शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदींना मिळाला त्रिनिदाद आणि टोबॅगोचा सर्वोच्च नागरी सन्मान; म्हणाले, "आपल्या नात्यात क्रिकेटचा रोमांच अन्..."
2
ENG vs IND 2nd Test Day 3 : 'त्या' दोघांनी दमवलं; तिसऱ्या दिवसाअखेर टीम इंडियानं १ विकेटही गमावली, पण...
3
"मी शेवटी 'जय गुजरात' म्हणालो कारण..."; एकनाथ शिंदे यांनी दिलं स्पष्टीकरण; ठाकरेंनाही डिवचलं...
4
मोठा दावा...! इराणवरील हल्ल्यानंतर कुठे गायब झाले अमेरिकेचे B-2 बॉम्बर विमान? एकाचे इमर्जन्सी लंडिंग अन्...
5
"मसूद अझहर कुठे? माहित नाही, भारतानं माहिती दिली तर..."; बिलावल भुट्टोंच्या विधानावर कुणाचाच विश्वास बसणार नाही
6
बेशुद्ध करणाऱ्या कोणत्याही स्प्रे चा वापर झाला नाही; कोंढवा अत्याचार प्रकरणात धक्कादायक खुलासा
7
"तीन दिवस एकच 'अंडरवेअर' अन्..."; पत्नीनं विचित्र कारणं सांगत पतीला पाठवलं 'डायव्हर्स लेटर', होतंय तुफान व्हायरल 
8
छोट्याखानी खेळीसह यशस्वी जैस्वालचा मोठा धमाका! द्रविड,सेहवाग अन् गंभीरच्या विक्रमाशी बरोबरी
9
कोंढवा बलात्कार प्रकरणात मोठा ट्विस्ट; ‘तो’ कुरिअर बॉय नसून तरुणीचा मित्र, अनेक धक्कादायक बाबी समोर
10
DSP सिराजचा 'सिक्सर' अन् आकाश दीपचा 'चौकार'! इंग्लंडचा संघ ४०७ धावांवर All Out
11
"कोण दुटप्पी? हे मराठी माणसाला लक्षात येतं...!"; ठाकरेंच्या विजयी मेळाव्यावर फडणवीसांची खरमरीत टीका, स्पष्टच बोलले
12
‘जय गुजरात’ म्हटलं म्हणजे शिंदेंचे महाराष्ट्रावरील प्रेम कमी झालं का? मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना सवाल
13
"देशाला दिशा देणाऱ्या महाराष्ट्रात वाढत्या शेतकरी आत्महत्या भूषणावह नाहीत"; काँग्रेसचे टीकास्त्र
14
देशाच्या आरोग्याचे बजेट ३७ हजार कोटींवरून १ लाख कोटींवर नेण्याचे काम पंतप्रधान मोदींनी केले - अमित शाह
15
“नोंदणीचा ‘एक टक्का’ निधी थेट स्थानिक स्वराज्य संस्थांना देण्याचा विचार”: चंद्रशेखर बावनकुळे
16
'पंत तूने क्या किया!' कॅच नव्हे त्यानं टीम इंडियाला टेन्शन फ्री करण्याची संधी सोडली
17
"ते नेमकं काय म्हणाले माहित नाही, मी..."; एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'वर अजित दादांची पहिली प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
18
नीचभंग दशांक योग: ८ राशींना पद-पैसा-लाभ, ४ ग्रहांची साथ; विठ्ठलाचे वरदान, शुभ-कल्याणच होईल!
19
‘जय गुजरात’वरून टीका; शिंदे गटाच्या नेत्यांनी उद्धव ठाकरेंचा ‘तो’ व्हिडिओच दाखवला, दिले उत्तर
20
महाराष्ट्रात मराठी शिकण्याचा आग्रह करू शकतो, पण दुराग्रह करू शकत नाही- CM देवेंद्र फडणवीस

केंद्रप्रमुखांच्या रिक्त पदांमुळे केंद्रीय मुख्याध्यापकांवर अतिरिक्त भार !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2021 04:25 IST

किनगाव : प्राथमिक व माध्यमिक शाळांमधील शैक्षणिक गुणवत्ता वाढावी, यासाठी जिल्ह्यामध्ये केंद्रप्रमुखांची १०२ पदे मंजूर असून, सद्यस्थितीत ७३ ...

किनगाव

:

प्राथमिक व माध्यमिक शाळांमधील शैक्षणिक गुणवत्ता वाढावी, यासाठी जिल्ह्यामध्ये केंद्रप्रमुखांची १०२ पदे मंजूर असून, सद्यस्थितीत ७३ पदे रिक्त असल्याने जिल्ह्यातील २९ केंद्रप्रमुखांवर अतिरिक्त कामाचा भार पडला आहे. जिल्ह्यात २५ वरिष्ठ विस्तार अधिकाऱ्यांची पदे मंजूर असून, त्यापैकी १७ कार्यरत आहेत.

अहमदपूर तालुक्यांमध्ये १४ केंद्रप्रमुखांची पदे मंजूर असून, सद्यस्थितीमध्ये २ केंद्रप्रमुख कार्यरत आहेत. तसेच तालुक्यामध्ये पाच शिक्षण विस्ताराधिकारी पदे मंजूर असून, चार पदे रिक्त असल्याने अतिरिक्त पदभार कार्यरत केंद्रप्रमुखांवर पडल्याने कामाचा ताण वाढला आहे.

शाळेमध्ये शासनाचे विविध शैक्षणिक उपक्रम राबविण्यास शिक्षकांना प्रोत्साहित करण्यामध्ये केंद्रप्रमुखांचा महत्त्वाचा वाटा असतो. समुपदेशन करणे, प्रेरणा देणे, प्रोत्साहन देणे, शाळेतील विविध कार्यक्रमांचे अहवाल शासनास सादर करणे, अशी शैक्षणिक कामे केंद्रप्रमुखांना पार पाडावी लागतात.

शिक्षण विस्तार अधिकारी व केंद्रप्रमुख हे गटशिक्षणाधिकाऱ्यांना विविध शाळानिहाय शैक्षणिक माहिती पुरविण्याचे काम करतात.

सद्यस्थितीमध्ये गंगाहिप्परगा व रोकडासावरगाव येथील एकूण दोनच केंद्रप्रमुख कार्यरत असून, पदे रिक्तमध्ये अहमदपूर, नांदुरा, सताळा, चिखली, कोपरा, सांगवी, थोडगा, हिप्पळगाव, शिरुर ता., कुमठा, वळसंगी आणि ढाळेगाव या ठिकाणची केंद्रप्रमुखांची पदे रिक्त आहेत. तालुक्यामध्ये पाच बीट असून, जिल्हा परिषदेच्या १७२ शाळा आहेत, तर इतर खासगी संस्थाही आहेत. तालुक्यामध्ये विस्तार अधिकाऱ्यांची पाच पदे मंजूर असून, चार पदे रिक्त आहेत. हीच परिस्थिती जिल्ह्यातील सर्वच तालुक्यामध्ये आहे. रिक्त पदे त्वरित भरावीत, अशी मागणी होत आहे.

रिक्त पदे भरण्याची मागणी...

विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी शासनाच्या वतीने विविध उपक्रम रावबिले जातात. कोरोनामुळे गेल्या दीड वर्षांपासून शाळा बंदच आहेत. त्यामुळे ऑनलाईन अभ्यास सुरू आहेत. मात्र, तालुक्यात रिक्त असलेल्या पदांमुळे शिक्षक, मुख्याध्यापकांवर अतिरिक्त ताण पडत आहे. त्यामुळे या बाबींचा परिणाम विद्यार्थ्यांवर होत आहे. परिणामी, शिक्षण विभागाने रिक्त असलेली पदे तातडीने भरण्याची मागणी होत आहे. दरम्यान, याबाबत जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाशी संपर्क साधला असता प्रतिक्रिया मिळू शकली नाही.