शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

आशा स्वयंसेविकांच्या संपामुळे आयुष्मान कार्डची गती थंडावली

By हरी मोकाशे | Updated: January 13, 2024 19:07 IST

ग्रामीण भागातील सेवेवर परिणाम

लातूर : आशा स्वयंसेविका व गट प्रवर्तकांनी आपल्या मागण्यांची पूर्तता व्हावी म्हणून शुक्रवारपासून संप पुकारला आहे. त्याचा ग्रामीण भागातील आरोग्य सेवेवर परिणाम झाला आहे. शिवाय, आयुष्मान कार्ड काढण्याची गतीही मंदावली आहे.

ग्रामीण भागात आशा स्वयंसेविका महत्त्वाचा घटक आहे. त्या आरोग्य क्षेत्रातील ७० ते ७२ प्रकारची विविध कामे करीत असतात. त्यात प्रामुख्याने गरोदर मातांची काळजी घेणे, बाळांचे लसीकरण करुन घेणे, प्रसूतीपश्चात जन्मजात बाळ व मातेच्या भेटी घेणे, मधुमेह, रक्तदाब तपासणी करुन घेणे, माता व किशोरवयीन मुलींच्या बैठका घेऊन आरोग्यविषयक माहिती देणे अशा प्रकारची विविध कामे करतात. याशिवाय, आयुष्मान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य योजना व महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजेनच्या लाभासाठी आयुष्मान कार्ड काढण्याचे काम करतात.

आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तकांना दिवाळी भेट देण्यात यावी, मोबदल्यात वाढ करण्यात यावी, अशा मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य आशा- गटप्रवर्तक कर्मचारी कृती समितीच्या वतीने गत ऑक्टोबर- नोव्हेंबरमध्ये राज्यव्यापी आंदोलन करण्यात आले. तेव्हा राज्याच्या आरोग्य मंत्र्यांनी दिवाळी भेट, मोबदल्यात वाढ करण्यात येईल, असे जाहीर केले. मात्र, अद्यापही आश्वासनांची पूर्तता केली नाही. त्यामुळे आशा व गटप्रवर्तकांनी शुक्रवारपासून बेमुदत आंदोलन सुरु केले आहे.

आता दररोज १२०० आयुष्मान कार्ड...आयुष्मान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य योजना व महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनेच्या लाभासाठी आयुष्मान कार्ड आवश्यक आहे. जिल्ह्यात १८ लाख २३ हजार आयुष्मान कार्ड काढण्याचे उद्दिष्ट आहे. आतापर्यंत ५ लाख २५ हजार कार्ड काढण्यात आले आहेत. आशा स्वयंसेविकांच्या मदतीने दररोज जवळपास ५ ते ६ हजार कार्ड काढण्यात येत होते. मात्र, आंदोलनामुळे १ हजार २०० कार्ड काढले जात आहेत. कार्ड काढण्याची गती मंदावली आहे.

मागण्यांची पूर्तता करावी...राज्य शासनाने दिलेल्या आश्वासनांची पूर्तता केली नाही. त्यामुळे आशा स्वयंसेविका, गटप्रवर्तकांनी शुक्रवारपासून संप पुकारला आहे. आश्वासनपूर्ती झाल्याशिवाय आंदोलन मागे घेतले जाणार नाही, असे कृती समितीचे भगवान देशमुख यांनी सांगितले.

 

टॅग्स :laturलातूरHealthआरोग्यagitationआंदोलन