आहेत. आता ते हॅट्ट्रिक करणार का, याकडे लक्ष आहे.

अगदी प्रारंभापासून भाजपा अथवा शिवसेनेला प्रतिनिधित्व करण्याची संधी या मतदारसंघात आजपर्यंत मिळालेली नाही. मात्र गेल्या पाच वर्षांत महापालिका, जिल्हा परिषदेतील सत्ता आणि लोकसभेचा निकाल पाहता भाजपाचा जोर वाढला आहे. सध्या भाजपाकडून शहर विधानसभा मतदारसंघात २४ इच्छुकांनी मुलाखती दिल्या असल्या तरी अमित देशमुख यांच्या विरोधात सक्षम उमेदवाराचा शोध भाजपाला अजूनही करावा लागणार आहे.

२०१४ मधील भाजपाचे उमेदवार शैलेश लाहोटी यंदाही इच्छुक आहेत. त्यांच्याबरोबर अन्य इच्छुकांनीही मुलाखती दिल्या आहेत. त्यामुळे गेल्या पाच वर्षांत मिळविलेली सत्ता, लोकसभेतील उत्तुंग यश यावर भाजपा काँग्रेसचा गड भेदणार की पुन्हा काँग्रेसच आपले वर्चस्व कायम राखणार, याची उत्सुकता मतदारसंघात आहे.

पाच वर्षांत काय घडले?

  • काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या जिल्ह्यात प्रथमच लातूर मनपा, जि़प़वर भाजपा सत्तेवर आली़ परिणामी, काँग्रेस या दोन्ही संस्थांत विरोधी बाकावर राहिली़
  • अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव तसेच गोवा राज्याचे प्रभारी म्हणून ठसा उमटविण्यात अमित देशमुख यांना यश़ सत्ता नसतानाही मतदार संघातील विकासकामांवर लक्ष़
  • सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, विमानतळाचे विस्तारीकरण, चौपदरी रस्ता, जिल्हा रुग्णालयाच्या जागेसाठी प्रयत्न केले.
  • लातूर शहर मतदार संघात सौहार्द व शांतता राखण्यासाठी प्रत्येक समाजघटकाशी संवाद असून, निवडणुकीचा रागरंग पाहून व्यक्तिगत गाठीभेटींवर भर आहे.

 

गेली पाच वर्षे केंद्र व राज्यात भाजपाची सत्ता आहे़ त्यांनी आपल्या सत्ताकाळात कोणती ठळक कामे केली, हा प्रश्न आहे़ बेरोजगारी, पाणी अशा मूलभूत समस्यांवर सरकार अपयशी ठरले आहे़ आर्थिक मंदीचे सावट आहे़ बेरोजगारीत वाढ झाली आहे़ याला सरकारच जबाबदार आहे़ - आ़अमित देशमुख, लातूर शहर विधानसभा

टॅग्स :latur-city-acलातूर शहरAmit Deshmukhअमित देशमुखBJPभाजपा