शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
3
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
4
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
5
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?
6
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
7
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
8
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
9
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
10
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
11
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
12
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
13
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
14
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
15
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
16
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
17
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
18
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
19
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
20
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका

आशा स्वयंसेविकांच्या संपामुळे आयुष्मान कार्डची गती थंडावली

By हरी मोकाशे | Updated: January 13, 2024 19:07 IST

ग्रामीण भागातील सेवेवर परिणाम

लातूर : आशा स्वयंसेविका व गट प्रवर्तकांनी आपल्या मागण्यांची पूर्तता व्हावी म्हणून शुक्रवारपासून संप पुकारला आहे. त्याचा ग्रामीण भागातील आरोग्य सेवेवर परिणाम झाला आहे. शिवाय, आयुष्मान कार्ड काढण्याची गतीही मंदावली आहे.

ग्रामीण भागात आशा स्वयंसेविका महत्त्वाचा घटक आहे. त्या आरोग्य क्षेत्रातील ७० ते ७२ प्रकारची विविध कामे करीत असतात. त्यात प्रामुख्याने गरोदर मातांची काळजी घेणे, बाळांचे लसीकरण करुन घेणे, प्रसूतीपश्चात जन्मजात बाळ व मातेच्या भेटी घेणे, मधुमेह, रक्तदाब तपासणी करुन घेणे, माता व किशोरवयीन मुलींच्या बैठका घेऊन आरोग्यविषयक माहिती देणे अशा प्रकारची विविध कामे करतात. याशिवाय, आयुष्मान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य योजना व महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजेनच्या लाभासाठी आयुष्मान कार्ड काढण्याचे काम करतात.

आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तकांना दिवाळी भेट देण्यात यावी, मोबदल्यात वाढ करण्यात यावी, अशा मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य आशा- गटप्रवर्तक कर्मचारी कृती समितीच्या वतीने गत ऑक्टोबर- नोव्हेंबरमध्ये राज्यव्यापी आंदोलन करण्यात आले. तेव्हा राज्याच्या आरोग्य मंत्र्यांनी दिवाळी भेट, मोबदल्यात वाढ करण्यात येईल, असे जाहीर केले. मात्र, अद्यापही आश्वासनांची पूर्तता केली नाही. त्यामुळे आशा व गटप्रवर्तकांनी शुक्रवारपासून बेमुदत आंदोलन सुरु केले आहे.

आता दररोज १२०० आयुष्मान कार्ड...आयुष्मान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य योजना व महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनेच्या लाभासाठी आयुष्मान कार्ड आवश्यक आहे. जिल्ह्यात १८ लाख २३ हजार आयुष्मान कार्ड काढण्याचे उद्दिष्ट आहे. आतापर्यंत ५ लाख २५ हजार कार्ड काढण्यात आले आहेत. आशा स्वयंसेविकांच्या मदतीने दररोज जवळपास ५ ते ६ हजार कार्ड काढण्यात येत होते. मात्र, आंदोलनामुळे १ हजार २०० कार्ड काढले जात आहेत. कार्ड काढण्याची गती मंदावली आहे.

मागण्यांची पूर्तता करावी...राज्य शासनाने दिलेल्या आश्वासनांची पूर्तता केली नाही. त्यामुळे आशा स्वयंसेविका, गटप्रवर्तकांनी शुक्रवारपासून संप पुकारला आहे. आश्वासनपूर्ती झाल्याशिवाय आंदोलन मागे घेतले जाणार नाही, असे कृती समितीचे भगवान देशमुख यांनी सांगितले.

 

टॅग्स :laturलातूरHealthआरोग्यagitationआंदोलन