शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG 5th Test : टीम इंडियानं हातून निसटलेली मॅच जिंकून दाखवली! मालिकेत बरोबरी
2
मंत्रिपद जाऊनही धनंजय मुंडेंनी सरकारी बंगला का सोडला नाही? भरावा लागणार दंड
3
"हे बंद करा"; परिणय फुकेंच्या विधानावर बोलताना CM फडणवीसांनी माध्यमांचे टोचले कान, काय म्हणाले?
4
मुंबई घडवण्यात हिंदी भाषिकांचं मोठं योगदान, मराठी केवळ ३० टक्के...: निशिकांत दुबेंनी पुन्हा डिवचलं
5
बाजारात जोरदार 'कमबॅक'! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी वाढ, हिरो मोटर्ससह 'या' शेअर्सचा बंपर परतावा
6
एका शेअरवर १५६ रुपयांचा डिविडंड देणार ही कंपनी, रेकॉर्ड डेट १५ ऑगस्टपूर्वीच, तुमच्याकडे आहे का?
7
“आपला पक्ष मुंबईत सर्वांत जास्त बलवान आहे, यंदा महापालिकेत मनसेचीच सत्ता येणार”: राज ठाकरे
8
एक दिवस एमजी टाटाला मागे टाकणार? जुलैमध्ये एवढ्या विकल्या इलेक्ट्रीक कार... ह्युंदाई क्रेटा...
9
Viral Video: पाठीमागून आला अन् मिठी मारली, छातीलाही केला स्पर्श; भररस्त्यात महिलेसोबत घाणेरडं कृत्य!
10
भारतातील एकमेव रेल्वे स्टेशन, ज्याला नावच नाही, तरीही थांबते ट्रेन, लोक करतात प्रवास
11
पंतप्रधान मोदींनंतर चार तासांनी अमित शाह राष्ट्रपतींना भेटले; ५ ऑगस्टला काहीतरी मोठे घडणार....
12
IND vs ENG :मियाँ मॅजिक! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये विकेट; KL राहुलनं एक कॅच सोडला
13
IND vs ENG : क्रिस वोक्सला सलाम! खांदा फॅक्चर असताना संघासाठी मैदानात उतरला (VIDEO)
14
शाहरुख खान अन् राणी मुखर्जीसाठी प्रिय मित्र करण जोहरची पोस्ट, म्हणाला, "३३ वर्षांचा हा काळ..."
15
थ्रेडिंगमुळे लिव्हर फेल? आयब्रो करणं पडेल चांगलंच महागात, डॉक्टरांचा धोक्याचा इशारा
16
१७,००० कोटींचा घोटाळा! अनिल अंबानींच्या डोकेदुखीत वाढ, ED आता 'या' लोकांची चौकशी करणार
17
Post Office ची ५० वर्ष जुनी सेवा होणार बंद, तुमच्यावर काय परिणाम होणार?
18
नव्या प्रभाग रचनेला आव्हान देणाऱ्या याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या; स्थानिक निवडणुकांना हिरवा कंदील
19
६ ऑगस्टला बच्चू कडू राज ठाकरेंची भेट घेण्याची शक्यता; शेतकरी आंदोलनाला मनसेचं पाठबळ मिळणार?

पाण्यासाठी किल्लारी बंद; आक्रमक महिलांचा घागरमोर्चा, रास्तारोको

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2019 17:38 IST

किल्लारीत तीन महिन्यांपासून नळाला पाणी आल नाही

ठळक मुद्देव्यापाऱ्यांनी ठेवली बाजारपेठ बंदटँकर नको, माकणी धरणाचे पाणी द्या़

किल्लारी (लातूर )  : तीन महिन्यांपासून नळाला पाणी नसल्याने किल्लारीतील नागरिकांची पाण्यासाठी भटकंती होत आहे़ गावास नळाद्वारे पाणी सोडण्यात यावे, अशी मागणी करीत गावातील महिला आक्रमक होत सोमवारी सकाळी घागरमोर्चा काढला़ तसेच लातूर- उमरगा मार्गावर एक तास रास्तारोको आंदोलन केले़ 

औसा तालुक्यातील किल्लारी हे ३० हजार लोकसंख्येचे गाव आहे़ दुष्काळी परिस्थितीमुळे पाणी पातळी खालावली आहे़ परिणामी, गावातील ९० टक्के बोअर कोरडे पडले आहेत तर उर्वरित १० टक्के बोअरला अत्यल्प प्रमाणात पाणी येत आहे़ गावास माकणी प्रकल्पातून ३० खेडी योजनेअंतर्गत पाणीपुरवठा होत होता़ परंतु, तीन महिन्यांपासून नळाद्वारे येणारा पाणीपुरवठा बंद झाला आहे़ पाणी पुरवठ्याची विद्युत मोटार जळाली, जलवाहिनी फुटली अशी विविध कारणे सांगितली जात आहेत़ त्यामुळे गावातील नागरिकांची पाण्यासाठी भटकंती होत आहे़ गावास सुरळीत पाणीपुरवठा करावा, या मागणीसाठी किल्लारीतील महिला आक्रमक होत घागरमोर्चा काढला, तर या आंदोलनात नागरिकांनी सहभागी होत महिलांसोबत रास्तारोको आंदोलन केले़ दरम्यान, गावकऱ्यांच्या या आंदोलनास पाठिंबा दर्शवित गावातील व्यापाऱ्यांनी बाजारपेठ बंद ठेवली़

यावेळी पाणी द्या अन्यथा खुर्च्या खाली करा, अशा जोरदार घोषणा देण्यात आल्या़ आमदार, खासदारांचे लक्ष नसल्याने गावातील नळांना तीन महिन्यांपासून पाणी येत नाही, असे आंदोलनकर्ते म्हणत होते़ यावेळी प्रा़ हरिश्चंद्र कांबळे म्हणाले, तीन महिन्यांपासून नळाला पाणी नसतानाही तुरटीवर दीड लाखाचा खर्च झाला कसा? ग्रामपंचायतीने पाण्यासाठी १५ लाखांचा खर्च दाखविला आहे़ परंतु, पाणीच नाही तर तो खर्च झाला कसा? ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांकडून कागदोपत्री मेळ घालण्यात येत असल्याचा आरोपही त्यांनी केला़ माकणी धरणावरुन ३० खेडी पाणीपुरवठा योजना दोन दिवसांत सुरु करा, अन्यथा आत्मदहन करु, असा इशारा महिलांनी दिला़या आंदोलनात मोहन गायकवाड, विनायक बिराजदार, सुरेश सावळगे, कृष्णहरी क्षीरसागर, प्रा़ हरिश्चंद्र कांबळे, बिभिषण कांबळे, वसंत मंजुळे, बाबुराव झाकडे, अनिता साठे, जयश्री कांबळे यांनीही ग्रामपंचायतीच्या कारभारावर संताप व्यक्त केला़

हे आंदोलन शांततेत पार पडावे म्हणून बिभिषण कांबळे, मोहन गायकवाड गुरुजी, बाबुराव झाकडे, ईश्वर गायकवाड, विनायक बिराजदार, राजेंद्र कुलकर्णी, दयानंद गायकवाड, प्रा़ हरिश्चंद्र कांबळे, विजय भोसले, पाशा पटेल यांनी परिश्रम घेतले़ तसेच आंदोलनादरम्यान अनुचित प्रकार घडू नये म्हणून सपोनि विनोद मेत्रेवार, पीएसआय गणेश कदम यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता़

टँकर नको, माकणीचे पाणी द्या़़़गावकऱ्यांच्या विविध मागण्यांचे निवेदन सहाय्यक गटविकास अधिकारी सतीश पाटील यांनी निवेदन स्वीकारले़ यावेळी विस्तार अधिकारी मांदळे, मंडळ अधिकारी हाश्मी, तलाठी बालाजी जाधव होते़ यावेळी सहाय्यक गटविकास अधिकारी पाटील यांनी सध्या तीन टँकर मंजूर केले आहेत़ त्यात आणखीन वाढ करता येईल, असे म्हणताच महिलांनी टँकर नको, माकणी धरणाचे नळाद्वारे पाणी द्यावे, अशी मागणी केली़

रास्तारोकोनंतर महिला ग्रामपंचायतीकडेरास्तारोको आंदोलन झाल्यानंतर संतप्त महिलांनी आपला मोर्चा ग्रामपंचायतीवर नेला़ परंतु, तिथे सरपंचासह एकही सदस्य उपस्थित नव्हता़ त्यामुळे ग्रामपंचायतीच्या कारभाराचा निषेध केला़

टॅग्स :Waterपाणीagitationआंदोलनlaturलातूरdroughtदुष्काळ