शहरं
Join us  
Trending Stories
1
Ajit Pawar: पुणे जिल्ह्यात तीन महापालिका होणार; चाकण, हिंजवडी आणि..., अजित पवारांची मोठी घोषणा
2
सत्ताधारी, निवडणूक आयोगाने देशाला फसवले; संपूर्ण निवडणूक प्रणालीची झाली चोरी; राहुल गांधी यांचा आरोप
3
चीनच्या सर्वांत मोठ्या धरणाने भारत सतर्क; ब्रह्मपुत्रा नदीशी संबंधित सर्व घडामोडींवर सरकारचे बारीक लक्ष
4
अत्याचाराच्या प्रकरणातून सोडवण्यासाठी अजितदादांच्या आमदाराला फोन; उपमुख्यमंत्री म्हणाले, 'तुमची जीभ कशी रेटते'
5
Trump Tariff On India: ट्रम्प यांचं टॅरिफ संधी ठरू शकते का? कॉर्पोरेट इंडिया म्हणतोय भारत बनू शकतो नवा 'पॉवरहाऊस'
6
अभिनेत्री हुमा कुरेशीच्या भावाची निर्घृणपणे हत्या; दिल्लीत दोघांना अटक, क्षुल्लक कारणावरुन झाला वाद
7
सिद्धिविनायकाच्या दर्शनाला लॅपटॉप, कॅमेरा साेबत नकाे
8
आजचे राशीभविष्य, ०८ ऑगस्ट २०२५: पद-पैसा-प्रतिष्ठा वाढ, सुख-सुबत्ता, कल्याणाचा दिवस
9
डबल जॉली, डबल ट्रबल! सौरभ शुक्लांनी दिलं 'जॉली एलएलबी ३'चं मोठं अपडेट, कधी रिलीज होणार?
10
ठकासारखे वागू नका, कायद्याच्या चौकटीत राहा; ईडीला सुप्रीम कोर्टाने पुन्हा एकदा फटकारले
11
नेपाळची सक्ती; किमान ३ मुलांना जन्म द्या!
12
रक्षाबंधन २०२५: राखी बांधताना तुमच्याकडून ‘ही’ चूक तर होत नाही ना? पाहा, योग्य पद्धत-नियम
13
निवडणूक प्रक्रियेत मोठा घोटाळा! 'या' पाच प्रकारे झाली ‘मतांची चोरी’, राहुल गांधींचा दावा; विचारले असे प्रश्न
14
रक्षाबंधन २०२५: गणपती, स्वामींना राखी नक्की बांधा; सदैव रक्षण-कृपा, कायम सोबत असतील स्वामी!
15
अमेरिकेत महागाईचा भडका; टॅरिफमुळे भारतीय वस्तूंवर लावलेले ५०% आयात शुल्क ग्राहकांना भोवणार
16
गजलक्ष्मी सौभाग्य योगात रक्षाबंधन: ५ मूलांक लकी, बंपर कमाई; प्रसन्न होईल लक्ष्मी, शुभच घडेल!
17
लॅपटॉप जास्त वेळ मांडीवर अन् फोन खिशात ठेवाल तर वडील होण्याचे स्वप्न राहील अधुरे; नपुंसक होण्याचा धोका
18
मला व्यक्तिश: खूप मोठी किंमत चुकवावी लागणार आहे, नेमकं काय म्हणाले मोदी?
19
रेव्ह पार्टीत नशा देऊन महिलांवर लैंगिक अत्याचार, प्रांजल खेवलकर अडचणीत; मोबाइलमध्ये सापडला अश्लील छायाचित्रांचा साठा!
20
उत्तरकाशीच्या धरालीत १००हून अधिक लोक बेपत्ता; ४०० जणांना वाचवले, ३०० यात्रेकरू सुरक्षित

तापमानाचा पारा चढल्याने पाणीटंचाईचे चटकेही वाढले; लातुरात १०२ गावांना टंचाईच्या झळा 

By हरी मोकाशे | Updated: June 7, 2023 19:28 IST

प्रशासनाकडून ९० गावांना पाणीपुरवठा करण्यात येत आहे. त्यामुळे उर्वरित १२ गावे अद्यापही तहानलेलीच आहेत.

लातूर : यंदाच्या उन्हाळ्यात तापमानाचा पारा वाढल्याने जीवाची काहिली होत आहे. तसेच जलस्त्रोतही आटत आहेत. परिणामी, जिल्ह्यातील १०२ गावांत तीव्र पाणीटंचाईच्या झळा जाणवत आहेत. त्यामुळे उन्हाचे चटके सहन करीत नागरिकांना पाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे. दरम्यान, टंचाई निवारणासाठी प्रशासनाने अधिग्रहणाद्वारे ९० गावांना पाणीपुरवठा सुरु केला आहे.

यंदाच्या उन्हाळ्याच्या प्रारंभापासूनच अधिक उष्णता जाणवण्यास सुुरुवात झाली होती. त्यामुळे उन्हाळा असह्य होणार आणि पाणीटंचाईची तीव्रता जाणवणार असे नागरिक, प्रशासनाने गृहित धरले होते. गत पावसाळ्यात वार्षिक सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाला होता. मात्र, रविराजा रौद्ररुप धारण केल्याने जलसाठ्यातील पाण्याच्या बाष्पीभवनाचा वेगही वाढला. त्यामुळे एप्रिलपासून जिल्ह्यातील काही गावांना पाणीटंचाईच्या झळा जाणवण्यास सुरुवात झाली. मे आणि जूनमध्ये टंचाईची तीव्रता आणखीन वाढली आहे.

यंदाच्या उन्हाळ्यात सूर्यनारायण जणू आग ओकल्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. परिणामी, १२ मे रोजी कमाल तापमान ४१.५ अं.से. पर्यंत पोहोचल्याची नोंद लातूरच्या गळीत धान्य संशोधन केंद्रात झाली आहे. त्या तुलनेत सध्या उन्हाचा पारा उतरला असला तरी दुपारी १२ ते ४ वा. पर्यंत उन्हाचे चटके नेहमीप्रमाणे जाणवत आहेत. त्यामुळे जीवाची घालमेल होत आहे.

अहमदपूर तालुक्यात सर्वाधिक टंचाई...जिल्ह्यातील १०२ गावांत पाणीटंचाई जाणवत आहे. दरम्यान, टंचाई निवारणासाठी प्रशासनाने अधिग्रहणाद्वारे ९० गावांना पाणीपुरवठा सुरु केला आहे. सर्वाधिक पाणीटंचाई अहमदपूर तालुक्यात जाणवत असून ३५ गावे व वाड्यांत अधिग्रहणे करण्यात आली आहेत. लातूर तालुक्यात ५, औसा- २६, निलंगा- ३, रेणापूर- ५, चाकूर- ६, उदगीर- ५, जळकोट तालुक्यातील ५ गावांत अधिग्रहणांद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे.

अद्याप टँकर सुरु नाही...यंदा उन्हाची तीव्रता वाढली असल्याने टंचाईचे चटकेही वाढले आहेत. मात्र, जिल्ह्यात अद्यापही टँकर सुरु झाले नाही. अधिग्रहणाच्या माध्यमातून पाणीपुरवठा करण्यात येत आहे. विशेष म्हणजे, शिरुर अनंतपाळ आणि देवणी तालुक्यातील एकाही गावात पाणीटंचाई जाणवत नाही. त्यामुळे ही दोन तालुके सध्या तरी टंचाईमुक्त आहेत, असे जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाकडून सांगण्यात आले.

१२ गावे तहानलेलीच...जिल्ह्यातील एकूण १०२ गावे व वाड्यांमध्ये पाणीटंचाई जाणवत आहे. प्रशासनाकडून ९० गावांना पाणीपुरवठा करण्यात येत आहे. त्यामुळे उर्वरित १२ गावे अद्यापही तहानलेलीच आहेत. तात्काळ पाणीपुरवठ्याची मागणी होत आहे.

दिनांक             किमान तापमान             कमाल तापमान

१ जून             २०.५                         ४०.५२ जून             २१.०                         ४१.०३ जून             २०.५                         ४०.०४ जून             २०.५                        ३९.५५ जून             २०.५                         ३९.०६ जून             २०.०                         ३८.०७ जून             २१.०                         ३९.५

टॅग्स :Waterपाणीlaturलातूरdroughtदुष्काळ