शहरं
Join us  
Trending Stories
1
India Into Final : सात वेळच्या चॅम्पियनसमोर ८ वर्षांपूर्वीचा रुबाब! विक्रमी विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल
2
IND vs AUS : "ना फिफ्टीचं सेलिब्रेशन, ना सेंच्युरीचं! विजयी धाव घेताच जेमिमाला अश्रू अनावर; म्हणाली...
3
सरकार शेतकरी कर्जमाफी कधीपर्यंत करणार? मुख्यमंत्री फडणवीसांनी बैठकीनंतर सांगितला प्लॅन
4
"मुख्यमंत्री करा म्हणून किती लाचारी करायची?"; राज ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना डिवचलं, चढवला हल्ला
5
Jemimah Rodrigues Century : शाब्बास जेमी! घरच्या मैदानात अविस्मरणीय शतकी खेळीसह लुटली मैफील
6
Sangli Crime: ‘व्हाईट हाऊस हॉटेल’च्या बारमध्ये मित्रानेच चिरला गळा, तरुणाचा जागेवरच मृत्यू
7
एकीकडे दिलासा, मात्र दुसरीकडे बच्चू कडू, राजू शेट्टी यांच्यासह हजारो शेतकरी आंदोलकांविरोधात गुन्हा दाखल
8
शेतकऱ्यांच्या कायमस्वरूपी कर्जमुक्तीसाठी उच्चाधिकार समितीची स्थापना; मुख्यमंत्री फडणवीस-बच्चू कडू यांच्या बैठकीत निर्णय
9
‘चाचा पीएमओ है हमारे’, एअरपोर्ट ऑथोरिटीत नोकरी मिळवून देण्याच्या नावाखाली बंटी-बबलीकडून ७ लाखांचा गंडा
10
Phaltan Doctor Update: "हॉटेलमध्ये हातावर सुसाईड नोट दिसली नाही, पोस्टमार्टम रुममध्ये दिसली"; वकिलाने कोर्टासमोर मांडली शंका
11
Maoist Leader: ‘देवजी’च्या महासचिवपदी निवडीचा दावा सपशेल खोटा, आत्मसमर्पण करणाऱ्या 'चंद्राण्णा'वर साधला निशाणा
12
IND vs AUS : ७ वेळच्या वर्ल्ड चॅम्पियनसमोर जेमी-हरमनप्रीतची हवा; दोघींनी मिळून सेट केला नवा विक्रम
13
बिहार निवडणुकीत काँग्रेस-राजदला किती जागा मिळणार?; PM नरेंद्र मोदींची 'भविष्यवाणी'
14
विदर्भाला बसला ‘माेंथा’ चक्रीवादळाचा फटका ! पुढचे तीन दिवस अवकाळीचे संकट ; नोव्हेंबरपर्यंत जोर राहणार कायम?
15
शिवरायांच्या गडकिल्ल्यांवर मोदींच्या नावाने उघडणार 'नमो पर्यटन केंद्र'; राज ठाकरेंचा तीव्र विरोध
16
खासगी क्षणात अडथळा ठरत होती प्रेयसीची चिमुकली! प्रियकरानं उचललं टोकाचं पाऊल? जाणून तुमचाही थरकाप उडेल! 
17
याला म्हणतात शेअरचा धमाका...! गुंतवणूकदारांना केलं मालामाल; १०००० चे फक्त १० महिन्यांत बनवले 5 लाख; अजूनही तेजी कायम
18
महाराष्ट्रातला मोर्चा दणदणीत झाला पाहिजे, राज ठाकरेंचं आवाहन; मतचोरीवरून मेळाव्यात केले सादरीकरण
19
सरन्यायाधीश गवई यांच्यानंतर पुढचे सरन्यायाधीश कोण असतील? सरकारने केली मोठी घोषणा
20
Bihar Election: नितीश कुमारी की, तेजस्वी यादव, बिहारमध्ये कोणाचे सरकार येणार? फलोदी सट्टा बाजाराचा कौल काय?

लातूर जिल्ह्यातील आणखीन एक मध्यम प्रकल्प काेरडा; ५०१ गावांमध्ये ठणठणाट!

By हरी मोकाशे | Updated: May 30, 2024 16:43 IST

उन्हामुळे टंचाई वाढली : ३९८ गावांना अधिग्रहणाद्वारे पाणीपुरवठा

लातूर : वैशाख वणव्यामुळे होरपळ वाढली आहे. त्याचबरोबर जलसाठ्यातही झपाट्याने घट होत आहे. दरम्यान, आणखीन एक मध्यम प्रकल्प जोत्याखाली गेल्याने त्यावर अवलंबून असलेल्या गावांमध्ये टंचाईची दाहकता वाढली आहे. सध्या जिल्ह्यातील ५०१ गावांना टंचाईचे चटके बसत आहे. त्यापैकी ३९८ गावांना ४८५ अधिग्रहणाद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे.

गत पावसाळ्यात वार्षिक सरासरीच्या तुलनेत अल्प पर्जन्यमान झाल्याने प्रकल्पांमध्ये अपेक्षित जलसाठा झाला नाही. त्यामुळे जिल्ह्यातील काही गावांना डिसेंबरपासूनच पाणीटंचाईच्या झळा जाणवू लागल्या. वाढत्या उन्हामुळे बाष्पीभवनाचा वेग वाढला आहे. त्यामुळे जलसाठे आटू लागले आहेत. तसेच जलस्त्रोतही कोरडे पडत आहेत. जिल्ह्यातील आठ मध्यम प्रकल्पांपैकी तीन मध्यम प्रकल्प यापूर्वीच जोत्याखाली गेले होते. दरम्यान आता आणखीन एक मध्यम प्रकल्प जोत्याखाली गेल्याने पाणीटंचाई वाढली आहे.

चार प्रकल्पांत उपयुक्त पाणी शून्य...जिल्ह्यातील तावरजा, व्हटी आणि तिरु मध्यम प्रकल्प यापूर्वीच जोत्याखाली गेले आहेेत. त्यामुळे तिथे उपयुक्त जलसाठा शून्य टक्के आहे. वाढत्या उन्हामुळे आता शिरुर अनंतपाळ तालुक्यातील घरणी मध्यम प्रकल्प जोत्याखाली गेला आहे. त्यामुळे तिथेही उपयुक्त जलसाठा शून्य टक्के आहे. सध्या रेणापूर प्रकल्पात ०.५७० दलघमी, देवर्जन- ०.३९९, साकोळ- ०.४९० आणि मसलगा मध्यम प्रकल्पात १.८२५ दलघमी उपयुक्त पाणीसाठा आहे. चार मध्यम प्रकल्पात एकूण ३.२८४ दलघमी उपयुक्त पाणीसाठा आहे.

चार प्रकल्पांमध्ये २.६९ टक्के साठा...प्रकल्प - पाणी (टक्के)तावरजा - ००व्हटी - ००रेणापूर - १.७०तिरु - ००देवर्जन - ३.७४साकोळ - ४.४८घरणी - ००मसलगा - १३.४२एकूण - २.६९

लघु तलावांमध्ये ६.८६ टक्के साठा...लघु पाटबंधारे विभागाअंतर्गत जिल्ह्यात एकूण १३४ तलाव आहेत. त्यात सध्या २१.५७४ दलघमी उपयुक्त पाणीसाठा आहे. तो ६.८६ टक्के आहे. दरम्यान, सततच्या वाढत्या उन्हामुळे तलावातील साठ्यात झपाट्याने घट होत आहे.

टंचाई निवारणासाठी ४८५ अधिग्रहणे...सध्या जिल्ह्यातील ४२२ गावे आणि ७९ वाड्या अशा एकूण ५०१ गावांना पाणीटंचाई जाणवत आहे. त्यामुळे या गावांनी टंचाई निवारणासाठी ७३४ प्रस्ताव दाखल केले आहेत. पंचायत समितीने प्रत्यक्ष पाहणीनंतर २७ गावांचे प्रस्ताव वगळले आहेत. ४५८ गावांचे ५९९ प्रस्ताव तहसील कार्यालयाकडे सादर केले. त्यातील ३९८ गावांसाठी ४८५ अधिग्रहणे मंजूर करण्यात येऊन पाणीपुरवठा सुरु आहे.

टॅग्स :Waterपाणीlaturलातूर