शहरं
Join us  
Trending Stories
1
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
2
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
3
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
4
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
5
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
6
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
7
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
8
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
9
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
10
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
11
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
12
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
13
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
14
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
15
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
16
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
17
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
18
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
19
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
20
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?

तापमानाचा पारा चढल्याने पाणीटंचाईचे चटकेही वाढले; लातुरात १०२ गावांना टंचाईच्या झळा 

By हरी मोकाशे | Updated: June 7, 2023 19:28 IST

प्रशासनाकडून ९० गावांना पाणीपुरवठा करण्यात येत आहे. त्यामुळे उर्वरित १२ गावे अद्यापही तहानलेलीच आहेत.

लातूर : यंदाच्या उन्हाळ्यात तापमानाचा पारा वाढल्याने जीवाची काहिली होत आहे. तसेच जलस्त्रोतही आटत आहेत. परिणामी, जिल्ह्यातील १०२ गावांत तीव्र पाणीटंचाईच्या झळा जाणवत आहेत. त्यामुळे उन्हाचे चटके सहन करीत नागरिकांना पाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे. दरम्यान, टंचाई निवारणासाठी प्रशासनाने अधिग्रहणाद्वारे ९० गावांना पाणीपुरवठा सुरु केला आहे.

यंदाच्या उन्हाळ्याच्या प्रारंभापासूनच अधिक उष्णता जाणवण्यास सुुरुवात झाली होती. त्यामुळे उन्हाळा असह्य होणार आणि पाणीटंचाईची तीव्रता जाणवणार असे नागरिक, प्रशासनाने गृहित धरले होते. गत पावसाळ्यात वार्षिक सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाला होता. मात्र, रविराजा रौद्ररुप धारण केल्याने जलसाठ्यातील पाण्याच्या बाष्पीभवनाचा वेगही वाढला. त्यामुळे एप्रिलपासून जिल्ह्यातील काही गावांना पाणीटंचाईच्या झळा जाणवण्यास सुरुवात झाली. मे आणि जूनमध्ये टंचाईची तीव्रता आणखीन वाढली आहे.

यंदाच्या उन्हाळ्यात सूर्यनारायण जणू आग ओकल्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. परिणामी, १२ मे रोजी कमाल तापमान ४१.५ अं.से. पर्यंत पोहोचल्याची नोंद लातूरच्या गळीत धान्य संशोधन केंद्रात झाली आहे. त्या तुलनेत सध्या उन्हाचा पारा उतरला असला तरी दुपारी १२ ते ४ वा. पर्यंत उन्हाचे चटके नेहमीप्रमाणे जाणवत आहेत. त्यामुळे जीवाची घालमेल होत आहे.

अहमदपूर तालुक्यात सर्वाधिक टंचाई...जिल्ह्यातील १०२ गावांत पाणीटंचाई जाणवत आहे. दरम्यान, टंचाई निवारणासाठी प्रशासनाने अधिग्रहणाद्वारे ९० गावांना पाणीपुरवठा सुरु केला आहे. सर्वाधिक पाणीटंचाई अहमदपूर तालुक्यात जाणवत असून ३५ गावे व वाड्यांत अधिग्रहणे करण्यात आली आहेत. लातूर तालुक्यात ५, औसा- २६, निलंगा- ३, रेणापूर- ५, चाकूर- ६, उदगीर- ५, जळकोट तालुक्यातील ५ गावांत अधिग्रहणांद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे.

अद्याप टँकर सुरु नाही...यंदा उन्हाची तीव्रता वाढली असल्याने टंचाईचे चटकेही वाढले आहेत. मात्र, जिल्ह्यात अद्यापही टँकर सुरु झाले नाही. अधिग्रहणाच्या माध्यमातून पाणीपुरवठा करण्यात येत आहे. विशेष म्हणजे, शिरुर अनंतपाळ आणि देवणी तालुक्यातील एकाही गावात पाणीटंचाई जाणवत नाही. त्यामुळे ही दोन तालुके सध्या तरी टंचाईमुक्त आहेत, असे जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाकडून सांगण्यात आले.

१२ गावे तहानलेलीच...जिल्ह्यातील एकूण १०२ गावे व वाड्यांमध्ये पाणीटंचाई जाणवत आहे. प्रशासनाकडून ९० गावांना पाणीपुरवठा करण्यात येत आहे. त्यामुळे उर्वरित १२ गावे अद्यापही तहानलेलीच आहेत. तात्काळ पाणीपुरवठ्याची मागणी होत आहे.

दिनांक             किमान तापमान             कमाल तापमान

१ जून             २०.५                         ४०.५२ जून             २१.०                         ४१.०३ जून             २०.५                         ४०.०४ जून             २०.५                        ३९.५५ जून             २०.५                         ३९.०६ जून             २०.०                         ३८.०७ जून             २१.०                         ३९.५

टॅग्स :Waterपाणीlaturलातूरdroughtदुष्काळ