शहरं
Join us  
Trending Stories
1
नवले पुलावर मृत्यूचा तांडव..! कंटेनर ट्रॅव्हलवर पलटी, कार पेटली, आठ जणांचे बळी
2
लाल किल्ला ब्लास्ट : एक-दोन नव्हे, तब्बल 32 कारचा होणार होता वापर; दहशतवाद्यांनी आखला होता 'बाबरीचा' बदला घेण्याचा भयंकर कट
3
अजून किती निष्पाप लोकांचे बळी घेणार? प्रशासन ठोस उपाययोजना कधी करणार? स्थानिकांचा सवाल
4
'माझ्या मृत्युला आईच जबाबदार, तिला कडक शिक्षा करा', सोलापुरात वकील तरुणाने बेडरुममध्येच संपवले आयुष्य
5
दिल्लीनंतर आता मुंबईच्या आकाशावर जीपीएस स्पूफिंगचे सावट; सिग्नलमध्ये बिघाडबाबत एएआयने दिला इशारा
6
बिहारमध्ये NDA कडून मुख्यमंत्रीपदाची शपथ कोण घेणार? मतमोजणीपूर्वीच चिराग पासवान यांच्या पक्षाचा मोठा दावा!
7
'इलेक्ट्रिक व्हेईकल्सना प्रोत्साहन देण्यासाठी पेट्रोल-डिझेलवरील लग्झरी वाहनांवर...', सर्वोच्च न्यायालयाचा केंद्राला सल्ला
8
Pune Accident : नवले पुलावर भीषण अपघात; अनेक वाहनं पेटली..! बचावकार्य सुरू
9
Travel : भरपूर फिरा, फोटो काढा अन् धमाल करा! 'या' देशात जाताच १० हजार भारतीय रुपये होतात ३० लाख!
10
'आम्ही अशी शिक्षा देणार की जग बघत बसेल’; दिल्ली स्फोटांवर अमित शहांचा गंभीर इशारा
11
पुलवामा हल्ल्याच्या मास्टरमाईंडची पत्नी डॉक्टर शाहीनच्या संपर्कात; जैशच्या 'महिला ब्रिगेड' मोठं कनेक्शन उघड!
12
5 लाख सॅलरी अन्...! हनिमूनला जाण्याच्या तयारीत बसलेली डॉक्टर रुकैया कोण? दहशतवादी आदिलच्या लग्नात सहभागी झालेले सगळेच रडारवर
13
"अजित पवारांनी सांभाळून राहावं, त्यांना बळ देऊ नये"; मनोज जरांगे भडकले, धनंजय मुंडेंबद्दल काय बोलले?
14
दिल्ली ब्लास्ट : 'अल-फलाह'चा नेमका अर्थ काय? युनिव्हर्सिटीचा फाउंडर कोण? सुनावली गेलीये तीन वर्षांची शिक्षा!
15
दिल्ली स्फोट प्रकरणात पोलिसांची मोठी कारवाई; उत्तर प्रदेशातील हापुडमधून डॉ. फारुक ताब्यात...
16
फ्रीचं वायफाय पडेल महागात! सार्वजनिक वाय-फाय वापरणाऱ्यांना गुगलने दिला मोठा इशारा; कनेक्ट कराल तर.. 
17
बदल्याची आग! 'तो' वाद टोकाला गेला, पुतण्याने आईच्या मदतीने काढला काकीचा काटा अन्...
18
पंजाबमध्ये दहशतवादी मॉड्यूलचा पर्दाफाश, १० ISI एजंटना अटक; मोठ्या हल्ल्याचा कट रचला होता
19
8th Central Pay Commission : आठव्या वेतन आयोगात या कर्मचाऱ्यांचा समावेश होणार, नवीन नियम जाणून घ्या
20
३२ वर्षांची मुलगी एआयच्या प्रेमात पडली, 'आय लव्ह यु' म्हणाली अन् लग्नगाठ बांधली! VIRAL झाला लग्नाचा व्हिडीओ
Daily Top 2Weekly Top 5

तापमानाचा पारा चढल्याने पाणीटंचाईचे चटकेही वाढले; लातुरात १०२ गावांना टंचाईच्या झळा 

By हरी मोकाशे | Updated: June 7, 2023 19:28 IST

प्रशासनाकडून ९० गावांना पाणीपुरवठा करण्यात येत आहे. त्यामुळे उर्वरित १२ गावे अद्यापही तहानलेलीच आहेत.

लातूर : यंदाच्या उन्हाळ्यात तापमानाचा पारा वाढल्याने जीवाची काहिली होत आहे. तसेच जलस्त्रोतही आटत आहेत. परिणामी, जिल्ह्यातील १०२ गावांत तीव्र पाणीटंचाईच्या झळा जाणवत आहेत. त्यामुळे उन्हाचे चटके सहन करीत नागरिकांना पाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे. दरम्यान, टंचाई निवारणासाठी प्रशासनाने अधिग्रहणाद्वारे ९० गावांना पाणीपुरवठा सुरु केला आहे.

यंदाच्या उन्हाळ्याच्या प्रारंभापासूनच अधिक उष्णता जाणवण्यास सुुरुवात झाली होती. त्यामुळे उन्हाळा असह्य होणार आणि पाणीटंचाईची तीव्रता जाणवणार असे नागरिक, प्रशासनाने गृहित धरले होते. गत पावसाळ्यात वार्षिक सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाला होता. मात्र, रविराजा रौद्ररुप धारण केल्याने जलसाठ्यातील पाण्याच्या बाष्पीभवनाचा वेगही वाढला. त्यामुळे एप्रिलपासून जिल्ह्यातील काही गावांना पाणीटंचाईच्या झळा जाणवण्यास सुरुवात झाली. मे आणि जूनमध्ये टंचाईची तीव्रता आणखीन वाढली आहे.

यंदाच्या उन्हाळ्यात सूर्यनारायण जणू आग ओकल्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. परिणामी, १२ मे रोजी कमाल तापमान ४१.५ अं.से. पर्यंत पोहोचल्याची नोंद लातूरच्या गळीत धान्य संशोधन केंद्रात झाली आहे. त्या तुलनेत सध्या उन्हाचा पारा उतरला असला तरी दुपारी १२ ते ४ वा. पर्यंत उन्हाचे चटके नेहमीप्रमाणे जाणवत आहेत. त्यामुळे जीवाची घालमेल होत आहे.

अहमदपूर तालुक्यात सर्वाधिक टंचाई...जिल्ह्यातील १०२ गावांत पाणीटंचाई जाणवत आहे. दरम्यान, टंचाई निवारणासाठी प्रशासनाने अधिग्रहणाद्वारे ९० गावांना पाणीपुरवठा सुरु केला आहे. सर्वाधिक पाणीटंचाई अहमदपूर तालुक्यात जाणवत असून ३५ गावे व वाड्यांत अधिग्रहणे करण्यात आली आहेत. लातूर तालुक्यात ५, औसा- २६, निलंगा- ३, रेणापूर- ५, चाकूर- ६, उदगीर- ५, जळकोट तालुक्यातील ५ गावांत अधिग्रहणांद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे.

अद्याप टँकर सुरु नाही...यंदा उन्हाची तीव्रता वाढली असल्याने टंचाईचे चटकेही वाढले आहेत. मात्र, जिल्ह्यात अद्यापही टँकर सुरु झाले नाही. अधिग्रहणाच्या माध्यमातून पाणीपुरवठा करण्यात येत आहे. विशेष म्हणजे, शिरुर अनंतपाळ आणि देवणी तालुक्यातील एकाही गावात पाणीटंचाई जाणवत नाही. त्यामुळे ही दोन तालुके सध्या तरी टंचाईमुक्त आहेत, असे जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाकडून सांगण्यात आले.

१२ गावे तहानलेलीच...जिल्ह्यातील एकूण १०२ गावे व वाड्यांमध्ये पाणीटंचाई जाणवत आहे. प्रशासनाकडून ९० गावांना पाणीपुरवठा करण्यात येत आहे. त्यामुळे उर्वरित १२ गावे अद्यापही तहानलेलीच आहेत. तात्काळ पाणीपुरवठ्याची मागणी होत आहे.

दिनांक             किमान तापमान             कमाल तापमान

१ जून             २०.५                         ४०.५२ जून             २१.०                         ४१.०३ जून             २०.५                         ४०.०४ जून             २०.५                        ३९.५५ जून             २०.५                         ३९.०६ जून             २०.०                         ३८.०७ जून             २१.०                         ३९.५

टॅग्स :Waterपाणीlaturलातूरdroughtदुष्काळ