शहरं
Join us  
Trending Stories
1
'...तर देशभरात भाजपचा पाया हादरवून टाकेन', SIR प्रक्रियेवरुन ममता बॅनर्जींचा केंद्रावर हल्लाबोल
2
"जे होतं ते आम्ही फडणवीस यांच्यासमोर मनमोकळ्या...", महायुतीतील नाराजी नाट्यावर एकनाथ शिंदेंचा खुलासा
3
“श्रीराम काल्पनिक होते असं म्हणणारी गुलामी संपवू”; PM मोदींनी सांगितला २०३५ पर्यंतचा संकल्प
4
हे भगवान...! २६ हजार कोटींची मालकीण करणार एका चहावाल्याशी लग्न; उद्योगजगतात खळबळ...
5
श्रीराम मंदिर बांधणे सोपे होते, पण मॅकॉले प्रेरित गुलामीची मानसिकता..; PM मोदींनी पुन्हा 'तो' मुद्दा काढला
6
भारताला २३,००० कोटी रुपयांचे युरेनियम का विकत आहे कॅनडा? मोठ्या करारामागचे कारण काय?
7
Anant Garje : "अनैतिक संबंध ठेवणारी महिला...", रुपाली पाटील ठोंबरे यांची गौरी पालवे मृत्यू प्रकरणी संतप्त पोस्ट
8
'ईसीजी' काढणारे स्मार्ट वॉच आले! भारतात 'या' किंमतीला कंपनी लाँच करून बसली...
9
मुस्कान रस्तोगी बनली आई, पण तुरुंगामध्ये जन्मलेल्या मुलांचा सांभाळ कसा केला जातो, कोणत्या सुविधा असतात?
10
हुंड्याला नकार! वराने थेट २१ लाख रुपये लग्न मंडपातच परत केले; पाहुणे बघतच राहिले, वधू भावूक
11
माझ्या विरोधात काही प्रयत्न केले तर मी भाजपाचा पाया हादरवून टाकेन; ममता बॅनर्जी यांचे आव्हान
12
Solapur Crime: एकाच दिवशी चौघांनी मृत्युला मारली मिठी, कुणी घरात, कुणी बाहेर संपवले आयुष्य
13
बाजारात सलग तिसऱ्या दिवशी 'रेड अलर्ट'! गुंतवणूकदारांचे ३३,००० कोटी पाण्यात! 'हे' ठरले टॉल लूजर्स
14
मार्च पर्यंत ४००० अब्ज डॉलर्सची होणार देशाची अर्थव्यवस्था; कोणी केला हा दावा, पाहा
15
IND vs SA 2nd Test Day 4 Stumps : दोन्ही सलामीवीर तंबूत! कुलदीपला चौथ्या क्रमांकावर पाठवण्याची वेळ!
16
पाकिस्तानचा अफगाणिस्तानवर पुन्हा हवाई हल्ला; ९ निष्पाप बालकांसह १० जणांचा मृत्यू
17
डेली SIP की मासिक SIP? म्युच्युअल फंडात जास्त फायदा कशात? गुंतवणूकदारांसाठी तज्ज्ञांचा खास सल्ला
18
उद्धव ठाकरेंनी घेतली संजय राऊतांची भेट, केली तब्येतीची विचारपूस; म्हणाले, “आता लवकरच...” 
19
रिलायन्सचा वर्षात २७ टक्क्यांचा दमदार परतावा! भविष्यात किती वाढ होईल?, ब्रोकरेज फर्मने दिलं टार्गेट
20
आधी पत्नीला संपवलं, नंतर पतीने स्वतःही घेतला जगाचा निरोप; मरणापूर्वी भिंतीवर लिपस्टिकने लिहिली संपूर्ण कहाणी!
Daily Top 2Weekly Top 5

पाणी टंचाईने त्रस्त अहमदपूरकरांचे पालिकेसमोर ‘स्नान करो’ आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2019 18:22 IST

आंदोलनकर्त्यांनी फोडली नगरपालिकेसमोर मटकी

अहमदपूर (लातूर ) : शहरातील पाणी टंचाई भीषण होत चालली असून नगरपरिषदेच्या वतीने ३५ दिवसाआड पाणी पुरवठा होत असल्याने स्वामी विवेकानंद मित्र मंडळाच्या वतीने सोमवारी नगरपरिषदेसमोर अनोखे स्नान करो आंदोलन करण्यात आले. यावेळी आंदोलनकर्त्यांनी मटकी फोडून आपला रोष व्यक्त केला. दरम्यान, प्रशासनाने १० दिवसात टँकरची व्यवस्था करून पाणी पुरवठा सुरळीत करण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.

अहमदपूर शहरास पाणी पुरवठा करणाऱ्या लिंबोटी धरणात मुबलक पाणी पुरवठा असूनही केवळ नगरपरिषद प्रशासन व लोकप्रतिनिधी व कार्यक्षमतेमुळे ३५ दिवसाआड पाणी पुरवठा होत आहे. त्यामुळे शहरात भीषण पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे. नागरिकांना पाण्यासाठी टँकरवर अवलंबून राहावे लागत आहे. दरम्यान, स्वामी विवेकानंद मित्र मंडळाच्या वतीने १० मे रोजी नगरपरिषदेला पाणी सुरळीत करण्यासंदर्भात पत्र दिले होते. मात्र नगरपरिषदेने कुठलीही कार्यवाही केली नाही. याच्या निषेधार्थ सोमवारी नगरपरिषदेवर शहरातून मोर्चा काढण्यात आला. हा मोर्चा क्षिप्र गणेश मंदिर, आझाद चौक, पोस्ट आॅफिसवरून थेट नगरपरिषदेसमोर आला. त्या ठिकाणी आंदोलनकर्त्यांकडून अनोखे स्नान करो आंदोलन करण्यात आले. त्यानंतर मुख्याधिकारी व नगराध्यक्षांच्या कार्यालयासमोर मटकी फोडून आंदोलन करण्यात आले. 

यावेळी स्वामी विवेकानंद मित्र मंडळाचे स्वप्नील व्हते, संदीप चौधरी, मधुकर धडे, राम आलगुले, सुशांत गुणाले, नीलेश हिवरे, श्याम यादव, सिद्धेश्वर जगताप, अमोल सजनशेट्टी, बालू तेलंगे, किशोर कोरे, अभिजीत पुणे, प्रेम हामने, सुनील देशमुख, गंगाधर हेगणे, अतुल गिरी, अजय गादगे यांच्यासह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.

१० दिवसात टँकरने पाणी पुरवठा...शहरात भीषण पाणी टंचाई असल्याने जिल्हाधिकाऱ्याांकडे २७ विंधन विहीर व २५ टँकरच्या मागणीचा प्रस्ताव नगरपरिषदेने पाठविला असून याबाबत सकारात्मक निर्णय झाल्यानंतर लगेच पाणी पुरवठा सुरळीत करण्याचे लेखी आश्वासन नगर परिषदेच्या वतीने पाणी पुरवठा अभियंता गिरी यांनी दिले. यावेळी नगरसेवक लक्ष्मीकांत कासनाळे, राहुल शिवपुजे, बालाजी आगलावे आदी उपस्थित होते.

काँग्रेसच्या वतीने निवेदन...शहरातील पाणी टंचाईसाठी उपाययोजना करण्यासंदर्भात शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने निवेदन देण्यात आले. या निवेदनावर विकास महाजन, चंद्रकांत मद्वे, देवानंद मुळे, प्रकाश ससाणे, अनिल बोडगे, अनिल कांबळे, रामबापू नरवटे, सोपान शिवणे, शिवकुमार उटगे यांच्यासह अनेकांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

टॅग्स :agitationआंदोलनwater scarcityपाणी टंचाईlaturलातूर