शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! पालघरमधील मेलोडी फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
2
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
3
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
4
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
5
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
6
Shreyas Iyer : बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
7
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
8
पाकिस्तानात मोठी घडामोड! इम्रान खान तुरुंगातून बाहेर येणार? एकाचवेळी आठ प्रकरणांत मिळाला जामीन 
9
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!
10
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
11
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
12
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
13
Asia Cup 2025 : टीम इंडिया आशिया कप स्पर्धेत पाकविरुद्ध खेळणार का? मोठी माहिती आली समोर
14
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका
15
Nashik House Collapses: नाशकात दुमजली घर कोसळलं, आठ महिलांसह नऊ जण जखमी
16
भारताच्या सीमेवर 'चिनी' पकड मजबूत होतेय? जिनपिंग यांनी तिबेटला दिले 'हे' नवे निर्देश!
17
१ लाखाचे केले १० कोटी रुपये, अनेकदा लागलं अपर सर्किट; एकेकाळी एका रुपयांपेक्षाही कमी होती किंमत
18
सप्टेंबरनंतर देशात अन् राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडतील; अंजली दमानियांचा दावा, म्हणाल्या...
19
रिलायन्समुळे मिळाला आधार; निफ्टी-सेन्सेक्स विक्रमी उच्चांकावर बंद; कोणत्या क्षेत्रात सर्वाधिक वाढ?
20
नजर खाली, काकाचा हातात हात...लग्नासाठी आलेली ५ स्थळे नाकारणारी अर्चना तिवारी घरी कशी पोहचली?

रेणापुरात १४९७ कोरोनाचे ॲक्टिव्ह रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2021 04:21 IST

रेणापूर : शहराबरोबरच तालुक्यातील पानगाव, पोहरेगावात कोरोनाचा संसर्ग वाढला आहे. त्यामुळे नागरिकांना धास्ती बसली आहे. तालुक्यात आतापर्यंत एकूण २ ...

रेणापूर : शहराबरोबरच तालुक्यातील पानगाव, पोहरेगावात कोरोनाचा संसर्ग वाढला आहे. त्यामुळे नागरिकांना धास्ती बसली आहे. तालुक्यात आतापर्यंत एकूण २ हजार ६०९ बाधितांची नोंद झाली असून त्यातील १ हजार ६८ जण उपचारानंतर ठणठणीत झाले आहेत. त्यामुळे सध्या तालुक्यात १ हजार ४९७ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.

रेणापूर शहरापेक्षा ग्रामीण भागात कोरोनाचा प्रादुर्भाव अधिक झाला आहे. तो रोखण्यासाठी आरोग्य विभागाबरोबरच महसूल, पंचायत समिती, पोलीस प्रशासनाकडून जनजागृती करण्याबरोबरच प्रतिबंधात्मक उपाययोजनांवर भर देण्यात येत आहे. मात्र, रस्त्यावर विनाकारण फिरणा-यांची संख्या कमी न झाल्याने संसर्ग वाढतच राहिला. दरम्यान, राज्य शासनाने ब्रेक द चेन अंतर्गत कडक निर्बंध लागू केल्याने आणि त्याची प्रभावीपणे अंमलबजावणी केली जात आहे. नाहक फिरणा-यांवर दंडात्मक कार्यवाही केली जात आहे.

तालुक्यात एकूण ७१ गावे असून त्यापैकी ५७ गावांपर्यंत संसर्ग पोहोचला आहे. हा संसर्ग होऊ नये म्हणून गाव पातळीपर्यंत पोहोचू नये म्हणून दक्षता घेतली जात आहे. तसेच कोविडचा संसर्ग झालेल्यांच्या हायरिस्कमधील व्यक्तींची चाचणी केली जात आहे. तसेच गावात निर्जंतुकीकरण मोहीम राबविण्यात येत आहे. गावाबाहेरील व्यक्तींची चाचणी केली जात आहे. कडक नियमांची अंमलबजावणी केली जात आहे. घरोघरी जाऊन लसीकरणविषयी जनजागृती केली जात आहे. नियमांचे पालन करण्यासाठी नागरिकांना सातत्याने आवाहन करण्यात येत आहे.

घरोघरी जाऊन संशयितांचा शोध...

आशा स्वंयसेविकांमार्फत कोरोनाची लक्षणे असणा-या व्यक्तींचा घरोघरी जाऊन शोध घेतला जात आहे. त्यांचे शरीरातील ऑक्सिजन तपासण्यात येत आहे. गावोगावी आराेग्य कर्मचारी रुग्णांची तपासणी करीत आहेत. प्राथमिक आरोग्य केंद्रात तपासणी करुन बाधितांना कोविड केअर सेंटरला दाखल केले जात आहे. ग्रामपंचायत, नगरपंचायतीकडून जनजागृती करण्यात येत आहे.

- डॉ. नारायण देशमुख, तालुका आरोग्य अधिकारी.

चाचण्यांवर भर...

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्व विभागात समन्वय साधून बाधितांचा शोध घेतला जात आहे. लसीकरण व चाचण्या मोठ्या प्रमाणात केल्या जात आहे. प्रत्येक ग्रामपंचायत, तालुका प्रशासन, आरोग्य विभाग, पंचायत समितीमार्फत जनजागृती केली जात आहे.

- राहुल पाटील, तहसीलदार.

१४ गावांनी कोरोनाला रोखले...

तालुक्यात एकूण ७१ गावे असून त्यापैकी ५७ गावांपर्यंत संसर्ग पोहोचला आहे. १४ गावांनी कोरोनाला वेशीवर रोखले आहे. तालुक्यात एकूण बाधित २ हजार ६०९ झाले असून उपचारानंतर १ हजार ६८ जण बरे झाले आहेत. सध्या १ हजार ४९७ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. आतापर्यंत ४४ जणांचा बळी गेला आहे. होम आयसोलेनमध्ये १०२६, बावची येथील कोविड केअर सेंटरमध्ये ८५, ग्रामीण रुग्णालयात २५ रुग्ण उपचार घेत आहेत.

रेणापूर १८०, पानगाव १५६, पोहरेगाव १५०, मुसळेवाडी ४०, रामवाडी २५.