शहरं
Join us  
Trending Stories
1
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
2
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
3
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
4
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
5
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
6
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
7
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
8
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
9
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
10
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
11
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
12
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
13
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
14
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
15
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
16
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
17
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
18
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
19
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
20
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 

वीकेण्ड लॉकडाऊनमध्ये प्रशासनाची ढिलाई, अहमदपुरातील काही दुकाने सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2021 04:14 IST

अहमदपूर : दुसऱ्या टप्प्यात जिल्हाधिकाऱ्यांनी वीकेण्ड लॉकडाऊनचे आदेश दिले आहेत. मात्र, प्रशासनाच्या ढिलाईच्या धोरणामुळे सकाळच्या सत्रात शहरातील काही ठिकाणची ...

अहमदपूर : दुसऱ्या टप्प्यात जिल्हाधिकाऱ्यांनी वीकेण्ड लॉकडाऊनचे आदेश दिले आहेत. मात्र, प्रशासनाच्या ढिलाईच्या धोरणामुळे सकाळच्या सत्रात शहरातील काही ठिकाणची दुकाने सुरू होती. त्यामुळे खरेदीसाठी नागरिक रस्त्यावर पहावयास मिळत होते. शनिवारी वीकेण्ड लॉकडाऊनला प्रतिसाद मिळाला नसल्याचे दिसून आले.

जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग कमी झाला असल्याने मध्यंतरीच्या काळात जिल्हा प्रशासनाने काही निर्बंध शिथिल केले होते. मात्र, राज्य शासनाच्या आदेशानुसार पुन्हा जिल्हाधिकाऱ्यांनी वीकेण्ड लॉकडाऊन करण्याच्या सूचना केल्या. त्यानुसार गत आठवड्यात शहरात शनिवारी व रविवारी प्रतिसाद मिळाला. मात्र, शनिवारी सकाळपासून नागरिक मोठ्या प्रमाणावर रस्त्यावर होते. तसेच शहरातील काही ठिकाणची दुकानेही सुरू होती. वैद्यकीय व कृषी सेवा वगळता अन्य काही दुकानदारांनी अर्धे शटर उघडून व्यापार सुरू ठेवल्याचे पहावयास मिळाले.

दरम्यान, शहरातील ठोक भाजीपाला व्यापार बंद होता. पालिका, महसूल अथवा पोलीस प्रशासनाने दुकाने बंद करण्याविषयी व नागरिकांत जागृती करण्याबद्दल कुठलेही आवाहन केले नाही. तसेच सक्तीही केली नाही. त्यामुळे बहुतांश दुकाने दुपारपर्यंत सुरू होती. रस्त्यावर रहदारीही मोठ्या प्रमाणावर होती. सकाळच्या सत्रात ग्रामीण भागातून आलेल्या शेतकऱ्यांनी शहरातील मुख्य चौकात दुकाने थाटली होती.

बैठकीत घेतला होता निर्णय...

प्रशासन व व्यापाऱ्यांसोबत बंदविषयी बैठक घेऊन कडेकोट बंद करण्याविषयी सूचना केल्या होत्या. तेव्हा व्यापाऱ्यांनी स्वतः बंद ठेवणार असल्याचे सांगितले होते. त्यामुळे प्रशासनाने सक्ती केली नसल्याचे उपजिल्हाधिकारी प्रमोद कुदळे यांनी सांगितले.

कृषी सेवा केंद्र बंदचे आदेश...

जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार कृषी दुकाने पूर्णवेळ सुरू ठेवण्याच्या सूचना असतानाही प्रशासनाने बैठक घेऊन कृषी दुकाने शनिवार व रविवारी बंद ठेवण्याची तोंडी सूचना केली. मात्र, सध्या कीटकनाशक, औषधे खरेदीसाठी शेतकऱ्यांची धावपळ सुरू असून शेतकऱ्यांना अडचण येणार असल्याचे व्यापारी विनोद भुतडा यांनी सांगितले.

पालिकेकडून कारवाई...

सकाळच्या सत्रात काही दुकाने सुरू असल्याची माहिती मिळताच पालिकेच्या अतिक्रमणविरोधी पथकाने तीन आस्थापनांवर कारवाई केली आहे, असे मुख्याधिकारी त्र्यंबक कांबळे यांनी सांगितले.

नागरिकांनी स्वतः बंद पाळावा...

मागील सहा महिन्यांपासून आपण लॉकडाऊन व बंदविषयी प्रत्येकांना वेळोवेळी सूचना करीत आहोत. नागरिकांनी आताही स्वतःहून कोरोना व बंदचे नियम पाळावेत, असे आवाहन पोलीस निरीक्षक नानासाहेब लाकाळ यांनी केले.