शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेनं ओसामा संपवला, पण त्याच्या बायकांचं काय झालं? पाकिस्तानच्या माजी राष्ट्रपतीच्या सहकाऱ्यानं सागितलं
2
IND vs PAK: गंभीरनं टीम इंडियातील खेळाडूंना स्पष्ट सांगितलंय की...; सहाय्यक कोच नेमकं काय म्हणाले?
3
याला म्हणतात 'दृढनिश्चय'...! मणिपूरमध्ये पाऊस बनला अडथळा, मग पंतप्रधान मोदींनी 'हा' मार्ग अवलंबला! 
4
BAN vs SL : श्रीलंकेचा डंका! एका पराभवासह बांगलादेश संघ स्पर्धेतून OUT होण्याच्या उंबरठ्यावर
5
नेपाळ हिंसाचारासंदर्भात CM योगी आदित्यनाथ यांचं मोठं विधान; म्हणाले - "छोट्या-छोट्या गोष्टींकडे..."
6
चार दिवसांत थंड व्हाल, हिंम्मत असेल तर कारागृहात पाठवून दाखवा; प्रशांत किशोर यांचं संजय जायसवाल यांना आव्हान
7
२०७ खुनाचा आरोप, तिला पकडण्यासाठी होते २ कोटींचे इनाम ! पण तिच्या 'या' निर्णयाने तिलाच मिळतील २५ लाख
8
कमाल झाली! हसरंगाचा बॉल स्टंपला लागला, पण नशिबाच्या जोरावर बॅटर Not Out राहून चमकला (VIDEO)
9
शेअर असावा तर असा...! 5 वर्षांत लखपतींना केलं करोडपती; TV-AC अन् वॉशिंग मशीन तयार करते कंपनी
10
"होय, मतचोरी झाली !" मत चोरीतूनच भाजप सत्तेत; काँग्रेसच्या आरोपाला नक्षल्यांचे समर्थन
11
Women's Asia Cup 2025 Final : भारताची फायनलमध्ये धडक! चीनचा हिशोब चुकता करुन इतिहास रचण्याची संधी
12
IND vs PAK Head To Head Record : पाकचा नवा डाव; पण टीम इंडियाविरुद्ध फिकी ठरेल त्यांची ही चाल, कारण...
13
लाईफबॉय साबण ८, डव शाम्पू ५५, टूथपेस्ट १६ रुपयांनी स्वस्त झाली; हिंदुस्तान युनिलिव्हरची यादी आली...   
14
आता पश्चाताप करून काय उपयोग? रोखण्याचा प्रयत्न करूनही तरुणीनं खोल पाण्यात उडी घेतली; थरकाप उडवणारा VIDEO
15
सासऱ्यावर गोळी झाडली, स्वतःला वाचवण्यासाठी पळत सुटला अन् पुराच्या पाण्यात पडला जावई! पुढे जे झालं...
16
असुरक्षित! पहाटे पुणे स्टेशनला उतरलेल्या तरुणाने पैसे न दिल्याने पोटात चाकूने वार
17
उल्हासनगरातील हॅन्ड्रेड बारमध्ये महिला वेटर्सचे अश्लील चाळे, महिला वेटर्ससह ९ जणांवर गुन्हा 
18
घरात ‘टॉप टू बॉटम’ डॉक्टर ; पण आयएएस झाले आणि लोकसेवेत आले...
19
योगेश आळेकरी यांना मिळाली नवीकोरी दुचाकी; पुढच्या प्रवासाला सुरुवात करणार पण...
20
Sonu Sood : दिलदार सुपरहिरो! "रोटी का कर्ज चुकाना है"; पंजाबमधील पूरग्रस्तांसाठी सोनू सूदचा पुढाकार

लातूर जिल्ह्यातील आणखीन एक मध्यम प्रकल्प काेरडा; ५०१ गावांमध्ये ठणठणाट!

By हरी मोकाशे | Updated: May 30, 2024 16:43 IST

उन्हामुळे टंचाई वाढली : ३९८ गावांना अधिग्रहणाद्वारे पाणीपुरवठा

लातूर : वैशाख वणव्यामुळे होरपळ वाढली आहे. त्याचबरोबर जलसाठ्यातही झपाट्याने घट होत आहे. दरम्यान, आणखीन एक मध्यम प्रकल्प जोत्याखाली गेल्याने त्यावर अवलंबून असलेल्या गावांमध्ये टंचाईची दाहकता वाढली आहे. सध्या जिल्ह्यातील ५०१ गावांना टंचाईचे चटके बसत आहे. त्यापैकी ३९८ गावांना ४८५ अधिग्रहणाद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे.

गत पावसाळ्यात वार्षिक सरासरीच्या तुलनेत अल्प पर्जन्यमान झाल्याने प्रकल्पांमध्ये अपेक्षित जलसाठा झाला नाही. त्यामुळे जिल्ह्यातील काही गावांना डिसेंबरपासूनच पाणीटंचाईच्या झळा जाणवू लागल्या. वाढत्या उन्हामुळे बाष्पीभवनाचा वेग वाढला आहे. त्यामुळे जलसाठे आटू लागले आहेत. तसेच जलस्त्रोतही कोरडे पडत आहेत. जिल्ह्यातील आठ मध्यम प्रकल्पांपैकी तीन मध्यम प्रकल्प यापूर्वीच जोत्याखाली गेले होते. दरम्यान आता आणखीन एक मध्यम प्रकल्प जोत्याखाली गेल्याने पाणीटंचाई वाढली आहे.

चार प्रकल्पांत उपयुक्त पाणी शून्य...जिल्ह्यातील तावरजा, व्हटी आणि तिरु मध्यम प्रकल्प यापूर्वीच जोत्याखाली गेले आहेेत. त्यामुळे तिथे उपयुक्त जलसाठा शून्य टक्के आहे. वाढत्या उन्हामुळे आता शिरुर अनंतपाळ तालुक्यातील घरणी मध्यम प्रकल्प जोत्याखाली गेला आहे. त्यामुळे तिथेही उपयुक्त जलसाठा शून्य टक्के आहे. सध्या रेणापूर प्रकल्पात ०.५७० दलघमी, देवर्जन- ०.३९९, साकोळ- ०.४९० आणि मसलगा मध्यम प्रकल्पात १.८२५ दलघमी उपयुक्त पाणीसाठा आहे. चार मध्यम प्रकल्पात एकूण ३.२८४ दलघमी उपयुक्त पाणीसाठा आहे.

चार प्रकल्पांमध्ये २.६९ टक्के साठा...प्रकल्प - पाणी (टक्के)तावरजा - ००व्हटी - ००रेणापूर - १.७०तिरु - ००देवर्जन - ३.७४साकोळ - ४.४८घरणी - ००मसलगा - १३.४२एकूण - २.६९

लघु तलावांमध्ये ६.८६ टक्के साठा...लघु पाटबंधारे विभागाअंतर्गत जिल्ह्यात एकूण १३४ तलाव आहेत. त्यात सध्या २१.५७४ दलघमी उपयुक्त पाणीसाठा आहे. तो ६.८६ टक्के आहे. दरम्यान, सततच्या वाढत्या उन्हामुळे तलावातील साठ्यात झपाट्याने घट होत आहे.

टंचाई निवारणासाठी ४८५ अधिग्रहणे...सध्या जिल्ह्यातील ४२२ गावे आणि ७९ वाड्या अशा एकूण ५०१ गावांना पाणीटंचाई जाणवत आहे. त्यामुळे या गावांनी टंचाई निवारणासाठी ७३४ प्रस्ताव दाखल केले आहेत. पंचायत समितीने प्रत्यक्ष पाहणीनंतर २७ गावांचे प्रस्ताव वगळले आहेत. ४५८ गावांचे ५९९ प्रस्ताव तहसील कार्यालयाकडे सादर केले. त्यातील ३९८ गावांसाठी ४८५ अधिग्रहणे मंजूर करण्यात येऊन पाणीपुरवठा सुरु आहे.

टॅग्स :Waterपाणीlaturलातूर