शहरं
Join us  
Trending Stories
1
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
2
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
3
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
4
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
5
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
6
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
7
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
8
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
9
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
10
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
11
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
12
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
13
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
14
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
15
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
16
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
17
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
18
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
19
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
20
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!

दुष्काळाच्या उंबरठ्यावरील शेतकऱ्यांना पीककर्ज वसुलीसाठी बँकेच्या नोटिसा

By हरी मोकाशे | Updated: August 28, 2023 20:58 IST

बळीराजाच्या तोंडचे पाणी पळाले : व्याज अकारणी तब्बल १४.५ टक्के

लातूर : वरुणराजाने दीर्घ ताण दिल्याने खरिपातील पिके माना टाकत आहेत. दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे बळीराजा हतबल होऊन वर्ष कसे काढावे अशा चिंतेत असताना निलंगा तालुक्यातील औराद शहाजानी येथील एका राष्ट्रीयीकृत बँकेच्या शाखेने कायदेशीर नोटिसा बजावल्या आहेत. परिणामी, शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणीच पळाले आहे.

निलंगा तालुक्यातील औराद शहाजानी परिसरात गेल्या दोन वर्षांत अतिवृष्टीमुळे शेतीपिकांचे नुकसान झाले. त्यामुळे यंदा तरी चांगले उत्पादन मिळेल, अशी शेतकऱ्यांना आशा होती. परंतु, हंगामाच्या सुरुवातीपासून संकटे सुरू झाली. विलंबाने पाऊस झाल्याने जुलैमध्ये खरिपाच्या पेरण्या झाल्या. पिकांपुरता पाऊस झाल्यामुळे पिके बहरली होती. सध्या सोयाबीन फूल, शेंगा लागण्याच्या अवस्थेत आहे. मात्र, पावसाने जवळपास महिनाभरापासून उघडीप दिली आहे. विशेष म्हणजे, ऑगस्टमध्ये ५० वर्षांतील सर्वांत कमी पाऊस झाला आहे. परिणामी, दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे संकटात असलेल्या शेतकऱ्यांना येथील महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या शाखेने थकीत पीक कर्जासाठी कायदेशीर नोटिसा बजावल्या आहेत.

शेतकऱ्यांना कायदेशीर नोटिसा...येथील महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या शाखेकडून काही शेतकऱ्यांनी पीक कर्ज घेतले. हे कर्ज परतफेडीचे तारण, हमी व विनंतीवरून देण्यात आले होते. त्यासाठी सुरक्षा तारण, दस्तऐवज शेतकऱ्यांनी दिले आहे. तसेच वेळोवेळी दस्ताऐवजाचे नूतनीकरणही करून देण्यात आले आहे. त्यामुळे कर्जावर द.सा.द.शे. ७ टक्के व थकीत रकमेवर नियमाप्रमाणे व्याजासह वसुली देऊन परतफेड करण्याचे मान्य केले होते, असे म्हणत शेतकऱ्यांना कायदेशीर नोटिसा बजावण्यात आल्या आहेत.

३० दिवसांत कर्जाचा भरणा करावा...नोटिसा मिळाल्यापासून ३० दिवसांच्या आत येथील महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या शाखेकडे कर्जाचा भरणा करावा अन्यथा कायद्यानुसार कार्यवाही करण्यात येईल, असे नोटिसीत बजावले आहे. अगोदरच निसर्गाच्या लहरीपणामुळे अडचणीत असलेला शेतकरी आता नोटिसीमुळे नव्या संकटात सापडला आहे. विशेषत: सध्या शेतकऱ्यांना कर्जाच्या व्याजाचा भरणा करणेही शक्य नाही.

अडीच टक्के आकारले दंड व्याज...थकीत पीक कर्जावर १२ टक्के व्याज तसेच २.५ टक्के दंड व्याज लागू करण्यात आला आहे. एकूण १४.५ टक्के व्याज आकारणी करण्यात आली आहे. शेतकऱ्यांनी बँकेच्या शाखेत कर्जाची रक्कम व व्याज भरणा न केल्यास कायदेशीर नोटिसांचा खर्चही खातेदारांच्या नावे टाकण्यात येत असल्याचे नोटिसीत स्पष्ट केले आहे.

शेतकऱ्यांपुढे नवे संकट...औरादसह परिसरातील कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांपुढे नवे संकट निर्माण झाले आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी आम्हा शेतकऱ्यांवर अन्याय होऊ नये म्हणून ठोस पावले उचलावीत, अशी मागणी शेतकरी दत्ता ढाेरसिंगे यांनी केली.

कर्जदारांनी नियमित भरणा करावा...अनेक शेतकऱ्यांचे पीक कर्ज थकीत आहे. त्यामुळे व्याज वाढले आहे. कर्जदारांनी नियमित कर्जाचा भरणा करावा अथवा बँकेच्या ओटीएस योजनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन बँकेचे शाखा व्यवस्थापक रवी नाईक यांनी केले.

टॅग्स :Farmerशेतकरी