शहरं
Join us  
Trending Stories
1
'इंडिया आघाडी' तुटणार? बिहारमधील पराभवानंतर, काँग्रेसवर एकट्याने निवडणूक लढण्याचा वाढला दबाव
2
'माझ्या प्रियकराला भैय्या म्हणायचीस, आता बाबू बोलतेस'; दोन तरुणींचा रस्त्यातच राडा, केस ओढून मारहाण; व्हिडीओ व्हायरल
3
कुठे तोडफोड, कुठे राडा; उमेदवारीवरून राज्यभरात दिसला 'हायव्होल्टेज ड्रामा'! इच्छुकांचे नेत्यांपुढे रडगाणे...
4
पाकिस्तानात मोठी खळबळ! लष्कर मुख्यालयात लष्करप्रमुखांच्या मुलीचा निकाह; फोटो का आले नाहीत समोर?
5
नवीन वर्ष २०२६ मध्ये PM Kisan योजनेचा २२ वा हप्ता कधी जारी होईल? कोणाला मिळणार नाहीत पैसे, जाणून घ्या
6
२००३ मध्ये भारताच्या हातातला वर्ल्डकप हिसकावणारा फलंदाज कोमामध्ये; ऑस्ट्रेलियाचा स्फोटक दिग्गज मृत्यूशी देतोय झुंज
7
भारत-पाक संघर्षात चीनची उडी! "आम्हीच केली मध्यस्थी"; ट्रम्प यांच्यानंतर आता 'ड्रॅगन'चा नवा दावा
8
टार्गेट पूर्ण...! केंद्र सरकारने 'या' इलेक्ट्रिक वाहनांवरील सबसिडी बंद केली; टू-व्हीलर, कारही रांगेत...
9
Union Bank of India मध्ये जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹२२,२३९ चं फिक्स व्याज; पटापट चेक करा कॅलक्युलेशन
10
६ राशींचे धनलाभाने २०२६ नववर्ष सुरू, यश-प्रगती; समृद्धी-भरभराट, तुमच्या राशीवर कसा प्रभाव?
11
निवडणुकीला समोरे जाण्यापूर्वी योगी आदित्यनाथ अखेरचा डाव टाकणार; संक्रांतीनंतर अनेक मंत्र्यांना डच्चू देणार, मंत्रिमंडळाचा विस्तार करणार...
12
गुड न्यूज! रेल्वे तिकिटावर ३ टक्के सवलत; प्रवाशांना आर्थिक दिलासा
13
भारत जगातील चौथी मोठी अर्थव्यवस्था; जपानला टाकले मागे; केंद्र सरकारची अधिकृत घोषणा
14
सैन्य भरतीची तयारी करत होता, पण प्रेमाच्या जाळ्यात अडकला; प्रेयसीच्या एका फोन कॉलने घात केला!
15
नाराज निष्ठावंतांचा उद्रेक, थेट नेत्यांनाच शिव्यांची लाखोली! वर्षानुवर्षे पक्षनिष्ठा जपणारे, सतरंज्या उचलणारे भाजप कार्यकर्ते भडकले
16
नातेवाईकच उदंड झाले कार्यकर्ते वाऱ्यावर उडाले, ३० नेत्यांसह ११६ नातेवाईक निवडणूक रिंगणात
17
आजचे राशीभविष्य ३१ डिसेंबर २०२५ : सरत्या वर्षाचा शेवट कोणासाठी गोड होणार? कसा असेल आजचा दिवस...
18
तिसरं महायुद्ध अन् मोठी आपत्ती...! 2026 साठी बाबा वेंगा यांची धडकी भरवणारी भविष्यवाणी
19
सावधान! मोबाईलमध्ये 'हे' गाणे आढळल्यास थेट तुरुंगवास; चीनने लादले कडक निर्बंध
20
KDMC: मतदानाआधीच भाजपच्या रेखा चौधरी विजयी? कल्याण- डोंबिवली महापालिकेत नेमकं काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

भाजपच्या वतीने काेरोना योद्ध्यांचा सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2021 04:16 IST

खरीप हंगामाच्या शेतीकामांना वेग लातूर : खरीप हंगाम काही दिवसांवर येऊन ठेपला असून, शेतकऱ्यांच्या वतीने मशागतीची कामे केली जात ...

खरीप हंगामाच्या शेतीकामांना वेग

लातूर : खरीप हंगाम काही दिवसांवर येऊन ठेपला असून, शेतकऱ्यांच्या वतीने मशागतीची कामे केली जात आहेत. तसेच बियाणे, खतांचे नियोजन करण्यात येत आहे. जिल्ह्यात ५ लाख ९३ हजार हेक्टरवर खरिपाचा पेरा अपेक्षित असून, सोयाबीनला शेतकऱ्यांची पसंती आहे. दरम्यान, कृषी विभागाच्या वतीने शेतकऱ्यांना पेरणीविषयी मार्गदर्शन केले जात आहे. बियाणांची उगवण क्षमता तपासूनच पेरणी करावी, असे आवाहन करण्यात येत आहे.

दरवाढीमुळे सर्वसामान्यांचे नियोजन कोलमडले

लातूर : पेट्रोल, डिझेल आणि गॅसच्या दरवाढीमुळे सर्वसामान्यांचे नियोजन कोलमडले आहे. पेट्रोल १०० रुपये, तर डिझेल ९० रुपयांच्या पुढे सरकले आहे. दरम्यान, डिझेलच्या दरवाढीमुळे शेतीच्या मशागतीच्या दरातही वाढ झाली आहे. कोरोनामुळे गेल्या दीड वर्षापासून सर्वांवर आर्थिक संकट ओढावले आहे. त्यातच महागाईने सर्वसामान्यांचे नियोजन पूर्णपणे कोलमडले आहे. शासनाने तत्काळ दरवाढ कमी करण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे.

बँकांनी कर्जपुरवठा करण्याची मागणी

लातूर : खरीप हंगामामध्ये शेती मशागतीसह बियाणे, खते आदी खरेदीसाठी पैशांची गरज असते. कोरोनामुळे शेतीमालाला बाजारपेठ न मिळाल्याने अनेकांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे बँकानी शेतकऱ्यांना कर्जपुरवठा करावा, अशी मागणी होत आहे. महात्मा जोतिबा फुले कर्जमुक्ती योजनेचा बहुतांश शेतकऱ्यांना लाभ मिळालेला नाही. त्यामुळे जे शेतकरी योजनेसाठी पात्र आहेत त्यांना तरी बँकांनी तत्काळ कर्जपुरवठा करावा, अशी मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे.

ग्रामीण भागात पाणीटंचाईच्या झळा

लातूर : जिल्ह्यातील १११ गावांत पाणीटंचाईच्या झळा तीव्र झाल्या असून, पाण्यासाठी नागरिकांना भटकंती करावी लागत आहे. संबंधित ग्रामपंचायतींच्या वतीने अधिग्रहणासाठी पंचायत समिती स्तरावर प्रस्ताव सादर करण्यात आले आहेत. काही प्रस्तावांना उपविभागीय अधिकारी कार्यालयाच्या वतीने मंजुरी देण्यात आली आहे. सध्या २२ गावांना अधिग्रहणाद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. दरम्यान, अधिग्रहणाच्या उर्वरित प्रस्तांवाना तत्काळ मंजुरी देण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे.

मालवाहतूक उपक्रमाला व्यापाऱ्यांचा प्रतिसाद

लातूर : राज्य परिवहन महामंडळाच्या वतीने आर्थिक उत्पन्न वाढीसाठी एसटीची मालवाहतूक सेवा सुरू करण्यात आली आहे. या उपक्रमाला जिल्ह्यातील व्यापारी, शेतकऱ्यांच्या वतीने चांगला प्रतिसाद मिळत आहे. अनेक शेतकरी आपला शेतीमाल एसटीच्या मालवाहतूक ट्रकद्वारे विक्रीसाठी नेत आहेत. दरम्यान, गेल्या दीड वर्षांच्या कालावधीत मालवाहतुकीच्या माध्यमातून लातूर विभागाला पावणेदोन काेटी रुपयांचे आर्थिक उत्पन्न मिळाले असल्याचे सांगण्यात आले.

विजेच्या लपंडावामुळे नागरिकांची गैरसोय

लातूर : शहरानजीक असलेल्या हरंगुळ नवीन वसाहत परिसरातील सदाशिव नगर, गोविंद नगर भागात सोमवारी रात्री ९ वाजेपासून वीज गुल होती. त्यामुळे नागरिकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय झाली. दरम्यान, महावितरणच्या वतीने लवकर वीजपुरवठा सुरळीत न झाल्याने नागरिकांतून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. नियमित वीजबिल भरूनही वीजपुरवठा खंडित केला जात असल्याची ओरड आहे. विशेष म्हणजे महावितरणशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता फोनही घेत नसल्याचे चित्र आहे. याकडे महावितरणने तत्काळ लक्ष देऊन गैरसोय दूर करण्याची मागणी नागरिकांतून होत आहे.