शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

आशा स्वयंसेविकांच्या संपामुळे आयुष्मान कार्डची गती थंडावली

By हरी मोकाशे | Updated: January 13, 2024 19:07 IST

ग्रामीण भागातील सेवेवर परिणाम

लातूर : आशा स्वयंसेविका व गट प्रवर्तकांनी आपल्या मागण्यांची पूर्तता व्हावी म्हणून शुक्रवारपासून संप पुकारला आहे. त्याचा ग्रामीण भागातील आरोग्य सेवेवर परिणाम झाला आहे. शिवाय, आयुष्मान कार्ड काढण्याची गतीही मंदावली आहे.

ग्रामीण भागात आशा स्वयंसेविका महत्त्वाचा घटक आहे. त्या आरोग्य क्षेत्रातील ७० ते ७२ प्रकारची विविध कामे करीत असतात. त्यात प्रामुख्याने गरोदर मातांची काळजी घेणे, बाळांचे लसीकरण करुन घेणे, प्रसूतीपश्चात जन्मजात बाळ व मातेच्या भेटी घेणे, मधुमेह, रक्तदाब तपासणी करुन घेणे, माता व किशोरवयीन मुलींच्या बैठका घेऊन आरोग्यविषयक माहिती देणे अशा प्रकारची विविध कामे करतात. याशिवाय, आयुष्मान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य योजना व महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजेनच्या लाभासाठी आयुष्मान कार्ड काढण्याचे काम करतात.

आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तकांना दिवाळी भेट देण्यात यावी, मोबदल्यात वाढ करण्यात यावी, अशा मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य आशा- गटप्रवर्तक कर्मचारी कृती समितीच्या वतीने गत ऑक्टोबर- नोव्हेंबरमध्ये राज्यव्यापी आंदोलन करण्यात आले. तेव्हा राज्याच्या आरोग्य मंत्र्यांनी दिवाळी भेट, मोबदल्यात वाढ करण्यात येईल, असे जाहीर केले. मात्र, अद्यापही आश्वासनांची पूर्तता केली नाही. त्यामुळे आशा व गटप्रवर्तकांनी शुक्रवारपासून बेमुदत आंदोलन सुरु केले आहे.

आता दररोज १२०० आयुष्मान कार्ड...आयुष्मान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य योजना व महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनेच्या लाभासाठी आयुष्मान कार्ड आवश्यक आहे. जिल्ह्यात १८ लाख २३ हजार आयुष्मान कार्ड काढण्याचे उद्दिष्ट आहे. आतापर्यंत ५ लाख २५ हजार कार्ड काढण्यात आले आहेत. आशा स्वयंसेविकांच्या मदतीने दररोज जवळपास ५ ते ६ हजार कार्ड काढण्यात येत होते. मात्र, आंदोलनामुळे १ हजार २०० कार्ड काढले जात आहेत. कार्ड काढण्याची गती मंदावली आहे.

मागण्यांची पूर्तता करावी...राज्य शासनाने दिलेल्या आश्वासनांची पूर्तता केली नाही. त्यामुळे आशा स्वयंसेविका, गटप्रवर्तकांनी शुक्रवारपासून संप पुकारला आहे. आश्वासनपूर्ती झाल्याशिवाय आंदोलन मागे घेतले जाणार नाही, असे कृती समितीचे भगवान देशमुख यांनी सांगितले.

 

टॅग्स :laturलातूरHealthआरोग्यagitationआंदोलन